सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि

[[सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि Source: EB]]

[

सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723634837Screenshot2024-08-14165655.png"/>

संपादक
विष्णु विनायक परांजपे, पेण

भाषांतरकार
चिंतामण मोरेश्वर परांजपे,

बी. ए., एल्एल्. बी.

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723703333Screenshot2024-08-15115827.png"/>

प्रकाशक

केशव भिकाजी ढवले, गिरगांव - मुंबई

—————

आवृत्ति तिसरी

———

कार्तिक शके १८५३ सन १९३१

—————

किंमत १२ आणे

प्रस्तावना

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723039746Screenshot2024-08-07193837.png"/>

लोकांचें अज्ञान नाहींसेंहोऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनीं महाभारत ग्रंथ निर्माण केला.यामध्यें चतुर्विध पुरुषार्थांचें प्रतिपादन पूर्णपणें केलें अमून आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना कर्तव्याचा मार्ग स्पष्टपणें दाखविला आहे, त्याप्रमाणेंच या ग्रंथामध्ये आर्यसंस्कृतिही सांठविली आहे. एक लक्ष श्लोकांचा एवढा मोठा विस्तृत ग्रंथ संस्कृत भाषेवांचून इतर कोणत्याही भाषेत नाहीं. महाभारताची भाषा समजण्याला सोपी असून संस्कृत भाषेचें उत्तम जिवंत स्वरूप या ग्रंथामध्ये चांगल्या प्रकारचें आढलतें.

या महाभारतांतील, सर्व लोकांना उपयोगी पडणारीं, सुबोध,निवडक १००८ संस्कृत सुभाषित वचनें प्रस्तुत पुस्तकांत घेतलीं आहेत. आणि प्रत्येक श्लोकाच्या खालीं त्याचें मराठी भाषांतर दिलें आहे. हींओजस्वी वचनें विद्यार्थ्यांनीं तोंडपाठ केल्यासत्यांचे संस्कृत भाषेचं ज्ञान वाढून त्यांना चांगले स्फूर्तिदायक विचार समजतील आणि पुढील आयुष्यांत व्यवहारांतील अनेक प्रसंगी योग्य रीतीनें वागण्यास ते समर्थ होतील. श्रोत्यांच्या मनावर महाभारतांतील वचनांचा ठसा अधिक उमटतो यासाठीं प्रतिपादनाचे वेलीं हरिदास, पुराणिक यांना या सिद्धान्तरूप वचनांचा विशेष उपयोग होईल. वक्ते व लेखक यांनाही हीं मार्मिक वचनें बरींच उपयोगी पडतील. तसेंच संस्कृत भाषेची अभिरुचि असणाऱ्या

सामान्य वाचकांनाही या वचनांचा उपयोग होईल.

या पुस्तकांतील वचनें महाभारताच्या मुंबईप्रतींतून घेतलीं आहेत. वचनें वर्णक्रमानें दिलीं असून शेवटीं मुख्य विषयांची सूची जोडली आहे. वचनांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांतील डावीकडून पहिला अंक पर्वाचा, दुसरा अध्यायाचा व तिसरा श्लोकाचा समजावा. ज्या वचनांत जो विषय आला, त्या वचनाचा क्रमांक त्या विषयापुढें सूचीमध्यें घातला आहे. सूचीमध्यें एकाच अर्थीं आलेले अनेक शब्द त्या त्या ठिकाणीं दिले असून पर्याय शब्द कंसांत घातले आहेत.
धार्मिक शिक्षण देण्याच्या कामीं हैं सुभाषितांचेंपुस्तक उपयोगीं पडतें, असें पुष्कल पालकांच्या व शिक्षकांच्या प्रत्ययास आले आहे. श्रीमहाभारतांतील ओजस्वी वचनांचा परिचय सर्वांना सुलभतेनें होण्याला हेंपुस्तक उपयोगी पडो, अशी भगवान् श्रीकृष्णपरमात्म्याजवल प्रार्थना करून प्रस्तावना संपवितों.

कार्तिक, शके १८५३ } विष्णु विनायक परांजपे,
राहणार पेण, जिल्हा कुलाबा

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723040233Screenshot2024-08-07194431.png"/>

श्रीमहाभारतांतील १८ पर्वांचीं नांवें

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723040583Screenshot2024-08-07195241.png"/>

आदिपर्व सौप्तिकपर्व
सभापर्व स्त्रीपर्व
वनपर्व शान्तिपर्व
विराटपर्व अनुशासनपर्व
उद्योगपर्व अश्वमेधपर्व
भीष्मपर्व आश्रमवासिकपर्व
द्रोणपर्व मौसलपर्व
कर्णपर्व महाप्रास्थानिकपर्व
शल्यपर्व स्वर्गारोहणपर्व

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723040989Screenshot2024-08-07195925.png"/>

सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1723041083Screenshot2024-08-07200042.png"/>

नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्।
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्॥

—————

१ अकाले कृत्यमारब्धं कर्तुर्नार्थाय कल्पते। प. अ. श्लो.
तदेव का आरब्धं महतेऽर्थाय कल्पते॥१२।१३८।९५

कोणतेंहि कार्य भलत्याच वेलीं आरंभिलें असतां त्यापासून कर्त्याचें मनोगत सिद्ध होत नाहीं. तेंच योग्य वेलीं केलें तर तेणेंकरून मोठा लाभ होतो.

२ अगोप्तारश्चराजानो बलिषड्भागतस्कराः।
समर्थाश्वाप्यदातारस्ते वै निरयगामिनः॥१३।२३।८०

प्रजेचें रक्षण न करतां तिच्यापासून उत्पन्नाचा सहावा हिस्सा कर मात्र घेणारे राजे व सामर्थ्य असून दान न करणारे खचित नरकास जातात.

३ अग्नौ प्रास्तं तु पुरुषं कर्मान्वेति स्वयं कृतम्।
तस्मात्तु पुरुषो यत्नाद्धर्मं संचिनुयाच्छनैः॥५।४०।१८

(मरणोत्तर) अग्नींत टाकून दिलेल्या मनुष्याबरोबर त्यानें केलेलें (बरें वाईट) कर्म तेवढें येत असतें. यासाठींच मनुष्यानें हलू हलू पण यत्नपूर्वक धर्माचा (पुण्याचा) संचय केला पाहिजे.

४ अज्ञश्वाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः॥६।२८।४०

अज्ञ असून श्रद्धा न ठेवणारा असा संशयखोर मनुष्य सर्वथा नाश पावतो, अशा संशयात्म्याला ना इहलोक, ना परलोक, ना सुख.

५ अज्ञानतिमिरान्धस्य लोकस्य तु विचेष्टतः।
ज्ञानाञ्जनशलाकाभिर्नेत्रोन्मीलनकारकम्॥१।१।८४

अज्ञानांधकारानेंडोल्यांवर झांपड येऊन धडपडणाऱ्या लोकांच्या डोल्यांत ज्ञानरूपी अंजन घालून त्यांना दिव्य दृष्टि देणारें (असें हेंमहाभारत आहे)

६ अञ्जलिः शपथः सान्त्वं शिरसा पादवन्दनम्।
आशाकरणमित्येवं कर्तव्यं भूतिमिच्छता॥१।१४०।६७

हात जोडणें, शपथ घेणें, मधुर भाषण करणें, पायांवर डोकें ठेवणें, लालूच दाखविणें या सर्व गोष्टी उत्कर्षेच्छु पुरुषानें केल्या पाहिजेत.

७ अतिक्रान्तं हि यत्कार्यं पश्चाच्चिन्तयते नरः।
तच्चास्यन भवेत्कार्यं चिन्तया च विनश्यति॥८।३१।२९

गोष्ट होऊन गेल्यानंतर तिच्याविषयीं जो मागाहून चिंता करीत बसतो, त्याचं तें कार्य तर होत नाहींच, पण चिंतेनें नाश मात्र होतो.

८ अति धर्माद्बलं मन्ये बलाद्धर्मः प्रवर्तते ।
बले प्रतिष्ठितो धर्मो धरण्यामिव जङ्गमम् १२।१३४।६

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) मला वाटतें, बल हें धर्मापेक्षां श्रेष्ठ आहे. कारण, बलापासूनच धर्माची प्रवृत्ति होते. सर्व जंगम पदार्थ ज्याप्रमाणें पृथ्वीच्या आधारानें राहतात, त्याप्रमाणें बलाच्या आधारानेंच धर्म राहतो.

९ अतियोगमयोगं च श्रेयसोऽर्थी परित्यजेत्॥१२।२८७।२४

कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्यानें (आहारविहारादिकांचें) अतिशय सेवन करणें व मुलींच सेवन न करणेंया दोहोंचाहि सर्वथा त्याग करावा.

१० अतीतेष्वनपेक्षा ये प्राप्तेष्वर्थेषु निर्ममाः।
शौचमेव परं तेषां येषां नोत्पद्यते स्पृहा॥१३।१०८।१०

द्रव्य नष्ट झालें असतां जे शोक करीत नाहींत, व प्राप्त झालें असतां त्याच्या ठिकाणीं जे आसक्त होत नाहींत, आणि ज्यांच्या अंतःकरणांत लोभ उत्पन्नच होत नाहीं ते अत्यंत शुचिर्भूतच होत.

११ अतो हास्यतरं लोके किंचिदन्यन्न विद्यते।
यत्र दुर्जनमित्याह दुर्जनः सञ्जनं स्वयम्॥१।७४।९५

स्वतः दुर्जन असलेल्यानें उलट सज्जनालाच दुर्जन म्हणावें, यापेक्षांजगांत अधिक हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणतीच नसेल !

१२ अथवा जायमानस्य यच्छीलमनुजायते।
श्रूयते तन्महाराज नामृतस्यापसर्पति॥३।८।११

(व्यास महर्षि धृतराष्ट्र राजाला म्हणतात) हे राजा, प्राणी जन्मतःच जो स्वभाव बरोबर घेऊन येतो, तो मरेपर्यंत त्याला सोडून जात नाहीं असें ऐकण्यांत येते.

१३ अथवा वसतो राजन्वने वन्येन जीवतः।
द्रव्येषु यस्य ममता मृत्योरास्ये स वर्तते॥१२।१३।१०

(सहदेव धर्मराजाला म्हणतो) हे राजा, वनांत राहून कंदमुलांवर उपजीविका करीत असतांनाहि ऐहिक वस्तूंविषयीं ज्याला ममत्वबुद्धि वाटते, तो खरोखर मृत्यूच्या जबड्यांत पडला आहे असें समजावें.

१४ अदत्तस्यानुपादानं दानमध्ययनं तपः।
अहिंसा सत्यमक्रोध इज्या धर्मस्य लक्षणम्॥१२।३६।१०

कोणी देईल तेवढ्याचाच स्वीकार करणें, दान, अध्ययन, तप,अहिंसा, सत्य भाषण, क्रोध नसणें आणि यज्ञ करणें हीं धर्माचीं लक्षणें होत..

१५ अद्रोहसमयं कृत्वा चिच्छेद नमुचेः शिरः ।
शक्रः, साभिमता तस्य रिपौ वृत्तिः सनातनी॥२।५५।१३

(दुर्योधन शकुनीला म्हणाला) ‘मी तुझ्याशीं द्रोह करणार नाहीं’अशी प्रतिज्ञा करून इंद्रानें नमुचि दैत्याचा शिरच्छेद केला. शत्रूशीं वागण्याची ही त्याची रीति पूर्वापार चालत आलेली असून सर्वसंमत आहे.

१६ अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा।
अनुग्रहश्चदानं च शीलमेतत्प्रशस्यते॥१२।१२४।६६

कृतीनें मनानें व वाणीनें कोणत्याहि प्राण्यास त्रास न देणें, परोपकार करणें आणि दान करणें या प्रकाराचें शील प्रशस्त होय.

१७ अद्रोहेणैव भूतानामल्पद्रोहेण वा पुनः।
या वृत्तिः स परो धर्मस्तेन जीवामि जाजले॥१२।२६२।६

(तुलाधार वैश्य जाजलि ब्राह्मणाला म्हणतो) हे जाजले, कोणत्याहि प्राण्यास मुलींच उपद्रव न देतां, अथवा (प्रसंगच पडल्यास) अगदीं थोडी पीडा देऊन आपला निर्वाह करणें हा श्रेष्ठ प्रकारचा धर्म होय, त्याचेंच अवलंबन करून मी रहात असतों.

१८ अधनं दुर्बलं प्राहुर्धनेन बलवान्भवेत्।
सर्वं धनवता प्राप्यं सर्वं तरति कोशवान्॥१२।१३०।४९

निर्धनाला दुबला समजतात, धनानें मनुष्य बलसंपन्न होतो. सर्व कांहीं धनसंपन्न असलेल्याला प्राप्त करून घेतां येतें. द्रव्याचा खजिना ज्याच्यापाशीं आहे तो सर्व (आपत्ति) तरून जातो.

