[[सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि Source: EB]]
[
मुंबाईइलाखा व मध्यप्रांत वहाडसरकारनेंशलांत
लायब्रयांकरितां मंजूर केलें आहे
———————————————————————————————————————————
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
———————————————————————————————————————————
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723033465Screenshot2024-08-07175352.22132.png"/>
संपादक व भाषांतरकार
विष्णु विनायक परांजपे, पेण
——————
प्रकाशक
केशव भिकाजी दवले, गिरगांव—मुंबई
आवृत्ति तिसरी
——————
चैत्र शके१८५४ सन १९३२
—————————————————————————————————————————————
मुद्रक
—एस. व्ही. परुलेकर,
मुंबईवैभव प्रेस, सर्ब्हंट्स ऑफ इंडिया
सोसायटीज बिल्डिंग, गिरगांव–मुंबई
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723034156Screenshot2024-08-07180528.8888.png"/>
प्रकाशक**—केशव भिकाजी ढवले, (रामचंद्र बिल्डिंग)**
गिरगांव, मुंबई
——————
(सर्व हक्कप्रकाशकाचेस्वाधीन)
—————————————————————————————————————————————
प्रस्तावना
श्रीयोगवासिष्ठ हा वेदान्ताचा प्रसिद्ध ग्रंथ आहे, वसिष्ठ महर्षीनीं रामाला केलेलाउपदेश आद्यकवि वाल्मीकि यांनीं आपल्या प्रासादिकः बाणीनेंयामध्येंबर्णिलाआहे. या ग्रंथाचीं मुख्य प्रकरणें३२ हजार आहे. यांतीलनिवडक ५०८ संस्कृत सुभाषितवचनें प्रस्तुत पुस्तकांतघेतलीं आहेत आणि वचनांच्याखालीं मराठी भाषान्तर दिलें आहे. वचनें वर्णक्रमानें दिलीं अमून शेबटीं मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. बचनांच्या डाबीकडेक्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे, स्थलनिर्देशांतील डाबीकडूनपहिला अंक प्रकरणाचा, दूसरा सर्गाचा व तिसरा श्लोकाचा समजावा, ६ व्या निर्वाण प्रकरणाच्या पूर्वर्धाबद्दल नुसता ६ हा अंक घातलाआहे व उत्तरार्धवद्दल६ उ.असा निर्देश केला आह, मूचीमध्येंपर्याय शब्द व संबंध असलेले शब्द मुख्य शब्दाच्या पोटांत दिले अमून् विषयापूढील अंक है बचनांचे क्रमांक आहेत, श्लोक वत्याचेंभाषपान्तर एकाच पृष्ठांत परेंहोईल आणि ओलीच्या शेवटींअपुरा शब्द येणार नाहीं अशीव्यवस्था छापतांना केली आहे,
धार्मिक शिक्षण देण्याला हं सुभाषितांचेंपुस्तक उपयोगीं पडतें, असा पुष्कल पालकांचा व शिक्षकांचा अनुभव आहे, हीं सुभाषितें सर्वांच्या वाचनांत येवोत, अशीश्रीरामप्रभूची प्रार्थना करून प्रस्तावना संपवितों.
चैत्रशके १८५४
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723035447Screenshot2024-08-07182637.77477.png"/>
——————
श्रीयोगवासिष्ठांसिष्ठांतील प्रकरणांचीं नावें
——————
१ वैराग्य
२ मुमुक्षुव्यवहार
३ उत्पत्ति
४स्थिति
५ उपशम
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723046832Screenshot2024-08-07213646.66.png"/>
——————
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723047850Screenshot2024-08-07214141.111.png"/>
यतः सर्वाणि भुतानि प्रतिभान्ति स्थितानि च।
यत्रैवोपशमं यान्ति तस्मैसत्यात्मने नमः॥
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723047870Screenshot2024-08-07214403.33.png"/>
१ अकृत्रिमं सुखं कोर्तिमायुश्र्चेवाभिवाञ्छता।प्र०स०श्लो०
सर्वाभिमतदानेन पूजनीया गुणान्विताः॥३।७७।२६
स्वाभाविक सुख, कीतिं आणि आयुष्य ह्यांची इच्छा करणाय्यामनुष्यानें सर्वाना मान्य अशादानाच्या योगनें गुणिजनांचा सत्कार करणे योग्य आहे.
२ अकृत्रिमफल त्यक्त्वा यः कृत्रिमफलं व्रजेत्।
त्यक्त्वास मन्दारवनं कारञ्जं याति काननम्॥६।२९।१२६
जो स्वाभाविक फलसोडून कृत्रिम फठ्टाच्या मागें लागतो, तो स्वर्गांतील मंदोरिवन सोडून कडू करंजाच्या वनांत जातोअसें समजावें.
३ अजितात्मा जनो मूढो रूढो भोगैककर्दमे।
आपदां पात्रतामेति पयसामिव सागरः॥६उ.।३३।२२
ज्याप्रमाणें पाणीरोवटींसम॒द्रालाजाऊन मिलतें, त्याप्रमाणें आत्मसंयमन न करणास्या व भोगरूपी चिखलांत रुतून गेलेल्यामूढ मनुष्याला सर्वआपत्ति प्राप्त होतात.
४ अज्ञतातज्ज्ञते पूर्वं वक्तुर्निणीय कार्येतः।
यः करोति नरः प्रश्नं प्रच्छकः स महामतिः॥२।११।४७
व्यवहारावरून वक्ता तज्ज्ञ आहे किंवा नाहीं, याचा प्रश्न करण्यापूर्वीं विचार करून नंतर जा मनुष्य प्रश्नकरितो तो मोठाबुद्धिमान होय.
५ अज्ञस्पार्धप्रबुद्धस्य सर्वं ब्रह्मेति यो बदेत्।
महानरकजालेषु स तेन विनियोजितः॥४।३९।२४
अगदीं अज्ञअसलेल्या व अर्धवट ज्ञान झालेल्य शिष्याला ‘हेसर्वब्रह्मआहे’असा बोध जो गुरू कारितो तो त्या शिष्याला महानरकांतच लोटतो
६ अज्ञानमपि नास्त्येव प्रेक्षितंयन्न लभ्यते।
विचारिणा दीपवता स्वरूपं तमसो यथा॥६उ.।५७।५
ज्याप्रामाणेंदिवा घेऊन अंधकाराचा शोध करणाय्याला अंधकार कधींही दिसावयाचा नाहीं, त्याप्रमाणें विचारपूवंक पाहणारास अज्ञाने देखीलनाही, असे दिसुन येईल.
७ अज्ञोऽपि तज्ज्ञतामेति
शनैः शैलोऽपि चूर्ण्यते
बाणोऽप्येति महालक्ष्यं
पश्याभ्यासविजुम्भितम्॥६उ.।६७।२६
(विद्याधरी वसिष्ठानां म्हणते) अभ्यासाचा म्हणजे पुनः पुनः एखादी गोष्ट केल्याचा परिणाम पहा. या. अभ्यासानें अज्ञ देखील तज्ज्ञ होतो,हलूहलूपर्वताचेंही चूर्ण अभ्यासानें होतो, आणि अचेतन असलेला बाण देखील घनुर्धराच्या अभ्यासामुलेंच सूक्ष्म लक्ष्याचा वेध करूं शकतो.
८ अत उक्तं मया राम यदि शुद्धे हि चेतसि।
उपदेशः प्रसरति तैलबिन्दुरिवाम्भसि॥ ६उ.।१६।४
(श्रीवसिष्ठम्हणतात ) हे रामा, मीं असेंम्हटलें आहे कीं, पाण्यामध्यें पडलेलातेलाचा थेंव जसा सहज पसरतो, तसा शुद्ध अन्तःकरणाच्या शिष्याला केलेला उपदेश तत्काल ठसतो.
९ अतज्ज्ञायैव विषया स्वदन्ते न तु तद्विदः।
न हि पीतामृतायान्तः स्वदते कटु काञ्चिकम्॥६उ.।४५।४०
तत्त्व न जाणणाण्यापुरुषालाच विषय आवडतात, तत्त्ववेत्त्यालाकधींही आवडत नाहींत. कारण अमृतपिऊन तृप्त झालेल्यालाकडू कांजी पिण्याचीइच्छाच होणार नाहीं.
१० अत्राहारार्थंकर्मकुर्यादनिन्द्यं
कुर्यादाहारं प्राणसंधारणार्थम्।
प्राणाः संधार्यस्तत्त्वजिज्ञासनार्थं
तत्त्वंजिज्ञास्यं येन भूयो न दुःखम्॥६उ.।२१।१०
मुमुश्चु पुरुषानें या लोकीं आहारासाठीं निद्यं कर्मकरूं नये आहार प्राणधारण होण्यासाठीं। करावा. तच्वजिज्ञासेकरितांच प्राणांचें धारण करावें व ज्याच्या ज्ञानानें पुनः दुःख उत्पन्न दोण्याचा प्रसंग येणार नाहीं, तेंच तत्त्व जाणण्याची इच्छा करावी।
११ अथापदंप्राप्य सुसंपदं वा
महामतिः स्वप्रकृतं स्वभावम्।
जहाति नोमन्दरवेल्लितोऽपि
शौक्ल्यं यथा क्षीरमयाम्बुराशि॥५।९३।९८
ज्याप्रमाणें मंदरपर्वताच्या योगांने घुसलला जाणारा क्षीरसागर आपलाशुभ्रपणा सोडीत नाही, त्याप्रमाणें महाबुद्धिमान् पुरुष आपत्कालीं किंवासंपत्कालीआपला मूलस्वभाव सोडीत नाहीं.
१२ अदर्शितमुखाएव दुजेना मर्मवेधिनः॥३।७०।३०
दुष्टमनष्येंनेहमीं आपले तोंड लपवून दसण्याच्या मर्मावर घाव घालीत असतात.
१३ अद्यैव कुरु यच्छ्रेयोवृद्धः सन्किंकरिष्यसि।
स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये॥६उ.।१६२।२०
आजच आपलें कल्याण करून घे. तुंवृद्ध झाल्यावर काय करूं शाकणार? कारण वद्धापकालीआपलीं गात्रेंच आपणांला भारभूत होत असतात.
१४ अद्यैव न चिकित्सां यः करोति मरणापदः।
संप्राप्तायां मृतौमूढः करिष्यति किमातुरः॥६उ.।१०३।३८
मरणरूपी आपत्तीची चिकित्सा जोमूढ मनुष्य आजच्या आज करीत नाही, तो, मरणकालप्राप्त झाला असतां, पीडित झाल्यावर काय करू शकेल?
१५ अनन्तं समतानन्दं परमार्थं विदुर्बुधाः।
स येभ्यः प्राप्यते नित्यं ते सेव्याः शास्रसाधवः २।६।३४
समत्वापासून होणाण्याशाश्वत आनंदाला ज्ञाते लोक परमार्थ म्हणतात. या परमार्थाची प्राप्ति शास्त्र व सत्पुरुष यांच्या योगानें होते, म्हणून निरंतर त्यांची सेवा केलीपाहिजे.
१६ अनन्तमपतृष्णस्य स्वयमेव प्रबर्तते।
ध्यानं गलितपक्षस्य सस्थानमिव भूभृतः॥६उ.।४५।४४
पंख तुटून गेल्यामुलें पर्वत जसा एकाच जागीं स्थिर राहतो, तसेंनिरिच्छ पुरुषाचें (परमेश्वराचे ठिकाणीं) सहजच अखंड ध्यान लागतें.
१७ अनन्ताः पितरो यान्तियान्त्यनन्ताश्च मातरः।
इह संसारिणां पुंसां वनपादपपर्णवत्॥ ५।२०।३३
ज्याप्रमाणें वनामध्यें वक्षावर असंख्य पानें येतात आणि गलून जातात, त्याप्रमाणें या लोकामध्येंसंसारांतील मनुष्यांना अनंत आईबाप प्राप्त होतात व ते निघून जातात.
१८ अनन्तानीह दुःखानि सुखं तणलवोपमम्।
नातः सुखेषु बध्नीयादृष्टि दुःखानुबन्धिषु॥२।१३।२३
या जगांत सुख पहावें तर अत्यंत अल्प आहे, व दुःख पहावें तर अनंत आहे, यासाठीं परिणामींइःख देणाण्या विषयसुखाची आस्था बालागुंनये.
१९ अनहंवेदन सिद्धिरहंबेदनमापदः॥६।९९।१३
‘अहम्’असेंन जाणणें हीच सिद्धि व `अहम्` असें जाणणें ह्याच (सर्व) आपत्ति.
२० अनागतानां भोगानामवाञ्छनमकृत्रिमम्।
आगतानां च संभोग इति पण्डितलक्षणम्॥४।४६।८
अप्राप्त विषयांची इच्छा स्वाभाविक नसणें आणि प्राप्त विषयांचा उपभोग घेणेंहेंपंडिताचेंलक्षण आहे.
२१ अनायासकदर्थिन्या गृहीते जरसा जने।
पलाय्य गच्छति प्रज्ञा सपलत्न्येवाहताङ्कना॥१।२२।५
आयासाववांचून दीन करून सोडणाण्याम्हातारपणाचा पगडा मनुष्यावर बसला म्हणजे त्याची बुद्धि सवतीमत्सरानें रागावलेल्या खीप्रमाणे त्याला सोडून निघून जाते.
२२ अनार्तेन हि संमानो बहुमानो न बुध्यते।
पूर्णानां सरितां प्रावृट्पूरः स्वल्पोन राजते॥४।२३।५४
पाण्यानें नेहमीं भरलेल्या नद्यांना पावसाच्या लहान लदान सरीनीं येणाण्यापुराचें महत्त्व नाहीं, त्याप्रमाणें ज्याला दुःख कधीं माहीत नाही, अशामनुष्याचा सन्मान केला तर त्याला त्याची फारशी किंमत वाटत नाही.
२३ अनित्यं यौवनं बाल्यं शरीरं द्रव्यसंचयाः।
भावाद्धावान्तरं यान्ति तरङ्गनबदनारतम्॥१।२८।१०
वाल्य, तारुण्य, शरीर, द्रव्यसंचय इत्यादि सर्वअनित्य असून समुद्रावरीललाटांप्रमाणेंत्यांची रुपें एकसारखीं पालटत असतात.
२४ अनुद्वेगः श्रियो मूलम्॥३।१११।२२
उद्विग्नन होणें हें संपत्तीचेंमूलहोय.
२५ अनुरक्ताङ्गनालोललोचनालोकिताकृति।
स्वस्थीकर्तुं मनः शक्तो न विवेको महानपि॥१।२६।२८
प्रेम करणाण्यातरुण स्त्रीनें चंचल नेत्रकटाक्ष फेकले असतां मोठा विवेकी पुरुष असला तरी, तो आपलेंमन आवरण्याला समथ होत नाही.
२६ अनेकजन्मनामन्ते विवेकी जायते पुमान्॥६।१२६।४
अनेक जन्मांनंतर पुरुष विवेका होतो.
२७ अन्तकः पर्यवस्थाता जीविते महतामपि।
चरन्त्यायूंषि शाखाग्ररम्बाम्बूनीव देहिनाम्॥६उ।९३।८५
मोठमोठ्यांच्याही जीवितालाग्रासण्यासाठीं यम त्यांच्यामभोंक्तीं धिरट्याघालीत असतो. प्राण्यांचेंआयुष्य शाखाग्रावर लोंबणाय्या जलबिंदुप्रमाणें चंचल आहे.
२८ अन्तनैराश्यमादायः बहिराशोन्मुखेहितः।
बहिस्तप्तोऽन्तरा शीतो रोके विहर राघव॥५।१८।२१
(श्रीवसिष्ठ म्हणतात) है राघवा, आंतून निराश राहा, पण बाहेरून आशावादी असल्यासारखा उद्योग कर. तसेंच (धनाविकांचा नाश झाला असतां ) आंतून शांत रहा, पण बाह्यतः संतप्त असल्याप्रमाणेंवर्तन ठेव.
२९ अन्तःशीतलता या स्यात्तदनन्ततपःफलम्॥५।५६।९
अन्तःकरण शांत असणें, हैं अनेंत तपांच फलहोय.
३० अन्तस्तृष्णोपतप्तानां दावदाहमयं जगत्।
भवत्यखिलजन्तूनां यदन्तस्तद्बहिःस्थितम्॥५।५६।३४
तृष्णमुलें अन्तःकरण संतप्त झालेल्या लोकांना हें जग वणवा लागल्यासारखेंदिसतें. कारण, जेंमनृष्याच्या मनांत असतें, तें च त्याच्या दृष्टीला बाह्य जगांत दिसतें.
३१ अन्तःसंसक्तिरेवैकं कारणं बन्धमोक्षयोः॥५।६७।३४
अन्तःकरणाची आसक्ति असणें व नसणें हेंच (अनुक्रमें) बंध आणिमोक्ष यांचें मुख्य कारण होय.
३२ अन्तःसंत्यक्तसर्वाशो वीतरागो विवासनः।
बहिःसर्वसमाचारो लोके विहर राघव॥५।१८।१८
(श्रावसिष्ठम्हणतात) है राघवा, अन्तःकरणंतीलसर्व आशा, विषयप्रेम व वासना यांना पार झगारून दे, आणि वाह्यतः सर्वलोकव्यवहार करीत जा.
३३ अन्तःसारतया कार्यं लघवोऽप्याप्नुवन्ति हि ३
।७२।१९
क्षुद्र मयष्येंदेखीलआपलें कार्य अन्तःकरणाच्या दृढ निश्चयाच्या सामर्थ्यामुलेंपार पाडतात.
३४ अन्नभूता हि महतां लघवो यत्नशालिनाम्।
यथेष्टं विनियोज्यन्ते तेन कर्मसु लोष्टवत्॥२।६।१३
दैववादी दुबलेलोक उद्योगी बलिष्ठलोकांच्या सक्ष्यस्थानीं पडतात. मातीच्या ढेकलानां तुडवुन वाटेलतसा आकार देतां येतो, त्याप्रमाणेंप्रयत्न करणारे लोक आपल्या कार्यामध्यें दुबल्या आव्ठशी लोकांचा वाटेल तसा उपयोग करून घेतात.
३५ अपरीक्ष्य च यः शिष्यं प्रज्ञास्त्यतिविमूढधीः।
स एव नरकंयाति यावदाभूतसंप्लवम्॥४।२९।२६
शिष्याची परीक्षा न करतां जो अत्यंत मंदबुद्धि गुरू त्याला ज्ञानोपदेश करितो, तो चिरकालनरकवासाचेंदुःख भोगितो.
३६ अपश्यन्काष्टरन्ध्रस्थवृषणाक्रमणं यथा।
कीलोत्पाटी कपिर्दुःखमेतीदं हि तथा मनः॥३।९९।४१
ज्याप्रमाणं लाकडाच्या फटींत वृषण सांपडेलयाचा विचार न करतां ( लाकडांत ठोकलेली ) पाचर उपटणाण्या वानराला दुःख होते, त्याप्रमाणें (अधिचारानें चागणास्या) या मनाला दुःख होतें.
६७ अपि कष्टतरां प्राप्तैदेशां विवशतां गतैः।
मनागपि न संत्याज्या मानवेः साधुसंगतिः॥२।१६।८
कसत्याही प्रकारची कष्टदशा प्राप्त होऊन मनुष्य विव्हल झाला, तरी त्यानें सत्संगाचात्याग क्षणभरही करूं नये.
६८ अपि जीवितदानेन गुणिनं परिपालयेत्।
गुणवत्संगमौषध्या मृत्युरप्येति मित्रताम्॥३।७७।२८
गुणिजनांच्या रक्षणासाठींप्रत्यक्ष जीवितावर पाणी सोडण्याचा प्रसंग आला तरी, त्याला माघार घेतां कामा नये, कारण गुणिजनांच्या समागमरूपी औषधीमुलें प्रत्यक्ष मृत्युसुद्धां मित्र बनत असतो.
३९ अपि पोरुषमादेयं शास्रं चेद्युक्तिबोधकम्।
अन्यत्वार्षमपि त्याज्यं भाव्यंन्याय्यैकसेविना॥२।१८।२
युक्तिबोधकरणारें शास्त्र एखाद्या सामान्य पुरुषानें केलेलें असलें तरी तें ग्राह्य आहे. परंतु एखाद्या प्राचीन ऋषीनें केलेलेंही शास्त्रयुक्तिशुन्य असले, तर न्यायी मनुष्यानें त्याचा त्याग करणेच उचित आहे.
४० अपि मेरुसमं प्राज्ञमपि शूरमपि स्थिरम्।
तृणीकरोति तृष्णैका निमेषेण नरोत्तमम्॥१।१७।५०
एखादा मनुष्य मेरूप्रमाणें अढव्ठ, विद्वान, शूर आणि स्थिर बुद्धीचा असला तरी त्याला, तृष्णा क्षणामध्यें तुणाप्रमाणें तच्छ करून सोडते.
४१ अपि शुरा अतिप्राज्ञास्ते न सन्ति जगत्त्रये।
अविद्यया ये परुषा न नाम विवशीकृताः॥४।४१।३७
अविद्येच्या तडाक्यांत सांपडला नाहींअसा शूर किंवा महाबुद्धिमान पुरुष त्रिभ्रुवनांतहीविरला.
४२ अपूर्वह्लददायिन्य उच्चेस्तरपदाश्रयाः।
अतिमोहापहारिण्यः सुक्तयो हि महीयसाम्॥५।४।५
थोर परूषांच्या सक्ति अपूर्बआल्हाद देणान्या, अत्युच्चपाटाला पोंचविणाय्याजाणिअनथकारक मोहघालविणान्या असतात.
४३ अपेक्षैव घनो बन्ध उपेक्षैव विभुक्तता॥६उ.।२६।३६
(विषयांची) अपेक्षा हाच दृढवंध होय. आणि उपेक्षा. हाच माक्ष होय.
४४ अप्यब्धिपानान्महतः सुमेरून्मूलनादपि।
अपि वह्लयशनात्साधो विषमश्चित्तनिग्रहः॥१।१६।२४
(राम विश्वामित्रांना म्हणतो) हे साधो, समद्र पिऊन टाकणें, मरुपर्वत उपटून काढणें किंवाअग्निमक्षण करणें यांच्यापेक्षांही चित्ताचा निग्रह करणें हेंजास्त कठीण आहे.
४५ अप्यापदि दुरन्तायां नैव गन्तव्यमक्रमे॥४।३२।३९
केवढेंहीअनिवार संकट कोसव्ठलें तरी सन्मार्गसोडून. जाऊं नये.
४६ अप्राप्तकारिणं भूपं रोधयन्ति च वैप्रजाः॥६।८४।२७
प्रजा प्राप्त झालेलें कर्तव्य न करणाय्याराजाचें निवारण करितात.
४३ अबन्धुर्बन्धुतामेति नैकट्यभ्यासयोगतः।
यात्यनभ्यासतो दूरात्स्नेहोबन्धुषु तानवम्॥६उ.।६७।२९
(नेहमींच्या सहवासामुलेंजो आप्त नसतोतोहीआप्त होतो, आणि प्रत्यक्ष बंधु असून तो निरंतर दूर राहिल्यास स्नेहसंबंध कमी होऊन परक्याप्रमाणें भासतो.
४८ अभ्यासभास्वति तपत्यवनौवने च
वीरस्य सिध्यति न यन्न तदस्ति किंचित् ।
अभ्यासतो भुविभयान्यभयीभवन्ति
सर्वासु पर्वतगुहास्वपि निर्जनासु॥६उ.।६७।४५
(जितेंद्रिय) वीर पुरुषाचा अभ्यासरूपी सूर्य प्रकाशमान होत असतांना भूमि, जल आणि (अंतरिक्ष) यांतील कोणतीही वस्तूत्याला प्राप्त करून घेतां येत नाहीं अशी नाहीं. इतकेंच नव्हे, तर प्रथ्वीवर कोणत्याहीनिर्जन पर्वतगहेंतील (व्याघ्रसर्पादि) भयंकर प्राणीहीअभ्यासामूलें त्यालाभय उत्पन्न करू शकत नाहींत.
४९ अभ्यासेन कटुद्रव्यं भवत्यभिमतं मुने।
अन्यस्मैरोचते निम्बस्त्वन्यस्मैमधु रोचते॥६उ.।६७।२८
(विद्याधरी श्रीवसिष्ठांना म्हणते) हे मुने, अभ्यासानें कडू पदार्थही गोड वाटूलागतो. एखाद्याला मध आवडतो, तर एखाद्याला अभ्यासामुलें कडूलिंबच आवडतो.
५० अम्लं मधुरसासिक्तं मधुर मधुरञ्जितम्।
बीजंप्रतिविषाकल्कसिक्तं च कटु जायते॥४।३५।२९
चिंचेच्या झाडाला मध, साखर इत्यादि पदार्थोचेंखत घातलें तर त्या चचेच्या झाडावर येणाण्याचिंचा गोड होतात परंतु चिचेला धोतरा, करंज यांच्या रसांचें खत घातल्यास त्याच चिंचा कडूनिपजतात. (असा वनस्पतिशास्त्राचा नियम आहे.)
५१ अयं बन्धुरयं नेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु विगतावरणैव धीः॥५।१८।६१
‘हा माझाबंधुआहे’, आणि ‘हा माझा बंधुनाहीं? ही विचारसरणी क्षुद्र पुरुषांच्या ठिकाणीं असते. परंतु श्रेष्ठ आचरणाच्या महात्म्यांच्या बुद्धीवरील संकुचित भावनेचें आवरण नाहींसें होऊन त्यांची बुद्धि सर्वत्रसम झालेली असते.
५२ अयोऽयसि च संतप्तेशुद्धे तप्तंतुलीयते॥४।१७।२९.
(लोखंडाचे दोन तुकडे एकत्रठेवल्यानें एकमेकांत मिसलत नाहीत, परंतु कांहीक्षार टाकून) शुद्ध केलेलेआणि तापवून मऊ झालेले तेच तुकडे एकमेकांत पूर्णपणं मिसलतात,
५३ अर्थिनां यन्निराशत्वं सत्तमेऽभिभवो हि सः॥१।७।१०
आपल्याकडे याचना करण्यासाठींआलेल्यामनुष्याची निराशा होणेंह सत्पुरूष लांछन समजतात.
५४ अर्धं सज्जनसंपर्कादविद्याया विनश्यति ।
चतुर्भागस्तु शास्त्रार्थैश्चतुर्मागं स्वयत्नतः॥६उ.।१२।३७
सज्जनांच्या सहवासानें अर्धी अविद्या नष्ठ होते. चतुर्थांश अविद्या शास्रविचारानेंजाते. राहिलेला चवथा भाग आपल्या प्रयत्नानेंघालवितां येतो.
५५ अलब्धज्ञानदृष्टीनां क्रिया पुत्र परायणम्।
यस्य नास्त्वम्बरं पट्टंकम्बलं किंत्यजत्यसौ॥६।८७।१७.
(ब्रह्मदेव कुंभालाम्हणतो) हे पुता, ज्यांना ज्ञानदृष्टि प्राप्त झाली नाही, त्यांना कमे हेंच मुख्य साधन आहें ज्याचेपाशीं उंची वस्त्र नाहीं त्यानेंआपल्याजवलचा कांवला टाकून देणेंयोग्य होईलकाय?
