दोहा
मूल (दोहा)
राम रूपु भूपति भगति ब्याहु उछाहु अनंदु।
जात सराहत मनहिं मन मुदित गाधिकुलचंदु॥ ३६०॥
अनुवाद (हिन्दी)
गाधिकुलातील चंद्रमा विश्वामित्र मोठॺा आनंदाने श्रीरामचंद्रांचे रूप-लावण्य, राजा दशरथांची भक्ती, चारी भावांचा विवाह आणि सर्वांचा आनंद-उत्साह यांची मनातल्या मनात वाखाणणी करीत जात होते.॥ ३६०॥
मूल (चौपाई)
बामदेव रघुकुल गुर ग्यानी।
बहुरि गाधिसुत कथा बखानी॥
सुनि मुनि सुजसु मनहिं मन राऊ।
बरनत आपन पुन्य प्रभाऊ॥
अनुवाद (हिन्दी)
वामदेव आणि रघुकुलाचे गुरू ज्ञानी वसिष्ठ हे पुन्हा एकदा विश्वामित्रांची कथा वर्णन करून सांगू लागले. मुनींचे सुयश ऐकून त्यांची कृपा लाभल्यामुळे राजांना मनोमन आपल्या पुण्याईचा प्रभाव जाणवला.॥ १॥
मूल (चौपाई)
बहुरे लोग रजायसु भयऊ।
सुतन्ह समेत नृपति गृहँ गयऊ॥
जहँ तहँ राम ब्याहु सबु गावा।
सुजसु पुनीत लोक तिहुँ छावा॥
अनुवाद (हिन्दी)
आज्ञा झाल्यावर सर्व लोक परतले. राजा दशरथसुद्धा पुत्रांसह राजमहालात परतले. जिकडे-तिकडे सर्वजण श्रीरामचंद्रांच्या विवाहाची गाथा गात होते. श्रीरामचंद्रांची पवित्र सुकीर्ती त्रैलोक्यात पसरली.॥ २॥
मूल (चौपाई)
आए ब्याहि रामु घर जब तें।
बसइ अनंद अवध सब तब तें॥
प्रभु बिबाहँ जस भयउ उछाहू।
सकहिं न बरनि गिरा अहिनाहू॥
अनुवाद (हिन्दी)
श्रीरामचंद्र विवाह करून घरी आल्यापासून सर्व प्रकारचा आनंद अयोध्ये-मध्ये येऊन निवास करत होता. प्रभू रामांच्या विवाहामध्ये जसा आनंद व उत्साह उसळला होता, त्याचे सरस्वती व सर्पराज शेष हे सुद्धा वर्णन करू शकणार नाहीत.॥ ३॥
मूल (चौपाई)
कबिकुल जीवनु पावन जानी।
राम सीय जसु मंगल खानी॥
तेहि ते मैं कछु कहा बखानी।
करन पुनीत हेतु निज बानी॥
अनुवाद (हिन्दी)
श्रीरामांची कीर्ती ही कविकुलाचे जीवन पवित्र करणारी व मांगल्याची खाण समजून मी आपली वाणी पवित्र करण्यासाठी थोडीशी वर्णन करून सांगितली आहे.॥ ४॥
छंद
मूल (दोहा)
निज गिरा पावनि करन कारन राम जसु तुलसीं कह्यो।
रघुबीर चरित अपार बारिधि पारु कबि कौनें लह्यो॥
उपबीत ब्याह उछाह मंगल सुनि जे सादर गावहीं।
बैदेहि राम प्रसाद ते जन सर्बदा सुखु पावहीं॥
अनुवाद (हिन्दी)
स्वतःची वाणी पवित्र करण्यासाठी तुलसीने श्रीरामांची कीर्ती वर्णन केली आहे. तसे पाहिले तर श्रीरघुनाथांचे चरित्र हा अपार समुद्र आहे. कोणता कवी तो पार करू शकेल? जे लोक श्रीरामांच्या मुंज व विवाह या मंगलमय उत्सवांचे वर्णन आदराने ऐकून गात रहातील, ते श्रीसीतारामांच्या कृपेने सदा सुख प्राप्त करतील.
सोरठा
मूल (दोहा)
सिय रघुबीर बिबाहु जे सप्रेम गावहिं सुनहिं।
तिन्ह कहुँ सदा उछाहु मंगलायतन राम जसु॥ ३६१॥
अनुवाद (हिन्दी)
श्रीसीता व श्रीरामचंद्र यांचा विवाह-प्रसंग जे लोक प्रेमाने गातील, ऐकतील, त्यांच्याकरिता सदा उत्साह-आनंदच आहे, कारण श्रीरामचंद्रांची कीर्ती ही मांगल्याचे धाम आहे.॥ ३६१॥