१९ अधनाद्धि निवर्तन्ते ज्ञातयः सुहृदो द्विजाः।
अपुष्पादफलाद्वृक्षाद्यथा कृष्ण पतत्त्रिणः॥५।७२।२०

(युधिष्ठिर म्हणतो) हे कृष्णा, ज्याप्रमाणें पक्षी पुष्परहित व फलरहित वृक्षाचा त्याग करतात, त्याप्रमाणें दरिद्री मनुष्याचे नातलग, इष्टमित्र व ब्राह्मण त्याला सोडून जातात.

२० अधर्मः क्षत्रियस्यैष यच्छय्यामरणं भवेत्॥१२।९७।२३

अंथरुणावर पडून मरणें हा क्षत्रियाचा धर्म नव्हे.

२१ अधर्मरूपो धर्मो हि कश्चिदस्ति नराधिप।
धर्मश्वाधर्मरूपोऽस्ति तच्च ज्ञेयं विपश्चिता॥१२।३३।३२

(व्यास महर्षि युधिष्ठिराला सांगतात) हे राजा, केव्हां केव्हां धर्माला अधर्माचें रूप येतें, व अधर्माला धर्माचें स्वरूप येत असतें समजून घेणें शहाण्या पुरुषाचें काम आहे.

२२ अधर्मो धर्मतां याति स्वामी चेद्धार्मिको भवेत्।
स्वामिनो गुणदोषाभ्यां भृत्याःस्युर्नात्र संशयः॥११।८।३३

मालक जर धर्मनिष्ठ असला तर, सेवक अधार्मिक असला तरीसुद्धां धार्मिक बनतो. धन्याच्या आंगच्या गुणदोषांप्रमाणें चाकरांच्या ठिकाणीं गुणदोष उत्पन्न होतात यांत संशय नाहीं.

२३ अध्रुवा सर्वमर्त्येषु श्रीरुपलक्ष्यते भृशम्॥९।६५।२०

सर्व मनुष्यांचें ऐश्वर्य पूर्ण अशाश्वत आहे असें दिसून येतें.

२४ अनन्तं बत मे वित्तं यस्य मे नास्ति किंचन।
मिथिलायां प्रदीप्तायां न मे दह्यति किंचन॥१२।१७।१९

(जनकराजा म्हणतो) खरोखर माझें ऐश्वर्य अनंत (अविनाशि) आहे; कारण माझी कशावरहि ममता नाहीं. साऱ्या मिथिला नगरीला आग लागली तरी त्यांत माझें असें कांहींहि दग्ध व्हावयाचें नाहीं.

२५ अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥६।३३।२२

(भगवान् श्रीकृष्ण सांगतात) जे लोक अनन्यनिष्ठेनें माझेंचिंतन करून मला भजतात, अशा नित्य माझी भक्ति करणाऱ्यालोकांचा योगक्षेम मी चालवीत असतों.

२६ अनर्हते यद्ददाति न ददाति यदर्हते।
अर्हानर्हापरिज्ञानाद्दानधर्मोऽपि दुष्करः॥१२।२०।९

दानाला पात्र कोण व अपात्र कोण हें न समजल्यानें कोणी अपात्रीं दान करतो आणि सत्पात्रीं करीत नाहीं. तस्मात् दानरूप धर्मसुद्धां मोठा कठीण आहे.

२७ अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च यः।
द्वावेव सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति॥१२।१३७।१

पुढें येणाऱ्या संकटाची आधीं तरतूद करून ठेवणारा, व प्रसंग पडतांच ताबडतोब ज्याला युक्ति सुचते तो, अशा दोन प्रकारच्या मनुष्यांनाच सुखाचा लाभ होत असतो. दीर्घसूत्री सर्वथा नाश पावतो.

२८ अनायुष्यं दिवा स्वप्नंतथाभ्युदितशायिता॥१३।१०४।१३९

दिवसा झोप घेणें आणि सूर्योदयानंतर निजून राहणें हीं आयुष्याची हानि करणारीं आहेत.

२९ अनारम्भात्तु कार्याणां नार्थः संपद्यते क्वचित्॥१०।२।३४

केव्हांहि कार्याला आरंभ केल्याशिवाय कोणतीहि गोष्ट साध्य होत नसते.

३० अनार्याचरितं तात परस्वस्पृहणं भृशम्॥२।५४।६

(धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणतो) बाबा, परद्रव्याचा अभिलाष धरणें हेंकेव्हांह आर्य मनुष्याचें ब्रीद नव्हे.

३१ अनाहूतः प्रविशति अपृष्टो बहु भाषते।
अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः॥५।३३।४१

मूर्ख मनुष्य कोणी न बोलावितांच प्रवेश करतो, विचारल्यावांचून बडबडत सुटतो, आणि विश्वासास पात्र नसलेल्यावर विश्वास ठेवतो.

३२ अनित्यं यौवनं रूपं जीवितं द्रव्यसंचयः।
आरोग्यं प्रियसंवासो गृध्येत्तत्र न पण्डितः॥१२।३३०।१४

तारुण्य, रूप, जीवित, द्रव्यसंचय, आरोग्य व प्रियजनांचा सहवास हीं सर्व अशाश्वत आहेत. शहाण्या पुरुषानें त्यांचा लोभ धरूं नये.

३३ अनित्यचित्तः पुरुषस्तस्मिन्को जातु विश्वसेत्।
तस्मात्प्रधानं यत्कार्यं प्रत्यक्षं तत्समाचरेत्॥१२।८०।९

मनुष्याचें मन फार चंचल आहे. त्याच्यावर कोण विश्वास ठेवील? (कोणाची बुद्धि केव्हां कशी पालटेल याचा काय नेम?) यासाठीं, जे काम महत्त्वाचेंअसेल तें स्वतःच करावें.

३४ अनिर्वेदः श्रियो मूलं लाभस्य च शुभस्य च॥५।३९।५९

लक्ष्मीचें, लाभाचें आणि कल्याणाचें मूल सतत उद्योग करणें हें आहे.

३५ अनिर्वेदेन दीर्घेण निश्चयेन ध्रुवेण च।
देवदेवप्रसादाच्च क्षिप्रं फलमवाप्यते॥१२।१५३।११७

दीर्घोद्योगानें, दृढनिश्चयानें व ईश्वरी कृपेनें सत्वर कार्यसिद्धि होते.

३६ अनिष्टं सर्वभूतानां मरणं नाम भारत।
मृत्युकाले हि भूतानां सद्यो जायति वेपथुः॥१३।११६।२७

(भीष्म धर्मराजाला सांगतात) खरोखर कोणत्याहि प्राण्याला मरण नकोसें वाटतें. मृत्युकाल जवल आला कीं सर्वांना कापरें भरतें !

३७ अनीशश्चावमानी च स शीघ्रं भ्रश्यते श्रियः॥१०।२।२५

हातांत सत्ता नसतांना जो दुसऱ्याचा उपमर्द करतो तो ऐश्वर्यापासून लवकरच भ्रष्ट होतो.

३८ अनुकम्पयो नरः पत्न्या पुष्टो रक्षित एव च।
प्रपतेद्यशसो दीप्तात्स च लोकान्न चाप्नुयात्॥१४।९०।४७

बायकोच्या जिवावर पोसलेल्या व रक्षिलेल्या पुरुषाची कीवच केली पाहिजे. असा पुरुष उज्ज्वल कीर्तीपासून च्युत होतो,य त्याला उत्तम लोकहि प्राप्त होत नाहींत.

३९ अनुक्त्वा विक्रमेद्यस्तु तद्वै सत्पुरुषव्रतम्॥७।१५८।१९

न बोलतां पराक्रम करून दाखविणें हेंच सत्पुरुषाचें व्रत होय.

४० अनुग्रहं च मित्राणाममित्राणां च निग्रहम्।
संग्रहं च त्रिवर्गस्य श्रेय आहुर्मनीषिणः॥१२।२८७।१६

मित्रांवर उपकार करणें, शत्रूंचा पाडाव करणें आणि (धर्म,अर्थ व काम या तीनही पुरुषार्थांची प्राप्ति करून घेणें हें श्रेयस्कर आहे असें ज्ञाते लोक सांगतात.

४१ अनृतं जीवितस्यार्थे वदन्न स्पृश्यतेऽनृतैः॥७।१९०।४७

जीव वांचविण्याकरितां असत्य भाषण करणाराला असत्य भाषण केल्याचा दोष लागत नाहीं.

४२ अन्त्येषु रेमिरे धीरा न ते मध्येषु रेमिरे।
अन्त्यप्राप्तिं सुखामाहुर्दुःखमन्तरमन्त्ययोः॥१२।१७४।३४

ज्ञाते लोक कोणती तरी एक तड पतकरतात, मधल्या स्थितींत आनंद मानीत नाहींत. कारण कोणती तरी शेवटची स्थिति ही सुखकारक आहे आणि दोन्ही टोकांच्या मधली स्थिति ही दुःखदायक आहे.

४३ अन्यत्र राजन् हिंसाया वृत्तिर्नेहास्ति कस्यचित्।
अप्यरण्यसमुत्थस्य एकस्य चरतो मुनेः॥१२।१३०।२८

(भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे राजा, दुसऱ्याला मुलींच पीडा न देतां जगांत कोणाचीही जीवितयात्रा चालूं शकत नाहीं. मग तो अरण्यांत जन्मलेला व एकटाच राहणारा एकादा मुनि का असेना.

४४ अन्यथा चिन्तितो ह्यर्थः पुनर्भवति सोऽन्यथा।
अनित्यमतयो लोके नराः पुरुषसत्तम॥५।८०।६

(नकुल श्रीकृष्णाला म्हणतो) हे पुरुषोत्तमा, मनुष्यानें एका प्रकारानें केलेला बेत पुनः फिरलेला दिसतो. (याचें कारण) जगांत माणसांची बुद्धि नेहमीं पालटत असते.

४५ अन्यस्मिन् प्रेष्यमाणे तु पुरस्ताद्यः समुत्पतेत्।
अहं किं करवाणीति स राजवसतिं वसेत्॥४।४।४५

(राजानें) दुसऱ्या सेवकाला बोलाविलें असतां (तो गेला नाहीं असें पाहून) ओ पुढें जातो आणि ‘मला काय आज्ञा आहे’ असें (राजाला) विचारतो तो राजगृहीं वास्तव्य करूं शकतो.

४६ अन्यान्परिवदन्साधुर्यथा हि परितप्यते।
तथा परिवदन्नन्यांस्तुष्टो भवति दुर्जनः॥१।७४।९२

दुसन्याची निंदा करण्यांत सज्जनाला जितका खेद वाटतो, तितकाच दुर्जनाला परनिंदा करण्यांत संतोष वाटतो.

४७ अन्यो धनं प्रेतगतस्य भुङ्क्ते
वयांसि चाग्निश्चशरीरधातून् ।
द्वाभ्यामयं सह गच्छत्यमुत्र
पुण्येन पापेन च वेष्ट्यमानः॥५।४०।१६

कुडी सोडून गेलेल्या जीवाचें धन दुसरा कोणी भोगतो. (रक्तमांसादि) देहस्थ धातु पक्षी व अग्नि यांच्या भक्ष्यस्थानीं पडतात. फक्त दोन गोष्टी बरोबर घेऊन जीव परलोकीं जातो. त्या म्हणजे त्यानें इहलोकी केलेलें पुण्य व पाप.

४८ अन्यो धर्मः समर्थानामापत्स्वन्यश्च भारत॥१२।१३०।१४

(भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे भारता, सामर्थ्य असतां आचरण्याचा धर्म निराला आणि संकटप्रसंगींचा धर्म निराला.

४९ अन्योन्यसमुपष्टम्भादन्योन्यापाश्रयेण च।
ज्ञातयः संप्रवर्धन्ते सरसीवोत्पलान्युत॥५।३६।३६

तल्यांत वाढणाऱ्या कमलांप्रमाणें, परस्परांस साहाय्य करून व परस्परांचा आश्रय घेऊन ज्ञातींचा उत्कर्ष होत असतो.

५० अन्यो हि नाश्नाति कृतं हि कर्म
मनुष्यलोके मनुजस्य कश्चित्।
यत्तेन किंचिद्धि कृतं हि कर्म
तदश्नुते नास्ति कृतस्य नाशः॥३।२०७।२७

मृत्युलोकीं एका मनुष्यानें केलेल्या कर्माचें फल दुसरा कोणीहि भोगीत नाहीं. त्यानें जें कांहीं केलें असेल त्याचें फल त्याला भोगावेंच लागतें. केलेल्याचा नाश केव्हांहि होत नाहीं.

५१ अपि च ज्ञानसंपन्नः सर्वान्वेदान्पितुर्गृहे ।
श्लाघमान इवाधीयाद्ग्राम्य इत्येव तं विदुः॥१३।३६।१५

बापाच्या घरीं राहून मोठ्या ऐटींत सर्व वेदांचा अभ्यास करून जरी कोणी ज्ञानसंपन्न झाला तरी लोक त्याला खेडवलच म्हणणार.