५६ अवश्यभाव्यस्तमयो जातस्याहतेरिव॥४।४८।२७
सूर्याचा उदय झाला म्हणजे त्याचा अस्त व्हावयाचा हा नियम जसा ठरलेला आहे, तसा जो प्राणी जन्मास आला तो केव्हांतरी मरणारच.
५७ अविरुद्धैव सा युक्तिर्ययापदि हि जीव्यते॥३।६८।१२
आपत्तीमध्यें वाटेल ती युक्तिं योजून जिवंत राहणें ही गोष्ठ शास्त्राला केव्हांही संमतच आहे.
५८ अशिष्यायाविरक्ताय यत्किंचिदुपदिश्यते।
तत्प्रयात्यपवित्रत्वं गोक्षीरं श्वदृताविव॥२।२।२१
जें ज्ञान वैराग्य नसलेल्या अयोग्य शिष्याला दिलेंजातें, ते कुत्र्याच्या कातड्याच्या पात्रांत ठेविलेल्या गाईच्या दुधाप्रमाणेंअपवित्रहोतें.
५९ असतः शशशृङ्गादेकारणं मार्गयन्ति ये।
वन्ध्यापुत्रस्य पौत्रस्य स्कन्धमासादयान्ति ते॥६उ.।२२।९
सशाच्या शिंगासारख्या मुलीच नसलेल्या वस्तूंचेंमूल जे शोघीत बसतात, ते वन्ध्येच्या मुलाच्या नातचाच्या खांद्यावर बसतात असेंच म्हटलें पाहिजे!
६० असतामपि संरूढं सैहार्दंन निर्वतते॥३।८२।४७
दुष्टांरांच्याही अंतःकरणांत एकदां प्रेम दृढझालें, म्हणजे तें नाहींसें होत नाहीं.
६१ असत्यभूतं तोयान्तश्चन्द्रव्योमतलादिकम्।
बाला एवाभिवाञ्छन्तिमनोमोहाय नोत्तमाः॥४।४५।४७
पाण्यामध्यें पडलेलें चंद्राचें किंवाआकाशाचें असत्य प्रतिबिंब धरण्याचा मोह अज्ञ मुलांना पडतो, परंतु ज्ञात्या पुरुषाला असा मोह कधींही उत्पन्न होणार नाहीं.
६२ अस्माच्छास्रवराद्बोधा जायन्ते ये विचारितात्।
लवणैर्व्यञ्जनानीव भान्ति शास्त्रान्तराणि तैः॥६उ.।१६३।५४
मिठाच्या योगानें चटणी, माजी यांना जशीरुचि येते, त्याप्रमाणें या सुख्य शास्त्राच्या (योगवासिष्ठाच्या) विचारानें होणाण्याज्ञामामुलें इतर शास्त्रेंसहज समजतात.
६३ अहंकारघने शान्ते तृष्णा नवतडिल्लता।
शान्तदीपश्चिखावृत्त्याक्वापि यात्यतिसत्वरम्।१।१५।१३
अहंकाररूपी मेघ एकदां नाहींसा झाला, म्हणजे तृष्णारूपी वीज विझलेल्यादिव्याच्या ज्योतीप्रमाणे कोठेंनाहींशी होते तेंही समजत नाहीं.
६४ अहंकारानुसंधानवर्जनादेव राघव।
पौरुषेण प्रयत्नाच्च तीर्यते भवसागरः॥४।३३।७०
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, मोठ्याप्रयत्नानें आणि धैर्यानें अहंकारालादद्दपार कर, म्हणजे तूंभवसागर तरून जाशील.
६५ अहंकाराम्बुदे क्षीणे दृश्यते चिद्दिवाकरः॥५।६४।४५
अहंकाररूपी मेघ दूर झाला म्हणजे चैतन्यरूपी सूर्याचें दर्शन होतें.
६६ अहमित्येव बन्धाय नाहमित्येव मुक्तये॥६उ.।२५।२०
देहादिक ‘मी आहें’असें मानणें हा बंध, व वेहादिक ‘मी नाहीं? असं मानणेंहाच मोक्ष.
६७ अहो नु चित्रा मायेयं तता विश्वविमोहिनी।
असत्यैवापि सद्रूपा मरुभूमिषुवारिवत्॥६।६३।७
खरोखर विश्वाला मोह पाडणारी ही विचित्र माया पसरली आहे! ही असत्य आहे, तथापिं निर्जल प्रदेशावर भासणाण्यामृगजलप्रमाणें सत्यच आहेअसेंवाटतें.
६८ अहो बत दुरुच्छेदाः प्राणिनां स्नेहवागुराः॥३।४ ३।४८
प्राण्यांना बद्ध करणारे स्नेहपाशतोडून टाकणें खरोखर अतिशय कटीण आहे '
६९ अहो मोहस्य माहात्म्यं
यदयंसवेदुःखहा।
चन्तामणिर्विचाराख्यो
हृत्स्थोऽपि त्यज्यते जनैः॥ ६उ.।१।१२
केवढेहोहैं माहाचेंमाहात्म्य! कीं लोक आपल्याहृदयांत असलेलया सब दुःखांचा नाश करणाण्या विचार नांवाच्या चिंतामणीला टाकून देतात.
७० आज्ञाचरणमेवाहुर्मुख्यमाराधनंसताम्॥६।२३।४
सञ्जनांच्या आज्ञेप्रमाणें वर्तन ठेवणेंहेंच त्यांचेंमुख्य आराधन आहे.
७१ आत्मज्ञानं विदुज्ञानं ज्ञानान्यन्यानि यानि तु।
तानि ज्ञानावभासानि सारस्यानवबोधनात् ६उ.।२१।७
आत्मज्ञानं हेंच खरें ज्ञान असून बाकीचीं ज्ञानें हीं खरीं ज्ञाने नाहींत. कारण, त्यांच्या योगानें मुख्य तत्त्व कलत नाहीं.
७२ आत्मवत्सर्वभूतानि परद्रव्याणि लोष्टवत्।
स्वभावादेव न भयाद्यः पश्यति स परयति॥५।५६।४९
जो भयामुलें नव्हेतर स्वभावतःच सर्व भूतांना आपल्याप्रमाणे मानतो आणि परद्रव्यालामातीच्या ढेकलाप्रमाणेंसमजतो, तोच खरा तत्त्ववेत्ता होय.
७३ आत्मीयेष्वर्थजातेषु मिथ्यात्मसु सुतादिषु।
बुद्धुदेष्विव तोयानां न स्नेहस्तक्तदर्शिनाम्॥६उ.।१०२।१६
पाण्यावरील बुडबुड्यांप्रमाणेंमिथ्या असलेल्या आपल्या धनपुत्रादिकांचे ठिकाणीं तत्त्ववेत्त्यांची आसक्ति नसते.
७४ आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥६उ.।१६२।१८
प्रत्येक मनुष्य आपणच आपला हितकर्ता होतो व अहितकर्ताही होतो.
७५ आत्यन्तिकी विरसता यस्य दृश्येषु दृश्यते।
स बुद्धो नाप्रबुद्धस्य दृश्यत्यागे हि शक्तता॥६उ.।४५।३६
ज्याच्या ठिकाणीं दृश्य वस्तविषयीं पूर्णपणेंवैराग्य असेल तोच ज्ञानी, असेंजाणावें. कारण अज्ञ पुरुषाला दृश्य वस्तूंचा त्याग करण्याचेंसामर्थ्यनसतें.
७६ आदावन्ते च यन्नास्ति कीदृशी तस्य सत्यता।
आदावन्ते च यन्नित्यं तत्सत्यं नाम नेतरत्॥५।५।९
जेंपूर्वकालींआणि उत्तरकालीनाहीतें मधल्याकालांत तरी सत्य कसेंअसणार? जं सर्वदा (तिन्दी कालांत) असते, तेंवास्तविक सत्य होय, त्यावांचून दुसरें सत्य असणें शक्य नाहीं.
७७ आदावेव हि नोत्पन्नं यत्तस्येहास्तिता कुतः।
कुतो मरौ जलसरिद्द्वितीयेन्दौ कुतो ग्रहः॥
जं आरभींउत्पन्नच झालेलेंनाहीं त्याला अस्तित्व कोटुन असणार? रखरखीत वालबंटांत भासणारीनदी आणि दृष्टिदोषामुलेंआकाशांत भासणारा दुसरा चंद्र यांचेंअस्तित्व कसेंबरेंस्वीकारलेंजाईल?
७८ आदौशमदमप्रायैर्गुणैःशिष्यं विशोधयेत्।
पश्चात्सर्वमिदं ब्रह्म शुद्धस्त्वमिति बोधयेत्॥४।३९।२३
शिष्याची बुद्धि प्रथम शमदमादि गुणानींचांगली शुद्ध करावी, नंतर ‘हेंसर्वजग ब्रह्म आहे’आणि ‘तुंहीशुद्ध ब्रह्मच आहेस` असा उपदेश करावा.
७९ आनन्दायैव भूताति यतन्ते यानि कानिचित्॥६।१०८।२०
कोणताही प्राणी सखासाठींच यत्न करीत असतो.
८० आपतन्ति प्रतिपदं यथाकालं दहन्ति च।
दुःखचिन्ता नरं मूढं तृणमग्निशिखा इव॥२।११।४०
अग्नीची ज्योत गवताला जालुन टाकते त्याप्रमाणें दुःख आणि चिंता यांचे तडाखे मूढ मनुष्याला पावलोपावली सहन करावे लागतात; व त्याच्या आंगाचा नेहमीं दाह करतात.
८१ आपदः क्षणमायान्ति क्षणमायान्ति सपदः।
क्षणं जन्म क्षणं सृत्युर्मुने किमिव न क्षणम्॥१।२८।३१
(राम विश्वामित्रांना म्हणतो) है मुने, क्षणांत आपात्ति, क्षणांत संपत्ति, क्षणांत जन्म, क्षणांत मृत्यु अशातव्हनें जगांतील कोणती गोष्टक्षणिक नाहीं वरें?
८२ आपदो या दुरुत्तारा याश्चतुच्छाः कुयोनयः।
तास्ता मौर्ख्यात्प्रसुयन्ते खदिरादिव कण्टकाः॥२।१३।१६
खैराच्या झाडापासून कांटे उत्पन्न होतात, त्याप्रमाणें सर्व तम्हेच्या अधम योनि आणि दुस्तर आपत्ति मूर्खपणापासून उत्पन्न होतात.
८३ आपातमात्ररम्येभ्यभोगेभ्यः किमवाप्यते।
सत्सङ्गचिन्तामणितः सवेसारमवाप्यते॥६।२०।३९
वरवर पाहिलें जसतां रम्य वाटमाण्याभोगांपासून काय मिलणार? सत्संगरूप चिंतामणीपासून सर्वांमध्यें श्रेष्ठ असें पद प्राप्त होतें.
८४ आयुः पल्लवकोणाग्रलम्बाम्बुकणभड्गुरम्।
उन्मत्तामिव संत्यज्य यात्यकाण्डे शरीरकम्॥१।१४।१
झाडावरील पानाच्या टोकावर लेंबणाण्यापाण्याच्या थेंबाप्रमाणें आयुष्य क्षणभंगुर आहे. उन्मत्त मनुष्याप्रमाणें जीवित शरीर सोडून भलत्याच वेलींनिधुन जातें.
८५ आयुषः क्षण एकोऽपि सबेरत्नैर्न लभ्यते।
नीयते तद्वृथा येन प्रमादः सुमहानदो॥६उ.।१७५।७८
आयुष्याचा एक क्षण सुद्धां रत्नांच्या राशी दिल्यानेंही मिलणार नाहीं, हेंजर निश्चित आहे, तर आयुष्य व्यर्थ घालविणें हा मोठाबेसावघपणा आहे!
८५ आयुषः खण्डखण्डाश्व निपतन्तः पुनः पुनः।
न कश्चिद्वेत्ति कालेन क्षतानि दिवसान्यहो॥६उ.।९३।५१
कालप्राण्यांच्या आयुष्याचेतुकडे तकडे करून टाकीत असतो. पण प्रत्येक दिवशीं अशा प्रकारेंक्षय पावणारें आयुष्य संपत आहेहें कोणाच्या लक्षांत येत नाहींḷ
८६ आलस्यं यदि न भवेज्जगत्यनर्थः
को न स्याद्वहुधनको बहुश्रुतो वा।
आलस्यादियमवनिः ससागरान्ता
सपूर्णानरपशुभिश्चनर्धनैश्च॥२।५।३०
या जगामध्यें अनर्थकारक आलस नसता, तर प्रत्येक मनुष्य संपात्तिमान आणि विद्वान् झाला असता. परंतु आलसामुलें हीसमुद्रवलयांकित संपूर्ण पृथ्वीनरपशुंनींआणि निर्धन लोकानींभरून गेली आहे.
८८ आशा हि लोहरज्जुभ्यो विषमा विपुला दृढा।
कालेन क्षीयते लोहं तृष्णा तु परिवर्धते॥६।९१।६
आशा ही लोखंडी साखलदंडाहूनअतिशय कठीण व मोठीमजबूत आहे. लोखंड कांहीं कालानें झिज़ून जातें, परंतु आशा मात्र उत्तरोत्तर वाढतच जाते.
८९ आस्थामात्रमनन्तानां दुःखानामाकरं विदुः।
अनास्थामात्रमभितः सुखानामाकरंविदुः॥४।२७।२५
आसक्ति असणें हा केवलअनंत दुःखांचीखाण आहे. आसक्तिनसणेंही स्थिति सर्व सखांची खाण आहे.
९० इच्छोदयो यथा दुःखमिच्छाशान्तिर्यथा सुखम्।
तथा न नरके नापि ब्रह्मलोकेऽनुभूयते॥६उ.।३६।२४
इच्छा उत्पन्न झाल्यानें दःख होतें तसेदुःखनरकांतही होत नाहीं; आणि इच्छा नाहींशी झाली असतां जेंसुख मिलतेंतसेंश्रेष्ठसुखब्रह्मलोकामध्येंही अनुभवाला येत नाहीं.
९१ इच्छापशमनं कर्तुं यदि कृत्स्नं न शक्यते।
स्वल्पमप्यनुगन्तव्यं मार्गस्थो नावसीदति॥६उ.।३६॥३०
सर्वे इच्छा एकदम नाहींशा करणें अशक्य झाल्यास क्रमाक्रमानेंथोडथोड्या इच्छा सोडीत जाव्या. कारण, सन्मार्गनेंजाणारा पुरुष कधींही क्लेश भोगीत नाहीं.
९२ इतो नाभिमताः सर्वे ज्ञस्य भागाः स्वभावतः।
भवन्ति कोऽतितृप्तोहि दुरन्नं किल वाञ्छति॥६।५९।३०
ज्ञानी परूषाला स्वभावतःचकोणताही भोग स्वीकारणें मान्य नसतें. कारण जो मिष्ठान्नानें अतिशय तप्त झाला तो कदन्नाची इच्छा कशी धरील?
९३ इत्युक्तवत्यथ मुनौदिवसो जगाम
सायंतनाय विधयेऽस्तमिनो जगाम।
स्नातुं सभा कृतनमस्करणा जगाम
श्यामाक्षये रविकरेण सहाजगाम॥२।५।२२
(श्रीवाल्मीकिभरद्वाजाला म्हणाले) वसिष्ठ मुनींनीं अशा तव्हचेंभाषण केल्यानंतर सभ्याकालझाली व सूर्य अस्तास गेला. तव्हां सभेतीलमुनि वसिष्ठमुनीना नमस्कार करून सायंकालचीं स्नानसंध्यादि विहित कर्में करण्यासाठीं निधून गेले, आणि रात्र संपल्यानंतर (पुन्हां दुसण्यादिवशीं) सूर्याच्या किरणांबरोबर वसिष्ठमुनींकडे आले.
९४ इंद्रियोत्तमरोगाणां भोगाशावर्जनादृते।
नौषधानि न तीर्थानि न च मन्त्राश्च शान्तये॥६उ.।६।४५
इंद्रियरूपी रोगांवर भोगांची आशा सोडणे यावांचून दुसरे कोणतेंहीऔषध नाही. तीर्थे, मंत्र इत्यादिकांच्या योगानें हा रोग नाहींसा होत नाहीं.
९५ इष्टवस्त्वर्थिनां तज्ज्ञसूपदिष्टेन कर्मणा।
पौनःपुन्येन करणान्नेतरच्छरणं मुने॥६उ.।६७।२३
(विद्याधरी श्रीवसिष्ठांना म्हणते) हे मुने, (लौकिक शिल्प अथवा वैदिक विद्या) ही इष गोष्टप्राप्त व्हावी अशी इच्छा करणान्या विद्यार्थ्यांस त्यात्या विद्यांच्या गरूंनीं सांगेतल्याप्रमाणेंपुनः पुनः त्याचा अभ्यासं करणेंया वांचून दुसरे साधन नाहीं.
९६ इहैव नरकव्याधेश्चिकित्सा न करोति यः।
गत्वा निरौषधं स्थानं सरुजः कि करिष्यति॥६उ.।१०३।५१
येथेंअसतांनाच पुढच्या नरकव्याधीची चिकित्सा केली पाहिजे. औषध मिलणार नाहीं अशा ठिकाणीं गेल्यावर रोगग्रस्त मनुष्य काय करणार?
९७ ईप्सितावेदनाख्यात्तु मनःप्रशमनादृते।
गुरूपदेशशास्त्रार्थमन्त्राद्यायुक्तयस्तृणम्॥२।१११।१४
इष्ठवस्तुवषयीं वैराग्य उत्पन्न होऊन मन शांत झाल्याशिवाय गुरूपदेरा, शास्त्रार्थ, मंत्र इत्यादि युक्त्या व्यथ होत.
९८ ईश्वरप्रेरितो गच्छेत्स्वर्गं नरकमेव वा।
ससदैव पराधीनः पशुरेव न संशयः॥२।६।२७
केवलईश्वरानें प्रेरणा केल्यामुलें मनुष्य स्वर्गाला किंवा नरकाला जातो, असेंज्याला वाटतें, असा मनुष्य नेहमीं पराधीनच राहणार, व असला मनुष्य निःसंशय पशुहोय.
९९ ईश्वरो न महाबुद्धे दुरेन च सुदुर्लभः।
महाबोधमयैकात्मा स्वात्मैव परमेश्वरः॥६उ.।४८।२२
(श्रीवसिष्ठ रामालाम्हणतात) हे महाबुद्धे, ईश्वर दूर नाहीं, तो अतिशय दुर्लभही नाहीं. परमेश्वर ज्ञानस्वरूप, एकरूप असून स्वतःचा आत्माच आहे.
१०० उत्कन्धरों विततनिर्मलचारुपक्षो
हंसोऽयमत्र नभसीति जनैःप्रतीतः।
गृह्णाति पल्वलजलाच्छफरीं यदासौ
ज्ञातस्तदा खलु बकोऽयमितीह लोकैः॥६उ.।११८।५
आकाशांतून जात असतांना वर उंच केलेलीमान व पसरलेले शुभ्र सुंदर पंखयांवरून ‘हा हसच असावा,’ असें प्रथम लोकांनावाटलें; परंतु पुढेंजेब्हांडबक्यांतील पाण्यांतून मासे गट्टकरीत आहे असेंदृष्टीस पडलें, तेव्हां ‘हा बगलाआहे` अशी लोकांची खातरी झाली. (बाह्य आकारावरून जरी एखाद्याची बरोबर ओलख न परली, तरी त्याचेंआचरण पाहिल्यावर ती सहज पटते.)
१०१ उत्थितानुत्थितानेतानिन्द्रियाहीन्पुनःपुनः।
हन्याद्विवेकदण्डेन वज्रेणेव हरिर्गिरीन॥ ५।८।१७
इंद्र आपल्या वज्रानें पर्वतांचे चूर्ण करून टाकितो, त्याप्रमाणें इंद्रियरूपी सर्पानीं आपलींडोकीं वर केलेलीं असोत किंवानसोत, तीं विवेकरूपी दंडानेंपुन्हां पुन्हां फोडून टाकावीं.)
१०२ उत्सवादपि नीचानां कलहोऽपि सुखायते॥३॥७०।७६
नीचवृत्तीच्या लोकांना आनंदोत्सवापेक्षांदी कलहच अधिक प्रिय असतो.
१०३ उदारगुणयुक्ता ये विहरन्तीह देहिनः।
धरातलेन्दवः सङ्गाद्भृशं शीतलयन्ति ते॥३।७७।३०
जे उदार व गुणवान् पुरुष या जगांत विहार करतात, ते आपल्या सहवासानें सर्व लोकांना शीतलता आणि आल्हाददेणारे पृथ्वीवरीलदुसरे चंद्रचहोत.
१०४ उपदेशक्रमों राम व्यवस्थामात्रपालनम्।
ज्ञप्तेस्तुकारणं शुद्धा शिष्यप्रज्ञैव राघव॥६।८२।१२
(श्रीवसिष्ठम्हणतात) है राघवा, उपदेश करणें हेंकेवल शास्त्रीयव्यवस्थेचेपरिपालन करणेंआहे. पण ज्ञानाचें कारण केवलशिष्याची शद्ध बुद्धच आहे.
१०५ उभाभ्यामेव पक्षाभ्यां यथा खे पक्षिणां गतिः।
तथैव ज्ञानकर्मभ्यां जायते परमं पदम्॥१।१।७
पक्ष्यांना आकाशांत संचार करण्याला ज्याप्रमाणेंदोन पंखांची गरज असते, त्याप्रमाणें कर्म आणि ज्ञान या दोन साधनांच्या योगानें मोक्षरूपा परमपदाची प्राप्ति होते.
१०६ उह्यन्तेवारणा यत्र तत्रोर्णायुषु का कथा॥६उ.।६८। ३७
हत्तीसारखे मोठे मोठे प्राणीही ज्या प्रवाहांतून वाहत जातात, तेथें क्षुद्रं मेंढ्यांची काय कथा!
१०७ ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष च कश्चिच्छृणोति तत्।
असंकल्पः परं श्रेयः स किमन्तर्नभाव्यते॥६।१२६।९४
(श्रीवासिष्ठ म्हणतात) मी दात वर करुन मोठ्यानें ओरडत आहेपण माझ्याआक्रोशाकडे कोणी लक्ष देत नाही. विषयसंकल्पाचा त्याग केल्यानें मोक्षप्राप्तिहोईल, ही गोष्ठ लोक अंतःकरणांत कां ठसवून घेत नाहींत?
१०८ एतया तदलं मेऽस्तुतुच्छया पूर्वाचिन्तया।
पौरुषं यातिसाफल्यं वर्तमानाचिकित्सया॥५।२५।१६
(बलि म्हणतो) गत गोष्ठीबद्दलशोक करण्यांत काय अर्थआहे? वर्तमानकालीं कोणती गोष्ठ कर्तव्य आहे. याचा विचार केल्याने परुषप्रयत्न सफलहोतो.
१०९ एतावति धरणितले
सुभगास्ते साधुचेतनाः पुरुषाः।
पुरुषकलासु च गण्या
न जिता ये चेतसा स्वेन॥४।२३।६०
या पृथ्वीवर तेच भाग्यवान्, साधु, स्वरे पुरुष, आणि कलावान् होत कीं, ज्यांना त्यांच्या चित्तानेंजिंकून त्यांच्यावर आपलापगडा बसविला नाहीं.
११० एतावतैव देवेशः परमात्मावगम्यते।
काष्ठलोष्टसमत्वेन देहो यदवलोक्यते॥५।६४।४४
देह हा काष्ठ व ढेकूलयांच्या सारखा जड आहे ही गोष्ट मनांत निरंतर वागवीत जणेंहाच देवश्रेष्ठ परमात्म्याच्या ज्ञानाचा उपाय आहे.
१११ एतावदेव बोधस्य
बोधत्वं याद्वितृष्णता।
पाण्डित्यं नाम तन्मौर्ख्यं
यत्र नास्ति वितृष्णता॥६उ.।१९४।३४
हेंच खरें ज्ञान कीं, ज्याच्या योगनेंविषयलालसा नाहींशी होईल. ज्याच्यायोमानेंविषयतृष्णा नाहींशी होत नाहीं असें पांडित्य म्हणजे केवलमूर्खत्वच होय.
११२ कपर्दकार्धलाभेन कृपणो बहु मन्यत्॥३।७०।७७
एखाद्या कृपणाच्या हातीं एखादी फुटकी कवडी लागली, तरी तेवढ्यामुलेंत्यालाएखादा मोठानिधि सांपडल्यासारखा आनंद होतो (अशारीतीनें प्राण्यांच्या अहंकाराचा चमत्कार खरोखर दुर्निवार आदे.)
११३ कवलयति नरकनिकरं
परिहरति मृणालिकां घ्वाङ्क्षः।
यदतोऽस्तु मा स्मयस्ते
स्वभ्यस्तं सर्वदा स्वदते॥६उ.११६।६४
(एकजण मित्राला म्हणतो) कावलाकमलतंतु सोडून घाणेरडे पदार्थ खातो, यांत आश्चर्यनाहींकारण रोजच्या सवयीनें निंद्य पदार्थही स्वादिष्ठ वाटूंलागतात.
११४ कान्तावियोगजातेन हृदि दुःस्पर्शवह्निना।
यौवने दह्यते जन्तुस्तरूर्दावाग्निना यथा॥१।२०।१७
तारूण्यांत स्त्रीचा वियोग झाला म्हणजे, स्पर्श करण्यास कठीण अशाशोकरूपी अग्नीनें मनुष्याचें अंतःकरण वणव्यानें जलणाण्यावृक्षाप्रमाणें जलून जातें.
११५ कामनाम्नाकिरातेन विकीर्णामुग्धचेतसाम्।
नार्योनरविहङ्गानामङ्गबन्धनवागुराः॥१।२१।१८
मोहित झालेआहे अंतःकरण ज्यांचे अशा पुरुषरूपी पक्ष्यांना पकडण्यासाठींकामरूपी भिल्लानें तरुण स्त्रिया हें एक अवयव बांधुन टाकणारें जालेपसरून ठेविलें आहे.
११६ कारणेन बिना कार्यं न च नामोपपद्यते॥६उ।५७।१३
कारणावांचून कार्यसंभवतच नाही.
११७ कार्यमण्वपि काले तु कृतमेत्युपकारताम्।
महदप्युपकारोऽपि रिक्ततामेत्यकारतः॥१।७।२६
योग्यवेली। एखाद्याचेंलहानसें काम केलेतरी तो मनुष्य आभारी होतो; परंतु वेलनिधून गल्यावर कितीही मोठा उपकार केला तरो फुकट जातो.
११८ कालः कवलनैकान्तमतिरत्ति गिरन्नपि।
अनन्तैरपि लोकौघैर्नायं तृप्तोमहाशनः॥१।२३।१०
कालहासर्वानाखाऊन टाकण्यांत अगदीं दंग झालेला आहे. तो एकाच वेलींअनेकांचा सहार करीत असतो. तो इतका अधाशी आहे की, अगणित लोकांचा संहार करूनही त्याची तृप्ति होत नाही. (तोंडांत घास असतांना आणखीखातच असतो.)