५२ अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः॥६।३३।३०

(श्रीकृष्ण सांगतात) अत्यंत दुराचारी असलेला मनुष्यहि जर अनन्यभावानें मला भजेल तर तो साधुच समजावा. कारण (तो मला भजूं लागला म्हणजे) त्याचा निश्चय चांगला झाला. (तो चांगल्या मार्गाला लागला.)

५३ अपिचेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि॥६।२८।३६

(श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना,) सर्व पापी लोकांहून तूं जरी अधिक पापी असलास तरी ज्ञानरूप नौकेच्या योगानेंच तूं सर्व पाप तरून जाशील.

५४ अपि पापकृतो रौद्राः सत्यं कृत्वा पृथक्पृथक्।
अद्रोहमविसंवादं प्रवर्तन्ते तदाश्रयाः॥१२।२५९।११

पाप करणारीं आणि भयंकर अशीं जरी मनुष्यें असली, तरी तींसुद्धां परस्परांशीं सत्यानें वागण्याची शपथ घेऊन त्या सत्याच्या आधारानें, परस्परांशीं विश्वासघात व फसवणूक न करितां वागतात.

५५ अपि शाकं पचानस्य सुखं वै मघवन् गृहे।
अर्जितं स्वेन वीर्येण नाप्यपाश्रित्य कंचन॥३।१९३।२९

(बकमुनि म्हणतात) हे इंद्रा, कोणावर अवलंबून न राहतां स्वतःच्या हिंमतीने मिलविलेली मीठभाकर सुद्धां स्वतःच्या घरीं खाण्यांत सुख आहे

.

५६ अपि सर्वस्वमुत्सृज्य रक्षेदात्मानमात्मना॥१२।१३८।१७९

सर्वस्वाचा त्याग करून देखील आपण आपलें रक्षण करावें.

५७ अप्युन्मत्तात्प्रलपतो बालाच्च परिजल्पतः।
सर्वतः सारमादद्यादश्मभ्य इव काञ्चनम्॥५।३४।३२

वेडाच्या लहरींत बरलणाऱ्या वेड्यापासून, तसेंच बोबडे बोल बोलणाऱ्या बालकापासून, सर्वांपासून, दगडांतून सोनें निवडावें त्याप्रमाणे, चांगले तेवढें ग्रहण करावें.

५८ अप्रयत्नागताः सेव्या गृहस्थैर्विषयाः सदा।
प्रयत्नेनोपगम्यश्व स्वधर्म इति मे मतिः॥१२।२९५।३५

(पराशर मुनि जनकराजाला म्हणतात) मुद्दाम प्रयत्न न करितां ओघानें प्राप्त होतील तेवढ्याच विषयांचे गृहस्थाश्रमी पुरुषानें सेवन करावें, आणि स्वधर्माचें आचरण प्रयत्नपूर्वक करावें असें माझें मत आहे.

५९ अप्राप्तकालं वचनं बृहस्पतिरपि ब्रुवन्।
लभते बुद्ध्यवज्ञानमवमानं च भारत॥५।३९।२

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे भारता,समयाला न शोभण्यासारखेंभाषण करणारा बृहस्पति जरी असला तरी त्याच्या बुद्धीचा तिरस्कार होतो व तोहि अपमानालाच पात्र होतो.

६० अबलस्य कुतः कोशो ह्यकोशस्य कुतो बलम्।
अबलस्य कुतो राज्यमराज्ञः श्रीर्भवेत्कुतः॥१२।१३३।४

दुर्बलाला द्रव्य कोठून मिलणार? व ज्याच्यापाशीं द्रव्य नाहीं त्याला सामर्थ्य कोठलें? तसेंच ज्याला सामर्थ्य नाहीं त्याचें राज्य कसे राहणार? व राज्य नाहींसें झालें म्हणजे संपत्ति तरी कशी टिकणार?

६१ अब्रुवन्कस्यचिन्निन्दामात्मपूजामवर्णयन्।
न कश्चिद्गुणसंपन्नः प्रकाशो भुवि दृश्यते॥३।२०७।५०

कोणाचीहि निंदा न करतां व आत्मस्तुति न करतां कोणताहि गुणसंपन्न पुरुष जगांत प्रसिद्धीस येत असल्याचें दृष्टीस पडत नाहीं.

६२ अभिमानकृतं कर्म नैतत्फलवदुच्यते।
त्यागयुक्तं महाराज सर्वमेव महाफलम्॥१२।१२।१६

(नकुल युधिष्ठिराला म्हणाला) (मी कर्ता अशा) अभिमानानें केलेलें कर्म सफल झालें असें म्हणतां येत नाहीं. त्यागबुद्धीनें केलेल्या प्रत्येक कर्माचें फल फार मोठें मिलतें.

६३ अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः।
चत्वारि संप्रवर्धन्ते कीर्तिरायुर्यशो बलम्॥५।३९।७६

नेहमीं वृद्धजनांना वंदन करून त्यांच्या समागमांत जो राहतो, त्याची कीर्ति, आयुष्य, यश व सामर्थ्य हीं चार वृद्धिंगत होतात.

६४ अभिशस्तं प्रपश्यन्ति दरिद्रं पार्श्वतः स्थितम्।
दरिद्रं पातकं लोके न तच्छंसितुमर्हति॥१२।८।१४

दरिद्री मनुष्य जवल उभा राहिला तर एकाद्या पातकी मनुष्याप्रमाणें लोक त्याजकडे पाहतात. या लोकामध्यें दारिद्र्य हैं एक पातकच आहे! म्हणूनच त्याची प्रशंसा करणें योग्य नाहीं.

६५ अभ्यावहति कल्याणं विविधं वाक् सुभाषिता।
सैव दुर्भाषिता राजन्ननर्थायोपपद्यते॥५।३४।७७

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, वाणीनें चांगलें भाषण केलें असतां त्यापासून अनेक प्रकारें कल्याण होतें, परंतु, दुर्भाषण केलें असतां तीच वाणी अनर्थाला कारण होते.

६६ अमर्षजो हि संतापः पावकाद्दीप्तिमत्तरः॥३।३५।११

असहिष्णुतेमुलें होणारा संताप अग्नीपेक्षांहि अधिक प्रखर असतो.

६७ अभित्रमुपसेवेत विश्वस्तवदविश्वसन्।
प्रियमेव वदेन्नित्यं नाप्रियं किंचिदाचरेत्॥१२।१०३।९

(बृहस्पति इंद्राला म्हणतात) शत्रूवर विश्वास न ठेवतां विश्वास ठेवल्याचा बहाणा करून त्याच्या कलानें वागावें. त्याच्याशीं सदा गोड बोलावें,व त्याला न रुचणारी कोणतीहि गोष्ट करूं नये.

६८ अमित्रो न विमोक्तव्यः कृपणं बह्वपि ब्रुवन्।
कृपा न तस्मिन्कर्तव्या हन्यादेवापकारिणम्॥१।१४०।२२

शत्रु अत्यंत दीनवाणीनें बोलूं लागला तरी त्याला मोकला सोडूं नये. त्याच्यावर दया न करतां त्या अपकार करणाऱ्याला ठार मारावें.

६९ अमित्रो मित्रतां याति मित्रं चापि प्रदुष्यति।
सामर्थ्ययोगात्कार्याणामनित्या वै सदा गतिः॥१२।१३८।१३

कार्याच्या महत्त्वाच्या मानानें शत्रुहि मित्र होतात व मित्रहि शत्रु होतात. कारण, कोणतीहि स्थिति ही कायमची अशी नसतेच.

७० अमृतस्येव संतृप्येदवमानस्य तत्त्ववित्।
विषस्येवोद्विजेन्नित्यं संमानस्य विचक्षणः॥१२।२२९।२१

तत्त्ववेत्त्या पुरुषाला अपमान झाला तर अमृतप्राप्ति झाल्याप्रमाणें संतोष वाटला पाहिजे. व शहाण्यानें विषाप्रमाणें सन्मानाचा तिटकारा मानला पाहिजे.

७१ अयुध्यमानो म्रियते युध्यमानश्च जीवति।
कालं प्राप्य महाराज न कश्चिदतिवर्तते॥११।२।५

(भारतीय युद्धानंतर विदुर धृतराष्ट्राचें सांत्वन करतो) हे राजा, रणांत पाऊल न टाकणाराहि मरून जातो, आणि घनघोर रणकंदन करूनहि मनुष्य जिवंत राहू शकतो. सारांश काल आल्यावर त्याचा प्रतिकार कोणालाहि करितां यावयाचा नाहीं.

७२ अरक्षितारं हर्तारं विलोप्तारमनायकम्।
तं तै राजकलिं हन्युः प्रजाः संनह्य निर्घृणम्॥१३।६१।३२

प्रजेचें रक्षण न करितां तिजपासून जो कर घेतो, व प्रजेला सन्मार्गाला न लावितां जो लुबाडतो तो राजरूपी कली प्रजेनें सज्ज होऊन निष्ठुरपणें ठार मारावा.

७३ अरण्ये विजने न्यस्तं परस्वं दृश्यते यदा।
मनसापि न हिंसन्ति ते नराः स्वर्गगामिनः॥१३।१४४।३१

अरण्यांत एकीकडे पडलेलें दुसऱ्याचें द्रव्य दृष्टीस षडलें असतांही जे लोक मनानेंसुद्धां त्याचा अभिलाष धरीत नाहींत ते स्वर्गाला जातात.

७४ अराजकेषु राष्ट्रेषु धर्मो न व्यवतिष्ठते।
परस्परं च खादन्ति सर्वथा धिगराजकम्॥१२।६७।३

राजा नसलेल्या राष्ट्रांमध्यें धर्म रहात नाहीं. तसेंच लोक एकमेकांना फाडून खातात. अराजकतेला सर्वथा धिक्कार असो!

७५ अरिणापि समर्थेन संधिं कुर्वीत पण्डितः॥१२।१३८।२०३

सुज्ञ मनुष्यानें शत्रु सामर्थ्यसंपन्न असल्यास त्याच्याशींही संधि करावा.

७६ अर्थं महान्तमासाद्य विद्यामैश्वर्यमेव वा।
विचरत्यसमुन्नद्धोयः स पण्डित उच्यते॥५।३३।४५

विपुल संपत्ति, विद्या किंवा अधिकार प्राप्त झाला असतां जो निरभिमान वृत्तीनें वागतो त्याला पंडित म्हणावें.

७७ अर्थयुक्त्या हि जायन्ते पिता माता सुतस्तथा।
मातुला भागिनेयाश्च तथा संबन्धिबान्धवाः॥१२।१३८।१४५

आई, बाप, मुलगा, मामा, भाचे तसेंच इतर संबंधी आणि बांधव हे सर्व द्रव्याच्याच संबंधानें परस्पर (प्रीतियुक्त) होत असतात.

७८ अर्थसिद्धिं परामिच्छन् धर्ममेवादितश्चरेत्।
न हि धर्मादपैत्यर्थः स्वर्गलोकादिवामृतम्॥५।३७।४८

पुष्कल द्रव्य मिलावें अशी इच्छा करणाऱ्यानें प्रथम धर्माचेंच आचरण करावें. कारण, स्वर्गलोकाला सोडून जसें अमृत जात नाही तसा अर्थ (द्रव्य) धर्माला सोडून रहात नाहीं.

७९ अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित्।
इति सत्यं महाराज बद्धोऽस्म्यर्थेन कौरवैः॥६।४३।४१

(तुम्ही कौरवांचा पक्ष कां सोडीत नाहीं ? या युधिष्ठिराच्या प्रश्नाला भीष्मद्रोणादिकांनीं उत्तर दिलें आहे) पुरुष हा अर्थाचा (द्रव्याचा) दास आहे, अर्थ कोणाचाहि दास नाहीं ह्यास्तव, खरोखर, हे राजा मी अर्थामुलें कौरवांशीं बांधला गेलों आहें.

८० अर्थागमो नित्यमरोगिता च
प्रिया च भार्या प्रियवादिनी च।
वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या
षड् जीवलोकस्य सुखानि राजन्॥५।३३।८७

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, सदोदित द्रव्यप्राप्ति, निकोप प्रकृति, मधुर भाषण करणारी प्रेमल स्त्री, आज्ञाधारक पुत्र व धनोत्पादक विद्या हीं सहा मृत्युलोकांतील सुखें होत.

८१ अर्थाद्धर्मश्च कामश्च स्वर्गश्चैव नराधिप।
प्राणयात्रापि लोकस्य विना हार्थं न सिध्यति॥१२।८।१७

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) अर्थ (द्रव्य) असेल तर धर्म, काम आणि स्वर्ग यांची प्राप्ति होते. फार काय, पण लोकांची जीवितयात्रा देखील अर्थावांचून चालणार नाहीं.

८२ अर्थानामीश्वरो यः स्यादिन्द्रियाणामनीश्वरः।
इन्द्रियाणामनैश्वर्यादैश्वर्याद्भ्रश्यते हि सः॥५।३४।६३

जो मनुष्य संपत्तीचा मालक असून इंद्रियांचा दास होऊन राहतो तो इंद्रियांवर ताबा नसल्यामुलें ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो.