११९ कालविद्धिर्विनिर्णीतं पाण्डित्यं यस्य राघव \।
अनध्यापित एवासौतज्ज्ञश्चेद्दैवमुत्तमम॥२।८।१९
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, एखादामनुष्य पंडित होणार, असेंज्योतिष्यानें भाकीत केलें, परंतु अध्ययन न करतां असा मनुष्य विद्वान् होऊं शकेल, तर दैव वलिष्ट आहे असेंम्हणतां येईल.
१२० कारविद्धिर्विनिर्णीता यस्यातिचिरजीविता।
स चेज्जीवति संछिन्नशिरास्तद्दैमुत्तमम्॥२।८।१८
एखादा मनुष्य पुष्कलदिवस जगणार असेंज्योतिष्यानें सांगितलेंआणि अशा स्थितींत त्या मनुष्याचेंडोकें उडविलें असतांही तो जगला, तर मात्र दैव समर्थ आहे, असें म्हणतां येईल.
१२१ कालः सर्वंकषोह्ययम्॥६उ॥१४०।५
काल हा सर्वाचाच नाश करणारा आहे
१२२ किं दूरं व्यवसायिनाम्॥३।२९।३८
उद्योग करणाभ्या लोकाना मिलविण्यास कठीण असेंया जगांत काय आहे?
१२३ कुटिला कोमलस्पर्शा विषवैषम्यशंसिनी।
दशत्यपि मनाक्स्पृष्टा तष्णा कृष्णेव भोगिनी॥१।१७।१७
विषयतष्णा ही कुटिल असून तिचा स्पर्शआरंभीं मोठागोड वाटतो, परंतु परिणामीती विषाप्रमाणें घात करिते. एखाद्या कालया नागिणीला जरा स्पर्शहोतांच ती डसते, त्याप्रमाणें तृष्णेला स्पर्शकेल्यावरोवर ती मनुष्यालामूढ बनविते.
१२४ कुरङ्गालिपतङ्गेभमीनास्त्वेकैकशोहताः।
सर्वैर्युक्तैरनर्थैस्तु व्याप्तस्याज्ञकुतः सुखम्॥५।५२।२१
(उद्दालक मुनि अज्ञ चित्ताला बोध करितात) शब्दस्पर्शादि विषय इतके अनर्थकारक आहेत कीं, एकेका विषयामध्ये आसक्त होणारे हरिण, भ्रमर, पतंग, हत्ती आणिमासा हे जीव घात करून घेतात. मग पांचही विषयामध्यें रममाण होणाण्यामनुष्यावर सर्व तन्हेचे अनर्थ कोसलतील यांत नवल काय?त्याला कोठून सुख मिलणार?
१२५ कृच्छ्रेषु दूरास्तविषादमोहाः
स्वास्थ्येषु नेत्सिक्तमनोभिरामाः।
सुदुर्लभाः संप्रति सुन्दरीभि-
रनाहतान्तःकरणा महान्तः॥१।२७।८
विपत्तीमध्यें ज्यांना विषाद्वाटत नाहीं व मोह पडत नाहीं आणि संपत्ति प्राप्त झाली असतां जे गर्वानं फुगून जात नाहींत; तसेंच सुंदर स्त्रिया पाहून ज्यांच्या अंतःकरणांत मलींच विकार उत्पन्न होत नाहीं असे महात्मे सांप्रतकालीं फारच दुर्मिलआहेत.
१२६ केनापादिविचार्यन्ते वर्णधर्मकुलक्रमाः॥३।१०६।५२
आपत्तीमध्यें सांपडलेला मनुष्य आपला वर्ण, धर्म किंवा आपली कुलपरंपरा ह्यांचा विचार कधीं तरी करतोका?
१२७ केवलात्कर्मणो ज्ञानान्न हि मोक्षोऽभिजायते।
कि तूभाभ्यांभवन्मोक्षःसाधनं तूभयं विदुः॥ १।१।८
केवलकर्माने किंवा कवलज्ञानानें मोक्ष साध्य होत नाहीं. तर कर्म आणि ज्ञान हीं दोन्ही मोक्षार्ची साधनें आहेत.
१२८ कोकिलःकाकसंघातैःसमवर्णाननाकृतिः।
गदितैर्व्यक्ततामेति सभायामिव पण्डितः॥६उ.।११६।७३
कावव्व्यांच्या समूहांत असलेलाकोकीलपक्षी हा वर्ण, मुख व आकृति यांच्यामध्यें साम्यअसल्यामूलेंजरी ओलखूं आला नाही, तरी ज्याप्रमाणे पंडित कोण आहे हेंसभेंतील भाषणावरून समजतें, त्याप्रमाणें मधुर शब्दांवरून कोकीलपक्षी सहज ओलखूं येतो.
१२९ को न गृह्णाति मूढोऽपि
वाक्यं युक्तिसमन्वितम्॥६उ.।१८
३
।२२
ज्या भाषणांत कांहीतरी युक्ति आहे, असेंभाषण मूर्ख मनुष्य दखीलमानीत असतो.
१३० को नाम परिप्रच्छन्तं विनीतं वञ्चयेत्पुमान्॥६।८५।८४
नम्रतेनें प्रश्नकरणाराला कोणता बरेंपुरुष फसबील?
१३१ कोपंविषादकलनां विततं च हर्षं
नाल्पेन कारणवशेन वहन्ति सन्तः॥१।५।१५
सत्पुरुषांना अल्पकारणावरून क्रोध, खेद किंवा हर्ष कधींही उत्पन्न होत नाहीं.
१३२ कोऽहं कथमयं दोषः संसाराख्य उपागतः।
न्यायेनेति परामर्शोविचार इति कथ्यते॥२।१४।५०
माझेखरेंस्वरूप काय व हा संसाररूपी दोष (आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं) कसा उत्पन्न झाला, इत्यादि प्रश्नांचेंशास्त्रानें सांगितलेल्यामार्गानें (चिंतन करणें यालाच विचार असें म्हणतात.
१३३ क्षणमानन्दितामेति क्षणमेति विषादिताम्।
क्षणं सौम्यत्वमायाति सर्वेस्मिन्नटवन्मनः॥१।२८।३८
मनाची स्थिति एकाद्या नटाप्रमाणें क्षणांत आनंदाची तर क्षणांत खिन्नतेची व क्षणांत सौम्यतेची दिसून येते.
१३४ क्षणमायाति पातालं क्षणं याति नभःस्थलम्।
क्षणं भ्रमति दिक्कुञ्चे तृष्णा हृत्पद्मषट्पदी॥१।१७।३१
तृष्णा ही क्षणामध्येंपातालांत जाते, व. क्षणामध्यें आकाशांत गमन करते अशारीतीनें तृष्णा ही हृदयरूपी कमलावरील भ्रमरी असून दिशारूपी कुंजामध्यें भ्रमण करीत असते.
१३५ गम्भीराणि प्रसन्नानि साधुचेतःसरांसि हि ६उ.।२३।३५
साधूंचीं अन्तःकरणरुपी सरोवरेंखोल व स्वच्छ असतात.
१३६ गुणं ममेमं जानातु जनः पूजां करोतुमे।
इत्यहंकारिणामीहा न तु तन्मुक्तचेतसाम्॥६उ.।१०२।३१
माझा हा गुण लोकांना कलावा, त्यांनीं माझासत्कार करावा, ही इच्छा अहंकार असलेल्या लोकांना असते. मुक्त झालेल्यांना अशी इच्छा मुलींच नसते.
१३७ गुणवति जने बद्धाशानां श्रमोऽपे सुखावहः॥६उ,।११८।२६
गुणी मनुष्याच्या आशेवर राहून श्रम पडले तरी ते सुखावह होतात.
१६८ गुणैःकतिपयैरेव बहुदोषोऽपि कस्यचित्।
उपादेयोयां भवत्येव शौर्यसंतोषभक्तिभिः॥६उ.।११६।५५
पुष्कलदोष असलेल्याही मनुष्याला त्याच्या आंगच्या शौर्ये, संतोष, स्वामिनिष्ठा इत्यादि कांहीं (थोड्याशा) गुणांमुलेचएखादा मनुष्य पदरीं बालगितो.
१६९ गुरुश्चेदुद्धरत्यज्ञमात्मीयात्पौरूषादृते।
उष्ट्रंदान्तं बलीवर्दं तत्कस्मान्नोद्धरत्यसौ॥५।४३।२६
शिष्यानें स्वतः प्रयत्न केलानसतांही जर गुरु त्याचा अज्ञानांतून उद्धार करूं शकला असता, तर वठणीस आणलेल्या उंट, बैल इत्यादि जनावरांनासुद्धां त्यागुरूनें आत्मज्ञानी केलें असतें.
१४० गेहमेवोपशान्तस्य विजनं दुरकाननम्।
अशान्तस्याप्यरण्यानी विजना सजना पुरी
६
उ.।३।३८
शांत पुरुषाला त्याचेंघरच निर्जन अरण्य आहे. पण शांत नसलेल्या पुरुषाला निर्जन अरण्यही लोकांनीं गजबज़ून गेलेलें नगर आहे.
१४१ गोरर्थे ब्राह्मणस्यार्थे मित्रस्यार्थे च सन्मते।
शरणागतयत्नेन स मृतः स्वर्गभूषणम्॥३।३१।२८
(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) दे सन्मते, गाई, ब्राह्मण, मित्र आणि शरण आलेला यांच्या रक्षणासाठींलढत असतां, जो वीर पुरुष आपला देह धारातीथीं अर्पण करतो, तो स्वर्गलोकाला खरोखर अलंकृतच करतो.
१४२ चन्द्रांशवइवोत्सार्यतमांस्यमृतनिर्मलाः।
अन्तः शीतवलयन्त्येता महताममला गिरः॥५॥४।४
महात्म्यांची वाणी चंद्रकिरणासारखी निर्मल, शीतल आणि अमृतमय असून मोहांधकार नष्ठ करणारी व अंतःकरणाला सुख देणारीअसतें.
१४३ चित्तमिन्द्रियसेनाया नायकं तज्जयाज्जयः।
उपानद्गुढपादस्य ननु चर्मावृतैव भूः॥६उ,।१६३।६
इंदियरूपी सेनेचा अधिपति चित्त आहे. या चित्ताला जिंकलें असतां इंद्रिये जिंकलीं जातात. पायांत जोडे घातलेल्या मनुष्यालासर्वपृथ्वी चामड्यानेंआच्छादिल्यासारखीच आहे. (जाड घालून पायं झांकले म्हणजेपथ्वीवरील सर्वकांट्यांचेंनिवारण झालेंच, त्याप्रमाणे एका चित्ताला जिंकल्यानें सर्वइंद्रियांना जिंकल्यासारखेंच होतें.)
१४४ चित्रसंगरयुद्धस्य सैन्यस्याक्षुब्धता यथा।
तथैव समता ज्ञस्य व्यवहारवतोऽपि च॥६उ.।३०।५
चित्रांतील समरांगणांत युद्ध करीत असलेलें सैन्य निश्चेष्ठ असतें, त्याप्रमाणें ज्ञानी पुरुष व्यवहार करीत असतांही आंतून निश्चलअसतो.
१४५ चित्रामृत नामृतमेव विद्धि
चित्रानलंनूनमनमेव विद्धि।
चित्राङ्गनानूनमनङ्गनेति
वाचा विवेकस्त्वाविवेकएव॥४।१८।६९
(श्रीवसिष्ठ रामलाम्हणतात) चित्रांतील अमृत खरें अमृत नव्हे, चित्रांतील अग्नि हा खरा आग्निनव्हे, आणि चित्रांतील स्त्री हा खरीस्त्री नव्हे, त्याप्रमाणें केवलबोलण्यांतील विवेक म्हणजे खरा विवेक नव्हे, तर तो आविवेकच होय,
१४६ चिन्तनेनैधते चिन्ता त्विन्धनेनेव पावकः।
नश्यत्यचिन्तनेनैव विनेन्धनमिवानलः॥५।२१।६
ज्याप्रमाणें अग्नीमध्यें इंधन टाकीत गेल्यास तो एकसारखा वाढत जातो, त्याप्रमाणें विषयांचेंचिंतन करीत गेत्यानें चिंता वाढूंलागते; परंतु इंधनें टाकण्याचें बंद केल्यास अग्निआपोआप विझूनजातो, त्याप्रमाणेंविषयांचें चिंतन थांबविलेंम्हणजे चिंतेचाही नाश होतो.
१४७ चिन्तामणिरियंप्रज्ञा हृत्कोशस्था विवेकिनः।
फलं कल्पलतेवैपा चिन्तितं संप्रयच्छति॥५।१२।३४
विचारी पुरुषांच्या हृदयकोशांत असलेली बुद्धि हा चिंतामाणिच आहे. अथवा चिंतिलेलें फलदेणारी ती एक कल्पलताच आहे.
१४८ जगदृश्यं तु यद्यस्ति न शाम्यत्येव कस्यचित्।
नासतो विद्यते भावो नाभागो विद्यते सतः॥३।१।२६
दृश्यजग जर खरोखरच असेलतर त्याचा कोणत्याही वस्तूमध्यें लय होणें शक्य नाहीं. कारण जें नाहींतेंआहेसें होत नाहीं, व जें आहे तें नाहींसें होत नाहीं.
१४९ जडः कइव वा नाम गुणागुणमपेक्षते॥३।७०।६२
मूर्ख मनुष्याच्याठिकाणीं गुण आणि अवगुण यांचें तारतम्य बेतार्चेच असतें.
१५० जडत्वान्निःस्वरूपत्वात्सर्वदैव मृतं मनः।
मृतेन मार्यते लोकश्चित्रेयं मौर्खचक्रिका॥५।१३।१००
मन हेंजड आणि निःस्वरूप असल्यामुलेंसर्वदा मेलेलेंच आह परंतु या मृत मनाकडून अनेक लोक मारले जातात, ही मूर्खपरंपरा विचित्रच म्हणावयाची.
१५१ जडेन मूकेनान्धेन निहतो मनसापि यः।
मन्ये स दह्यते मूढः पुर्णचन्द्रमरीचिभिः॥५।१३।१०३
जड, मूढआणि अंधअशा मनाकडून जो मारला जातो, असा मूढपुरूष पूर्ण चंद्राच्या शीतलकिरणानीं सुद्धां जाललाजाण्याला काय हरकत आहे!
१५२ जडो देहो मनश्चात्र न जडं नाजडं विदः॥२।११०।१३
देह हा केवलजड आहे, परंतु मन है धड जडही नाहीं, आणि चेतनही नाहीं.
१५३ जन्मान्तरशताभ्यस्ता राम संसारसंस्थितिः।
सा चिराभ्यासयोगेन विना न क्षीयते क्वचित्५।९२।२३
(श्रीवसिष्ठग्हणतात) है रामा, संसारस्थितीचा अभ्यास मागीलशेंकडोजन्मांत झालेला आहे, त्यामुलें दीर्घकाल साधनांचा अभ्यास केल्यावांचून संसारास्थिति क्षीण होणार नाही.
१५४ जयन्ति ते महाशुराः साधवो यैर्विनिर्जितम्।
अविद्यामेदुरोल्लासैःस्वमनो विषयोन्मुखम्॥४।३५।१
अविद्येच्या योगानें विलक्षण रीतीनें उल्लास पावणारें आणि विषयोन्मुख होणारें स्वतःचें मन ज्यांनीं जिंकलें अशा महाशुर सत्पुरुषांचा जयजयकार असो.
१५५ जराकुसुमितं देहद्रुमं दृष्ट्वैव दूरतः।
अध्यापतति वेगेन मुने मरणमर्कटः॥१।२२।१६
(राम विश्वामित्रांना म्हणतो) है मुन, देहरूपी वृक्ष म्हातारपणामुलेंफलला आहे असेंदुरून दृष्ठीस पडतांच मरणरूपीमाकड त्यावर जोरानें झडप घालतें,
१५६ जरा जगत्यामजिता जनानां
सर्वैषणास्ताततिरस्करोति॥१।२२।३८
(रामविश्वामित्रांना म्हणतो) हेतात, म्हातारपण हेंअजिंक्य आहे, तें मनुष्यांच्या सर्व इच्छांना न जुमानतां त्यांच्यावर आपला पगडा बसवितें.
१५७ जरामार्जारिका भुङ्क्तेयौवनाखुं तथोद्धता।
परमुल्लासमायाति शरीरामिषगर्धिनी॥१।२२।२५
जरा ही उद्धट मांजरी असून ती तारुण्यरूपी उंदीर गट्ट करून टाकते आणि शरीररूपी भक्ष्य भक्षण करण्यास अगदीं टपून वसलेलीअसते.
१५८ जरासुधालेपसिते शरीरान्तःपुरान्तरे।
अशक्तिरार्तिरापच्च तिष्ठन्ति सुखमङ्गनाः॥१।२२।३६
जरारूपीचुन्याचा लेप दिल्यामुलेंशरीररूपी अन्तःपुर फटफटीत दिसूंलागलें, म्हणजे अशक्तता, पीडा व आपत्ति ह्यास्त्रिया त्या अंतःपुरांत आनंदानेंराहूं लागतात.
१५९ जलमेव यथाम्भोधिर्नतरङ्गदिकं पृथक्।
आत्मैवेदं तथा सर्वंन भूतोयादिकं पृथक्॥५।७१।१४
समुद्र म्हणजे पाणीच असून लाटा पाण्याहून निरालया नसतात, त्याप्रमाणेंहेंसर्वजग तत्त्वतः आत्माच असून पृथ्वी, उदक इत्यादि भूतेंआत्म्याहून भिन्न नाहींत.
१६० जले जलचरव्यूहान् सूक्ष्मान्स्थूलो निकृन्तति।
ग्रासार्थं निर्दयो मत्स्यः कैवात्र परिदेवना॥५।१४।२०
पाण्यांतीलमोठा निर्दय मासा आपणापेक्षां लहान जलचर प्राण्यांना खाऊन टाकतो, या ठिकाणीं शोक तरीकिती करणार? (प्रबलांकडून दुर्बलांना पीडा ब्हावयाची असा या सृष्टींतीलनियमच आहे.)
१६१ जाग्रत्येव सुपुप्तस्थः कुरु कर्माणि राघव।
अन्तःसर्वपरित्यागी बहिः कुरु यथागतम्॥६।१२५।६
(श्रीवसिष्ठम्हणतात) हे राघवा, जागृतीमध्यें सुषुप्तीमध्यें असल्याप्रमाणें राहून कर्में करीत जा. आंतून सर्वांचा परित्याग कर, पण वाहेर प्राप्त झालेला व्यवहार करण्यास चुकूंनकोस.
१६२ जायते जीव्यते पश्चादवश्यंच विनश्यति॥४।४८।२५
उत्पन्न होऊन जगर्णे, हेंजसें सृष्ठींतील एक कार्यआहे, तसेंच शेवर्टी मरणें हेंही एक अवश्य कार्यहोय.
१६३ जायते दर्शनादेव मैत्री विशदचेतसाम्॥३।७८।३५
मोकलया मनाचीं माणसेंएकमेकांना भेटतां क्षणी त्यांची परस्पर मैत्रीजमत असते.
१६४ जायन्ते च म्रियन्ते च शरीराणि शरीरिणाम्।
पादपानां च पर्णानि का तत्र परिदेवना॥६।३२।५०
झाडांना पानेंयेतात व पुढें गलुन पडतात, त्याप्रमाणें प्राण्यांचीं शरीरेंउत्पन्न होतात व पुढेंनष्ठ होतात, यांत दुःख कशाचें!
१६५ जितेंन्द्रिया महासत्त्वाये त एव नरा भ्रुवि।
शेषानहमिमान्मन्ये मांसयन्त्रगणांश्चलान्॥६उ.।६।४३
(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) ज्यांनी इंद्रियेंजिंकिलीं आहेत आणिज्यांचें अंतःकरण थोर आहे, त्यांनाच या पुथ्वीवर खरोखर ‘मनुष्यें’ असें म्हणतां येईल. बाकीचे लोक म्हणजेकेवलहालचाल करणारीं मांसाचीं यंत्रेंच होत असेंमी समजतों.
१६६ जिते मनसि सर्वैव विजिता चेन्द्रियावलिः।
शीर्यतेच यथा तन्तौदग्धे मौक्तिकमालिका॥३।१९०।२५
दोरा अलतांच त्यांत ओंवलेले मोत्यांचे दाणे गलून पडतात, त्याप्रमाणेंएकमन जिंकलें म्हणजे सर्वइंद्रियेंजिंकलीं गेलींअसें समजावें.
१६७ जीर्यन्ते जीर्यतः केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यतः।
क्षीयते जीर्यते सर्वंतृष्णैवैका न जीर्यते॥६उ.।९३।८६
वृद्ध झालेल्या प्राण्यांचें केस पिकतात, दांत पडतात, सर्व अवयव शिाथिल होतात, पण एक तृष्णा मात्र तरुण राहते, ती कमी होत नाहीं.
१६८ जीवं विवेकिनमिहोपदिशन्ति तज्ज्ञा
नो बालमुद्भ्रममसन्मयमार्यमुक्तम्॥६।४१।५९
तत्वज्ञ लोक विवेका जीवालाच उपदेश करितात. श्रेष्ठ लोकानीं ज्याची उपेक्षा केलीआहे, देहादिकांच्या ठिकाणीं जो आसक्त आहे अशाअत्यंत भ्रमिष्ट मूर्खालाते उपदेश करीत नाहींत.
१६९ जीवितं गलति क्षिप्रंजलमञ्जलिना यथा।
प्रवाह इव वाहिन्या गतं न विनिवर्तते॥६उ.।९
३
।८९
ओंजलींत घेतलेलें पाणी ज्याप्रमाणें गलून जातें, त्याप्रमाणें प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी होत जातें. नदीचा पढें गेलेला ओघ जसा मागें येत नाहीं, तसे गेलेले आयुष्य परत येत नाहीं.
१७० जेतुमन्यं कृतोत्साहैःपुरुषैरिह पण्डितैः।
पूर्वं हृदयशत्रुत्वाज्जेतव्यानीन्द्रियाण्यलम्॥४।२३।५९
दुसण्यांना जिंकण्याची हाव धरणाण्यासुज्ञ पुरुषांनीं प्रथम आपल्याहृदयाच्या शत्रुभूत असलेल्या इंद्रियांना जिंकावें.
१७१ ज्ञातज्ञेयस्य मनसो नूनमेतद्धि रक्षणम्।
न स्वदन्ते समग्राणि भोगवृन्दानि यत्पुनः॥२।२।३
ज्ञेय तत्त्व जाणल्याची म्हणजेपरब्रह्मसाक्षात्कार झाल्याची हीच खूण आहे कीं, त्या स्थितीनंतर सर्वतप्हांच्या विषयोपभोगांबद्दल कायमच। वीटयेऊन जातो.
१७२ ज्ञानं हि परमं श्रेयः॥६।८७।१६
ज्ञान हेंच परमश्रेष्ठआहे.
१७३ ज्ञानवानेव सुखवान् ज्ञानवानेव जीवति।
ज्ञानवानेव बलवांस्तस्माञ्ज्ञानमयो भव॥५।९२।४९
(श्रीवसिष्ठ म्हणतात हेरामा,)जो ज्ञानी असतो, तोच खरा सुखी, तोच खरा जिवंत, आणि तोच खरा बलवान असतो; म्हणून तूंज्ञानी हो.
१७४ ज्ञानाद्विषयवैरस्यं स समाधिर्हिनेतरः॥६उ.।४६।१५
ज्ञानामुलेंविषयांची आवड नाहींशी होणें, हीच समाधि होय. इतर कारणांमुलेविषय नावडणेंही समाधि नब्हे.
१७५ ज्ञानिनैव सदा भाव्यं राम न ज्ञानबन्धुना।
अज्ञातारं वरं मन्ये न पुनर्ज्ञानबन्धुताम्॥६उ.।२१।१
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, प्रत्येकानें ज्ञानी व्हावें पण ज्ञानाच्या योगानें यथेष्टआचरण करणारा ज्ञानबंधुहोऊं नये. अशाज्ञानबंधृपेक्षां मुलींच ज्ञान नसलेला बरा; असें मी समजतों.
१७६ तच्चिन्तनं तत्कथनमन्योन्यं तत्प्रबोधनम्।
एतदेकपरत्वंच तदभ्यासं विदुर्बुधाः॥३।२२।२४
श्रवणाच्या योगानेंसमजलेलें तत्त्व बुद्धीमध्येंआरूढ व्हावें, अशा दृष्टीनें त्याचें निरंतर चिंतन करणें, ज्ञात्या पुरुषांशीं संवाद्करणें, समान अधिकाण्यांनींते तत्त्वएकमेकांना सांगून त्यासंबंधानें परस्परांना बोध करून देणें आणि अखंड तदाकार वृत्ति राखण्याचा प्रयत्न करणें, याला ज्ञाते पुरूष अभ्यास असें म्हणतात.
१७७ तडित्सु शरदभ्रेषु गन्धर्वनगरेषु च।
स्थैय येन विनिर्णीतं स विश्वसितु विग्रहे॥१।१८।६१
आकाशांतीलवीज, शरददृतुमधीलमेघ आणि गन्धर्वनगर हीं सर्व स्थिर आहेत, असेंज्याला वाटत असेल त्यानें देहाच्या शाश्वतीविषयीं खुशाल विश्वास बालगावा.
१७८ तपसैवं महोग्रेण यद्दुराप॑ तदाप्यते॥३।६८।१४
मिलविण्यास कठीण अशी कोणतीही वस्तु मोठ्या उग्रतपानें प्राप्त होते.
१७९ तरङ्गं प्रतिबिम्बेन्दुं तडित्पुञ्जंनमोऽम्बुजम्।
ग्रहीतुमास्थां बध्नामि नत्वायुषि हतस्थितौ॥१।१४।७
(राम विश्वामित्रांना म्हणतो) पाण्यावरील लाटा, चंद्राचें प्रतिबिंब, विजेची चमक, आकाशांतील कमलें हीं मला पकडतां येतील, परंतु चंचल आयुष्यावर मला विश्वास ठेवतां येणार नाहीं.
१८० तर तारूण्यमस्तीदंयावत्ते तावदम्बुधेः।
ननु संसारनाम्नोऽस्माद्बुद्ध्या नावा विशुद्धया॥६उ.।१६२।१९
(श्रीवसिष्ठ रामाला सांगतात) तारुण्य आहे तोंपर्यंतच शुद्धबुद्धिः या नौकेच्या योगानें संसारसागरांतून तरून जाण्याचा यत्न कर.
१८१ तरन्ति मातङ्गघटातरङ्गं
रणाम्बुधिं ये मयि ते न शुराः।
शुरास्त एवेह मनस्तरङ्गं
देहेन्द्रियाम्भोधिमिमं तरन्ति॥१।२७।९
(राम विश्वामित्रांना म्हणतो) ज्या रणरूपी समुद्रामध्यें शेंकडंहत्तींचे कलप तरंगाप्रमाणे दिसत आहेत, असा समुद्र तरून जाणारे लोक खरे शूर, असेंमी समजत नाहीं, तर खरे शुरयोद्धे तेच कीं, जे मनोरूपी तरंगांनीं युक्त असलेल्या देहेंद्रियरूपी समुद्रांतुनसुरक्षितपणें तरून जातात.