८३ अर्थानारभते बालो नानुबन्धमवेक्षते॥२।१५।१४

अज्ञ मनुष्य निरनिराल्या कामांना हात घालतो पण पुढील परिणामाकडे लक्ष देत नाहीं.

८४ अर्थी तु शक्यते भोक्तुं कृतकार्योऽवमन्यते ।
तस्मात्सर्वाणि कार्याणि सावशेषाणि कारयेत्॥१२।१४०।२०

कोणत्याहि मनुष्याला आपली गरज आहे तोंवरच त्याचा उपयोग करून घेतां येतो. एकदां त्याचें कार्य झालें म्हणजे तो आपली पर्वा करीत नाहीं. यास्तव कोणतेंहि काम पूर्णपणें न करतां त्यांतील अवशेष ठेवावा.

८५ अर्थेन हि विहीनस्य पुरुषस्याल्पमेधसः।
विच्छिद्यन्ते क्रियाः सर्वा ग्रीष्मे कुसरितो यथा॥१२।८।१८

ज्याप्रमाणें ग्रीष्मऋतूंत लहान नद्यांना खांडवे पडतात, त्याप्रमाणें द्रव्यहीन अशा मंदबुद्धि पुरुषाच्या सर्व किया छिन्न विच्छिन्न होऊन जातात.

८६ अर्थेभ्यो हि विवृद्धेभ्यः संभृतेभ्यस्ततस्ततः।
क्रियाः सर्वाः प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगाः॥१२।८।१६

पर्वतांपासून नद्या उगम पावतात त्याप्रमाणें सर्व बाजूंनीं द्रव्य संपादन करून त्याची वाढ झाली म्हणजे त्यापासून सर्व कार्यें सिद्ध होतात.

८७ अर्थे सर्वे समारम्भाः समायत्ता न संशयः।
स च दण्डे समायत्तः पश्य दण्डस्य गौरवम्॥१२।१५।४८

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) सर्व प्रकारचे उद्योग द्रव्यावर अवलंबून आहेत यांत संशय नाहीं. आणि तें द्रव्य दंडाच्या (नियामक शक्तीच्या) अधीन आहे. यावरून दंडाची थोरवी केवढी आहे पहा !

८८ अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा।
भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः॥१।७४।४१

स्त्री हैं पुरुषाचें अर्धें आंगच होय. स्त्री हाच पुरुषाचा सर्वोत्तम मित्र होय (धर्म, अर्थ व काम या) तीनहि पुरुषार्थांचें मूल स्त्रीच आहे. संसार तरून जाण्याची इच्छा करणाऱ्याचें मुख्य साधन स्त्रीच.

८९ अलातं तिन्दुकस्येव मुहूर्तमपि हि ज्वल।
मा तुषाग्निरिवानर्चिर्धूमायस्व जिजीविषुः॥५।१३३।१४

(विदुला माता संजयास म्हणते) टेंभुरणीच्या लाकडाच्या कोलतीप्रमाणें थोडा वेल कां होईना, पण चमकून जा. केवल जिवाची आशा धरून ज्वाला न निघणाऱ्या तुसाच्या (कोंड्याच्या) अग्नीसारखा नुसता धुमसत राहूं नको.

९० अल्पोऽपि ह्यरिरत्यर्थं वर्धमानः पराक्रमैः।
वल्मीको मूलज इव ग्रसते वृक्षमन्तिकात्॥२।५५।१७

शत्रु क्षुद्र असला तरी तो आपल्या पराक्रमानें प्रबल होत जाऊन, बुंध्याशीं असलेलें वारूल जसें अखेर झाडाला खाऊन टाकतें त्याप्रमाणें, आपल्या प्रतिपक्ष्याचा नाश करतो.

९१ अवज्ञानं हि लोकेऽस्मिन्मरणादपि गर्हितम्॥३।२८।१२

या जगांत मानखंडना होणें हेंमरणापेक्षांहि दुःखदायक आहे.

९२ अविद्वांसमलं लोके विद्वांसमपि वा पुनः।
नयन्ति ह्यपथं नार्यः कामक्रोधवशानुगम्॥१३।४८।३७

जगांत कोणी विद्वान् असो, किंवा अविद्वान् असो, तो कामक्रोधांच्या तडाक्यांत सांपडला कीं स्त्रिया त्याला निःसंशय कुमार्गाला नेतात.

९३ अविश्वासो नरेन्द्राणां गुह्यं परममुच्यते॥१२।८५।३४

कोणाचाहि विश्वास न धरणें हेंराजे लोकांचें एक मोठें रहस्य आहे.

९४ अविसंवादनं दानं समयस्याव्यतिक्रमः।
आवर्तयन्ति भूतानि सम्यक्प्रणिहिता च वाक्॥५।३८।३६

सरल बुद्धीनें दिलेलें दान, वचनाचें परिपालन आणि नीट विचार करून केलेलें भाषण यांच्या योगानें सर्व लोक आपलेसे करून घेतां येतात.

९५ अवृत्तिर्भयमन्त्यानां मध्यानां मरणाद्भयम्।
उत्तमानां तु मर्त्यानामवमानात्परं भयम्॥५।३४।५२

निकृष्ट स्थितींतील लोकांना उपासमारीचें भय वाटतें, मध्यम लोकांना मरणाचें भय वाटतें. परंतु उत्तम कोटींतील मनुष्यांना अपमानाचे फार भय वाटतें.

९६ अवेक्षस्व यथा स्वैः स्त्रैः कर्मभिर्व्यापृतं जगत्।
तस्मात्कर्मैव कर्तव्यं नास्ति सिद्धिरकर्मणः॥१२।१०।२८

(भीम युधिष्ठिराला म्हणतो) असें पहा कीं, जगांतील सर्व प्राणी आपआपलीं कर्मे करण्यांत गुंतलेले आहेत, तस्मात्, कर्मच केलें पाहिजे. कर्मावांचून सिद्धि नाहीं.

९७ अव्यापारः परार्थेषु नित्योद्योगः स्वकर्मसु।
रक्षणं समुपात्तानामेतद्वैभवलक्षणम्॥२।५४।७

(धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणतो) परद्रव्याचा अपहार करण्याच्या फंदांत न पडणें, आपल्या कामांत नेहमीं दक्ष असणें, आणि संपादन केलेल्या द्रव्याचें रक्षण करणें हीं वैभव मिलविण्याचीं लक्षणें होत.

९८ अव्याहृतं व्याहृताच्छ्रेय आहुः
सत्यं वदेव्द्याहृतं तद्द्वितीयम्।
प्रियं वदेव्द्याहृतं तत्तृतीयं
धर्म्यं वदेद्व्याहृतं तच्चतुर्थम्॥५।३६।१२

कांहीं तरी बोलण्यापेक्षां मुलींच न बोलणें हें चांगलें असें म्हणतात. बोलणें सत्य असलें पाहिजे ही दुसरी गोष्ट होय. सत्य असूनही तें प्रिय असलें पाहिजे ही तिसरी गोष्ट होय. आणि सत्य व प्रिय असूनही तें धर्माला अनुसरून असलें पाहिजे ही चौथी गोष्ट होय.

९९ अशङ्कितेभ्यः शङ्केत शङ्कितेभ्यश्च सर्वशः।
अशङ्क्याद्भयमुत्पन्नमपि मूलं निकृन्तति॥१।१४३।६१

संशयास्पद मनुष्यांवर मुलींच विश्वास ठेवूं नये. इतकेंच नव्हे ज्यांच्याविषयीं कोणाला शंका वाटत नाहीं, अशांचा देखील विश्वास धरूं नये. कारण विश्वासू मनुष्याकडून कांहीं संकट उत्पन्न झालेंतर तें समूल नाश करतें.

१०० अशाश्वतमिदं सर्वं चिन्त्यमानं नरर्षभ।
कदलीसंनिभो लोकः सारो ह्यस्य न विद्यते॥११।३।४

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे पुरुषश्रेष्ठा, आपण ज्याचें चिंतन करितों तें हें सर्व जग अशाश्वत आहे. याची स्थिति केलीसारखी आहे. यांत सार कांहींच नाहीं. (केलीचीं सोपटें काढीत गेलें असतां शेवटीं कांहींच सार उरत नाहीं, त्याप्रमाणें या जगाची स्थिति आहे.)

१०१ अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः॥५।४०।४

दुर्लक्ष, त्वरा व स्तुति हे तीन विद्येचे शत्रु होत.

१०२ अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येत्पराक्रमम्।
भैषज्यमेतदुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत्॥११।२।२७

पराक्रम करतां येईल असें दिसेल तर शोक न करतां प्रतिकार करावा, दुःखावर औषध हेंच कीं, त्याचें एकसारखें चिंतन करीत बसूं नये.

१०३ अश्नाम्याच्छादयामीति प्रपश्यन्पापपूरुषः।
नामर्षं कुरुते यस्तु पुरुषः सोऽधमः स्मृतः॥२।५०।१७

अन्न आणि आच्छादन आपल्याला मिलत आहे, एवढ्यावरच नजर देऊन (शत्रूच्या उत्कर्षाविषयीं) ज्याला चीड येत नाहीं तो पुरुष अधम पापी, असें म्हटलें आहे.

१०४ अश्रद्धा परमं पापं श्रद्धा पापप्रमोचनी।
जहाति पापं श्रद्धावान्सर्पो जीर्णामिव त्वचम्॥१२।२६४।१५

अश्रद्धा हे मोठें पाप आहे. श्रद्धा ही पापापासून मुक्त करणारी आहे. जसा सर्प जीर्ण झालेली कांत टाकून देतो तसा श्रद्धावान् मनुष्य पातकाचा त्याग करतो.

१०५ अश्रुतश्च समुन्नद्धो दरिद्रश्च महामनाः।
अर्थांश्चाकर्मणा प्रेप्सुर्मूढ इत्युच्यते बुधैः॥५।३३।३५

अध्ययन नसतांनाहि गर्विष्ठ, दरिद्री असून मोठमोठ्या खर्चाच्या गोष्टी मनामध्यें आणणारा आणि उद्योग न करितां द्रव्यप्राप्तीची इच्छा करणारा अशाला शहाणे लोक मूढ म्हणतात.

१०६ अश्वमेधसहस्रं च सत्यं च तुलया धृतम्।
अश्वमेधसहस्राद्धि सत्यमेव विशिष्यते॥१२।१६२।२६

सहस्र अश्वमेध आणि सत्य ह्रीं तराजूंत घातलीं तर सहस्र अश्वमेधांपेक्षां सत्यच अधिक भरेल.

१०७ अष्टादश पुराणानि धर्मशास्त्राणि सर्वशः।
वेदाः साङ्गास्तथैकत्र भारतं चैकतः स्थितम्॥१८।५।४६

अठरा पुराणें, सर्व धर्मशास्त्रें(स्मृति) आणि सांग वेद एका बाजूला व एकटें भारत एका बाजूला (एवढी भारताची योग्यता आहे.)

१०८ अष्टौ गुणाः पुरुषं दीपयन्ति
प्रज्ञा च कौल्यं च दमः श्रुतं च।
पराक्रमश्चाबहुभाषिता च
दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥५।३३।१०४

बुद्धि, कुलीनता, इंद्रियनिग्रह, विद्या, पराक्रम, पुष्कल न बोलणें, यथाशक्ति दान, आणि कृतज्ञता हे आठ गुण मनुष्याला योग्यतेला चढवितात.

१०९ असंशयं दैवपरः क्षिप्रमेव विनश्यति॥१२।१०५।२२

दैववादी मनुष्य सत्वर सर्वथा नाश पावतो यांत संशय नाहीं.

११० असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥६।३०।३५

(भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे महाबाहो अर्जुना, खरोखरच मन हैं चंचल असून त्याचा निग्रह करणें अति कठीण आहे. तरीपण अभ्यासानें व वैराग्यानें तें ताब्यांत आणतां येतें.

१११ असतो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः॥६।२७।१९

आसक्ति न ठेवतां कर्म करणारा मनुष्य परमपद खचित प्राप्त करून घेतो.

११२ असतां प्रतिषेधश्च सतां च परिपालनम्।
एष राज्ञां परो धर्मः समरे चापलायनम्॥१२।१४।१६

दुष्टांचे निवारण करणें, सज्जनांचें परिपालन करणें आणि युद्धांत शत्रूला पाठ न दाखविणें हा राजांचा श्रेष्ठ धर्म होय.

११३ असतां शीलमेतद्वै परिवादोऽथ पैशुनम्॥१२।१३२।१३

दुसऱ्याची निंदा करणें, आणि चहाडी करणें हा दुर्जनांचा स्वभावच आहे.

११४ असदुच्चैरपि प्रोक्तः शब्दः समुपशाम्यति।
दीप्यते त्वेव लोकेषु शनैरपि सुभाषितम्॥१२।२८७।३२

अयोग्य भाषण मोठ्या जोरानें केलें तरी त्याचें तेज पडत नाहीं आणि योग्य भाषण हलू केलें तरी लोकांत त्याचें तेज पडतेंच.

११५ असंतोषः श्रियो मूलम्॥२।५५।११

असंतोष हैं उत्कर्षाचें मूल आहे.

११६ असंत्यागात्पापकृतामपापां-
स्तुल्यो दण्डः स्पृशते मिश्रभावात्।
शुष्केणार्द्रं दाते मिश्रभावात्
तस्मात्पापैः सह संधिं न कुर्यात्॥५।३४।७०

पापी लोकांचा त्याग केला नाहीं, तर त्यांच्याशीं मिसलल्यामुलें निर्दोषी माणसांनाहि त्यांच्या बरोबरीनें दंड सोसावा लागतो. सुक्याबरोबर मिसलल्यानें ओलेंहि जलून जातें. यास्तव, पापी लोकांशी संबंध ठेवूं नये.

११७ असभ्याः सभ्यसंकाशाः सभ्याश्वासभ्यदर्शनाः।
दृश्यन्ते विविधा भावास्तेषु युक्तं परीक्षणम्॥१२।१११।६५

पुष्कल असभ्य मनुष्यें सभ्य असल्यासारखीं दिसतात व सभ्य असलेलीं असभ्य दिसतात. नानाप्रकारच्या वस्तु दिसतात (त्या तशाच असतात असें नाहीं) यास्तव, त्यांची नीट परीक्षा करणें युक्त आहे.

११८ असंभवे हेममयस्य जन्तो–
स्तथापि रामो लुलुभे मृगाय।
प्रायः समासन्नपराभवाणां
धियो विपर्यस्ततरा भवन्ति॥२।७६।५

सोन्याचा मृग असणें संभवत नाहीं, असें असतांहि श्रीरामचंद्राला सुवर्णमृगाचा मोह पडला (यावरून असें दिसतें कीं) बहुतकरून विनाशकाल जवल आला कीं, माणसांच्या बुद्धीला भ्रम होतो.

११९ असम्यगुपयुक्तं हि ज्ञानं सुकुशलैरपि।
उपलभ्यं चाविदितं विदितं चाननुष्ठितम्॥५।३९।३४

जें समजून घेणें अवश्य आहे तें जर समजून न घेतलें अथवा समजल्यावरहि त्याप्रमाणं वर्तन न केलें तर अतिनिपुण पुरुषांनीहि केलेला ज्ञानाचा उपदेश व्यर्थ जाणार.

१२० अस्मिन्महामोहमये कटाहे
सूर्याग्निना रात्रिदिवेन्धनेन।
मासर्तुदर्वीपरिघट्टनेन
भूतानि कालः पचतीति वार्ता॥३।३१३।११८

असें म्हणतात कीं, अतिशय मोह पडणाऱ्या या जगद्रूपी कढंईत दिवसरात्ररूपी सर्पणानें सूर्यरूपी अग्नीवर, मास ऋतु–रूप पलीनें ढवलीत ढवलीत, काल हा सर्व प्राण्यांना शिजवीत आहे.

१२१ अहं वो रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिपः।
स संहत्य निहन्तव्यः श्वेव सोन्माद आतुरः॥१३।६१।३३

मी तुमचें रक्षण करीन’ असें म्हणून जो राजा त्याप्रमाणें प्रजेचें रक्षण करीत नाहीं त्याला, सर्वांनीं एक होऊन, सडक्या पिसाललेल्या कुत्र्याप्रमाणें ठार करावें.

१२२ अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम्।
शेषाःस्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतःपरम्॥३।३१३।११६

रोजच्यारोज मृत्युलोकांतील प्राणी यमसदनास जात असूनहि बाकीचे लोक चिरंजीव आहों असें समजतात, यापरतें आश्चर्य तें कोणतें !

१२३ अहिंसा परमो धर्मः॥३।२०७।७४

अहिंसा हा परमश्रेष्ठ धर्म होय.

१२४ अहिंसायां तु निरता यतयो द्विजसत्तम।
कुर्वन्त्येव हि हिंसां ते यत्नादल्पतरा भवेत्॥३।२०८।३४

(धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणाला) हे द्विजश्रेष्ठा, अहिंसेकरितां झटणाऱ्या यतींच्या हातून देखील हिंसा घडतेच; मात्र ती टालण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुलें फार थोडी घडते.

१२५ अहिंसार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम्।
यः स्यादहिंसासंयुक्तः स धर्म इति निश्चयः॥१२।१०९।१२

प्राण्यांना पीडा होऊं नये एवढ्यासाठींच धर्म सांगितला आहे. जो अहिंसेनें युक्त असेल तोच धर्म, हा सिद्धांत आहे.

१२६ अहिंसा सत्यवचनं सर्वभूतेषु चार्जवम्।
क्षमा चैवाप्रमादश्च यस्यैते स सुखी भवेत्॥१२।२१५।६

अहिंसा, सत्य भाषण, सर्वांशी सरलपणाची वागणूक, क्षमा व सावधानता हे गुण ज्याच्यापाशीं असतील तो सुखी होईल.

१२७ अहो बत महत्कष्टं विपरीतमिदं जगत् ।
येनापत्रपते साधुरसाधुस्तेन तुष्यति॥३।२।६४

अरेरे! मोठी दुःखाची गोष्ट कीं, या जगाची रीत विपरीत आहे. ज्याच्या योगानें सज्जनाला खेद होतो त्यानेंच दुर्जनाला संतोष वाटतो.

१२८ अहो ह्यनित्यं मानुष्यं जलबुद्बुदचञ्चलम्॥७।७८।१७

पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणें मनुष्याचें जीवित किती क्षणभंगुर आहे !

१२९ आकिंचन्ये न मोक्षोऽस्ति किंचन्ये नास्ति बन्धनम्।
किंचन्ये चेतरे चैव जन्तुर्ज्ञानेन मुच्यते॥१२।३२०।५०

दारिद्यांत मोक्ष नाहीं किंवा श्रीमंतींत बंधन नाहीं. श्रीमंतींत काय आणि गरिबींत काय, मनुष्य ज्ञानानें मुक्त होत असतो.

१३० आगमानां हि सर्वेषामाचारः श्रेष्ठ उच्यते।
आचारप्रभवो धर्मो धर्मादायुर्विवर्धते॥१३।१०४।१५६

सर्व शास्त्रांत आचार हाच श्रेष्ठ म्हटला आहे. आचारापासून धर्माची उत्पत्ति होते. धर्माचरणानें आयुष्य वाढतें.

१३१ आत्मदोषैर्नियच्छन्ति सर्वे दुःखसुखे जनाः॥१०।७८।३०

सर्व लोकांना स्वतःच्या कर्मामुलेंच सुख किंवा दुःख प्राप्त होत असतें.

१३२ आत्मनो बलमज्ञाय धर्मार्थपरिवर्जितम्।
अलभ्यमिच्छन्नैष्कर्म्यान्मूढबुद्धिरिहोच्यते॥५।३३।४३

आपलें सामर्थ्य न जाणून धर्म व अर्थ यांना सोडून असलेली न मिलण्याजोगी वस्तू उद्योग न करितां मिलविण्याची इच्छा करणारा मूर्ख होय.

१३३ आत्मा जेयः सदा राज्ञा ततो जेयाश्चशत्रवः।
अजितात्मा नरपतिर्विजयेत कथं रिपून्॥१२।६९।४

राजानें नेहमीं प्रथम आपलें मन जिंकावें. म्हणजे मग त्याला शत्रूंवर जय मिलवितां येईल. ज्यानें स्वतःचें मन जिंकलें नाहीं तो राजा शत्रूंना कसा जिंकणार?

१३४ आत्मानं कः समुद्बध्यकण्ठे बद्ध्वामहाशिलाम्।
समुद्रं तरते दोर्भ्यां तत्र किं नाम पौरुषम्॥४।४९।१६

स्वतःस जखडून घेऊन आणि गल्यांत मोठी धोंड बांधून नुसत्या बाहूच्या जोरावर समुद्र तरून जाण्याच्या भरीस कोण पडेल ! असलें साहस करण्यांत पुरुषार्थ कसला?

१३५ आत्मानमसमाधाय समाधित्सति यः परान्।
विषयेष्विन्द्रियवशं मानवाः प्रहसन्ति तम्॥१२।२६७।२७

आपलें मन स्वाधीन न ठेवतां जो दुसऱ्यांना आपल्या ताब्यांत ठेवू पहातो, अशा विषयासक्त इंद्रियाधीन पुरुषाचा लोक उपहासकरतात.

१३६ आत्मा पुत्रः सखा भार्या
कृच्छ्रं तु दुहिता किल॥१।१५९।११

(बकासुराकडे मी जातें असें म्हणणाऱ्या मुलीचे उद्गार) पुत्र म्हणजे आपला आत्माच होय. भार्या हा मित्र होय. परंतु मुलगी म्हणजे मात्र खरोखर संकट होय !

१३७ आत्मार्थे संततिस्त्याज्या
राज्यं रत्नं धनानि च॥१२।१३८।१७९

स्वतःकरितां संततीचा, राज्याचा, रत्नांचा व सर्व प्रकारच्या द्रव्याचा त्याग करावा.

१३८ आत्मा सर्वस्य भाजनम्॥९।४।४२

जीव हाच सर्व गोष्टींचा आधार आहे. (आधीं जीव जगेल तरसर्व कांहीं अनुकूल होईल.)

१३९ आत्मैव ह्यात्मनः साक्षी
कृतस्यापकृतस्य च॥१३।६।२७

आपला आत्माच आपल्या बऱ्या वाईट कृत्यांचा साक्षी आहे.

१४० आत्मैवादौ नियन्तव्यो
दुष्कृतं संनियच्छता॥१२।२६७।२९

दुष्टांचें नियमन करूं इच्छिणाऱ्यानें प्रथम आपल्या मनाचें नियमन केलें पाहिजे.

१४१ आत्मोत्कर्षं न मार्गेत परेषां परिनिन्दया।
स्वगुणैरेव मार्गेत विप्रकर्षं पृथग्जनात्॥१२।२८७।२५

दुसऱ्यांची निंदा करून आपला उत्कर्ष साधण्याची इच्छा धरूं नये. आपल्या आंगच्या गुणांच्या जोरावरच सामान्य लोकांपेक्षां वरचढ होण्याची इच्छा करावी.

१४२ आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः॥६।३०।३२

(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, आपणांला जसें सुखदुःख होतें तसेंच सर्व प्राण्यांना होतें, अशा बुद्धीनें जो सर्वत्र सारखेंच पहातोतो योगी परमश्रेष्ठ होय.

१४३ आददानस्य चेद्राज्यं ये केचित्परिपन्थिनः।
हन्तव्यास्त इति प्राज्ञाः क्षत्रधर्मविदो विदुः॥१२।१०७

राज्य घेण्याच्या कामीं जर कोणी अडथला करतील, तर त्यांचा वध करावा असें क्षत्रधर्म जाणणारे शहाणे लोक सांगतात.

१४४ आदावेव मनुष्येण वर्तितव्यं यथाक्षमम्।
यथा नातीतमर्थं वै पश्चात्तापेन युज्यते॥११।१।३५

आधींपासूनच मनुष्यानें योग्य रीतीनें वागावें. म्हणजे गोष्ट हातची गेल्यावर त्याकरितां पश्चात्ताप करण्याची पाली येणार नाहीं.

१४५ आदित्यचन्द्रावनिलानलौ च
द्यौर्भूमिरापो हृदयं यमश्च।
अहश्च रात्रिश्व उभे च संध्ये
धर्मश्च जानाति नरस्य वृत्तम्॥१।७४।३०

सूर्य, चंद्र, वायु, अग्नि, आंकाश, पृथ्वी, जल, तसेंच आपलें अंतःकरण, यम, दिवस, रात्र, सकालसंध्याकालचा संधिप्रकाशआणि धर्म इतक्यांना मनुष्याचें (बरेंवाईट) कृत्य समजतें.

१४६ आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेद्धनैरपि।
आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि॥१।१५८।२७

(बकवधपर्वांत ब्राह्मणस्त्री पतीला सांगते) संकटप्रसंगी उपयोग व्हावा म्हणून धनाचें रक्षण करावें. धनाचा त्याग करूनसुद्धां स्वस्त्रीचें रक्षण करावें. आणि धनाचा व स्त्रीचा त्याग करून देखील नेहमीं स्वतःचेंरक्षण करावें.

१४७ आपदेवास्य मरणात्पुरुषस्य गरीयसी।
श्रियो विनाशस्तद्ध्यस्य निमित्तं धर्मकामयोः॥५।७२।२७

द्रव्यनाश हेंमनुष्याला मरणापेक्षांहि अधिक मोठें संकट होय. कारण, त्याचा धर्म व काम या दोनहि पुरुषार्थांचें साधन द्रव्य हें आहे.

१४८ आभ्यन्तरं भयं रक्ष्यमसारं बाह्यतो भयम्॥१२।१०७।२८

आपापसांतील भयाचें प्रथम निरसन केलें पाहिजे. कारण, बाह्य लोकांपासून उत्पन्न होणाऱ्या भयाचें फारसें महत्त्व नसतें.