१८२ तरवोऽपि हि जीवन्ति जीवन्ति मृगपक्षिणः।
स जीवति मनो यस्य मननेन न जीवति॥१।१४।११
जगांत वृक्ष किंवा पशुपक्षी जगतच आहेत, परंतु ते जगणें खरेंनव्हे, तोच खरा जिवंत कीं, ज्याचें मन वासनाक्षयामलें जिवंत नाहीं. किंवा तत्त्ववोधामुलें जो मनाला तुच्छ लेखतो.
१८३ ताडितस्य हि यः पश्चात्संमानः सोऽप्यनन्तकः।
शालेर्ग्रीष्माभितप्तस्य कुसेकोऽप्यमृतायते॥४।२३।५३
उन्हानेंकरपून गेलेल्या भाताच्या शेतावर थोडासा पाऊस पडला तरी त्याला तीं अमृतवृष्टि वाटते, त्याप्रमाणें पुष्कलकालपर्यंत निग्रह केलेल्या मनाला थोडासा मान दिला म्हणजे ते संतुष्टहोतें.
१८४ तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणाः
क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति॥ ६उ.।१६२।५६
हेकेखोर लोक (जबलअसलेलें गंगोदक न पितां) ही आमच्या बापाचीविहीर आहे, असें म्हणून तिचेंच खारट पाणी पितात.
१८५ तावदुत्तमतामेति पुमानापि दिवौकसाम।
कृपणैरिन्द्रियैर्यावत्तृणवन्नापकृष्यते॥६उ.।६।४२
गवत जसेंसहज ओढलें जातें, त्याप्रमाणें विषयासक्त होणारीं इंद्रियें जोपर्यंत मनुष्यालाआकर्षण करीत नाहीत, तोंपर्यंतच तो देवांना देखीलमान्य होतो.
१८६ तावन्नयति संकोचं तृष्णा वैमानवाम्बुजम्।
यावद्विवेकसूर्यस्यनोदिता विमलाप्रभा॥२।१३।२०
जोंपर्यंत विवेकरूपी सूर्याचा उदयहोऊन त्याचा स्वच्छ प्रकाशसर्वत्रपसरलानाहीं, तापर्यतच तृष्णा ही मनुष्यरूपीं कमव्ठाला संकुचित करते.
१८७ तिष्ठतस्तव कार्येषु मास्तु रागेषु रञ्जना।
स्फटिकस्येव चित्राणि प्रतिबिम्बानि गृह्णतः॥३।११४।७६
(श्रीविसष्टरामालाम्हणतात) स्फाटिकमणि अनेक प्रकारच्या वस्तृंचींप्रतिविंबें ग्रहण करतो, परंतु तो त्या वस्तूंचें ठिकार्ण! आसक्तहोत नाहीं; त्याप्रमाणें व्यवहारांत वावरत असतां मोह उत्पन्न करणान्या विषयांच्या ठिकाणीं तुझे चित्त आसक्त न होवो.
१८८ तुच्छोऽप्यर्थोऽल्पसत्त्वानां
गच्छति प्रार्थनीयताम्॥३।७०।३१
क्षुद्र अंःतकरणाचे लोक नेहमींक्षुद्र फलसाठींच धडयडत असतात.
१८९ तुल्यवर्णच्छदैःकृष्णः संगतैःकिलकोकिलैः।
केन विज्ञायते काकः स्वयं यदि न भाषते॥६उ.।११६।६६
कोकीलपक्ष्यांप्रमाणेंचपंख, रंग हे असणारा कावला त्या कोकिलांच्या बरोबर असतांना जोंपर्यत स्वतःचा शब्द करीत नाहीं, तोंपर्यंत तो कोणाला ओलखूं येणार आहे?
१९० ते पूज्यास्ते महात्मानस्त एव पुरुषा भुवि।
ये सुखेन समुत्तीर्णाःसाधो यौवनसंकटात्॥१।२०।४१
(राम विश्वामित्रांना म्हणतो) हेसाधो, जे पुरुष यौवनरूपी संकटांतून सुखानें तरून जातात, तेच पृथ्वीवर पूज्य, तेच महात्मे, आणि तेच खरे पुरुष होत.
१९१ तेमहान्तोमहाप्राज्ञा निमित्तेन विनैव हि।
वैराग्यंजायते येषां तेषां ह्यमलमानसम्॥२।११।२४
ते महाबुद्धिमान् महात्मे खरोखरच धन्य होत कीं, ज्यांना निमित्ताशिवायच वैराग्य उत्पन्न होतें. कारण त्यांचें मन निर्मलअसतें.
१९२ त्यक्तावनर्विंटपिनोभूयः पत्राणि नो यथा।
नर्वासनस्य जावस्य पुनर्जन्मादिनोतथा॥५।४८।५५
वृक्षाचींमुलेंच तोडून टीकलींम्हणजे त्याच्यावर पुन्हां पानेयेत नाहींत, त्याप्रमाणें ज्याच्या वासना नाहींशा झालेल्या आहेत, अशाप्राण्याला पुनर्जन्मादि अवस्था प्राप्त होत नाहींत,
१९३ त्यजत्स्वात्मसुखं सौम्यं मनो विषयविद्रुतम्।
अङ्कुशेनेव नागेन्द्रं विचारेण वशं नयेत् ॥४।२३।५१
हत्तीला अकुंशाच्या योगाने कह्यांत ठेवितात, त्याप्रमाणें शांति देवाण्यास्वात्मसुखाचा त्याग करून विषयसुखाच्या मागे धाव धेणाण्यामनाला विचाराच्या योगानें ताब्यांत ठेवावें.
१९४ त्यजन्त्युद्यममुद्युक्तान स्वकर्माणि केचन॥३।२।५
कोणीही उद्योगी पुरुष स्वकर्माचा त्याग(कधींही) करीत नाहींत.
१९५ त्यागो न युक्त इह कर्मसुनापि रागः॥५।५।५४
प्राप्त कर्माचा त्याग करणें व त्याविषयीं आसक्तिठेवणें हींदान्हीयुक्त नव्हत,
१९६ दासाः पुत्राः स्त्रियश्चैव बान्धवाः सुहृदस्तथा।
हसन्त्युन्मत्तकामिव नरं वार्धककम्पितम्॥१।२२।६
उन्मत्त मनुष्याकडे पाहून लोक हसतात, त्याप्रमाणें म्हातारपणींमनुष्याचेंशरीर कांपूं लागलें म्हणजे त्याचे नोकर चाकर, मुलगे, बायका, बंधु आणि मित्र व्याच्याकडे पाहून हसुंलागतात.
१९७ दीनो वासनया लोकः कृतान्तेनापकृष्यते।
रज्ज्वेव बालेन खगो विवशो भृशमुच्छ्वसन् ४।२७।३४
जालयांत किंवा फासांत सांपडून पराधीन झालेल्या व घाबरलेल्या पक्ष्याला एकादें लहान पोर दोरी धरून सहज आढतें, त्याप्रमाणें वासनेच्या योगनेंदीन झालेल्या मनुष्याला यम आपल्या फासांनी ओढतो.
१९८ दीर्घसंसाररोगस्य विचारों हि महौषधम्॥२।१४।२
संसाररूपी दीर्घरोगावर विचार हें रामबाण औषध आहे.
१९९ दुःखशोकमहाष्ठीलःकष्टकण्टकसंकटः।
सहस्रशाखतां याति दारिद्र्यदृढशाल्मलिः॥६।७।१९
दुःख व शोक या ज्याच्या मोठ्याबिया आहेत, कष्ठरूपी कांट्यांनीं जो भरून गेला आहे, असा हा दारिद्र्यरूपी बलकट सावरीचा वृक्ष हजारों खांद्यांनीं विस्तार पावतो.
२०० दुःखानि मौर्ख्यविभवेन भवन्ति यानि
नैवापदोन च जरामरणेन तानि॥६।८८।२७
आपत्ति, जरा व मरण यांच्या पासून जें दुःख होत नाहीं तें दुःख मूर्खपणाच्या प्रभावानें भोगावें लागतें.
२०१ दुःखाद्यथा दुःखकाले हा कष्टमिति कथ्यते।
हाकष्टशब्दपर्यायस्तथा हादैवमित्यपि॥२।६।३
दुःखाचे वेलीं‘हाय हाय, केवढीइःखाची गोष्ट’असे उद्गार निघतात. या अर्थानेंच कधीं कधीं ‘हाय हाय, हाय रे दैवा असेही उद्गार पर्यायानेंनिघतात.
२०२ दुःखितस्य निशा कल्पःसुखितस्यैव च क्षणः३।६०।२२
मनुष्य दःखी कष्टीअसला म्हणजे त्याला एक रात्र कल्पप्रमाणेंदीर्घवाटते आणि सुखामध्येंकितीही काल लोटला, तरी तो त्याला एक क्षणाप्रमाणेच वाटतो.
२०३ दुरीहितं दुर्विहितं सर्वंसज्जनसूक्तयः।
प्रमार्जयन्ति शीतांशोस्तमःकाण्डमिवाङ्घ्रयः॥५।४।७
ज्याप्रमाणें चंद्राचे किरण अंधकाराचा नाश करतात, त्याप्रमाणेंसज्जनांचीं चांगटीं वचनें सर्व शारीरिक व मानसिक दोष दूर करतात.
२०४ दुरुत्तरा या विपदो दुःखकल्लोलसंकुलाः।
तीर्यते प्रज्ञया ताभ्यो नावापद्भयो महामते॥५।१२।२०
(श्रीवसिष्ठरामाला म्हणतात) हेमहामते, दुःखरूपी लाटांच्या योगानें भयंकर आणि दुस्तर भासणारी ती विपत्तिरूपी (नदी) प्रज्ञारूपी नौकेचा आश्रय केल्यानें सहज तरून जातां येते.
२०५ दुर्जनो येन तेनैव नाशितेनैति हृष्टताम्॥३।७०।८२
कोणत्या तरी रीतीनें (दुसण्याचा) नाशझाला म्हणजे दुर्जनाला आनंद होत असतो.
२०६ दुःसाध्याः सिद्धिमायान्ति रिपवो यान्ति मित्रताम्।
विषाण्यमृततां यान्ति संतताभ्यासयोगतः॥६उ.।६७।३३
सतत अभ्यासानें, मिलण्यास कठीण अशीकोणतीही वस्तू प्राप्त होते, शत्रुमित्र होतात आणि विष हेंअमृताप्रमाणें होतें.
२०७ दुःसाध्योवासनात्यागः सुमेरून्मूलनादपि॥५।९२।१०
मेरू पर्वत उपटून टाकण्यापेक्षांही वासनांचा त्याग करणें कठीण आहे.
२०८ दूरमुत्सहतेराजा महासत्त्वोमहापदि।
अल्पसत्त्वोजनः शोचत्यल्पेऽपिहि परिक्षते॥६।१२७।४३
महावलवान् राजा युद्धादिकांच्या मोठ्याआपत्तींत सांपडला, तरी साधनसंपन्न असल्यामुलेंफार मोठा उत्साह धारण करतो. पण अल्प सामर्थ्यअसलेला मनुष्य त्याची थोडीशी जरीहानि झालीतरीफार शोक करतो.
२०९ दृष्टान्तेन बिना राम नापूर्वार्थोऽवबुध्यते।
यथा दीपं बिना रात्रौभाण्डोपस्करणं गृहे॥२।१८।५१
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हेरामा, ज्याप्रमाणें रात्रीच्या वेलींदिव्याच्या प्रकाशाशिवाय घरांतील भांडीं वगैरे वस्तू दिसत नाहीत, व्याप्रमाणें दृष्टांताशिवाय अदृष्टअर्थाचा बोध होत नाहीं.
२१० देहपादपसंस्थस्यहृदयालयगामिनः।
तृष्णा चित्तखगस्येयं वागुरा परिकल्पिता॥४।२७।३३
देहरूपी वृक्षावरील हृदयरूपी घरट्यकडे जाणाण्या चित्तरूपी पक्ष्याला पकडण्याकरितांच हें तृष्णारूपी जालें जणूंकाय निर्माण करण्यांत आलें आहे.
२११ देहोऽहमिति या बुद्धिः सा संसारनिबन्धनी।
न केदाचिदियं बुद्धिरादेया हि मुमुक्षुभिः॥६।११८।८
‘भी देह आहे’ अशी जी बुद्धि तीसंसारांत जखडून टाकणारी आहे. यासाठीं म॒मुक्षूंनीं त्या बुद्धीचा स्वीकार केव्हांही करूं नये.
२१२ दैन्यदारिद्र्यदुःखार्ताअप्यन्ये पुरुषोत्तमाः।
पौरुषेणैव यत्नेन याता देबेन्द्रतुल्यताम्॥२।५।२७
दैन्य, दारिद्य्रआणि दुःख यांनीं पीडलेले उत्तम पुरुष पूर्वी पुरुषप्रयत्नानेंच इंद्रपदाला पोचले आहेत.
२१३ दैवंसंप्रेरयति मामिति दग्धधियां मुखम्।
अदृष्टश्रेष्ठदृष्टीनां दृष्ट्वालक्ष्मीर्निवर्तते॥२।५।२०
‘मला दैव प्रेरणा करीत आहे` असें म्हणणाण्यालोकांची बुद्धि होरपलून गेली आहे, असेंसमजावें. ज्यांच्या दृष्टीला दैवच श्रेष्ठ आदह असें वाटतें, अशालोकांचे तोंड दिसल्याबरोबर लक्ष्मी त्यांच्याकडे पाठ कारिते.
२१४ दैवमेवेह चेत्कर्तृपुंसः किमिव चेष्टया।
स्नानदानासनोच्चारान्दैवमेब करिष्यति॥२।८।६
सर्वं गोष्ठी जर दैवानेंच होत असतील, तर मनुष्याला कांहीं हालचाल तरी करून काय करावयाचेंआहे? तसें असेल तर स्नान, दान, बसणें, बोलणें दैवच करूं शकेल.
२१५ दैवात्तमिति मन्यन्ते ये हतास्ते कुबुद्धयः॥२।५।२९
कोणतीहीगोष्ठ दैवानें घडून येते, अशीज्यांची भावना असते, त्या मंदबुद्धि लोकांचा (अखेरीस) नाश होतो.
२१६ दोषान्प्रसवति स्फारान्वासनावलिता मतिः।
कीर्णाकण्टकबीजा भूः कण्टकप्रसरं यथा॥४।३५।६
कांटेरी झाडेंतोडून टाकलीं, पण त्या झाडांचीं मुलें भूमीत तशीच कायम असलीं, तर त्यांची पुन्हां जोरानें वाढहोऊन सर्वभूमि कांट्यांनीं मरून जाते; त्याचप्रमाणें विषयांचा त्याग केला, तरी जोंपर्यंत अंतःकरणांत वासनाबीज शिल्लकआहे, तोपर्यत तेंविषयांचेंस्मरण करवून रागद्वेषादि दोष उत्पन्न केल्याशिवाय राहणार नाहीं.
२१७ द्विविधो भवति प्रष्टा तत्त्वज्ञोऽज्ञोथवापि च।
अज्ञस्याज्ञतया देयो ज्ञस्य तु ज्ञतयोत्तरः ६उ.।२९।३२
तत्त्वज्ञआणि अज्ञ असे दोन प्रकारचे प्रश्न करणारे असतात, तत्त्वज्ञाला तात्त्विक उत्तर दिलें पाहिजे आणि अज्ञ मनुष्याला त्याच्या सारखेंसांगून शांत केलें पाहिजे.
२१८ द्वौहुडाविव युध्येते पौरुषार्थौसमासमौ।
पराक्तनश्चैहिकश्चैव शाम्यत्यत्राल्पवीर्यवान्॥२।५।५
दोन एडके आपसांत लढूंलागले म्हणजे त्याची कधीं बरोबरी होते किंवा एक अधिक बलिष्ठअसल्यास तोदुसन्याला जिंकतो, त्याचप्रमाणें पूर्वीचा व हल्लींचा प्रयत्न हे एकमेकांशीं लढत असतात. त्यामध्ये कमी सामर्थ्याचा असेल त्याला हार खावी लागते.
२१९ धीमन्तो न निषेवन्ते पर्यन्ते दुःखदां क्रियाम॥५।५२।८
ज्या कृत्याचा परिणाम दुःखदायक होणार, असेंकृत्य करण्याला विचारी लोक केव्हांच तयार होत नाहींत.
२२० धीरोऽप्यतिबहुज्ञोऽपि इलजोऽपि महानपि।
तृष्णया बध्यते जन्तुः सिंहः शृङ्खलया यथा॥४।२७।३२
ज्याप्रमाणें सिंह शृखलेनें बद्ध होतो त्याप्रमाणें मनुष्य कितीही धैर्यवान, पुष्कलजाणणारा, कुलीन आणि मोठा असला तरी तृष्णेच्या जाव्व्यांत सांपडून बद्ध होतो.
२२१ धीः सम्यग्योजिता पारमसम्यग्योजिताऽऽपदम्।
नरं नयति संसारे भ्रमन्ती नौरिवार्णवे॥५।१२।३६
बुद्धि चांगल्या रीतीनें योजिलीतर मनुष्य संकटांतून पार पडतो, अयोग्य रीतीनें तिचा उपयोग केल्यास आपत्ति प्राप्त होते. ज्याप्रमाणे अशिक्षित नावाङ्याची नौका समुद्रामध्ये गिरक्या खाते, त्याप्रमाणें मंदबुद्धि पुरुष या संसारसागरांत गटंगल्याखात राहतो.
२२२ न कदाचन जायन्ते शीतांशोरुष्णरश्मयः॥१।९।३
चंद्राचे किरण कधींही उष्ण होत नाहींत.
२२३ न कारणं विना कार्यं भवतीत्युपपद्यते ॥६उ.।१७९।८
कारण असल्यावांचून कार्य होणें संभवत नाहीं
२२४ न कालमतिवर्तन्ते महान्तः स्वेषु कर्मसु॥५।१०।९
महात्मे आपल्या कर्तव्यकर्माविषयीं केव्हांही कालातिक्रम होऊं देत नाहींत. (वेलच्यावेलींकामें करतात.)
२२५ न किंचन फलं धत्ते स्वाभ्यासेन विना क्रिया२।१८।११
अभ्यास केल्याशिवाय कोणतेंच कृत्य फलद्रुपहोत नाहीं.
२२६ न किंचिद्दीर्घसूत्राणां सिध्यत्यात्मक्षयादृते॥३।७८।८
दीर्घसूत्री मनुष्य विलंब करून आपल्या कार्याचा नाश करून घेतात, यापेक्षां जास्त कांहीं त्यांच्या पदरांत पडत नाहीं.
२२७ न केचन जगद्भावास्तत्त्वज्ञं रञ्जयन्त्यमी।
मर्कटा इव नृत्यन्तो गौरीलास्यार्थिनं हरम्॥४।५७।५६
गौरीच्या नृत्याची इच्छा करणान्या शंकरापुढेंमाकडें नाचूं लागलीं असतां त्याला त्याबद्दल प्रेम वाटणें शक्य नाहीं, त्याप्रमाणेंया जगांतील कोणतीही वस्तुज्ञानी पुरुषाचें चित्त आकर्षण करूं शकत नाहीं.
२२८ न क्षमन्ते महान्तोऽपि
पौनःपुन्येन दुष्क्रियाम्॥५।३०।१२
वारंवार केलेल्या अपराधांची महात्मे देहात्मेक्षमा करीत नाहींत.
२२९ नगर्यां दह्यमानायां भूषितायां तथोत्सवे।
सम एवमहीपालो जनको भूभृतां वरः॥६उ.।१९८।३१
राजधानीची मिथिलानगरी जलूंलागली किंवा उत्सवाचे बेलींती सुशोभित केली, तरी दोन्ही स्थितींत राजश्रेष्ठ जनकराजाची अतःकरणाची समता कायम असे.
२३० न च निस्पन्दता लोके दृष्टेह शवतां बिना।
स्पन्दाच्च फलसंप्रप्तिस्तस्माद्दैवं निरर्थकम्॥२।८।८
हालचाल ही फक्त प्रेतामर्ध्येच काय ती होत नाहीं; हालचाल कल्यानेंच फलप्राप्ति होत असल्यामुलें दैव हें निरर्थक आह.
२३१ न जातु ते विगण्यन्ते गणनासु गरीयसाम्।
ये तरङ्गैस्तृणानीव ह्रियन्ते हर्षशोकयोः॥६।१२७।५०
लाटांबरोबर गवत वाहत जातें त्याप्रमाणें जे हर्षशोकांच्या तडाक्यांत सांपडतात, त्यांची गणना श्रेष्ठ लोकांमध्यें हीत नाहीं.
२३२ न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा क्वचित्।
पौरुषेण प्रयत्नेन यन्नाप्नोति गुणान्वितः॥४।६२।१९
या पृथ्वीवर, आकाशांत किंवा देवलोकांत अशीएकही वस्तु नाहीं कीं, जी प्रयत्न करणाण्यागुणवानाला साध्य होत नाहीं.
२३३ न तदस्ति विमोहाय यद्विविक्तस्य चेतसः॥३।७८।२१
विचार करणाण्याअंतःकरणाला मोह पाडील अशी कोणतीहीस्थिति नाहीं.
२३४ न तपांसि न तीर्थनि न शास्त्राणि जयन्ति च।
संसारसागरोत्तारे सञ्जनासेवनं विना॥४।३३।१४
संसारसागरांतून तरून जाण्यासाठीं केलेलें तप, तीर्थाटन आणि शास्त्राध्ययन हीं सर्वसज्जनसेवेवांचून व्यर्थहोत.
२३५ न देशो मोक्षनामास्ति
न कालोनेतरा स्थितिः॥६।१२१।१२
मोक्ष म्हणून कांहीं कोणता निरालादेश नाहीं, निराला कालनाहीं किंवा निरालास्थिति नाहीं.
२६६ न मे मनोरमाः कामा न च रम्या विभूतयः।
इदं मन्ताङ्गनापाङ्गभङ्गलोलंच जीवितम् ६उ.।९३।६०
(सिद्ध श्रीवसिष्ठांना म्हणतात) विषय व एश्चर्यहीं दोन्ही रमणीय असतील, परंतु माझेंमन विषयांचे ठिकाणीं रमत नाहीं, व एश्चर्यापासुनही आनंद पावत नाहीं. कारण, जीवित हेंच मुलींमत्तास्रियांच्या कटाक्षाइतकें चंचल आहे.
२३७ न मोक्षो नभसः पृष्ठे न पाताले न भूतले।
मोक्षो हि चेतो बिमलं सम्यग्ज्ञानविबोधितम्५।७३।३५
मोक्ष हा कांहीं कोठें आकाशांत, पातालांत किंवा पृथ्वीवर आहे असेंनाही, तर योग्य तव्हेचें ज्ञान होऊन झालेली मनाची निर्मलस्थिति म्हणजेच मोक्ष होय.
२३८ न मौर्ख्यदधिको लोके कश्चिदस्तीह दुःखदः ५।२९।५७
या लोकांत मूर्खपणापेक्षां अधिक दुःखदायक असें कांहीं नाहीं.
२३९ न वैराग्यात्परो बन्धर्नसंसारात्परो रिपुः॥६।१२७।५९
वैराग्याहून श्रेष्ठ दुसरा बंधु नाहीं व संसाराहून दुसरा शत्रु नाहीं.
२४० न व्याधिर्नविषंनापत्तथा नाधिश्च भूतले।
खेदाय स्वशरीरस्थं मौर्ख्यमेकं यथा नृणाम्॥२॥१३॥१३
स्वतःच्या मूर्खपणामुलेंजितकें दुःख भोगावें लागतें,तितकें दुःख मानसिक चिंता, शारीरिक पीडा, विष व आपत्ति यांच्यापासूनही भोगावें लागत नाहीं.
२४१ न शास्त्रैर्नापि गुरुणा दृश्यते परमेश्वरः।
दृश्यते स्वात्मनैवात्मा स्वया सत्त्वस्थया धिया६।११८।४
परमेश्वर शास्त्रेव गरु यांच्या योगानें दिसत नाही. तर आपल्या स्वतःच्या स्वत्त्वस्थबुद्धीनेंच त्याचेंदर्शन होतें.
२४२ नष्टं नष्टमुपेक्षेत प्राप्तं प्राप्तमुपाहरेत्।
निविकारतयैतद्धि परमार्चनमात्मनः॥ ६।२३९।४४
जें जेंनष्टझाले असेल त्याची उपेक्षा करणें आणि जें जें यदृच्छेनें प्राप्त होईल त्याचा स्वीकार करणेंया दोन्ही गोष्ठी निर्विकार चित्तानें कराव्या, म्हणजे हेंच आत्म्याचें श्रेष्ठ पूजन होईल.
२४३ न सज्जनाद्दूरतरः क्वचिद्भवे-
द्भजेत साधून्विनयक्रियान्वितः।
स्पृशन्त्ययत्नेन हि तत्समीपगं
विसारिणस्तद्गतपुष्परेणवः॥६उ.।९८।२४
सज्जनांपासून केव्हांही दूर राहुं नये, नम्रतापूर्वक त्यांचीसेवा करावी. कारण, सज्जनांच्या जवलराहणाराला त्यांच्या गुणरूपी पुष्पांतील पसरणाम्यारजःकणांचा लाभ अनायासें होतो.
२४४ न स्तौमि न च निन्दामि क्वचित्किंचित्कदाचन।
आत्मनोऽन्यस्य वा साधो तेनाहं शुभमागतः॥६।२६।१३
(भुशुंड श्रीवसिष्ठांना म्हणतो) हे साधो, मी केव्हांही व कोठेंही थोडीसुद्धां आपली स्तुति करीत नाहीं व दुसण्याची निंदा करीत नाहीं त्यामुलें मला कल्याणकारक स्थिति प्राप्त झाली आहे.
२४५ न स्वकर्मविना श्रेयः प्राप्नुवन्तीह मानवाः॥५।४८।६९
स्वकर्माचें अनुष्ठान केल्याशिवाय मसुष्यांना या जगांत श्रेयःप्राप्तिहोत नाहीं
२४६ न स्वधैर्यादृते कश्चिदम्युद्धरति संकटात्॥५।२१।१०
स्वतःच्या घैर्यावांचून आपणाला संकटांतून कोणीही पार पाडणार नाही.
२४७ न हि चन्द्रं विना शुद्धा सविकासा कुमुद्वती॥२।१२।६
चंद्रावांचून श्वेत कमलिनी विकास पावत नाहीं.
२४८ न हि जानाति दर्बुद्धिर्विनाशंप्रत्युपस्थितम्॥२।१०२॥३६
दुर्बुद्धिअसलेल्या मनुष्याला आपल्या पुढें येऊन ठेपलेला स्वतःचा नाश समजून येत नाही.
२४९ न हि तज्ज्ञस्य शान्तस्य ममाहमिति विद्यते॥६उ.।३०।२
तत्वज्ञ आणि शांत मनुष्याचे ठिकाणीं ‘मी` आणि ‘माझें’ असे दोन्ही भाव नसतात.