१४९ आरब्धान्येव कार्याणि सुपर्यवसितानि च।
यस्य राज्ञः प्रदृश्यन्ति स राजा राजसत्तमः॥१२।५७।३२

ज्या राजाचीं आरंभिलेलीं कार्यें चांगल्या रीतीनें तडीस गेल्यानंतरच दृष्टीस पडतात तो राजा सर्वांत श्रेष्ठ होय.

१५० आर्तिरार्ते प्रिये प्रीतिरेतावन्मित्रलक्षणम्।
विपरीतं तु बोद्धव्यमरिलक्षणमेव तत्॥१२।१०३।५०

आपण दुःखी झालों असतां ज्याला दुःख होतें व आपण सुखी झालों असतां ज्याला सुख होतें तोच मित्र होय आणि त्याच्या उलट स्थिति असणें हें शत्रूचेंच लक्षण जाणावें.

१५१ आर्येण हि न वक्तव्या
कदाचित्स्तुतिरात्मनः॥७।१९५।२१

आर्य मनुष्यानें केव्हांहि आत्मस्तुति करूं नये.

१५२ आलस्यं मदमोहौ च चापलं गोष्ठिरेव च।
स्तब्धता चाभिमानित्वं तथाऽत्यागित्वमेव च
एते वै सप्त दोषाः स्युः सदा विद्यार्थिनां मताः॥५।४०।५

आलस, गर्व व मोह, चंचलपणा, जनसमुदायांत जाणें, उद्धटपणा,अभिमान आणि आपणांस येत असलेलें दुसऱ्यास न सांगणें हे विद्यार्थ्यांचे नेहमीं सात दोष होत.(दोष आठ भरत असतां सात म्हटले आहेत.)

१५३ आशां कालवतीं कुर्यात्कालं विघ्नेन योजयेत्।
विघ्नं निमित्ततो ब्रूयान्निमित्तं चापि हेतुतः॥१।१४०।८८

(प्रसंगविशेषीं शत्रूला) आशाहि दाखवावी पण तिला कालाची मर्यादा सांगावी. आणि तो काल आला म्हणजे ती सफल होण्याच्या मार्गांत विघ्नें उपस्थित करावी. त्या विघ्नांचेंहि कांहींतरी कारण सांगावें. आणि त्या कारणाच्याहि मुलाशीं कांहीं मतलब असावा. (कोणीकडून तरी गोष्ट लांबणीवर टाकावी.)

१५४ आशां महत्तरां मन्ये पर्वतादपि सद्रुमात्।
आकाशादपि वा राजन्नप्रमेयैव वा पुनः॥१२।१२५।६

(युधिष्ठिर भीष्मांना म्हणतो) राजा, मला वाटतें कीं, वृक्षाच्छादित पर्वतापेक्षां आणि आकाशापेक्षांहि आशा ही मोठी आहे. खरोखर तिच्या मोठेपणाला सीमाच नाहीं !

१५५ आशीविषैश्च तस्याहुः सङ्गतं यस्य राजभिः॥१२।८२।२४

जो राजेलोकांच्या समागमांत राहतो तो खरोखर सर्पांच्याच सहवासांत राहतो.

१५६ आश्चर्याणामनेकानां प्रतिष्ठा भगवान् रविः॥१२।३६२।२

भगवान् सूर्यनारायण अनेक चमत्कारांचें आश्रयस्थान आहे.

१५७ आश्रमांस्तुलया सर्वान्धृतानाहुर्मनीषिणः।
एकतश्च त्रयो राजन् गृहस्थाश्रम एकतः॥१२।१२।१२

(नकुल युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, एकीकडे बाकीचे तीन आश्रम व एकीकडे एकटा गृहस्थाश्रम ठेवला तरी बरोबरी होईल असें ज्ञाते लोक म्हणतात.

१५८ इच्छतोरत्र यो लाभः स्त्रीपुंसोरमृतोपमः।
अलाभश्चापि रक्तस्य सोऽपि दोषो विषोपमः॥१२।३२०।६९

परस्परांची इच्छा करणाऱ्या स्त्रीपुरुषांना परस्परांचा लाभ होईल तर तो अमृततुल्य असतो, आणि न होईल तर तें दुःखहि विषतुल्यच होय.

१५९ इज्याध्ययनदानानि तपः सत्यं क्षमा दमः।
अलोभ इति मार्गोऽयं धर्मस्याष्टविधः स्मृतः॥५।३५।५६

यज्ञ, अध्ययन, दान, तप, सत्य, क्षमा, इंद्रियनिग्रह आणि निर्लोभता असा आठ प्रकारचा धर्मप्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे.

१६० इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत्।
बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यति॥१।१।२६८

(रामायण महाभारतादि) इतिहास आणि पुराणें यांच्या अभ्यासानें वेदाध्ययनाची पूर्तता करावी. कारण, अर्धवट शिकलेल्या मनुष्याविषयीं वेदाला अशी धास्ती वाटते कीं, हा माझ्यावर प्रहार करील.(म्हणजे अर्थाचा अनर्थ करून दुरुपयोग करील.)

१६१ इत्यर्थमिष्यतेऽपत्यं तारयिष्यति मामिति॥१।१५९।४

मनुष्याला अपत्य एवढ्याकरितां हवें असतें कीं, त्यानें आपल्याला (नरकापासून) तारावें.

१६२ इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ॥६।२७।३४

इंद्रियें आणि त्यांचे विषय यांच्यामधील प्रीति व द्वेष हींठरलेलीं आहेत.त्यांच्या ताब्यांत मनुष्यानें जाऊं नये. कारण ते त्याचे शत्रु होत.

१६३ इन्द्रियाणामनुत्सर्गे मृत्युनापि विशिष्यते।
अत्यर्थं पुनरुत्सर्गोसादयेद्दैवतानपि॥५।३९।५३

इंद्रियांचा आत्यंतिक निरोध मरणापेक्षांहि दुःसह होय, उलट तींच पूर्णपणें मोकलीं सोडलीं असतां देवतांचा देखील नाश करतील.

१६४ इन्द्रियाणां प्रसङ्गेन दोषमर्च्छत्यसंशयम्।
संनियम्य तु तान्येव सिद्धिमाप्नोति मानवः॥१२।३२३।८

मनुष्य इंद्रियांच्या नादीं लागला म्हणजे त्याच्या हातून निःसंशय पापाचरण घडतें. परंतु तींच ताब्यांत ठेवल्यानें सिद्धि (मोक्ष)प्राप्त करून घेतो.

१६५ इन्द्रियाण्येव तत्सर्वं यत्स्वर्गनरकावुभौ।
निगृहीतविसृष्टानि स्वर्गाय नरकाय च॥३।२११।१९

स्वर्ग व नरक म्हणून जें कांहीं आहे तें सर्व इंद्रियेंच होत. कारण इंद्रियें, आवरून धरल्यानें स्वर्गाला, आणि मोकलीं सोडल्यानें नरकाला, कारण होत असतात.

१६६ इन्द्रियाण्येव संयम्य तपो भवति नान्यथा॥३।२११।१८

इंद्रियांचें संयमन केल्यानेंच तपश्चर्या घडते, नाहीं तर घडत नाहीं.

१६७ इष्टं च मे स्यादितरच्च न स्या-
देतत्कृते कर्मविधिः प्रवृत्तः।
इष्टं त्वनिष्टं च न मा भजेते—
त्येतत्कृते ज्ञानविधिः प्रवृत्तः॥१२।२०१।११

मला इष्ट गोष्टी तेवढ्या घडाव्या व अनिष्ट टलाव्या यासाठीं कर्मकांडाची प्रवृत्ति आहे. इष्ट व अनिष्ट या दोहोंचाहि लेप मला न लागावा यासाठीं ज्ञानकांड आहे.

१६८ इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः॥६।२७।१२

(श्रीकृष्ण म्हणतात) यज्ञानें तृप्त झालेले देव तुम्हांला (यज्ञ करणाऱ्यांना) इच्छित भोग देतील. त्यांनी दिलेल्या त्या भोगांचा त्यांना दिल्याशिवाय जो उपभोग घेतो तो चोरच म्हटला पाहिजे.

१६९ ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया॥६।४२।६१

(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, परमेश्वर सर्व भूतांच्या अंतर्यामीं वास करतो, व आपल्या मायेच्या योगानें यंत्रावर चढविलेल्या (कलसूत्री बाहुल्याप्रमाणें) सर्व भूतांना नाचवीत असतो.

१७० उच्चैर्वृत्तेः श्रियो हानिर्यथैव मरणं तथा॥१२।१३३।५

उच्च वृत्तीनें राहणाऱ्या मनुष्याला संपत्तीचा नाश मरणासारखाच होय.

१७१ उत्थानवीरः पुरुषो वाग्वीरानधितिष्ठति॥१२।५८।१५

कर्तृत्ववान् पुरुष वाचाल पुरुषांवर छाप ठेवतो.

१७२ उत्थानहीनो राजा हि बुद्धिमानपि नित्यशः।
प्रधर्षणीयः शत्रूणां भुजङ्ग इव निर्विषः॥१२।५८।१६

राजा बुद्धिमान् असला तरी दुसऱ्यांवर चढाई न करील तर, विषहीन सर्पाप्रमाणें, नेहमीं शत्रूंच्या हल्ल्यांना पात्र होतो.

१७३ उत्थानेनामृतं लब्धमुत्थानेनासुरा हताः।
उत्थानेन महेन्द्रेण श्रेष्ठ्यं प्राप्तं दिवीह च॥१२।५८।१४

(देवांनासुद्धां) प्रयत्नानेंच अमृताची प्राप्ति झाली, व प्रयत्नानेंच दैत्यांचा संहार करितां आला. इंद्रदेखील प्रयत्नानेंच इहपरलोकीं श्रेष्ठपणा मिलविता झाला.

१७४ उत्थायोत्थाय गच्छेत नित्ययुक्तो रिपोर्गृहान्।
कुशलं चास्य पृच्छेत यद्यप्यकुशलं भवेत्॥१२।१४०।२२

नेहमीं सावध राहून दररोज उठून शत्रूच्या घरीं जावें आणि तो जरी खुशाल नसला तरी त्याला कुशलप्रश्न विचारावे.

१७५ उत्पन्नस्य रुरोः शृङ्गं वर्धमानस्य वर्धते।
प्रार्थना पुरुषस्येव तस्य मात्रा न विद्यते॥१३।९३।४५

उपजलेलें हरिणाचेंपोर वाढूं लागलें कीं, त्याच्याबरोबर त्याचीं शिंगेंही वाढत जातात. तद्वत् मनुष्याची हाव तो वाढूं लागला कीं वाढूं लागतेंमग तिला कांहीं मर्यादा रहात नाहीं.

१७६ उत्साहश्चापि यत्नेन कर्तव्यो भूतिमिच्छता॥१।१४०।८५

वैभवाची इच्छा करणाऱ्यानें उत्साहानें उद्योग केला पाहिजे.

१७७ उदाराणां तु सत्कर्म दैवं क्लीचा उपासते॥१२।१३९।८२

श्रेष्ठ प्रकारचे लोक सत्कर्माची कास धरतात. दुबले लोक दैवावर हवाला ठेवतात.

१७८ उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैवह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥६।३०।५

मनुष्यानें आपण होऊन आपला उद्धार करावा.आपण आपला नाश करूं नये. कारण, प्रत्येक मनुष्य आपणच आपला बंधु (हितकर्ता) किंवा आपणच आपला शत्रु होतो.

१७९ उद्यच्छेदेव न नमेदुद्यमो व पौरुषम्॥५।१३४।३९

(पुरुषानें) नेहमीं ताठ (वाणेदारपणानें) असावें कधीं कोणापुढें वाकूं नये. न वांकणें हाच खरा मानीपणा.

१८० उद्यम्य शस्त्रमायान्तमपि वेदान्तगं रणे ।
निगृह्णीयात्स्वधर्मेण धर्मापेक्षी नराधिपः॥१२।५६।२९

रणांगणांत शस्त्र उपसून धावून येणारा शत्रु वेदान्तविद्यापारंगत असला तरी त्याचा, धर्माची आस्था बालगणाऱ्या राजानें धर्मयुद्ध करून मोड करावा.

१८१ उन्मत्ता गौरिवान्धा श्रीः क्वचिदेवावतिष्ठते॥५।३९।६६

उन्मत्त गाईप्रमाणें, अविचारी लक्ष्मी कोठें तरी रहात असते !

१८२ उपस्थितस्य कामस्य प्रतिवादो न विद्यते।
अपि निर्मुक्तदेहस्य कामरक्तस्य किं पुनः॥५।३९।४६

प्राप्त झालेल्या विषयाचा त्याग, देहाची पर्वा न करणाऱ्याजीवन्मुक्ताच्याहि हातून होणें शक्य नाहीं. मग विषयलंपट पुरुषाची गोष्ट कशाला पाहिजे !