२५० न हि पर्यनुयोक्तव्याः स्वप्नविभ्रमरीतयः।
न तदस्ति जगत्यस्मिन् यन्न संभवति भ्रमे॥६।६१।१६
स्वप्न, भ्रम इत्यादिकांमध्यें ’ हें असेंकसेंघडलें?असा प्रश्नच संभवत नाहीं, त्याप्रमाणे जगाची रचना ही ‘अशीच का झाली?’असा प्रश्न संभवत नाहीं. कारण, या जगांत भ्रमामध्यें जें संभवत नाहीं, असें कांहींच नाहीं. (परमात्म्याची माया अघटित घटना करण्यांत मोटी पटाईत आहे)
२५१ न हि सत्त्ववतामस्ति दुःसाध्यमिह किंचन॥३।८२।२९
बुद्धिमान् लोकांना मिलाविण्यास कठीण असेंया जगांति कांहीण्क नाहीं
२५२ ना यथा यतते नित्य यद्भावयति यन्मयः।
यादृगिच्छेच्चभयितुं तादृग्भवति नान्यथा॥६उ.।१५७।३१
मनुष्य नित्य ज्यासाठीं अगदीं तन्मय होऊन अनन्य भावानें प्रयत्न करतो व जसेंहोण्याची इच्छा करतो, तसाच तो होता. एरवीं कधींही होत नाहीं.
२५३ नाशोऽपि सुखयत्यज्ञमेकवस्त्वतिरागिणम्॥३।७०।२३
एखाद्या वस्तूवर अतिशय आसक्त सालेल्या अज्ञ मनुष्याला स्वतःचा नाश झाला तरा तो सुद्धां सुखदायकच वाटतो.
२५४ नासतो विद्यते भावो नाभावोविद्यते सतः।
यत्तु नास्ति स्वभावेन कः क्लेशस्तस्यमार्जने॥३।७।३८
जें असत् आहे, त्याला कधीं अस्तित्वच नाहीं, आणि जें सत आहे त्याचा केच्हांही अभाव होऊं शकत नाहीं. म्हणून जेंवस्तुतः नाहीं, तें नाहींसें करण्याला क्लेश कसले?
२५५ नासिधारा न वज्रार्चिर्नतप्तायःकणार्चिषः।
तथा तीक्ष्णा यथा ब्रह्मंस्तष्णेयं हृदि संस्थिता॥१।१७।४८
(राम विश्वामित्रांना म्हणतो) हे ब्रह्मर्षे, मनुष्याच्या हृदयामध्यें राहणारी तृष्णा ही जितकी तीक्ष्ण असते, तितकी तरवारीची धार, वज्राचें तेज किंवा तापलेल्या लोखंडांतून बाहेर पडणाण्याठिणग्या तीक्षण नसतात.
२५६ नास्ति शत्रुःप्रकृत्यैव न च मित्रं कदाचन।
सुखदं मित्रमित्युक्तं दुःखदाः शत्रवः स्मृताः॥५।५३।५८
कोणी कोणाचा मूलचाच शत्रुनाही, व मूलचाच मित्रहीं नाहीं. सुख देणारा तो मित्र, व दुःख देणारा तो शत्रु, असेंच मानलेंजातें.
२५७ नाहंदेहस्य नो देहो मम नायमहं तथा।
इति बिश्रान्तचित्ता ये ते मुने परुषोत्तमाः॥१।१८।५३
(राम विश्वामित्रांना म्हणतों) हे मुने, ‘मीदेहाचा कोणी नाहींदेह माझा कोणी नाहीं, व हा देह हेंमाझेंखरेंस्वरूपनव्हे,’या भावनेनें जे पुरुष परमात्मस्वरूपांत स्थिर होतात, तेच उत्तम पुरुष होत.
२५८ नित्यं सज्जनसंपर्काद्विवेक उपजायते।
विवेकपादपस्यैव भोगमेक्षौफले स्मृतौ॥२।११।५८
सज्जनांचा सहवास केल्यानें विवेक अवश्यउत्पन्न होतो, वभोग आणि मोक्ष हीं त्या विवेकरूपी वृक्षार्चीच फले आहेत.
२५९ नित्याशुचेऽप्रियजने भषणैकनिष्ठ
रथ्यान्तरभ्रमणनीतसमस्तकाल।
कौलेयकाशयसमानतयैव मन्ये
मूर्खेण केनाचिदहो बत शिक्षितोऽसि॥६उ.।११६।५८
है कुत्र्या, तुझ्यामध्येंआपल्यासारखेच गण आहेत असें पाहून, नित्य अपवित्रता, अप्रिय जनांवर भों भोंकरणें, रस्त्यांतून फिरत सारा वेलफुकटघालविणें, इत्यादि गुण कोणी मूर्खानें तुला शिकविले आहेत असें मलावाटतें (अथात् तुझ्यापेक्षां तुझ्यागरूमध्यें असले गुण अधिक असलेपाहिजेत.)
२६० निरिच्छतैव निर्वाणं सेच्छतैव हि बन्धनम्।६उ.।३६।३८
इच्छा नसणें हाच मोक्ष होय. आणि इच्छा असणेंहाच बंध होय.
२६१ निर्दयः कठिनः क्रूरः कर्कश! कृपणोऽधमः।
नतदस्ति यदद्यापि न कालोनिगिरत्ययम्॥१।२३।९
कालहा निर्दय, कठीण, क्रुर, कर्कश, कृपण आणि अघम आहे, कालहा ज्याला गिलून टाकीत नाहीं, असेंअद्यापि कांहींच नाहीं.
२६२ निर्मले मुकुरे वक्रमयत्नेनैव बिम्बति॥२।२।१९
स्वच्छ आरशामध्यें ताडाचें प्रतिबिंबसहज रातीनें पडतें,
२६३ निर्वासनं जीवितमेव मोक्षः॥६उ.।१७७।४
३
जीवित वासनारदहित असणें हाच मोक्ष होय.
२६४ निःसंकल्पो यथाप्राप्तव्यवहारपरोभव॥४।५३॥४७
(दाशुर तपस्वी आपल्या पुत्राला म्हणतो) संकल्परहित होऊन प्राप्त झालेला व्यवहार योग्य रीतीनें करीत जा
२६५ नैर्घृण्यमस्थैर्यमथाशुचित्वं
रथ्याचरत्वं परिकुत्सितत्वम्।
श्वभ्यो गृहीतं किमुनाम मूर्खै-
र्मूर्खेभ्य एवाथ शुना न जाने॥६उ.।११६।५४
निर्दयता, चंचलता, अपवित्रता, रस्त्यांतून व्यर्थमटकणें, निंद्य असणें हेधर्ममूर्खनीं कुत्र्यांपासून घेतले, किंवा कुत्रा मूर्खांपासून शिकला हेंनक्कीसमजत नाहीं.
२६६ नैवास्त्यसौजगति यः परदुःखशान्त्यै
प्रीत्या निरन्तरतरं सरलंयतेत॥ ६उ.।११९।
३
दुसण्याचेंदुःख नाहीसेंकरण्यासाठीं मनापासून निरंतर योग्य रीतीनें झटणारा या जमामध्यें कोणीही नाहीं.
२६७ नोदेति नास्तमायाति सुखे दुःखे मुखप्रभा।
यथाप्राप्तस्थितेर्यस्य जीवन्मुक्तः स उच्यते॥३।९।६
सुखाचे वेलींज्याच्या तोंडावरीलतेज वाढत नाही, आणि इःखाचें वेलींतेंकमी होत नाहीं, याप्रमाणें प्राप्त स्थितीमध्यें जो निर्विकार असतो तोच जीवन्मुक्त होय.
२६८ नोद्विजन्ते स्वकार्येषु जना अध्यवसायिनः॥६।८८।१९
निश्चयी लोक आपल्या कार्याबिषयीं कधीं उद्विग्नहोत नाहींत.
२६९ नोपपन्नं हि यद्यत्र तत्र तन्न विराजते।
मध्ये काचकलापस्य महामूल्यो मणिर्यथा॥५।३२।२८
काचेच्या मण्यांच्या ढिगांत महामूल्यवान् रत्न जसें शोभत नाहीं, तसें जेंज्याठिकाणीं योग्य नसतें, तें त्या ठिकाणीं शोभतही नाहीं.
२७० पथिकाः पथि दृश्यन्ते रागद्वेषविमुक्तया।
यथा धिया तथैवैते द्रष्टव्याः स्वेन्द्रिरयादयः॥६।११८।५
प्रवासी ज्या मार्गानें जातात, त्या मार्गावर आसक्ति ठेवीत नाहीत, त्याप्रमाणें अपल्यादेहेंद्रियादिकांस रागद्वेषरहित वुद्धीनें पादावें.
२७१ पदमतुलमुपैतुमिच्छतोच्चैः
प्रथममिय मतिरेव लालनीया।
फलममिलषता कृषीवलेन
प्रथमतरं ननुकृष्यते धरैव॥५।१२।४०
चांगल्या पिकाची इच्छा करणारा रोतकरी प्रथम जमीन नांगरून तिची उत्तम माशागत करतो, त्याप्रमाणें अतुल अशा परमात्मपदाच्या प्राप्तीची इच्छा करणाण्यापुरुषानें प्रथम विवेकाच्या योगानें आपली बुद्धि शुद्ध करावी.
२७२ परं विवर्धनं बुद्धेरज्ञानतरुशातनम्।
समुत्सारणमाधीनां विद्धि साधुसमागमम्॥२।१६।५
(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) साधूंचा समागम वुद्धीची वाद करतो, अज्ञानरूपी वृक्षालातोडून टाकतो आणि सर्व मानासिक दःखेंनाहींशीं करतो.
२७३ परंविषयवैतृष्ण्यं समाधानमुदाहृतम्।
आहृतं येन तन्नूनं तस्मैनृब्रह्मणे नमः॥६उ.।४५।४६
विषयांविषयीं अत्यंत वैराग्य हेंच समाधान आहे. तें ज्यानें संपादनकेलें आहे, त्या मनुष्यरूपी ब्रह्माला नमस्कार असो.
२७४ परमपदप्रतिमो हि साधुसङ्गः॥५।६१।४८
सत्पुरुषांच्या सहवासाची योग्यता प्रत्यक्ष मोक्षसुखाइतकी आहे.
२७५ परं पौरुषमाश्रित्य दन्तैर्दन्तान्विचूर्णयन्।
शुभेनाशुभमुद्युक्तं प्राक्तनं पौरुषं जयेत्॥२।५।९
दांतांनीं दांतांचेंचूर्णहोईल इतक्या जोरानें शास्त्रीय प्रयत्न करून अनर्थ उत्पन्न करणान्या पूर्वीच्या कर्मचा पाडाव करावा.
२७६ परस्परेच्छाविच्छित्तिर्नहि सौहार्दबन्धनी॥ ३।५५।७२
परस्परांच्या इच्छांचा भंग झाला असतां खरी मैत्री रिकत नाहीं.
२७७ परस्परेप्सितस्नेहोदुर्लभो हि जगत्रये॥६।१०८।२१
परस्परांना इष्टअसलेला, (अर्थात् कृत्रिम नसलेला) स्नेह त्रैलोक्यांत दुर्लभ आहे.
२७८ परामृश्य विवेकेन संसाररचनामिमाम्।
वैराग्यं येऽधिगच्छन्ति त एव पुरुषोत्तमाः॥२।११।२६
या संसाररचनेचा विवेकानें विचार करून ज्यांना वैराग्य उत्पन्न होतें, ते खरोखर उत्तम पुरुष होत.
२७९ परायणं हि प्रभवः संदेहेष्वनुजीविनाम्॥३।२।१६
सेवकांना कोणतेंही संकट उत्पन्न झालें असतां, त्याप्रसंगीं धनी हाच त्यांचा मुख्य आधार होय.
२८० परिज्ञातोपभुक्तो हि भोगो भवति तुष्टये।
विज्ञाय सेवितो मैत्रीमेति चोरो न शत्रुताम्॥४।२३।४१
अमुक चोर आहे, असें पक्कें ज्ञान झाल्यावर त्याच्याशी वागतांना सावधपणा ठेवतां येतो, यामु॒लेस्नेहसभाव जलतो, वैरभाव राहात नाहीं. त्याप्रमाणें विषयांचेंवास्तविक स्वरूप ओलखून, ते योग्य रातीनें सेवन करणाराला त्यांची बाधा होत नाहीं.
२८१ पररोपकारकारिण्या परार्तिपरितप्तया।
बुद्ध एव सुखी मन्ये स्वात्मशीतलया धिया॥९।२६।३९
(राम विश्वामित्रांना म्हणतो) परोपकार करणारी, दुसण्याच्या दःखिनेंदुःखित होणारी व आत्मज्ञानानेंतृप्त झालेली असी बुद्धि ज्या ज्ञानी पुरुषाची आहे, तो खरा सुखी असेंमला वाटतें.
२८२ पापस्य हि भयाल्लोको राम धर्मे प्रवर्तते॥५।७५।३७
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, पापाच्या भयानेंच लोकांची धर्माकडे प्रवृत्ति होत असते.
२८३ पीताशेषविवेकाम्बुः शरीराम्भोधिवाडवः।
न निर्दहति यंकोपस्तं मृत्युर्नजिधांसति॥६।२३॥९
ज्यानें विवेकरूपी सर्वउदक पिऊन टाकलें आहे, असा शरीररूपी समुद्रांतील क्रोधरूपा वडवाग्निज्याला जालीत नाहीं, त्याला ठार मारण्याची इच्छा मृत्यु करीत नाहींं.
२८४ पण्यानि यान्ति बैफल्यं
वैफल्यं यान्ति मातरः।
भाग्यानि यान्ति वैफल्यं
नाभ्यासस्तु कदाचन॥६उ.।६७।३२
‘मीअमुक पुण्य केलें` असेंआपल्या तोंडानें दुसन्यास सांगितलें असतां तं पुण्य व्यर्थजातें. प्रसंगीं मातेचा व ऐश्वर्याचाही उपयोग होत नाहीं, परंतु अभ्यास हा कधींही फुकट जात नाहीं.
२८५ पुत्रमित्रकलत्रादि तृष्णया नित्यकृष्टया।
खगेष्विव किरात्येदं जारं लोकेषु रच्यते॥१।१७।१५
भिल्लीण पक्ष्यांना पकडण्याकरितां जालेतयार करते, त्याप्रमाणें मनुष्यांना नेहमीं आकर्षण करणारी तष्णा ही पुत्र, मित्र, स्त्री इत्यादिकांचें जालेंतयार करते.
२५६ पुरुषाथात्फलप्राप्तिर्देशकालवशादिह।
प्राप्ता चिरेण शीघ्रं वा यासौ दैवमिति स्मृता॥२।७।२१
पुरुषप्रयत्नानेंच होणारी फलप्राप्तिदेश व कालयांच्या परिस्थितीप्रमाणें लवकर किंवा उशिरां होत असते. यालाच दैव असे म्हणतात,
२८७ पूजनं ध्यानमेवान्तर्नान्यदस्त्यस्य पूजनम्।
तस्मात्त्रिभुवनाधारं नित्यं ध्यानेन पूजयेत्॥६।३८।६
परमेश्वराचें अंतःकरणांत ध्यान करणें हेंच त्याचें मुख्य पूजन होय. त्याहून दुसरे पूजन नाहीं. यासाठींत्रिभुवनाचा आधार जो परमात्मा, त्याचें ध्यानास्या योगाने नेहमीं पूजन करावें.
२८८ पूर्णस्तु प्राकृतोऽप्यन्यत् पुनरप्यमिवाञ्छते।
जगत्पूरणयोग्याम्बुर्गृह्णात्येवार्णवोजलम्॥४।२३।५५
सर्वजगाला बुडवून टाकतां येईल, इतका पाण्याचा सांठा ज्यांत भररेलाआह, असा समुद्र देखीलतेवढ्यानें तृप्त न होतां जास्त जास्त पाणी सांठवीत असतो; त्याप्रमाणें प्राकृत मनुष्य कितीही श्रीमान असला, तरी अधिकाधिक संपत्तीची हाव बालगीतच असतो.
२८९ पूर्वसिद्धस्वभावोऽयमादेहं न निवर्तते॥३।८२।४०
देह पडेपर्यंत मूलचा स्वभाव पालटत नाहीं.
२९० पूर्वापरविचारार्थचारुचातुर्यशालिनी।
सविकासा मतिर्यस्य स पुमानिह कथ्यते॥२।११।७२
मागचा पुढचा विचार आणि कोणताही सूक्षम अर्थउत्तम रीतीनें ग्रहण करण्याचेंचातुयं जिला आहे, अशी विकास पावलेली बुद्धि ज्याचे ठिकाणीं आहे, तोच खरा मनुष्य समजावा.
२९१ पौनःपुन्येन करणमभ्यास इति कथ्यते।
परुषार्थः स एवेह तेनास्ति न बिना गतिः॥६उ.।६७।४३
पुन्हां पुन्हां तेंच तेंच करणें याला अभ्यास असें म्हणतात. हाच पुरुषार्थ होय. या अभ्यासावांचून मनुष्याखा दुसरा मार्गनाहीं.
२९२ पौरुषं सर्वकार्याणां
कर्तृराघव नेतरत्।
फलभोक्तृ च सर्वत्र
न दैवंतत्र कारणम्॥२।९।२
(श्रीवसिष्ठ म्हणतात) दे राघवा, सर्वकायाचें कर्तृत्व पुरुषप्रयत्नाकडे आहे, इतर कशाकडेही नाहीं. कार्यकरणें आणि फलभोगणें यांच्याशीं दैवाचा कांहींएक संबंध नाहीं.
२९३ पौरुषंस्पन्दफलवद्दृष्टं प्रत्यक्षतो न यत्।
कल्पितंमोहितैर्मन्दैर्दैवं किंचिन्न विद्यते॥२।४।१०
मनुष्यानें प्रयत्नपूवेक एखादे कार्यकेले अक्षतां, त्याचा परिणाम प्रत्यक्ष दृष्टीस पडतो. परंतु दैव प्रत्यक्ष दिसत नसल्यामुलेंती केवलमंदबुद्धीच्या मूर्ख लोकांची कल्पना आहे.
२९४ पौरुषस्य महत्त्वस्य
सत्त्वस्य महतः श्रियः।
इन्द्रियाक्रमणं साधो
सीमान्तो महतामपि॥६उ.।६।४१
(विद्याधर भुशुंंडाला म्हणतो) हे साधो, इद्रियांवर आपलापगडा बसाविण्यासाठीं महात्म्यांनाही आपलें पौरुष, महत्त्व, मोठें धैर्यव शांतिरूपी संपदा यांची पराकाष्ठा करावीलागते.
२९५ पौरुषादृृश्यते सिद्धिः
पौरुषाद्धीमतां क्रमः।
दैवमाश्चासनामात्रं
दुःखे पेलवबुद्धिषु॥२।७।१५
कार्यसिद्धि उद्योगानें होते पुरुष आपला वर्तनक्रम पौरुषाच्याच योगानेें चालवितात. दुबलया बुद्धीच्या लोकांना दुःखाचें वेलींसमाधानासाठीं दैवाचा उपयोग होतो.
२९६ पौरुषेण प्रयत्नेन त्रैलोक्यैश्वर्यसुन्दराम्।
कश्रित्प्राणिविशेषोहि शक्त्रतां समुपागतः॥२।४।१३
पौरुषप्रयत्नाचा अवलंब करुन कोणा एका मनुष्यानें त्रैलोक्याच्या ऐश्वर्यानें युक्त असलेलें श्रेष्ठ इंद्रपद प्राप्त करुन घेतलें.
२९७
पौरुषेणान्नमाक्रम्य यथा दन्तेन चूर्ण्यते।
अन्यः पौरुषमाश्रित्य तथा शूरेणचूर्ण्यते॥२।६।१२
प्रयत्नानें अन्न मिलवून तोंडांत घातल्यानंतर त्याचेंचर्वण दांतांनीं केलेंजातें, त्याप्रमाणें पौरुषाचाच आश्रय करुन शूरमनुष्य दुबलया लोकांचें मर्दन करतो.
२९८ प्रज्ञया नखरालुनमत्तवारणयूथपाः।
जम्बुकैर्विजिताः सिंहाः सिंहैर्हरिणका इव॥५।१२।३१
आपल्या भयंकर पंजांनीं मस्त ह
त्तींच्या कलपांतील मुख्य हत्तींना फाडून टाकणाण्याबलाढ्य सिंहांनाहीं कोल्ह्यांनीं, आपल्या बुद्धीच्या बलवर सिंहांनीं हरणांना सहज जिंकावें, त्याप्रमाणें अनेक वेलांजिंकलें आहें.
२९९ प्रज्ञावानसहायोऽपि
कार्यान्तमधिगच्छति।
दुष्प्रज्ञः कार्यमासाद्य
प्रधानमपि नश्यति
॥५।१२।२३
बुद्धिमान् मनुष्यालाकोणत्याही प्रकारची मदत नसली तरी तो मोठमोठीं कार्येकरतो. पण (केवढेंही मोठें साहाय्य असलें तरी) बुद्धि नसलेल्या मनुष्याच्या मुख्य कार्याचाच नाशहोतो.
३०० प्रज्ञासौजन्ययुक्तेन शास्त्रसंवलितेन च।
पौरुषेण न यत्प्राप्तं न तत्क्वचन लभ्यते॥६।२९।९
शास्त्रीय मार्गानेंविचार करणारी बुद्धि, सौजन्य व पौरुषप्रयत्न यांच्या योगानें प्राप्त होत नाहीं, अशी कुठेंही वस्तूनाहीं.
३०१ प्रत्यक्षमानमुत्सृज्य योऽनुमानमुपेत्यसौ।
स्वभुजाभ्यामिमौसर्पाविति प्रेक्ष्यपलायते॥२।५।१९
प्रत्यक्ष ज्याचें फलदिसतआहे अशा पौरुषप्रयत्नाचा त्याग करुन, केवलअनुमानानेंसिद्ध होणाण्यादैवाचा आश्रय जो मनुष्य करील, तो आपल्याच हातांना सर्पमानून पलूंलागेल. (असें म्हणण्यास काय हरकत आ
हे?)
३०२ प्रभुताबृंहितं चेतो नादहार्यमभिनन्दति॥५।४६।६
ज्याच्या ठिकाणीं प्रभुत्व आलेंआहे, व अधिकार चालविण्याचें सामर्थ्यआहे, त्याला कृत्रिम भूषणादिकांचें काय महत्त्व आहे?
३०३ प्रवाहपतितं कार्यं कुबेन्नपि न लिप्यते॥४।५६।३४
प्रवाहपतित कार्य करणारा (देषांपासून) अलिप्त असतो.
३०४ प्राक्तनं चैहिकंचति द्विविधं विद्धि पौरुषम्।
प्राक्तनोऽद्यतनेनाशु पुरुषार्थेनजीयते॥२।४।१७
(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) पूर्वीचें व हल्लींचें असें दोन प्रकारचें कर्मआहे, हें(तुं) जाण. या जन्मांत मनुष्यानें नेटानेंप्रयत्न केला असतां पूर्वजन्मांतील (विरुद्ध) कर्म नाहींसें करून टाकितां येतें.
३०५ प्राक्स्वकर्मेतराकारं दैवं नाम न विद्यते।
बालः प्रबलपुंसेव तज्जेतुमिह शक्यते॥२।६।४
आपणच पूर्वी केलेल्या कर्माशिवाय दैव म्हणून कांहीं निरालीवस्तु नाहींइतकेंच नव्हे तर शक्तिमान मनुष्य एखाद्या लहान मुलाला आपल्या कह्यांत ठेवतो, त्याप्रमाणे पूर्वीच्या दृुष्ट संस्कारांना सध्यां केलेल्या प्रयत्नांनीं जिंकून टाकतां येणेंशक्य आहे.
३०६ प्राज्ञं प्राप्य न पृच्छन्ति ये केचित्ते नराधमाः॥३।७८।३३
विद्वानाची गांठ पडलीअसतां प्रश्नविचारून जे आपला संशय नाहींसा करून घेत नाहीत, ते केवलनराधम होत.
३०७ प्राप्तकालंकृतं कार्यं राजते नाथ नेतरत्।
वसन्ते राजत पुष्पं फलंशरदि राजते॥६।८४।२२
(चूडाला शिखिध्वज पतीला म्हणते) हे नाथ, योग्य समयीं केलेलेंच कार्यशोभतें. दुसरं शोभत नाहीं. वसंतऋतूमध्यें फुल शोभते आणि शरदृतूंत फलशोभतें.
३०८ प्राप्तेन येन नो भूयः प्राप्तव्यमवशिष्यते।
तत्प्राप्तौयत्नमातिष्ठेत्कष्टयापि हि चेष्टया॥६उ.।६।३१
जेंमिलविलें असतां पन्हां कांहींएणक मिलवावयाचें उरणार नाहीं, असेंच पद मिलविण्याविषयीं जोराचा प्रयत्न करावा. मग त्यामध्ये कितीही कष्टपडले तरी चालतील,
३०९ प्रामाणिकस्य तज्ज्ञस्य
वक्तुःपृष्टस्य यत्नतः।
नानुतिष्ठति यो वाक्यं
नान्यस्तस्मान्नराधमः॥२।११।४६
प्रमाणशुद्ध भाषण करणाण्यातज्ज्ञ मनुष्याला प्रश्न केल्यानंतर जो त्याच्या सांगण्याप्रमाणें यत्न करून वागत नाहीं, त्याच्यापेक्षां अघम मनुष्य दुसरा कोणीही नाहीं.
३१० प्रायः परपारित्राणमेव कर्मनिजं सताम्॥३।२६।२०
दुसण्याचेंरक्षण करण्यासाठींच सत्पुरुषांच्या हातून कोणतेंहीकर्म होत असतें.
३११ बद्धो हि वासनाबद्धोमोक्षःस्याद्वासनाक्षयः४।५७।१९
जो बासनेनें वद्ध असतो, तोच खरा बद्ध; आणि ज्याचा वासनाक्षय झाला, तोच मुक्त समजावा.
३१२ बन्धमुक्तों महीपालो ग्राममात्रेण तुष्यति।
परैरवद्धो नाक्रान्तो न राज्यं बहु मन्यते॥४॥२३॥५७
अरकेंत असलेला राजा मोकलाझाल्यावर त्याला जरी एखादा गांव मिलाला तरी तेवढ्यानें तो संतुष्टहोतो. परंतु ज्याला शत्रुंनीं बद्ध केलें नाहींव ज्याच्यावर कोणाचा तावा नाहीं अशा राजाला राज्य देऊं केलें, तरी खद्धां त्याचेंत्याला कांहींच महत्त्व वाटत नाहीं.
३१३ बलं बुद्धिश्च तेजश्च क्षयकाल उपस्थिते।
विपर्यस्यति सर्वत्र सर्वथा महतामपि॥ ६उ.।१४०।६
नाश होण्याची वेलआली म्हणजे सर्वठिकाणीं सर्वप्रकारें मोठमोठ्यांचीही बुद्धि विपरीत होते, बलचालेनासेंहोते व तेज लोपून जातें
३१४ बहुनात्र किमुक्तेन संक्षेपादिदमुच्यते।
संकल्पनं परो बन्धस्तदभावोविमुक्तता॥६।१२६।९७
अधिक बोलून काय करावयाचें आहे? थोडक्यांत सांगावयाचें हेंकीं, संकल्प करणेंहाच मोठा बंध होय व संकल्परहित असणेंहाच मोक्ष होय.
३१५ बाल्यमल्पदिनैरेव
यौवनश्रीस्ततोजरा।
देहेऽजपि नैकरूपत्वं
कास्था वाह्येषु वस्तुषु॥१।२८।३७
बाल्यदशेनंतर थोडक्याच दिवसानींतारूण्य, व नंतर म्हातारपण अशाभिन्न दशा प्रत्यक्ष देहाचे ठिकाणीं दिसून येतात; मग बाह्य वस्तुएकरूप राहतील असा भरंवसा ठेबण्यांत काय अर्थआहे?
३१६ बीजात्कारणतः कायमङ्कुरः किल जायते।
न बीजमपि यत्रास्ति तत्र स्यादङ्कुरः कुतः॥६उ.।५७।१२
कारणापासून कार्यउत्पन्न होतें. या नियमाप्रमाणें बीजापासून अंकुर उत्पन्न होतो.परंत ज्या ठिकाणींबीजच नाहीं तेथें अंकुर कसा उत्पन्न होईल?
३१७ बीमत्सं विषयं दृष्ट्वाको नाम न विरज्यते।
सतामुत्तमवैराग्यंविवेकादेव जायते॥२।११।२३
वीभत्स विषय पाहून त्यांच्याबद्दलकोणाला तिटकारा वाटणार नाहीं! परंतु सत्पुरुषांचे ठिकाणी जें उत्कृष्ट वैराग्य असतें ते विवेकामुलेंउत्पन्न हातें.
३१८ भवत्यखिलजन्तूनां यदन्तस्तद्वहिः स्थितम्॥५।५६।२४
कोणत्याहीपाण्याच्या अंःकरणांत ज्याविषयीं विचार चालू असतो त्याप्रमाणेंच त्याला वाह्यजगांत दिसत असतें.
३१९ भविष्यं नानुसंधत्ते नातीतं चिन्तयत्यसौ।
वर्तमाननिमेषं तुहसन्नेवानुवर्तते॥५।१२।१४
(जनक राजा) भावी गोष्ठीची चिंता वहात नसे. आणि गत गोष्टींचेंस्मरण करीत नस. तसेंच वर्तमानकालींसर्व व्यवहार आनंदाने करीत असे.
३२० भारोऽविवेकिनः शास्त्रभारो ज्ञानं च रागिणः।
अशान्तस्य मनो भारो भारो नात्मविदो वपुः॥१।१४।१३
अविवेकी मनुष्याला शास्त्र, विषयी मनुष्याला ज्ञान, रागीटमनुष्याला मन आणि आत्मज्ञान नसलेल्या मनुष्याला शरीर हेंभारभूत होतें.
३२१ भूतानि सन्ति सकलानि बहूनि दिक्षु
बोधान्वितानि विरलानि भवन्ति किंतु।
बृक्षा भवन्ति फलपल्लवजालयुक्ताः
कल्पद्रुमास्तु विरलाः खलु संभवन्ति॥उ,।९७।४७
पानें, फलेंयांनीं भरून गेलेले सामान्य वृक्ष सर्वत्र आढलतात परंतु कल्पवृक्ष सर्वत्रदिसत नाहींत. त्याप्रमारणें मोहांत गुरफटून गेलेले लोक सर्व ठिकाणीं दृष्टीस पडतात, परंतु ज्ञानसंपन्न लोक अगदीं क्वचित्च आढलतात,
३२२ भोगेच्छामात्रको बन्धस्तत्त्यागो मोक्ष उच्यते॥४।३५।३
विषयापभोगांची इच्छा असणेंहाच बंध, आणि इच्छा नसणें हाच मोक्ष होय.
३२३ भोगेष्वस्वदमानेषु पुंसः श्रेयः पुरो गतम्॥४।३३।६९
ज्या मनुष्याला विषयोपभोगांचा अत्यंत तिटकारा आला, त्याच्या पुढेंमोक्ष हात जोडून उभा आहे।
३२४ मत्त ऐरावतो बद्धः सर्षपस्येव कोटरे।
मशकेन कृतं युद्धं सिंहौघैरणुकोटरे॥३।२०।९
पद्माक्षे स्थापितो मेरुर्निगीर्णो भृङ्गसूनुना।
स्वप्नाब्दगर्जितं श्रुत्वा चित्रं नृत्यन्ति बर्हिणः॥२।२०।१०
(अशक्यविधानें) एखाद्या मत्त हत्तीला मोहरीच्या गाम्यांतबांधून ठेवलें, एखाद्या चिलटानेंपरमाणूच्या पोटांत सिंहांच्या कलपाबरोबर युद्ध केलें, एखाद्या कमलाच्या वीजामध्ये मेरुपर्वत सांठविला व तो एखाद्या लहानशा भुंग्यानें गिलुन टाकला, स्वप्नांतीलमेघांची गर्जना ऐकून चित्रांतीलमोर नाचूं लागले.
३२५ मन एव समर्थं वो मनसो दृढनिग्रहे।
अराजा कः समर्थः स्याद्राज्ञो राघव निग्रहे॥२।११२।१९
(श्रीवसिष्ठ म्हणतात) श्रोतृजनहो, तमच्या मनाचा दृढ निग्रह करण्याला तुमचें मनच समर्थ आहे. हे राघवा, राजाचा निग्रह करण्याला जो राजा नाही, जसा कोणता सामान्य मनुष्य समर्थ होइलऽ
३२६ मनःकृतं कृतं लोके न शरीरकृतं कृतम्॥३।८९।१
मनानेंजें केले तेंच खरोखर केलेलें असेंसमजावें, केवल रारीरानें केलें, तें केलें असेंम्हणतां येत नाहीं.
३२७ मनो हि न जडं राम नापि चेतनतां गतम्॥३।९६।३७
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, मन हैं धड जडहीनाहीं, आणि चेतनहीनाहीं.
३२८ मरणस्य मने रज्ञो
जराधवलचामरा।
आगच्छतोऽग्रे निर्याति
स्वाधिव्याधिपताकिनी॥१।२२।३०
(राम विश्वामित्रांना म्हणतो) हेमुने, मरण हा एक राजा असून त्याची स्वारी आपल्याकडे येऊं लागली, म्हणजे त्याच्या अगोदर आधिव्याधिरूपी सेना बाहेर पडत असून जरारूपी पांढरी चवरी पुढेंदिसूंलागते.
३२९ महतां दर्शनं नाम न कदाचन निष्फलम्॥३।२६।३९
महात्म्यांचें दर्शन केव्हांही निष्फलहोत नाहीं.
३३० महतामेव संपर्कात्पुनर्दुःखं न बाधते।
को हि दीपशिखाहस्तस्तमसा परिभूयते॥३।८२।८
जलणारी मशालहातांत असली म्हणजे अंधारांत चांचपडण्याचा कोणालाहींप्रसंग येत नाहीं. त्याप्रमाणे महात्म्यांचा सहवास झाल्यावर कोणालाही दुःख भोगण्याचा प्रसंग येत नाहीं.
३३१ महाकर्तामहाभोक्ता महात्यागी भवानघ।
सर्वाः शङ्काः परित्यज्य धैर्यमालम्ब्य शाश्वतम्॥६।११५।१
(श्रीवसिष्ठम्हणतात) हे निष्पाप रामा, तुंसर्वं शंका सोडूनदेऊन, शाश्वत धैर्याचा आश्रय करून, महाकर्ता, महाभोक्ता व महात्यागी हो.
३३२ महाशनानामेकान्ते भोजनं हि सुखायते॥३।८२।४४
पुष्कलआहार करणारांना एकान्तांत भोजन करणें सुखावह होत असतें.
३३३ मांसपाश्चारिकायास्तु
यन्त्रलोलेऽङ्गपञ्जरे।
स्नाय्वस्थिग्रन्थिशालिन्याः
स्त्रिया! किमिव शोभनम्॥१।२१।१
यंत्रांतीलनिरनिरालेभाग अत्यंत चंचलअसतात, त्याप्रमाणे स्त्रीचेंशरीर असून तें स्नायु, अस्थि इत्यादिकांनीं बनलेलें असते, स्रीं केवलमांसाची पुतलीअसून तिच्यामध्यें रमणीय असें काय आहे?
३३४ मुकुरे निर्मले द्रव्यमयत्नेनैव बिम्बति॥६उ.॥७।४
स्वच्छ आरशामध्यें कोणत्याही वस्तूचेंप्रतिबिंब सहज पडतें.
३३५ मुख्याङ्कुरं सुभग विद्ध मनो हि पुंसो
देहास्ततः प्रविसृतास्तरुपल्लवाभाः।
नष्टेऽङ्कुरे पुनरुदेति न पल्लवश्री-
र्नैवाङ्कुरः क्षयमुपैति दलक्षयेषु॥२।८९।५२
(इंद्रब्राह्यण इंद्रद्युम्न राजाला म्हणतो) मनुष्याचें मन हाच संसारतरूचा मुख्य अंकुर आहे. आणि ह्याअंकुरापासून संसाररूपी व॒क्षाला देहरूपी पाटवी फुटलअसते. मूल अंकुरच नाहींसा झाला, तर झाडाला पुन्हां पालवी फुटत नाहीं; पण जुसतीं पानेंगलून्पडलीं असतां मूव्ठ अंकुर नष्ठ होत नाहीं.
३३६ मूढानुमानसंसिद्धं दैवं यस्यास्ति दुर्मतेः।
दैवाद्दाहोऽस्ति नैवेति गन्तव्यं तेन पावके॥२।८।५
केवलमूर्खपणाच्या अनुमानामुलेदैव आहे असेंज्या मंदबुद्धि पुरुषाला वाटतें, स्यानेंत्या दैवाची परीक्षा करण्याकरितां अग्नीमध्यें उडी टाकून आंगाचा दाह होती किंवा नाहीं तें पहावें !
३३७ मूढैःप्रकल्पितं दैवं तत्परास्ते क्षयं गताः।
प्राज्ञास्तु पौरुषार्थेन पदमुत्तमतां गताः॥२।८।१६
दैव ही केवलमूर्खाचीकल्पना आहे या दैवाच्या नाीं जे लागतात त्यांचा नाश होतो. ज्ञाते लोक उद्योगाच्या योगानें उत्तम पदाला जाऊन पोहोंचतात.
३३८ मूढोत्तारणमेबेह स्वभावो महतामिति॥३।७६।१२
मीढ लोकांचा उद्धार करणेंहाच महात्म्यांचा स्वभाव असतो.
३३९ मृतिर्गुणितिरस्कारो जीवितं गुणिसंश्रयः॥३॥७७।३१
गुणिजनांचा तिरस्कार म्हणजेच मृत्यु. आणि गणिजनांचा आश्रय म्हणजेच खरेंजीवित होय.
३४० मोक्षद्वारे द्वारपालाश्चत्वारः परिकीर्तिताः।
रामो विचारः संतोषश्चतुर्थःसाधुसंगमः॥२।११।५९
राम, विचार, संतोष आणि साघुसमागम हे मोक्षाच्या द्वारावरील चार द्वारपालआहेत.
३४१ मोक्षःशीतलचित्तत्वं बन्धः संतप्ताचित्तता॥६उ.।९५।२९
चित्त शांत असणें हा मोक्ष व चित्त संतप्त असणेंहा बंध होय,
३४२ मोहनाशाय महतां वचो नो मोहवृद्धये॥५।४९।६
महात्म्यांचें भाषण मोहाचा नाश करतेंत्याची वाढ करीत नाहीं
३४३ मौर्ख्यं हि बन्धनमवेहि परं महात्मन्॥६।८९।३१
(चूडाला शिखिध्वजाला म्हणते) हे महात्मन्, मूर्खपणा हें मोठेबंधन आहेअसेंसमज.
३४४ य एव यत्नः क्रियते बाह्यार्थोपार्जने जनैः।
स एव यत्नः कर्तव्यः पूर्वं प्रज्ञाविवर्धने॥५।१२।२६
द्रव्यादि वाह्यपदार्थ मिलविण्यासाठीं मनुष्य जसा प्रयत्न करतो तसा जोराचा प्रयत्न प्रथमतः बुद्धि वाढविण्यासाठीं करावा.
३४५ यत्कृतं मनसा तात तत्कृतं बिद्धि राघव।
यत्त्यक्तं मनसा तावत्तत्त्यक्तं विद्धि चानघ।॥३।११०।१४
(श्रीवसिष्टम्हणतात) हे निष्पाप रामा, जेंमनाने केलें तेंच खरोखर केले असेंजाण. आणि ज्याचा मनने त्याग केला त्याचाच त्याग केला असेंसमज.
३४६ यत्नबद्भिर्दृढाभ्यासैःप्रज्ञोत्साहसमन्वितैः।
मेरवोऽपि निगीर्यन्ते कैव प्राक्पौरुषेकथा॥२।४।१८
बुद्धिमान, उत्साही, उद्योगी पुरुषांनीं प्रयत्नपूर्वक दृढ अभ्यास केला असतां, त्यांना मेरुपर्वत सुद्धां गिलंकृत करून टाकतां येतो, मग पूर्वजन्मांतील (विरुद्ध) कर्मनाहींसें करतां येईल, यांत नवलकाय?
३४७ यत्नेनापि पुनर्बद्धंकेन वृन्तच्युतं फएलम्॥६उ.।१२५।३२
देठापासून गललेलें फलपुन्हां कोणीतरी प्रयत्न करुन सुद्धां देठाला पूर्वीप्रमाणें चिकटवूंशकेल काय?
३४८ यत्सुखं दुःखमेवाहुक्षणनाशानुभूतिभिः।
अकृत्रिममनाद्यन्तं यत्सुखं तत्सुखं विदुः॥६उ.॥६८।३१
क्षणांत नाश पावण्याचा अनुभव येत असल्यामुलेज्ञाति लोक विषयसुखाला इःखच असेंम्हणतात. आणि जें स्वाभाविक, अनादि, अनंत असेंआत्मस्वरूपाचेंसुख त्यालाचखरें सुख म्हणतात.
३४९ यथाचारं यथाशास्त्रं
यथाचित्तं यथास्थितम्।
व्यवहारमुपादत्ते
यः स आर्यइति स्मृतः॥६।१२६।५५
वृद्धांचा आचार व शास्त्र यांच्या अनुरोधानें प्रसन्नचित्तानें यथास्थित कर्मकरणारा व लौकिक व्यवहारही पालणारा त्याला आर्यअसें म्हणतात.
३५० यथा देहोपयुक्तं हि करोत्यारोग्यमौषधम्।
तथेन्द्रियजयेऽभ्यस्ते विवेकः फलितो भवेत्॥४।१८।६६
औषध पथ्यपू्वर्क सेवन केल्यानेंच आरोग्य प्राप्त होतें, त्याप्रमाणें इंद्रियजयाचा अभ्यास केला, तर आत्मानात्मविवेक फलद्रपहोईल.
३४१ यथा न किंचित्कलयन्मञ्चके स्पन्दते शिशुः।
तथा फलान्यकलयन्कुरु कर्माणि राघव॥५।७०।२०
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, एखाेंदलहान मूल कीणत्याही तव्हेचासंकल्प न करितां आनंदानें पलंगावर लोलत असतें, त्याप्रमाणेंकर्मफलाचा मुलींच विचार न करतां तुंआपलीं प्राप्तकर्मैकरीत जा.
३४२ यथा नाशेन बा भाव्यं तथोदेत्यशुभामतिः॥३।७१।१७
जशा रीतीनें नाशव्हवयाचा असतो, तशातव्हेची दुर्बुद्धि अगोदर उत्पन्न होते.
३५३ यथाप्राप्तं हि कर्तव्यमसक्तेन सदा सता।
मुकुरेणाकलङ्केन प्रतिबिम्बक्रिया यथा॥३।८८।११
एखादा स्वच्छ आरसा आपल्यासमोर येणाण्यापदार्थाचें प्रतिबिंब धारण करतो, त्याप्रमाणेंआसक्त न होतां आपलें प्राप्त झालेलें कर्तव्य सज्जन मन॒ष्यानें अवश्य करीत राहिलें पाहिजे.
३५४ यथा रजोभिर्गगनं यथा कमलमम्बुभिः।
न लिप्यते हि संश्लिष्टैर्देहैरात्मा तथैव च॥५।५।३१
आकाशांत घूलउडाली म्हणून तें मलिन होत नाही, किंवा कमलपत्रावर उदक पडलें तरी तेंत्याला चिकटत नाहीं, त्याप्रमाणेंआत्म्याशीं कितीही देहांचा संबंध आला तरी तो त्यांच्या योगानें लिप्त होत नाहीं.
३५५ यथा वन्ध्यासुतो नास्ति यथा नास्ति मरौजलम्।
यथा नास्ति नभोवृक्षस्तथा नास्ति जगद्भ्रमः॥३।७।४३
(ज्ञानी पुरुषाचा अनुभव) ज्याप्रमाणेंवंध्येचा मुलगा, मृगजलआणि आकाशांतील वृक्ष यांना अस्तित्व नसतें, त्याप्रमाणें भ्रामामुलेंभासणाण्याजगाला अस्तित्व नाहीं.
३५६ यथा शाम्येन्मनोऽनिच्छं
नोपदेशशतैस्तथा॥६उ.।३६।२३
इच्छा सोडल्यानेंमन जसेंशांत होतें, तसेंशेंकडों उपदेशांनींही शांत होत नाहीं.
३५७ यथा स्पर्शेन पवनः सत्तामायाति नो गिरा।
तथेच्छातानवेनैव विवेकोऽस्य विबुध्यते॥४।१८।६८
नुसता `वारा’हा शब्द ऐकवल्यानें त्याचें आस्तित्व कलत नसतें, तर त्यासाठीं वाण्याचा आंगाला स्पर्श व्हावा लागतो, त्याप्रमाणें ‘मी विवेकी आहें’ असेंम्हटल्यानेंविवेकाची परोक्षा होत नाहीं, तर विषयाची तृष्णा कमी असर्णे हीच विवेक असल्याची खूण होय.
३५८ यथा हि काष्टजतुनोर्यथा बदरकुण्डयोः।
श्लिष्टयोरपि नैकत्वं दहदेहवतोस्तथा॥३॥११४।६२
लाकूड आणि लाख किंवाबोरें आणि भांडेंहीं एकमकांशींचिकटलेला दिसलीं, तरीस्यांचेंवास्तविक ऐक्य संभवत नहीं, त्याचप्रमाणें देह आणि जीवात्मा यांची स्थिति आहे.
३५९ यदवध्यवधात्पापं वध्यत्यागात्तदेव हि॥३॥९०।३
अवध्याचा वध केल्यानं जितकेंपातक लागतें, तितकेंच पातक वभ्याचा वध न केल्यानें लागत असतें.
३६० यदार्यगर्हितं यद्वा
न्यायेन न समार्जितम्।
तस्माद ग्रासाद्वरं मन्ये
मरणं देहिनामिदम्॥३।७६।७
आर्यलोकांनीं निंद्य ठराविलेलें किंवाअन्यायाचेंकृत्य करून आपलें पोटभरण्यापेक्षां मनष्यांनीं मरून जाणें हेंच श्रेयस्कर होय.
३६१ यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्कचित्।
इमं समस्तविज्ञानशास्त्रकेशं विदुर्बुधाः॥३।८।१२
जें या योगवासिष्ठ ग्रंथांत आहे, तेंच इतर ग्रंथांतुन आहे आणि जेंयांत नाहींतें कोठेंरी नाहीं. कारण हा ग्रंथ म्हणजे सर्वविज्ञानशास्त्रांचें भांडार आहे, असेंविद्वान लोक मानतात.
३६२ यदेव क्रियते नित्यं रतिस्तत्रैव जायते॥३।२।४८
मनुष्य जेंकृत्य नेहमीं करतो, तेंच पुन्हां करण्याची आवड त्याच्याठिकाणीं उत्पन्न होते.
३६३ यद्यथा कल्पितं येन स संपश्यति तत्तथा॥६उ.।१७७।३
ज्यानें ज्या वस्तुची ज्या प्रकारानेंकल्पना केली, तो त्या वस्तुलातरा प्रकारानेपाहतो.
३६४ यद्वस्तु विद्यमानं सत् प्रश्नस्तत्र विराजते॥६।९६।४२
जी वस्तु विद्यमान व सद्रूप असते, तिच्याविषर्यीं प्रश्न केला तर तो शोभतो.
३६५ यन्त्रं तिलानां कठिनं राशिमुग्रामिवाकुलम्।
यं पीडयति नानङ्गस्तं मृत्युर्नजिघांसति॥६।२३।१०
तेल काटण्याचा कठीण घाणा तिलांची मोठी रास पिलून काटतो, त्याप्रमाणें मदन ज्याला व्याकुलकरून पीडा देत नाहीं, त्यालाठार मारण्याची इच्छा मृत्यु करीत नाहीं.
३६६ यन्नाम किल नास्त्येव
तच्छान्तौका कदर्थना॥ ६उ.।१४२।४५
अलांत जी वस्तु नाहीं, तिचा परिहार करण्याविषयीं क्लेश तरी कसले!
३६७ यन्मयो हि भवत्यङ्ग पुरुषो वक्ति तादृशम्॥६उ.\।२९।४०
(श्रीवसिष्ठ रामाला सांगतात) बाबारे, मनुष्याचेंजसें ज्ञान असेंल, तसें तो भाषण करतो.
३६८ यमो निर्धृणराजेन्द्रो नार्तं नामानुकम्पते।
सर्वभूतदयोदारो जनो दुर्लभतां गतः॥१।२६।७
यम हा अत्यंत निर्दय असून त्याला दुःखितांचीमुलींच कीव येत नाही. सर्वप्राण्यांवर दया करणारा थोर मनुष्य या जगांत फारच विरला.
३६९ ययैवाजीव्यते युक्त्या सैवापदि विराजते॥६उ.।१९६।१६
आपत्कालींज्या युक्तीनें प्राण वांचतात, तीच उत्तम होय.
६७० यस्त्विच्छातानवे यत्नं न करोति नराधमः।
सोऽन्धकूपे स्वमात्मानं दिनानुदिनमुज्ज्ञति॥६उ,।३६।३ १
जो नीच मनुष्य आपल्या इच्छा कमी करण्याचा प्रयत्न करीत नाहीं, तो आपणाला प्रत्येक दिवशीं अंधकूपांत फेकीत असतो.
३७१ यस्याग्रे न गलति संशयः समूलो
नैवासौक्वचिदपि पण्डितोक्तिमेति॥३।७९।३३
जो आपल्यापुढेंमांडलेल्या शंकेचेंसमूलनिरसन करीत नाहीं, त्याला पंडित ही पदवी केव्हांच प्राप्त होत नाहीं.
३७२ यस्यान्तर्वासनारज्जा
ग्रन्थिबन्धः शरीरिणः।
महानपि बहुज्ञोऽपि
सबालेनापि जीयते॥४।२७।२०
जो मनुष्य अंतःकरणांतील वासनारूपी दोरीनेंघट्ट बांधलेला असतो, तो कितीहीबलवान् किंवा विद्वान असो, प्रसंगीं लहानशा पोराकडूनहीपराजित होतो.
३७३ यस्येच्छाननुसंधानमात्रे दुःसाध्यता मतेः।
गुरूपदेशशास्त्रादि तस्य नूनं निरर्थकम्॥६उ.।३६।३५
इच्छेचा संबंध न ठेवणें, एवढेंदेखील ज्याच्या बुद्धीला दुःसाध्य वाटत असेल, त्यानें घेतलेला गुरूपदेश, त्याचें शास्त्रज्ञान इत्यादि सर्व खरोखर व्यर्थ होय,
३७४ यस्योज्ज्वलति तीक्ष्णाग्रा पूर्वापरबिचारिणी।
प्रज्ञादीपशिखा जातु जाड्यान्ध्यं तं नबाधते ५।१२।१९
ज्याच्या ठिकाणीं पूर्वापरविचार करणाण्याकुशाग्र बुद्धीची ज्योति प्रज्वलित झालेली असते, त्याला अज्ञानरूपी अंधकार केव्हांही बाधा करीत नाहीं,
६७५ यः स्नातः शीतसितया
साधुसंगतिगङ्गया।
किं तस्य दानैःकिं तीर्थैः
किं तपोभिःकिमध्यरैः॥२।१६।१०
ज्यानें सत्संगरूपी गगेच्या थंड व स्वच्छ पाण्यांत स्नान केलें आहे, त्याला दान, तीर्थं, तप आणि यज्ञ यांच्यापासून कोणतें पुण्य प्राप्त व्हावयाचेंराहिलें आहे?
३७६ यावत्तिलं यथा तैलंयावद्देहं तथा दशा।
यो न देहदशामेति स च्छिनत्त्यसिनाम्बरम् ६।१०४।४२
जोपर्यंत तीलअसतात तोंपर्यंत त्यांत तेल असतेंच. त्याप्रमाणे जोपर्यंत शरीर असतें तोपर्यंत हर्ष, खेद इत्यादि विकार होणारच. देह असेपर्यंत ज्याला हे विकार होत नाहींत तो तरवारीनें आकाशच कापून काढतो.
६७७ यावत्सर्वंन संत्यक्तं
तावदात्मा न लभ्यते।
सर्वावस्थापरित्यागे
शेष आत्मेति कथ्यते।५।५८।४४
जोंपर्यंत मनानें सर्वविषयांचा पूर्णपणेे त्याग केला नाहीं, तोंपर्यंत कोणालाही आत्मप्राप्ति होणार नाहीं.कारण मनाच्या सर्वअवस्थांचा त्याग झाल्यानंतर अवशिष्टराहणारा तोच आत्मा, असा सिद्धांत आहे.
३७८ यावदन्यन्न संत्यक्तं
तावत्सामान्यमेव हि।
वस्तु नासाद्यते साधो
स्वात्मलाभे तु का कथा॥५।५८।४५
(मांडव्य ऋषि सुरघु राजाला म्हणतात) हे साधो, सामान्य व्यवहारामध्येदेखीलएखादी क्षुद्र वस्तु तिच्या विरोधी वस्तूंचा त्याग केल्याशिवाय हातीं लागत नाही; असा नियम आहे. तर आत्मलभाच्या संबंधानें हा नियम विशेषय लागू पडावा, यांत काय आश्चर्यआहे?
३७९ यावद्देहं स्वभावोऽस्य देहस्य न निवर्तते ॥३।७६।५
जोंपर्यंत देह आहे, तोपर्यंत व्याचें धर्म नाहीसे होत नाहींत-
३८० या विवेकबिकासिन्यो मतयो महतामिह।
न ता विषदि मञ्जन्ति तुम्बकानीव वारिणि॥२।१४।११
भोपलापण्यांत बुडत नाहीं, त्याप्रमाणे विवेकानें विकास पावलेली महात्म्यांची बुद्धि विपत्कालींनिराशेंत बुडून जात नाहीं,
३८१ युक्तियुक्तमुपादेयं वचनं बारकादपि।
अन्यत्तृणमिव त्याज्यमप्युक्तं पद्मजन्मना॥२।१८।३
एखाद्या मुलानेंही केलेलें सयुक्तिक भाषण ग्राह्म समजावें, परंतु प्रत्यक्ष बह्मदेवानेंही केलेलें भाषण युक्तीच्या विरुद्ध असल्यास तेंत्याज्य समजावें.