१८३ ऊधश्छिन्द्यात्तु यो धेन्वाः क्षीरार्थी न लभेत्पयः।
एवं राष्ट्रमयोगेन पीडितं न विवर्धते॥१२।७१।१६

दुधाच्या आशेनें जो गाईची कांस कापील त्याला दूध कधींच मिलणार नाहीं. त्याचप्रमाणें अयोग्य रीतीनें (कर वगैरे लावून) राष्ट्राला पीडा दिली असतां राष्ट्राचा उत्कर्ष होत नाहीं.

१८४ ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे।
धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते॥१८।५।६२

(महर्षि व्यास म्हणतात) मी बाहू उभारून मोठ्यानें ओरडून सांगतों आहें पण कोणीच माझें ऐकत नाहीं. बाबांनो, धर्मापासूनच अर्थ व काम प्राप्त होतात त्या धर्माचें आचरण तुम्ही कां करीत नाहीं ?

१८५ ऊर्ध्वं प्राणा द्युत्क्रामन्ति यूनः स्थविर आयति।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते॥५।३८।१

कोणी वृद्ध पुरुष जवल येऊं लागला कीं, तरुणाचे प्राण वर जाऊं लागतात. त्याला सामोरें जाऊन वंदन केल्यानें ते पुनः तरुणाला प्राप्त होतात.

१८६ ऋणशेषमग्निशेषं शत्रुशेषं तथैव च ।
पुनःपुनःप्रवर्धन्ते तस्माच्छेषं न धारयेत्॥१२।१४०।५८

ॠण, अग्नि व शत्रु यांचा थोडासा भाग जरी शिल्लक राहिला तरी तो पुनः पुनः वाढूं लागतो, यास्तव त्यांचा कांहीं अवशेष ठेवूं नये.

१८७ ऋषीणां च नदीनां च कुलानां च महात्मनाम्।
प्रभवो नाधिगन्तव्यः स्त्रीणां दुश्चरितस्य च॥५।३५।७२

ऋषि,नद्या व थोर लोकांचें कुल, त्याचप्रमाणें स्त्रियांचें दुश्चरित्रयांचें मूल शोधण्याच्या भरीस पडूं नये.

१८८ एक एव चरेद्धर्मं नास्ति धर्मे सहायता।
केवलं विधिमासाद्य सहायः किं करिष्यति॥१२।१९३।३२

केवल धर्मविधीचा आश्रय करून स्वतः एकट्यानेंच धर्माचें आचरण करावें. धर्माचरणांत दुसन्याच्या साहाय्याची अपेक्षाच नाहीं. मग साहाय्यकर्त्याचा उपयोग काय?

१८९ एकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च वध्यते।
सराष्ट्रं सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लवः॥५।३३।५०

विष एकालाच ठार मारतें आणि शस्त्रानेंसुद्धां एकाचाच घात होतो. परंतु राजाच्या गुप्त मसलतींत कांहीं बिधाड झाला, तर तो प्रजा व राष्ट्र यांसहवर्तमान राजाच्या नाशाला कारणीभूत होतो.

१९० एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता।
बुद्धिर्बुद्धिमतोत्सृष्टा हन्याद्राष्ट्रं सराजकम्॥५।३३।४८

तिरंदाजानें सोडलेला तीर एका प्राण्याचा वध करील न करील परंतु बुद्धिमान् पुरुषानें टाकिलेला बुद्धीचा डाव राजासह सर्व राष्ट्राचा घात करील.

१९१ एकः क्रुद्धो ब्राह्मणो हन्ति राष्ट्रम्॥५।४०१८

क्रुद्ध झालेला एक ब्राह्मण सर्व राष्ट्राचा नाश करूं शकेल.

१९२ एकः क्षमावतां दोषो द्वितीयो नोपपद्यते ।
यदेनं क्षमया युक्तमशक्तं मन्यते जनः॥५।३३।५३

क्षमाशील पुरुषांच्या ठायीं एकच दोष आढलतो, दुसरा नाहीं. तो दोष एवढाच कीं, त्याच्या सहनशीलतेमुलें लोक त्याला दुर्बल समजतात.

१९३ एकः पापानि कुरुते फलं भुङ्क्ते महाजनः।
** भोक्तारो विप्रमुच्यन्ते कर्ता दोषेण लिप्यते**

॥५।३३।४७

एकजण पाप करतो व त्याचें फल पुष्कल लोकांना उपभोगण्यास मिलतें. परंतु हे उपभोग घेणारे अजीबात सुटून जातात आणि कर्त्याला मात्र पापाचा दोष लागतो.

१९४ एकत्र चिरवासो हि न प्रीतिजननो भवेत्॥३।३६।३६

एकाच ठिकाणीं फार दिवस राहणें सुखावह होत नाहीं.

१९५ एकमेव हि लोकेऽस्मिन्नात्मनो गुणवत्तरम्।
इच्छन्ति पुरुषाः पुत्रं लोके नान्यं कथंचन॥७।१९४।५

या जगांत एक पुत्रच तेवढा आपल्यापेक्षां अधिक गुणवान व्हावा, असें लोक इच्छीत असतात; दुसरा कोणीहि असा वरचढ व्हावा अशी इच्छा करीत नाहींत.

१९६ एकशत्रुवधेनैव शूरो गच्छति विश्रुतिम्॥५।१३४।२३

शत्रूचा वध करणें या एका गोष्टीनेंच शूराची प्रसिद्धि होत असते.

१९७ एकः शत्रुर्न द्वितीयोऽस्ति शत्रुः
अज्ञानतुल्यः पुरुषस्य राजन्॥१२।२९७।२८

(पराशरमुनि जनकाला म्हणतात) हे राजा, मनुष्याचा एकच शत्रु आहे, अज्ञानासारखा दुसरा कोणताच शत्रु नाहीं.

१९८ एकस्मिन्नेव जायेते कुले क्लीबमहाबलौ।
फलाफलवती शाखे यथैकस्मिन्वनस्पतौ॥५।३।३

एकाच वृक्षावर ज्याप्रमाणें फलांनीं भरलेली व फलरहित अशा दोनहिप्रकारच्या खांद्या असतात, त्याप्रमाणें एकाच कुलांत अति बलिष्ठ व अत्यंत दुर्बल पुरुष जन्माला येतात.

१९९ एकस्मिन्नेव पुरुषे सा सा बुद्धिस्तदा तदा।
भवत्यकृतधर्मत्वात् सा तस्यैव न रोचते॥१०।३।१३

मनावर धर्माचा संस्कार झालेला नसल्यामुलें एकाच मनुष्याच्या ठिकाणीं समयानुरूप निरनिराले विचार उत्पन्न होतात, व पुढें ते त्याचे त्यालाच आवडतनासे होतात.

२०० एकान्ततो न विश्वासः कार्यो विश्वासघातकैः॥१२।१३९।२८

विश्वासघात करणाऱ्यांवर पूर्ण विश्वास टाकूं नये.

२०१ एकान्तेन हि विश्वासः कृत्स्नो धर्मार्थनाशकः।
अविश्वासश्च सर्वत्र मृत्युना च विशिष्यते॥१२।८०।१०

कोणावरहि सर्वथा विश्वास ठेविल्यानें धर्म व अर्थ यांचा नाश होतो. उलट, कोणाचाच विश्वास न धरणें हें मरणापेक्षां दुःखदायक होय.

२०२ एकान्तेन हि सर्वेषां न शक्यं तात रोचितुम्॥१२।८९।१९

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) बाबारे, (एकच व्यक्ति) सर्वांना सर्वथा आवडणें शक्य नाहीं.

२०३ एतज्ज्ञानं विदुर्विप्रा ध्रुवमिन्द्रियधारणम्॥५।६९।२०

खरोखर इंद्रियें ताब्यांत ठेवणें यालाच ज्ञाते पुरुष ज्ञान असें म्हणतात.

२०४ एतत्पृथिव्याममृतमेतच्चक्षुरनुत्तमम् ।
यद्ब्राह्मणमुखाच्छास्त्रमिह श्रुत्वा प्रवर्तते॥१३।३६।१०

ब्राह्मणाच्या तोंडून शास्त्रार्थ ऐकून त्याप्रमाणें वर्तन करणें हें पृथ्वीवरील अमृत होय, हेंच सर्वोत्कृष्ट दिव्य ज्ञान होय.

२०५ एतावानेव पुरुषः कृतं यस्मिन्न नश्यति॥१।१५७।१४

ज्याच्या ठिकाणीं केलेला उपकार व्यर्थ जात नाहीं तोच मनुष्य म्हणावयाचा.

२०६ एतावानेव पुरुषो यदमर्षीयदक्षमी॥५।१३३।३३

जो अपमान व अपकार सहन करीत नाहीं, तोच पुरुष.

२०७ ऐकगुण्यमनीहायामभावः कर्मणां फलम्।

अथ द्वैगुण्यमीहायां फलं भवति वा न वा॥५।१३५।२८

उद्योगरहित राहिलें असतां उद्योगानें प्राप्त होणारें जें फल त्याचा अभाव हा एकच प्रकार संभवतो. परंतु उद्योग करीत राहिलें असतां, फल प्राप्त होणें वन होणें असे दोन प्रकार संभवतात.

२०८ ऐश्वर्यमदमत्तो हि नापतित्वा विबुध्यते॥५।३४।५३

ऐश्वर्यमदानें धुंद झालेला मनुष्य ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्याशिवाय शुद्धीवर येत नाहीं.

२०९ कः कस्य चोपकुरुते कश्चकस्मै प्रयच्छति।
प्राणी करोत्ययं कर्म सर्वमात्मार्थमात्मना॥१२।२९२।१

कोण कोणावर उपकार करणार? आणि कोण कोणाला देणार? जो तो प्राणी सर्व कांहीं स्वतः करितां करीत असतो.

२१० कच्चिच्छारीरमाबाधमौषधैर्नियमेन वा।
मानसं वृद्धसेवाभिः सदा पार्थापकर्षसि॥२।५।८९1

(नारदमुनि विचारतात) वा युधिष्ठिरा, शारीरिक पीडा औषधानें व नियमित आचरणानें आणि मानसिक पीडा वृद्ध जनांची सेवा करून तूं नेहमीं दूर करितोस ना?

२११ कच्चित्कृतं विजानीषे कर्तारं च प्रशंससि।
सतां मध्ये महाराज सत्करोषि च पूजयन्॥२।५।११९

राजा, तूं केलेला उपकार स्मरतोस ना? आणि उपकारकर्त्याची प्रशंसा करितोस ना? त्याचप्रमाणेंचांगल्या लोकांसमोर त्याचा गौरव करून सत्कार करितोस ना ?

२१२ कच्चित्ते सर्वविद्यासु गुणतोऽर्चा प्रवर्तते॥२।५।९६

(हे राजा) तूं सर्व विद्यांचा त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें परामर्ष घेतोस ना ?

२१३ कच्चित्सहस्रैमूर्खाणामेकं क्रीणासि पण्डितम्।
पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्निःश्रेयसं परम्॥२।५।३५

हजारों मूर्ख देऊन त्यांच्या बद्दल एक पंडित तूं विकत घेतोस का ? कारण अडीअडचणीच्या प्रसंगीं पंडिताचा फार उपयोग होईल.

२१४ कच्चिद्द्वौ प्रथम यामौ रात्रेः सुप्त्वा विशांपते।
संचिन्तयसि धर्मार्थौयाम उत्थाय पश्चिमे॥२।५।८५

हे राजा, रात्रींच्या दुसऱ्या व तिसऱ्या ह्या दोन प्रहरांत झोप घेतोस ना? शेवटच्या (चौथ्या) प्रहरीं उठून तूं धर्मार्थाचें चिंतन करितोस ना?

२१५ कच्चिद्राष्ट्रे तडागानि पूर्णानि च बृहन्ति च
भागशो विनिविष्टानि न कृषिर्देवमातृका॥२।५।७७

(नारदमुनि युधिष्ठिराला विचारितात) तुझ्या राज्यांत पाण्यानें तुडुंब भरलेले मोठाले तलाव जागोजाग खोदलेले आहेत ना? शेती केवल पावसावर अवलंबून नाहीं ना?

२१६ कच्चिद्विद्याविनीतांश्च नराञ्ज्ञानविशारदान्।
यथार्हं गुणतश्चैव दानेनाभ्युपपद्यसे॥२।५।५३

विद्याविनयसंपन्न व कलाकुशल गुणी जनांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें व गुणाप्रमाणें पारितोषिकें देऊन त्यांचा गौरव करितोस ना?

२१७ कपाले यद्वदापः स्युः श्वदृतौ च यथा पयः।
आश्रयस्थानदोषेण वृत्तहीने तथा श्रुतम्॥१२।३६।४२

ज्याप्रमाणें मस्तकाच्या कवटींत ठेवलेलें पाणी किंवा कुत्र्याच्या कातड्याच्या पिशवींत घातलेलें दूध आश्रयस्थान वाईट असल्यामुलें दूषित होतें, त्याप्रमाणें आचारहीन मनुष्याचें ज्ञान व्यर्थ होतें.

२१८ करिष्यन्न प्रभाषेत कृतान्येव तु दर्शयेत्॥५।३८।१६

एकादी गोष्ट करण्याचें मनांत असतांच उगाच बोलूं नये. काय तें करूनच दाखवावें.