३८२ युक्त्या च व्यवहारिण्या स्वार्थःप्राज्ञेन साध्यते॥३।७८।२५
ज्ञाते लोक आपलेंकार्यव्यावहारिक युक्तीनें साधीत असतात.
३८३ युक्त्या प्रोबोध्यते मूढः प्राज्ञस्तत्त्वेन बोध्यते॥६।४९।२९
मूढालायुक्तीनें बोध करावा लागतो व जाणत्याला तत्त्व सांगृन बोध करावा लागतो.
३८४ युक्त्यैव बोधयित्वैष जीव आत्मनि योज्यते।
यद्युक्त्यासाद्यतेकार्यं न तद्यत्नशतैरपि॥
६
।४९।१९
युक्तीनेंच बोध करून या जीवाला आत्मप्राप्ति करून द्यावी लागते. कारण जेंकार्ययुक्तीनें साधतें तेंशेंकडों प्रयत्नांनींही साधत नाहीं.
३८५ युज्यते वेष्टनं वायोराकाशस्य च खण्डनम्।
ग्रथनं च तरङ्गाणामास्था नायुषि युज्यते॥१।१४।५
वाण्याची मोटबांधतां येईल, आकाशाचेतुकडे करतां येतील, पाण्यावरील लाटांना एकत्र ओंवतां येईल या गोष्टीवर एकवेलविश्वास बसेल परंतु आयुष्यावर विश्वास बसत नाहीं.
३८६ ये केचन समारम्भा ये जनस्य क्रियाक्रमाः।
ते सर्वे देहमात्रार्थमात्मार्थं न तु किंचन॥४।५७।३१
बाह्य विषयांवर दृष्टि ठेवणारे लोक सर्ववैदिक किंवा लौकिक कर्मकेवलदेहाच्या सुखासाठीं करीत असतात, परंतु आत्मज्ञानासाठीं मुलीच प्रयत्न करीत नाहींत.
३८७ येन नासादितं हेम रीतिं किं स परित्यजेत्॥६।१०१।४०
ज्याला सोन्याचीं माहिताीच नाहीं, तो पितल मिलविण्याच्याच मार्गांत असणार.
३८८ येन प्राप्तेनलोकेऽस्मिन्न प्राप्यमवशिष्यते।
तत्कृतं सुकृतं मन्ये शेषं कर्मविषूचिका॥६।७४। १७
(भागीरथ म्हणतो) जेंप्राप्त झालें असतां या लोकांतव कांहींअधिक मिलावयाचेंराहात नाही, तेंच करणं याला मी ‘सुकृत` समजतों. बाकीचें कर्म म्हणजे पटकीप्रमाणें अपवित्रव दुःखदायक होय.
३८९ येनाभ्यासः परित्यक्त इष्टे वस्तुनि सोऽधमः।
कदाचिन्न तदाप्नोति वन्ध्या स्वतनयं यथा॥६उ.।६७।३४
ज्यानें इच्छिलेल्या वस्तूविषयींचा अभ्यास सोडून दिला, तो नीच होय. वंध्येला ज्याप्रमाणं स्वतःचा मुलगा प्राप्त होत नाहीं, त्याप्रमाणें अभ्यास सोडून देणाराला इष्ठ वस्तु कधींही प्राप्त होत नाहीं.
३९० ये शूरा ये च विक्रान्ता ये प्राज्ञा ये च पण्डिताः।
तैस्तैः किमिव लोकेऽस्मिन्वददैवं प्रतीक्ष्यते ॥२।८।१७
(श्रीवसिष्ठ म्हणतात हे रामा,) या जगांत जेलोक शूर, पराक्रमी, बुद्धिमान् व पंडित म्हणून प्रसिद्धीला आले (ते केवलपौरुषाच्याच योगानेंहोत.) तुंच सांग कीं, ते कधीं दैवाची वाटपहात बसले होते काय?
३९१ येषां गुणेष्वसंतोषो रागो येषां श्रुतं प्रति।
सत्यव्यसनिनो ये च ते नराः पशवोऽपरे॥४।३२।४३
ज्यांचा हावरेपणा सद्गुणांविषयीं आहें, ज्यांना प्रेम विद्येचें आहे, आणि व्यसन सत्याचें आहे, तेंच खरोखर मनुष्य होत, इतर लोक केवलपशुतुल्य होत.
३९२ यैरेव जायते रागो मूर्खस्याधिकतागतैः।
तैरेव भागैःप्राज्ञस्य विराग उपजायते॥४।४६।५
ज्या विषयोपभोगांच्या समृद्धीमुलेंमूखं मनुष्यांना प्रेम उत्पन्न होतें, त्याच विषयांच्या अभिवृद्धीमुलेंज्ञात्यांना वैराग्य उत्पन्न होतें.
३९३ यो न निर्वासनो नूनं सर्वधर्मपरोऽपि सः
सर्वज्ञोऽप्यभितो वद्धः पञ्जरस्थो यथा खगः॥६।५५।४४
ज्याच्यावासना नाहींशा झाल्या नाहींत, तो खरोखर सर्वधर्मपरायण व सवेज्ञ जरी असला तरी पिंजन्यांतील पक्ष्याप्रमाणें सर्ववाजुंनीं बद्धच आहे.
३९४ योऽन्तःशीतलतां यातो यो भावेषु न मज्जति।
व्यवहारी न संमूढः स शान्त इति कथ्यते॥२।१३।७८
ज्याचेंअंतःकरण तृप्त आहे, विषयांच्यापसाण्यांत राहूनही जो विषयासक्तहोत नाहीं, आणि व्यवहार करीत असूनही जो मोह पावत नाहीं, तोच खरा शांत होय.
३९५ यो यादृक्क्लेशमाधातुं समर्थस्तादृगेव सः।
अवश्यं फलमाप्नोति प्रबुद्धोऽस्त्वज्ञ एव वा॥६उ.।
१
०२।
३३
ज्ञानी असो अज्ञानी असो, जो ज्या प्रकारचे कष्ठ करण्यास समर्थ असेल, त्याप्रकारचेंफलत्याला अवश्य प्राप्त होतें.
३९६ यो यो यथा प्रयतते स स तत्तत्फलैकभाक्।
न तु तूष्णीं स्थितेनेह केनचित्प्राप्यते फलम्॥।२।७।१९
जो जो मनुष्य जसा जसा प्रयत्न करतो, तसेंतसेंफल त्याला प्राप्त होते; परंतु स्वस्थ बसून कोणालाही फलप्राप्त होत नाहीं.
३९७ यो यो यादृग्गुणो जन्तुः स तमेवैति संस्थितिम्।
सदृशेष्वप्यजेषु श्वा न मध्ये रमते क्वचित्॥५।३२।२९
जो ज्या गुणाचा असेल ता त्यागुणाला योग्य अशा स्थितींतच राहतो. रंगाप्रमाणें व रूपाप्रमाणेंबोकडांचा रंग व रूप हीं जरी असलीं, तरी त्यांच्या कलपांत कुत्रा कधींदी रमत नाहीं.
३९८ योऽस्मत्तातस्य कूपोऽयमिति कौपं पिबत्यपः।
त्यक्तवा गाङ्गंपुरःस्थं तंकोना शास्त्यतिरागिणम्॥२।१८।४
‘ही विहीर आमच्या वडिलांनीं खणलेली आह,’असें म्हणून आपल्या पुढेंअसलेलें गगेचेंपाणी टाकून जो त्या विहिरीचेंच पाणी पितो, त्याहट्टीमनुष्याची कोणता मनुष्य समजूत घालणार?
३९९ रम्यवस्तुक्षयायैव मूढानां जृम्भते पदम्॥६।६२।२५
सुंदर वस्तुचानाश करण्यासार्ठीच मूढलोकांचें स्थान वाढत असतें.
४०० राग एव हि शोभायै
निर्गुणानां जडात्मनाम्॥
६
उ.।१२०।१०
(हा फुललेला पलसाचा वृक्ष केवलरंगीत फुलांच्या योगानें राजासारखा शोभत आहे, त्याप्रमाणं) खरी शोभा देणारे औदार्यादि गुण मूर्खाच्या ठिकाणीं नसल्यामूलेशोभा आणण्यासाठीं त्यांना केवलरगीत बस्त्रालंकारचधारण करावे लागतात.
४०१ राजते हि पदार्थेश्रीर्महतामर्पणाच्छुभा॥३।१०४।३७
एखादा मूल्यवान् चांगला पदार्थ योग्य असलेल्या थोर लोकांना अर्पण केला असतां शोभूं लागतो.
४०२ राज्यानि संपदः स्फारा भोगा मोक्षश्चशाश्वतः।
विचारकल्पवृक्षस्य फलान्येतानि राघव॥२।१४।१०
(श्रीवसिष्ठम्हणतात) हे राघवा, राज्य, विपुल संपत्ति, विषयोपभोग आणि मोक्ष हींसर्व विचाररूपी कल्पवृक्षार्चीच फलेंहोत.
४०३ कोकनिन्द्यस्य दुर्जन्तोर्जीवितान्मरणं वरम्॥५।४६।४३
लोकांच्या निंदेलापात्र झालेल्या दुष्ट पुरुषानें जगण्यापेक्षां मरून जाणें हेंच श्रेयस्कर आहे.
४०४ लोकस्थितिरलङ्घ्याहि महतामपि मानद॥५।६५।३०
(श्रीवसिष्ठ मानदेणाण्यारामाला म्हणतात) हे मानदा, माहात्म्यांनासुद्धां लौकिक व्यवहाराचेंउल्लंघन करतां येत नाहीं.
४०५ वरं शरावहस्तस्य चण्डालागारवीथिषु।
भिक्षार्थमटनं राम न मौर्ख्यहतजीवितम्॥२।१३।२७
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, चांडालांच्या वस्तींतून हातांत थालीघेऊन भीक मागण्याचा प्रसंग आला तरी पुरवरा, परंतु मूर्खपणामुलेंनिष्फलझालेलें जीवित कंठण्याचा प्रसंग नको.
४०६ वरं कर्दमभेकत्वंमलकीटकता वरम्।
वरमन्धगुहाहित्वं ननरस्याविचारिता॥२।१४।४६
चिखलांत बेडूकं हाऊन राहावें लागणें, घाणीमधील किडाम बनावें लागणें किंवाएखाद्या गुहेमध्यें आंधलासर्प होऊन राहावेंलागणें चांगलें, परंतु मनुष्य हाऊनही विचाररहित असणें चांगलें नाहीं.
४०७ वसनाशनमात्रेण तुष्टाः शास्त्रफलानि ये।
जानन्ति ज्ञानबन्धुस्तान्विद्याच्छास्रार्थशिल्पिनः॥६उ.।२१।५
उत्तमवस्त्रें आणि भोजनादि पदार्थ मिलणें हेंच शास्त्रज्ञानाचें फल, असेंसमजून आनंद मानणारे लोक शास्त्रार्थाचेकेवल शिल्पी (कसबी) होत; ज्ञानी नव्हत. (कारागीर लोकांनीं तयार केलेल्यासुंदर वस्तूंचे भोक्ते दुसरे, कारागीर फक्त मजुरीचे मालक. तीच यांची तब्हा.)
४०८ वसन्तो नन्दनोद्यानमिन्दुरप्सरसः स्मृताः।
इत्येकतः समुदितं संतोषामृतमेकतः॥६उ.।४७।४४
वसंत ऋतु, नंदनवन, चंद्र आणि अप्सरा या सर्वोपासून होणारें सुख एका संतोषरूपी अमृतापासून मिलतें.
४०९ वस्त्वल्पमप्यातिबृहल्लघुसत्त्वोहि मन्यते॥६उ.।९८।२३
(कोणताही प्राणी आपल्या बुद्धिसामर्थ्याप्रमाणें वस्तूला महत्त्व देतो) मंद बुद्धीचा मनुष्य अतिशय मुल्यवान् पदार्थाला कमी किंमतीचा समजून क्षुद्र बस्तूला फार महत्त्व देतो. (उंदीर रत्नादिकांना तुच्छ मानून धान्याचे कण गोला करतात. तसेंच खेलणारें मूल मातीच नवीन चित्र घेण्यासाठीं जवलचा मूल्यवाम् कागिना देण्यासही तयार होतें.)
४१० वस्त्वस्थानगतं सर्वं शुभमप्यशुभं भवेत्॥६उ.।१९६।५२
कोणतीही शभ वस्तु अयोग्य ठिकाणीं राहिल्यासती अशुभ होते.
४११ वातान्तर्दीपकशिखालोलंजगति जीवितम्।
तडित्स्फुरणसंकाशा पदार्थश्रीर्जगत्त्रये॥१।२८।११
वाग्याच्या झोतांत सांपडलेल्या दिवटीच्या ज्योतीप्रमाणें जगांतील जीविताची स्थिति क्षणभंगुर आहे. त्रैलोक्यांतील सर्वपदार्थाची शोभा विजेच्या प्रकाशाप्रमाणें चंचल आहे.
४१२ वासनातन्तुबद्धा ये आश्चापाशवशीकृताः।
वरयतां यान्ति ते लोके रज्जुवद्धाः खगा इव॥ ४।२७।१८
जे आशापाशांत गुरफटले जाऊन वासनातंतुंनीं बद्ध झालेले असतात, ते जाव्वयांत अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणें (दुसण्याच्या) सहज ताब्यांत जातात,
४१३ वासनातानवं राम
मोक्ष इत्युच्यते बधैः।
पदार्थवासनार्ढ्यं
बन्ध इत्यभिधीयते॥२।२।५
(श्रावसिष्ठ म्हणतात) हेरामा, वासना क्षीण होत जाणें या स्थितीलाच ज्ञाते पुरुष मोक्ष असेंम्हणतात. व पदार्थाबद्दलची वासना दृढहोत जाणें हाच बंध होय असें त्याचें मत आहे.
४१४ वासनावागुराकृष्टो मनोहरिणको नृणाम्।
परां विवशतामेति संसारवनगुल्मके॥२।११०।११
वासनारूपीजाव्व्यांत सांपडलेलें मनुष्याचेंमनोरूपी हरिण संसाररूपी वनांतीलझाडींत अतिशय विव्हलहोऊन जातें.
४१५ विचारसंतोषशमसत्समागमालिनि।
प्रवर्तन्ते श्रियो जन्तो कल्पवृक्षाश्रितेयथा॥२।१६।२४
कल्पवृक्षाचा आश्रय केला म्हणजे सर्वं तव्हचेंऐश्वर्य प्राप्त होतें, त्याप्रमाणें विचार, संतोष, शम आणि सत्समागम यांनीं युक्त असलेल्या भनुष्याला सर्वऐश्वर्य प्राप्त होतें.
४१६ विचारः सफलस्तस्य विज्ञेयो यस्य सन्मतेः।
दिनानुदिनमायाति तानवं मोगगृध्नुता॥४।१८।६५
चांगली बुद्धि असलेल्या ज्या पुरुषाचा विपयोपभोगांचा लोभदिवसेंदिवस कमी होत असतो, त्याचाच आत्मविषयक विचार सफव्ठ होत जातो, असें समजावें,
४१७ विचारोदयकारिण्या धिया व्यवहरन्ति ये।
फलानामल्युदाराणां भाजनं हि भवन्ति ते॥२।१४।१२
जे लोक विचार करणाण्याबुद्धीनें व्यवहार करतात, ते अतिशय उत्कृष्ट फलमिलविण्याला पात्र होतात.
४१८ विद्राविते शत्रुजने समस्ते
समागतायामभितश्चलक्ष्म्याम्।
सेव्यन्त एतानि सुखानि यावत्
तावत्समायाति कुतोऽपि मृत्युः॥१।२७।२०
सर्वशत्रूंचेंपारिपत्य करून, सर्वप्रकारची संपत्ति मिलवून मनुष्य अनेक सुखांचा अनुभव घेत आहे, तोंच मृत्यु अचानक येऊन त्याच्यावर झडप घालतो.
४१९ विना पुरुषयत्नेन दृश्यतेचेज्जनार्दनः।
मृगपक्षिगणं कस्मात्तदासौनोद्धरत्यजः॥५।४२।१५
मनुष्यानें स्वतः उद्योग केल्यावांचून जर त्याला ईश्वराचें दर्शन होऊं शकर्ले असतेंतर पशु, पक्षी इत्यादिकांचा सुद्धां उद्धार त्यापरमेश्वरानें कां केला नसता?
४२० वियोगायैव संयोगाः॥६।१२६।२८
वियोग होण्यासाठींच संयोग होत असतात,
४१२ विविधवनकुसुमकेसरधवलवपुर्हंस इव दृष्टः।
काकः कृमिकुलकवलंक्लिन्नमथो कवलयन् ज्ञातः॥६उ.।११६।६५
वनांतीलनानाप्रकारच्या पृष्पपरागांनीं शुभ्र झालेला कावलाहंसासारखा जरीवाटला, तरी किड्यांनीं भरलेलें व माखून गेलेलेंमांस खाण्यासाठींतो उचलून घेत आहेअसें विसल्याबरोबर हा कावलाचआहे अशी खात्री झाली.
४२२ विवेकोऽस्ति वचस्येव चित्रेऽग्निरिव भास्वरः।
यस्य तेनापरित्यक्ता दुःखायौवाविवेकिता॥४।१८।६७
ज्याचा विवेक बोलण्यांतच मात्र आहे, त्याला चित्रांतील प्रकाशमान अग्नीप्रमाणें विवेकाचा मुलींच उपयोग होत नाहीं त्यानें अविवेक सोडला नसल्यामुलेंत्यापासून त्याला दुःख होतों.
४२३ विश्वामित्रेण मुनिना दैवमुत्सृज्य दूरतः।
पौरुषेणैव संप्राप्तांब्राह्मण्यं राम नान्यथा॥२।८।२०
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, विश्वामित्र मुनींनीं दैव दूर बाजूला झुगारून देऊन केवलपौरुषाच्याच बलावर ब्राह्मण्य प्राप्त करून घेतलें.
४२४ विषं विपयवैषम्यं न विषं विषमुच्यते।
जन्मान्तरघ्नाविषया एकदेहहरं विषम्॥१।२९।१२
ज्याला आपण विष म्हणून म्हणतों, ते वास्ताविक विष नसून विषयांची तलमलहेंच खरें विष होय. विषप्राशन केलें असतां एका देहाचा नाशहोतो; परंतु विषयांचें सेवन हें अनेक जन्मांचा नाश करतें.
४२५ विषयान्प्रति भोःपुत्र सर्वानेव हि सर्वथा।
अनास्था परमा ह्येषा सा युक्तिर्मनसो जये॥५॥२४। १७
(विरोचन बलीला म्हणतो) हे पुत्रा, सर्वविषयांसंबंधानें मुलींच आस्था न ठेवणें हीच मनोजयाची सर्वोत्कृष्ट युक्ति आहे.
४२६ वृक्षाः प्रतिवनं सन्ति नित्यं सफलपल्लवाः।
नत्वपूर्वचमत्कारो लवङ्गः सुलभः सदा॥१।३३॥४१
प्रत्येक वनामध्यें फलांपानांनीं भरलेले असे शोंकडों वृक्ष आढलून येतात. परंतु आश्चर्यकारक लवंगवृक्ष एखादाच आढघलतो,
४२७ व्याचष्टे यः पठति च
शास्त्रं
भोगाय शिल्पिवत्।
यतते न त्वुनुष्ठाने
ज्ञानबन्धुः स उच्यते॥६उ.।२१।३
कारागीर द्रव्य मिलविण्यासाठीं प्रयत्न करतो, त्याप्रमाणें उपभोग मिलविण्यासाठों जो शास्त्र पढतों व त्याचेंव्याख्यान करती, पण स्वतः त्याप्रमाणें वागण्याविषयीं झटत नाहींतो ज्ञानबंधुम्हणजे नांवाचाच ज्ञानी होय.
४२८ शतादेकतमस्यैव सर्वोदारचमत्कृतिः।
ईप्सितार्थार्पणौकान्तदक्षा भवति भारती॥१।३३॥३२
शेंकडों वक्त्यांमध्यें एखाद्याचेंच भाषण सर्वस
हृदय श्रोत्यांच्याअन्तःकरणांत कौतुक उत्पन्न करितें, आणि इच्छिलेला अर्थनिश्चितपणें बिंबवितें.
४२९ शमेनासाद्यते श्रेयः शमो हि परमं पदम्॥२।१३।५२
शमानेंचमोक्ष प्राप्त होतो. व शम हेंच श्रेष्ठपद आहे.
४३० शरदम्बुधरच्छायागत्वर्यो यौवनश्रियः।
आपातरम्या विषयाः पर्यन्तपरितापिनः॥६उ.।९३।८४
शर
दृतूंतीलमेघांच्या छायेप्रमाणें तारूण्याची शोभा क्षणिक आहे, आणि शब्दादिविषय वरवर सुखदायक खरे, परंतु शेवटीं अत्यंत दृःखदायक होत.
४३१ शरीरमरुतापोत्थां युवतामृगतृष्णिकाम्।
मनोमृगाः प्रधावन्तः पतन्ति विषयावटे॥ १।२०।३२
शरीर हें रखरखीत वालवंटआहे, त्यांतील तापानें उत्पन्न झालेल्या तारुण्यरूपीमृगजलाकडे मनोरूपी हरिण धांवत जातात; आणि शेवटीं विषयांच्या खड्यांत जाऊन पडतात.
४३२ शस्त्राणिदयिताङ्गानि लग्नान्यङ्गेनिरम्बरे।
यो बुध्यमानः सुसमः स परस्मिन्पदे स्थितः॥६उ.।११।१
ज्याच्या उघड्या आंगावर झालेले शस्रांचे प्रहार आणि स्रीच्या अवयवांचा स्पर्शहीं दोन्ही ज्याला सारखींच वाटतात, तो ब्रह्मपदाला पोचला असें समजावें.
४३३ शास्त्रंसुबोधमेवेदं सालंकारविभूषितम्।
काव्यं रसमयं चारुदृष्टान्तैःप्रतिपादितम्॥२।१८।२३
हा योगवासिष्ठ शस्त्रीय ग्रंथ अतिशय सुबोध आहे, (अनेक) अलंकारांनीं सजविलेला आहे, (यांतील विषय पुष्कल) दृष्टान्तदेऊन प्रतिपादन केले आहेत म्हणून हा ग्रंथ एखाद्या काव्याप्रमाणें रम्य व सरस बनला आहे.
४३४ शस्त्रसज्जनसंसर्गैःप्रज्ञां पूर्वंविवर्धयेत्।
सेकसंरक्षणारम्भैःफलप्राप्तौलतामिव॥५।१२।२४
एखाद्या वेलीला चांगलीं फलेंयावीं असें वाटत असेल, तर तिला पाणी घालून तिचेंरक्षण करावेंलागतें, त्याप्रमाणें (कार्यसिद्धीस नेणाण्यापुरुषानें) शास्त्रआणि सत्समागम यांच्या योगानें प्रथम आपली बुद्धि वाढवावी.
४३५ शिखी वार्यपि नादत्ते भूमेर्भुङ्केबलादहिम्।
दौरात्म्यं तन्न जाने किं सर्पस्यशिखिनोऽथवा॥६उ.।११८।१९
मोर भूमीवरीलपाणीही पीत नाहींपण सर्पाला मात्र बलात्कारानें खाण्यासाठीं उचलून नेतो, तेब्हांयाठिकाणीं अंतःकरणाचा दृष्टपणा सर्पचा आहे किंवा मोराचा आहेतें समजत नाहीं,
४३६ शिष्यप्रज्ञैव बोधस्य कारणं गुरुवाक्यतः॥६।१२८।६३
ज्ञान होण्याला गुरूच्या उपदेशापेक्षांशिष्याची बुद्धिच अधिक कारण आहे.
४३७ शुद्धेऽल्पोऽप्युपदेशो हि निर्मले तैलबिन्दुवत्।
लगत्युत्तानचित्तेषु नादर्शइव मौक्तिकम्॥ ६उ.।५।३
तेलाचा थेंब निर्मलवस्त्रावर पडला असतां आंत शिरून जसा पसरतो तसाथोडाही उपदेश शुद्ध चित्तामध्यें चांगल्यारीतीनें बिंबतो , परंतु चित्त गंभीर नसल्यास आरशांत पडलेल्या मोत्याच्या प्रतिबिंबाप्रमाणें उपदेश ठसत नाहीं,
४३८ शुभवासनया चेतो महत्या जायते महत्।
भवतीन्द्रमनोराज्य इन्द्रतास्वप्नभाङ्नरः॥५।३५।३०
शुभ वासनेमुलेंमन शुभ होतें, आणि मोठ्यावासनेमुलें मनही मोठें होतें, ‘मी इंद्र होईन` असेंमनोराज्यकरणारा स्वप्नामध्यें इंद्र होतो.
४३९ शुभाशुभाभ्यांमार्गाभ्यांवहन्ती वासनासरित्।
पौरुषेण प्रयत्नेन योजनीया शुभे पथि॥२।९।३०
वासनारूपी नदी शुभ किंवा अशुभ अशा दोन्हीमार्गांनीं वाहत असते. (आपल्या वासनेचा प्रवाह अशुभमार्गानेंजात आहे असें दिसून आल्यास) प्रयत्न करून तो प्रवाह शुभ मार्गाकडे वलवावा.
४४० शून्यमाकीर्णतामेति मृतिरप्युत्सवायते।
आपत्संपदिवाभाति विदूज्जनसमागमे॥२।१६।३
विद्वान लोकांच्या सहवासांत असणाग्याला एखादे शुन्यस्थानहीं मनुष्यांनीं गजबजल्याप्रमाणें दिसतें, मृत्युही उत्सवाप्रमाणें आनंददायक वाटतो व आपत्तीलाही त्याच्या दृष्टीनें संपत्तीचेंस्वरूप पाप्त होतें.
४४१ शैशवं बार्धकंज्ञेयं तिर्यकत्वंमृतिरेव च।
तारुण्यमेव जीवस्य जीवितं तद्विवेकिचेत्॥६उ.।१६२॥२१
बालपण आणि म्हातारपण या दोन्हीअवस्थांत ज्ञान प्राप्त होत नसल्यामुलेंत्या पशुपक्ष्यांप्रमाणें व्यर्थ होत. त्या मरणतुल्यच आहेत. प्राण्याचें खरें जीवित म्हणजे तारूण्य होय. परंतु तें देखीलविचार करणारें असेल तर.
४४२ शौशवं च मनश्चैव सर्वास्वेव हिबृत्तिषु।
भ्रातराविव लक्ष्येते सततं भङ्गुरस्थिती॥१।१९।१६
वालपण आणि मन या दोहोंचेंस्वरूप सारखेंच चंचल आहे, यावरून सर्ववृत्तींमध्यें हीं दोन्हीभावंडेंच आहेत, असेंवाटतें.
४४३ श्मशानमापदं दैन्यं दृष्ट्वाको न विरज्यते।
तद्वैराग्यं परं श्रेयः स्वतो यदभिजायते॥२।११।२८
स्मशानांत गेल्यानंतर किंवा आपत्ति आणि दैन्य प्राप्त झाल्यानंतर कोणाला वैराग्य उत्पन्न होत नाहीं! परंतु असलें वैराग्य खरें नव्हे. स्वतः (विचार करून) जें वैराग्य उत्पन्न होत, तेंच अत्यंत श्रेयस्कर होय.
४४४ श्रीमानजननिन्द्यश्चशूरश्चप्यविकत्थनः।
समदृष्टिः प्रभुश्चैव दुर्लभाः पुरुषास्त्रयः॥ १।१३॥११
लोकांच्या निंदेला पात्र न झालेला श्रीमंत, स्वतः प्रौढि न सांगणारा शूर, आणि सर्वत्र समदृष्ढिअसणारा राजा हे तीन पुरुष या जगांत दुर्लभ आहेत.
४४५ श्रुत्वा स्पृष्ट्वाच दृष्ट्वाच भुक्त्वा घ्रात्वा शुभाशुभम्।
न हृष्यति ग्लायति यः स शान्त इति कथ्यते॥२।१३।८२
चांगल्या किंवा वाईटगोष्टीऐकून, पाहून, तसेंच चांगल्या किंवा वाईट पदार्थंना स्पर्शकरून, त्यांचा वास घेऊन, किंवा उपभोग घेऊन ज्याला हर्षकिंवा विषाद उत्पन्न होत नाहीं, त्यालाच शांत असेंम्हणतात.
४४६ संयोगे च वियोगे च महान्तो हि महाशयाः॥९।१११।११
(पुत्र, मित्र इत्यादिकांचा) समागम किंवा वियोग झाला असतां थोर प्ररुषांचेंअंतःकरण स्थिर असतें.
४४७ संशान्ताहंकृतेर्जन्तोर्भोगा रोगा महामते।
न स्वदन्ते सुतृप्तस्य यथा प्रतिविषा रसाः॥४।३३।६८
(श्रीवसिष्ठ रामालाम्हणतात) हे महामते, भोजन करून अत्यंत तृप्त झालेल्या मनुष्याला उत्तमोत्तम पक्कान्नेंही विषाप्रमाणें वाटतात, त्याप्रमाणें अहंकार नाहींसा होऊन आत्मज्ञानानेंतृप्त झालेल्या मनुष्यालाविषयोपभोग रोगांप्रमाणेंवाटतात.
४४८ संशान्ते चित्तवेताले यामानन्दकलां तनुः।
याति तामपि राज्येन जागतेन न गच्छति॥४।१५।२०
चित्तरूपी वेतालशांत झालाअसतां , शरीराला प्राप्त होणाण्यासुखाच्या सोलाव्या हिश्शाची बरोवरी सर्व जगताचें राज्य मिलाल्यानें होणाण्याआनंदालाही करतां येणार नाहीं.
संसार एव दुःखानां सीमान्त इति कथ्यते।
तन्मध्यपतिते देहे सुखमासाद्यते कथम्॥५।९।५२
संसार म्हणजे दुःखांचीपराकाष्ठाअसेंसत्पुरुष सांगतात. तेव्हां अशा संसारांतपडलेल्या देहामध्येंसुखप्राप्तिकोठून होणार?
४५० संसारविषवृक्षोऽयमेकमास्पदमापदाम्।
अज्ञं संमोहयेन्नित्यं मौर्ख्यं यत्नेन नाशयेत्॥२।११।६
संसार हा एक विषवृक्ष असून त्याच्यापासुन सर्व तव्हेच्याआपत्ति उत्पन्न होतात. अज्ञमनुष्याला हा संसार मोह उत्पन्न करतो, यासाठों प्रयत्न करून अज्ञानाचा नाश केला पाहिजे.
४५१ संसारस्यास्य दुःखस्य सर्वाेपद्रवदायिनः।
उपाय एक एवास्ति मनसः स्वस्य निग्रहः॥४।३५।२
सर्वप्रकारेंउपद्रवदेणाण्याअशाया संसारदुःखाचा नाश होण्याला स्वतःच्या मनाचा निग्रह हाच काय तो एक उपाय आहे.
४५२ संसारात्तरणे जन्तोरूपायो ज्ञानमेव हि॥२।१०।२२
संसारांतून तरून जाण्याला ज्ञान हाच काय तो एक उपाय आहे.
४५३ संसाराम्बुनिधावस्मिन्वासनाम्बुपरिप्लुते।
ये प्रज्ञानावमारूढास्ते तीर्णाबुडिताः परे॥४।४६॥२२
वासनारूपी पाण्यानें ओतप्रोत भरलेल्याया संसारसमुद्रांत जे बुद्धिरूपी नावेचा आश्रय करतात, तेच या ससुद्राच्या पलीकडे तरून जातात, इतर बुडून जातात.
४५४ संकटे विस्मरत्येव जनो गौरवसत्क्रियाम्॥२।७४।२५
कोणीहीझाला तरी संकटाचे वेलींआदरसत्कार करणें विसरून जातोच.
४५५ संकल्पःपरमो बन्धस्त्वसंकल्पोविमुक्तता३।११४।२४
संकल्पहाच मोठा बंध असून संकल्प न करणें हाच मोक्ष आहे.
४५६ सज्जनाशयनीकाशंत्यक्त्वा बर्हीमहत्सरः।
पिवत्यम्ब्वभ्रनिष्ठ्यूतं मन्ये तन्नतिभीतितः॥६उ.।११८।२०
(सहचर राजाला म्हणतो) सज्जनांच्या अंतःकरणाप्रमाणें स्वच्छ असलेलें मोठेंसरोवर सोडून, मोर मेघांतून गललेलें पाणी पितो, याचें कारण आपलें मस्तक वाकवावेंलागेल, हेंच असावें असें वाटतें.
४५७ सज्जनोहि समुत्तार्यविपद्भ्योनिकटस्थितम्।
नियोजयति संपत्सु स्वालोकेष्विव भास्करः॥६उ,।४७।
३
०
सूर्यस्वतःच्याप्रकाशांत इतरांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणें सज्जन आपल्या जवलअसलेला कोणी विपत्तींत पडल्यास त्यालाविपत्तीपासून सोडवून चांगली स्थिति प्राप्तकरून देतात,
४५८ सतां साप्तपदंमैत्रम्॥६उ.।२१६।४
सज्जनांच्या बरोबर सात पावलें चालल्यानें त्यांच्याशीं सख्य होतें.
४५९ सतो हि मार्जनक्लेशो नासतस्तुकदाचन॥३।६०।२
ज्या वस्तुलाअस्तित्व आहे ती नाहींशी करणें शक्य नाहीं. परंतु जिला अस्तित्व नाहीं ती नाहींशीकरण्याला मुलींच क्लेश पडत नाहींत.
४६० सत्य मनोरमाः कामाः सत्यं रम्या विभूतयः।
किं तु मत्ताङ्गनापाङ्कभङ्गलोलं हि जीवितम्॥६उ.।९३॥७९
विषय आणि ऐश्वर्यहीं खरोखर मनाला आनंद देणारीं आहेत, असेंधरून चाललों, तथापि जीवित हेंच मूलीं मत्त स्त्रियांच्या नेत्रकटाक्षाइतकें चंचल आहे यारा काय करणार?
४६१ सत्यां प्रज्ञामहानावि विवेके सति नाविके।
संसारसागरादस्माद्यो न तीर्णा धिगस्तु तम् ५।७६।१३
बुद्धिरूपी मोठीनौका व विवेकरूपी नावाडी असतां, या संसारसागराच्या पैलतीराला जो जात नाहीं, त्याला धिक्कार असो.
४६२ सन्तोऽतीतं न शोचन्ति भविष्यच्चिन्तयन्ति नो।
वर्तमान च गृह्नन्तिकर्मप्राप्तमखण्डितम् ॥६।१२४।१
३
सज्जन भूतकालच्या गोष्ठीविषयींशोक करीत वसत नाहींत व पुढील कार्याबहलही चिंता करीत नाहींत, तर वर्तमानकालींप्राप्त झालेलें कर्ममात्रसतत करीत राहतात.
४६३ संतोषः परमो लाभः सत्सङ्गःपरमा गतिः।
विचारः परमं ज्ञानं शमो हि परमं सुखम्॥२।१६।१९
संतोष हा अत्यंत श्रेष्ठ लाभ, सत्संग ही परम गति, विचार हेंश्रेष्ठ ज्ञान आणि शम हेंच परम सुख होय.
४६४ संतोषः साधुसङ्गश्चविचारोऽथ शमस्तथा।
एत एव भवाम्भोधावुपायास्तरणे नृणाम्॥२।१६।१८
संतोष, सत्संग, विचार आणि शांति हींच कांय तीं मनुष्यांना संसाररूपी सागरांतून तारून नेणारीं मुख्य साधनें आहेत.
४६५ संतोषो हि परं श्रेयःसंतोषः सुखमुच्यते॥२।१५। १
संतोष हाच मोक्ष, व संतोष हेंच आत्यंतिक सुख होय.
४६६ समया स्वच्छया बुद्धया सततं निर्विकारया।
यथा यत्क्रियते राम तददोषाय सर्वदा॥ ६उ.।१९९।७
सम, निर्मलव निर्विकार बुद्धीनें जें जेंकरावें तें तें नेहमीं निर्दोषच असतें.
४६७ समुद्रस्येव गाम्भीर्यंधैर्यंमेरोरिव स्थितम्।
अन्तः शीतलता चेन्दोरिवोदेति विचारिणः॥२।१८।१८
समुद्राचेंगांभीर्य, मेरूचें धैर्यव चंद्राची शीतलता हीं विचारी मनुष्याच्या अंतःकरणाला प्राप्त होतात.
४६८ संपदः प्रमदाश्चैव तरङ्गोत्तुङ्गभङ्गुराः।
कस्तास्वहिफणच्छत्रच्छायासु रमते बुधः६उ.।४७।४९
संपत्ति आणि तरुण स्त्रिया या पाण्यावरील मोठ्या लटांप्रमाणें क्षणभंगुर आहेत. सर्पच्या फणांच्या छायेप्रमाणें असलेल्या संपदा आणि प्रमदा यांच्या ठिकाणीं कोणता शाहाणा मनुष्य रममाण होईल?
४६९ संभवत्यङ्गजगति न बीजेन विनाङ्कुरः॥६।९४।६२
(कुंभमुनि शिखिध्वज राजाला म्हणतात) या जगांत बीजावांचून अंकुर संभवत नाहीं.
४७० सर्वकर्माणि संत्यज्य कुर्यात्सज्जनसङ्गमम्।
एतत्कर्मनिराबाधं लोकद्वितयसाधनम्॥६उ.।९८।२३
सर्वकर्में सोडून प्रथम सज्जनांचा सहवास करावा, सत्समागम हा उपाय सुलींच त्रासदायक नसून इहलोक व परलोक साधून देणारा आहे.
४७१ सर्वंकाले हि शोभते॥३।६७।६१
सर्वगोष्टीयोग्य वेलींच शोभत असतात,
४७२ सर्वज्ञोऽपि बहुज्ञोऽपि माधवोऽपि हरोऽपि च।
अन्यथा नियतिं कर्तुं न शक्तः कश्चिदेव हि॥५।८९।२६
कोणी एखादा पुष्कल जाणणारा असो किंवा सर्वज्ञ असो, स्वतः विष्णु असो किंवा शंकर असो सृष्टिनियम बदलण्यास कोणीहीसमर्थनाहीं
४७३ सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि।
यदा पश्यत्यभेदेन तदा जीवो विमुच्यते॥६।१२८।४९
सर्वभूतांमध्यें आत्म्यालाव आत्म्यामध्यें सर्व भूतांना हा जीव जेव्हां अभेदानें पाहतो तेव्हांतो मुक्त होतो.
४७४ सर्वमेवेह हि सदा संसारे रघुनन्दन।
सम्यक्प्रयुक्तात्सर्वेण पौरुषात्समवाप्यते॥२।४।८
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, या संसारांत योग्य दिशेंनें प्रयत्न केला असतां सर्वांना नेहमीं वाटेल ती वस्तु प्राप्त करून घेतां येते.
४७५ सर्वं ब्रह्मेतियो ब्रूयादप्रबुद्धस्य दुर्मतेः।
स करोति सुहृद्वृत्त्यास्थाणोर्दुःखनिवेदनम्॥६।४९।२०
मंदबुद्धीच्या मूर्खमनुष्याला ‘हेंसर्वब्रह्मच आहे’असें जो सांगतो, तो (एखाद्या) खांबाला आपला मित्र समजून आपलें दुःख सांगतो, असेंच म्हटलें पाहिजे.
४७६ सर्वस्य जन्तुजातस्य सर्ववस्त्वावभासने।
सर्वदैवैक एवोज्जैर्जयत्यभ्यासभास्करः॥ ६उ.।६७।४१
सर्वप्राण्यांना कोणतीही वस्तु सर्वदा भासविणारा एक अभ्यासरूपी सूर्यच सर्वोत्कृष्ट आहे.
४७७ सर्वस्यबीजे संत्यक्ते सर्वंत्यक्तं भवत्यलम्॥६।९३।३५
सर्वांच बीज टाकलें असतां सर्वांचा त्याग पुर्णापणें केल्यासारखा होतो.
४७८ सर्वस्या; सरितो वारि प्रयात्यायाति चाकरात्।
देहनद्याः पयस्त्वायुर्यात्येवायाति नो पुनः॥६उ.।९२।४८
सर्वनद्यांचेंपाणी जरी वाहुन जात असलें, तरी तें पुनः मेघ, पर्वत इत्यादिकांपासून येत असतें. परंतु या देहरूपी नदींतील आयुष्यरूपी पाणी एकसारखें जात मात्र असतें, पण त्यांत दुसरी कडून भर पडत नाहीं.
४७९ सर्वः
स्वसंकल्पवशाल्लघुर्भवति वा गुरुः॥३।७०।३०
जो तो प्राणी आपल्या संकल्पाच्या योगानें उच्च किंवा नीच स्थिति प्राप्त करून घेत असतो.
४८० सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छयाः।
संयोगा विप्रयोगान्ताः सर्वे संसारवत्मेनि॥५।८६।५५
या संसाराच्या मार्गंत सर्वसंग्रहांचा शेवटींनाश होतो, उंचावर चढलेले अखेरीस पडतात आणि ज्यांचा संयोग झाला असेल त्या सर्वांचा शेवटींवियोग होतो.
४८१ सर्वेषामेव धर्मणां कमर्णां शर्मणामपि।
पण्डितः पुण्डरीकाणां मार्तण्ड इव मण्डनम्॥६उ,।१४२।१
(आकाशाचें) भूषण असलेला सूर्यज्याप्रमाणें कमलांना विकसित करतो, त्याप्रमाणे (सभेचें भूषण असलेला पंडित सर्वं धर्मांचा, कर्मांचा आणि सखांचा निर्णय करतो.
४८२ सर्वेषु सुखदुःखेषु सवासु कलनासु च।
मनः कर्तृमनो भोक्तृ मानसं विद्धि मानवम्॥२।११५।२४
(श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, सर्वसुखदुःखांचेंआणि कल्पनांचेंकर्तृत्व आणि भोक्तृत्व मनाकडे आहे. यासाठीं मन म्हणजेच मनुष्य हें लक्षांत ठेव.
४८३ सर्वैव लोकयात्रेयं प्रोता तृष्णावरत्रया।
रज्जुबन्धाद्विमुच्यन्ते तृष्णावन्धान्न केचन॥५।१५।२३
हे सर्वलोकसमुदाय तृष्णारूपी चामड्याच्या वादीमध्यें ओवले गेलेआहेत. इतर कसल्याही दोरीनें बद्ध झालेला मनुष्य त्याबंधापासून मुक्त होऊं शकतो परंतु तृष्णेच्या बंधांतून कोणीही सहसा मुक्त होऊं शकत नाहीं
४८४ सलिलं स्थलतां याति स्थलीभवति वारिभूः।
विपर्यस्यति सर्वंहि सकाष्टाम्बुतृणंजगत्॥ १।२८।९
ज्या ठिकाणीं पाणी आहे, त्या ठिकाणीं कांहीं कालानें भूमि दिसतेव ज्या ठिकाणीं भूमि असते, त्या ठिकाणीं कांहीं दिवसांनी पाणी दिसुंलागतें. अशारीतीने लाकूड, पाणी आणिगवत यांनीं युक्त असलेलें जग कालमानांनें बदलत असतें.
४८५ सहस्रेभ्यःसहस्रेभ्यः कश्चिदुत्थाय वीर्यवान्।
भिनत्ति वासनाजालंपञ्जरं केसरी यथा॥६उ.।१९४।
३
९
ज्याप्रमाणे सिंह पिंजण्यांतून बाहेर पडतो, त्याप्रमाणें हजारो लोकांतील एखादाच सामर्थ्यवान पुरुष वासनेचें जालेंतोडून मोकलाहोतो.
४८६ साधुसंगतयो लोके सन्मार्गस्य च दीपिकाः॥२।१६।९
या जगामध्यें साधूंचा समागम हा सन्मार्गदाखविणारा दिवा आहे.
४८७ साधूपदिष्टमार्गेण यन्मनोऽङ्गविचेष्टितम्।
तत्पौरुषं तत्सफलमन्यदुन्मत्तचेष्टितम्॥२।४।११
सत्पुरुषांनीं आंखून दिलेल्या मार्गनेंकाया, (वाचा ) आणि मन यांनीं जें कर्म केलें जातें, तेंच पौरुष होय. अशा पौरुषानेंच फलप्राप्ति होते. याशिवाय केलेलें इतर कर्मउन्मत्त मनुष्याच्या कर्माप्रमाणें (निष्फल) होतें.
४८८ सिंहवत्सर्ववेगेन पतन्त्यर्थे किलार्थिनः॥३।७८।६
कार्यसाधणारे लोक आपल्या कार्यावर सिंहाप्रमाणें एकदम झडप घालीत असतात,
४८९ सीमान्तं सर्वदुःखानामापदां कोशमुत्तमम्।
बीजं संसारवृक्षाणांप्रज्ञामान्द्यंविनाशयेत्॥५।१२।२७
सर्वदुःखांची पराकाष्ठा, आपत्तीचें मोठेंभांडार, व संसार वृक्षाचेंबीज असलेल्या बुद्धिमांद्याचा नाश करावा.
४९० सुनिर्मलापि विस्तीर्णापावन्यपि हि यौवने।
मतिः कलुषतामेति प्रावृषीव तरङ्गिणी॥१।२०।१८
पावसाल्यांत नदीचेंपाणी गढूलहोतें, त्याप्रमाणें बुद्धि कितीही निर्मल, उदार आणि शुद्ध असली, तरी ती तारुण्यांत मलिन होते,
४९१ सुभगाः सुलभारोहाः फलपल्लवशालिनः।
जायन्ते तरवोदेशे न तु चन्दनपादपाः॥१।३३।४०
दिसण्यांत सुंदर आणि चढण्याला सुलभ असे फलेंआणि पानें यांनीं युक्त असलेले वृक्ष सर्वत्र दिसून येतात; परंतु चंदनाचे वृक्ष मात्र सर्वत्र दिसत नाहींत.
४९२ सुरज्ज्वेव बलीवर्दो बध्यते जन्तुरास्थया॥ ६।२८।६४
दोरीनें बैल बांधला जातो त्याप्रमाणें आशेच्या योगानें प्राणी बद्ध होतो.
४९३ सुलभोदुर्जनाश्लेषो दुर्लभः सत्समागमः॥१।२६।२१
दुर्जनांची संगाति सुलभ आहे, परंतु सत्समागम मात्र दुर्लभ आहे.
४९४ सुविरक्तं मुनेश्चेतोरक्तंच विषयार्थिनः।
रमयन्ति समं रम्या विजना वनभूमयः॥६उ.।१२०।२९
मुनिजनांचेंविरक्त चित्त आणि कामी पुरूषांचें विषयासक्त चित्त या दोहोंनाएकान्त असलेल्या रम्य वनभूमि सारख्याच आनंद देतात.
४९५ सुसाध्यः करटोद्भेदो मत्तैरावणदन्तिनः।
नोत्पथप्रतिपन्नानां स्वेन्द्रियाणां विनिग्रहः॥६३उ.।६॥४०
(इंद्राच्याः) मत्त एरावत हत्तीचें गंडस्थलसहज फोडतां येईल; परंतु भलत्याच मार्गानें जाणाण्यास्वतःच्या इंद्रियांचा निग्रह करणेंसुलभ नाहीं.
४९६ सौहार्दंसुजनानां हि दर्शनादेव वर्धते॥३।८२।३७
चांगल्या लोकांची भेट होतांच मैत्री वाढत असते.
४९७ सौहार्देन प्रवृत्तस्य को वाक्यं नाभिनन्दति॥३।८२।४
८
प्रमानेंबोलण्याच्या भाषणाचें कोण बरें कौतुक करणार नाही
४९८ स्त्रीलोचनैस्तडित्पुञ्जैर्ज्वलाजालैस्तरङ्गकैः।
चापलंशिक्षितं ब्रह्मञ्छैशवाक्रान्तचेतसः॥१।१९।१५
(राम विश्वामित्रांना म्हणतो) हे ब्रह्मर्षे, स्त्रीयांचे नेत्र, विद्युल्लता, अग्नीच्या ज्वालाआणि समुद्रावरील लाटा यांनीं बाल्यदशेकडूनच चांचल्याचेंशिक्षण घेतलें आहे, असेंवाटते.
४९९ स्फटिकः प्रतिबिम्बेन यथा याति न रञ्जनम्।
तज्ज्ञः कर्मफलेनान्तस्तथा नायाति रञ्जनम्॥६।१२२।६
स्फटिकमणि प्रतिबिंबाच्या योगानेे जसा रंगीत होत नाहीं. त्याप्रमणें ज्ञानी मन॒ष्य अंतःकरणांत कर्मफलाच्या योगानें कांहींएक विकार पावत नाहीं.
५०० स्वधर्मेण च हिंसैव महाकरुणया समा॥२।८२।४६
स्वधर्माप्रमाणे केलेली हिंसा ही मोठ्यादयेसारखीच आहे.
५०१ स्वया वासनया लोको यद्यत्कर्म करोति यः।
सतथैव तदाप्नोति नेतरस्येह कर्तृता॥४।१३।११
जगामध्यें आपल्या वासनेप्रमाणें लोक जेंजेंकर्मकरितात, त्या त्या कर्माचेंच फलत्यांतभोगतात त्यांत इतरांच्या कर्तृत्वाचा मुलींच संबंध नाहीं.
५०२ स्ववासनानुसारेण सर्वआस्पदमीहते॥३।७३।२९
प्रत्येक प्राणी आपापल्या वासनेपमाणेंच स्थानाची इच्छा करितो.
५०३ हरिवक्षोगता रक्ष्मीरपि शोभार्थमेव यत्।
बिभर्तिकमलं हस्ते कान्याशंसाधिका भवेत्॥६उ.।११७।२१
कमलहें इतकें सुंदर आहे कीं, प्रत्यक्ष विष्णुच्या वक्षःस्थलाच्या हिकाणीं बसणारी, सर्वसौंदर्याची अधिदेवता जी लक्ष्मी तिनें शोभा येण्यासाठीं आपल्या हातांत कमल धारण केलेंआहे. दुसरा कोणी यापेक्षां कमलची अधिक प्राशंसा काय करणार आह?
५०४ हस्तं हस्तेन संपीड्य दन्तैर्दन्तान्विचूर्ण्यच।
अङ्गान्यङ्गैरिवाक्रम्य जयेच्चेन्द्रियशत्रवान्॥४।२३।५८
हातावर हात चोलून, दांतांनीं दांत चावून, गात्रांनीं गात्रें आवलून धरून, (अर्थात् वाटतील ते दृढप्रयत्न करून) इंद्रियरूपी शत्रूंना जिकून टाकावें.
५०५ हृदि यावदहंभावो वारिदः प्रविजृम्भते।
तावद्विकासमायाति तृष्णाकुटजमञ्जरी॥४।३३॥३०
जोंपर्यंत अंतःकरणरूपी आकाशांत अहंकाररूपी मेघ वावरत आहे तोंपर्यंत तृष्णारूपी कड्याची वेर विकास पावत असते.
५०६ हृद्गुहावासिचित्तक्त्वं मुख्यं सानातनं वपुः।
शङ्खचक्रगदाहस्तो गौण आकार आत्मनः॥५।४३।२७
हृदयरूपी गहेमध्यें वास करणारें चौतन्यतत्त्व हेंच आत्म्याचें मुख्य आणि सनातन शरीर आहे; हातांत शंख, चक्र व गदा हीं असलेली मूर्ति हेंमुख्य स्वरूप नव्हे.
५०७ हृद्याकाशे विवेकार्के शमालोकिनि निर्मले।
अनर्थसार्थकर्तारो नोद्यन्ति किर केतवः॥२।१८।२१
हृदयाकाशांत विवेकरूपी सूर्याचा उदयझाला म्हणजे शांतिरूपी स्वच्छ प्रकाश पडतो; मग अनर्थसूचक (कामादि) धुमकेतु उदय पावत नाहींत.
५०८ हेलया राजहंसेन यत्कृतं कलकूजितम्।
न तद्वर्षशतेनापि जानात्याशिक्षितुं बकः॥६उ.।११७।३५
राजहंसानें सहज कलेला मधुर किलूविल शब्द बगलयाला शंभर वर्षें अभ्यास करूनही करतां येणार नाहीं.
——————
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724156453Screenshot2024-08-20175022.222.png"/>
विषयसूची
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724156499Screenshot2024-08-20175113.3333.3.png"/>
| विषयःक्रमाङ्कः | विषयः क्रमाङ्कः |
| अङ्कुरः ३१६ | ३३५ |
| अध्यवसायी २६८ | अमृतम् २०६ |
| अनुजीवी २७९ | अयः ५२ |
| अन्तःकरणम् २८-३३ | ३१८ |
| आत्मा ३ | अशक्तिः १५८ |
| आशयः४४६ | अशक्यम् ३२४ |
| हृदयम् २१० | ५०५-५०७ |
| अन्नम् ३४ | भावः२५४ |
| दुरन्नम् ९२ | सत्ता ३५७ |
| अभिभवः ५३ | अभावः २५४ |
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
| अज्ञानम्६ | २७२ |
| अविचारिता ४०६ | तेजः ३१३ |
| अविद्या१५४ | ४१|५४ |
| जाड्यम् ३७४ | महात्यागी ३३९|३४५ |
| माया ६७ | दया २६१ |
| मौर्ख्यम ८२ | १११ |
| तडित् १७९ | ४९८ |
| तत्त्वम्१० | ७२ | ७३ |
| तपः २९ | १७८ |
| तरङ्क; १७९ | ४९८ |
| तरणम् ४५३|४६१ | ४६४ |
| ताडितः १८३ | दुःखम् १० |
| तारुण्यम् ९८० | ४४१ |
| यौवनम् २३ | ११४ |
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
[TABLE]
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724648357Screenshot2024-08-26102836.png"/>
]