२१९ कर्णिनालीकनाराचान् निर्हरन्ति शरीरतः।
वाक्शल्यस्तु न निर्हर्तुं शक्यो हृदिशयो हि सः॥५।३४।७९

शरीरांत रुतलेले कर्णी, नालीक या प्रकारचे बाण उपटून काढतां येतात. परंतु वाग्बाण मात्र उपटून काढतां येत नाहीं कारण तो हृदयांत खोल शिरून बसलेला असतो.

२२० कर्तव्यमिति यत्कार्यं नाभिमानात्समाचरेत्॥३।२।७६

कर्तव्य म्हणून जें करावयाचें तें अहंकारबुद्धीनें करूं नये.

२२१ कर्मणा येन केनैव मृदुना दारुणेन च।
उद्धरेद्दीनमात्मानं समर्थो धर्ममाचरेत्॥१।१४०।७२

सौम्य किंवा तीव्र कोणत्याहि उपायानें प्रथमतः आपला हीन स्थितींतून उद्धार करावा; आणि समर्थ होऊन धर्माचरण करावें.

२२२ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥६।२६।४७

(अर्जुना,) फक्त कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, कर्मफलाच्या ठिकाणीं मुलींच नाहीं. (यासाठीं) तूं कर्मफलाची इच्छा करूं नकोस. तसेंच कर्म न करण्याचाहि आग्रह घरूं नको.

२२३ कर्मभूमिरियं ब्रह्मन् फलभूमिरसौ मता॥३।२६१।३५

(देवदूत मुगल मुनींना म्हणतो) हे ब्रह्मन्, मृत्युलोक ही कर्मभूमि असून परलोक ही फलभूमि आहे, असें म्हणतात.

२२४ कल्योत्थानरतिर्नित्यं गृहशुश्रूषणे रता।
सुसंमृष्टक्षया चैव गोशकृत्कृतलेपना॥१३।१४६।४८

(गृहिणीनें) सकालीं लवकर उठून दक्षतेनें घरकाम करावें. सर्व घर उत्तमप्रकारें झाडून स्वच्छ करावें. आणि गाईच्या शेणानें सारवून काढावें.

२२५ कश्चित्तरति काष्ठेन सुगम्भीरां महानदीम्।
स तारयति तत्काष्ठं स च काष्ठेन तार्यते॥१२।१३८।६२

एकादा प्राणी लाकडाच्या ओंड्याचा आश्रय करून अतिखोल व विस्तीर्ण नदी तरून जातो. (त्यासमयीं) तो त्या लाकडालानदीपार करतो, व लाकूडाह त्याला तारून नेतें.

२२६ कामक्रोधग्राहवतीं पञ्चेन्द्रियजलां नदीम्।
नावं धृतिमयीं कृत्वा जन्मदुर्गाणि संतर॥५।४०।२२

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) काम व क्रोध ह्या जिच्यांतील सुसरी आहेत. आणि चक्षुरादि पांच इंद्रियें हें जिच्यांतील उदक आहे, अशी ही संसाररूप नदी ज्ञानरूप नौकेचें अवलंबन करून जन्ममरणपरंपरारूप धोक्याचीं स्थलें चुकवून तरून जा.

२२७ कामचारी तु कामेन य इन्द्रियसुखे रतः।
ब्रह्मचारी सदैवैष य इन्द्रियजये रतः॥१४।२६।१५

विषयलालसेनें जो इंद्रियसुखांत गढून जातो तो कामचारी होय. जो सदैव इंद्रियांचेंदमन करण्यांत आनंद मानतो तो ब्रह्मचारी होय.

२२८ कामं नैतत्प्रशंसन्ति सन्तः स्वबलसंस्तवम्।
गुणसंकीर्तनं चापि स्वयमेव शतक्रतो॥१।३४।२

(गरूड म्हणतो) हे इंद्रा, स्वतःच्या बलाची स्तुति करणें आणि आपणच आपलें गुणवर्णन करणं हे सज्जनांना मुलींच प्रशस्त वाटत नाहीं

.

२२९ कामे प्रसक्तः पुरुषः किमकार्यं विवर्जयेत्॥१२।८८।२१

कामासक्त पुरुष कोणतें अकार्य वर्ज्य करील?

२३० काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः॥६।४२।२

(भगवान् श्रीकृष्ण सांगतात) सकाम कर्मांचा त्याग करणें यालाच ज्ञाते पुरुष संन्यास असें म्हणतात, आणि सर्व कर्मांच्या फलाचा म्हणजे फलाशेचा त्याग करणं यालाच शहाणे लोक त्याग म्हणतात.

२३१ कारणात्प्रियतामेति
द्वेष्यो भवति कारणात्।
अर्थार्थी जीवलोकोऽयं
न कश्चित्कस्यचित्प्रियः॥१२।१३८।१५२

कोणी झाला तरी कांहींतरी कारणानेंच प्रिय वाटतो, व कारणानेंच द्वेष्य वाटतो. हें जग सगलें स्वार्थी आहे. (खरोखर निष्कारण) कोणी कोणाला प्रिय नसतो.

२३२ कारणाद्धर्ममन्विच्छेन्न लोकचरितं चरेत्॥१२।२६२।५३

हेतूकडे लक्ष देऊन धर्माचरण करावें, केवल लोकांनीं केलें म्हणून आपणहि तसें करूं नये.

२३३ कार्यापेक्षा हि वर्तन्ते
भावस्निग्धाः सुदुर्लभाः॥१२।१११।८६

कार्याच्या अपेक्षेनेंच लोक प्रेमानें वागतात. खरोखर स्वभावतःच प्रेमल असे लोक अत्यंत दुर्लभ.

२३४ कालः कर्षति भूतानि सर्वाणि विविधान्युत।
न कालस्य प्रियः कश्चिन्न द्वेष्यः कुरुसत्तम॥११।२८

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे कुरुश्रेष्ठा, निरनिराल्या प्रकारच्या सर्व प्राण्यांना काल ओढून नेतो. कालाला कोणी प्रिय नाहीं, कोणी द्वेष्य नाहीं

.

२३५ कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः।
कालः सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः॥११।२।२४

काल प्राण्यांना शिजवून काढतो; काल प्रजेचा संहार करितो, सर्व प्राणी झोपी गेले असतां काल जागा राहतो.खरोखर कालाचें अतिक्रमण करणें कठीण आहे!

२३६ कालः पचति भूतानि सर्वाण्येवात्मनात्मनि।
यस्मिंस्तु पच्यते कालस्तं वेदेह न कश्चन॥१२।२३९।२५

कालस्वतः सर्व प्राण्यांना आपल्या पचनीं पाडतो, परंतु कालाला जो पचनीं पाडतो त्या परमात्म्याला कोणीच जाणत नाहीं.

२३७ कालमूलमिदं सर्वं भावाभावौ सुखासुखे॥१।१।२४७

जन्म आणि मृत्यु, सुख आणि दुःख हीं कालावर अवलंबून आहेत.

२३८ काले काले तु संप्राप्ते मृदुस्तीक्ष्णोऽपि वा भवेत्॥३।२८।२४

जसजशी वेल येईल त्याप्रमाणें सौम्य किंवा कठोर वृत्तीनें वागावें.

२३९ कालेन पादं लभते तथार्थं
ततश्च पादं गुरुयोगतश्च।
उत्साहयोगेन च पादमृच्छेत्
शास्त्रेण पादं च ततोऽभियाति॥५।४४।१६

प्रथमतः गुरूंपासून चतुर्थांश विद्या प्राप्त होते; नंतर आपल्या बुद्धिवैभवानें चतुर्थांश कालांतराने विचारपरिपक्कतेमुलें चतुर्थांश; आणि आपल्याबरोबरच्या लोकांशीं चर्चा केल्याचे योगानें (विचारविनिमयानें) चतुर्थांश विद्या प्राप्त होते. (या श्लोकांत पाठक्रमाहून अर्थक्रम भिन्न आहे असें टीकाकारांनी म्हटलें आहे त्याला अनुसरून वरील अर्थ दिला आहे.)

२४० कालेन रिपुणा संधिः काले मित्रेण विग्रहः।
कार्य इत्येव संधिज्ञाः प्राहुर्नित्यं नराधिप॥१२।१३८।२०८

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, प्रसंगानुसार शत्रूशींहि संधि करावा, मित्राशींहि विरोध करावा, असेंच संधिवेत्ते लोक सदैव सांगत असतात.

२४१ कालेनाभ्याहताः सर्वे कालो हि बलवत्तरः॥१२।२२७।५६

कालाने सर्वांना मारून टाकलें आहे. काल सर्वांना पुरून उरला आहे.

२४२ काले मृदुर्यो भवति काले भवति दारुणः।
प्रसाधयति कृत्यानि शत्रुं चाप्यधितिष्ठति॥१२।१४०।६७

योग्य वेलीं जो सौम्य होतो व योग्यवेलीं क्रूर होतो त्याची सर्व कार्ये सिद्धीस जातात आणि तोच शत्रूला आपल्या ताब्यांत ठेवितो.

२४३ काले हि समनुप्राप्ते त्यक्तव्यमपि जीवनम्॥५।९०।७७

तसाच प्रसंग पडला असतां जीविताचासुद्धां त्याग केला पाहिजे.

२४४ कालो न परिहार्यश्च न चास्यास्ति व्यतिक्रमः॥१२।२२७।९७

कालाला चुकवितां येणें शक्य नाहीं. तसेंच त्याचा प्रतिकारहिकरितां यावयाचा नाहीं.

२४५ कालोपहतचित्ता हि सर्वे मुह्यन्ति भारत॥९।६३।४७

(श्रीकृष्ण सांगतात) हे धृतराष्ट्रा, खरोखर कालानें बुद्धि ग्रासून टाकली असतां सर्वांना मोह पडत असतो.

२४६ कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम्।
इति ते संशयो माभूद्राजा कालस्य कारणम्॥१२।६९।७९

भीष्म युधिष्ठिराला म्हणतात काल राजाला कारण होतो का राजा कालाला कारण होतो, याविषयीं तूं संशयांत पडूं नको. राजा हाच कालाला कारण आहे.

२४७ कालो हि परमेश्वरः॥१३।१४८।३९

काल हा खरोखर परमेश्वरच आहे !

२४८ किंचिदेव ममत्वेन यदा भवति कल्पितम्।
तदेव परितापार्थं नाशे संपद्यते पुनः॥१२।२७६।८

एकाद्या वस्तूविषयीं ‘ही माझी’ अशी भावना धरिली, म्हणजे त्या वस्तूचा नाश झाला असतां तीच दुःखाला कारण होते.

२४९ किं तस्य तपसा राज्ञः किंच तस्याध्वरैरपि।
सुपालितप्रजो यः स्यात् सर्वधर्मविदेव सः॥१२।६९।७३

जो राजा प्रजेचें उत्तम प्रकारें पालन करितो तो सर्व धर्म जाणणाराच होय. अशा राजाला तप काय करावयाचें ? यज्ञांची तरी त्याला काय गरज?

२५० किं तु रोषान्वितो जन्तुर्हन्यादात्मानमप्युत॥७।१५६।९५

(संतप्त अश्वत्थामा म्हणतो) खरोखर क्रोधाविष्ट झालेला मनुष्य स्वतःचा देखील घात करील.

२५१ किं तैर्येऽनडुहोनोह्याः किं धेन्वा वाप्यदुग्धया।
वन्ध्यया भार्यया कोऽर्थः कोऽर्थो राज्ञाप्यरक्षता॥१२।७८।४१

जे वाहून नेण्याच्या कामीं येत नाहींत त्या वैलांचा काय उपयोग? किंवा दूध न देणारी गाय काय कामाची? वांझ स्त्री काय करावयाची? तसेंच, रक्षण न करणारा राजा पाहिजे कशाला ?

२५२ किं नु मे स्यादिदं कृत्वा किं नु मे स्यादकुर्वतः
इति कर्माणि संचिन्त्य कुर्याद्वा पुरुषो न वा॥५।३४।१९

हे केल्यानें माझा काय फायदा होईल, न केल्यानें काय तोटा होईल, असा विचार करून मग कोणतेंहि कार्य मनुष्यानें करावें अथवा करूं नये.

२५३ कीर्तिरक्षणमातिष्ठ कीर्तिर्हि परमं बलम्।
नष्टकीर्तेर्मनुष्यस्य जीवितं ह्यफलं स्मृतम्॥१।२०३।१०

(भीष्म म्हणतात हे दुर्योधना,) कीर्ति राखण्याकरितां झटून प्रयत्न कर. कारण, कीर्ति हें श्रेष्ठ प्रकारचें बल आहे. ज्याची कीर्ति नष्ट झाली त्या मनुष्याचें जिणें व्यर्थ गेलें.

२५४ कीर्तिर्हि पुरुषं लोके संजीवयति मातृवत्।
अकीर्तिर्जीवितं हन्ति जीवतोऽपि शरीरिणः॥३।३००।३२

कीर्ति ही मातेप्रमाणें मनुष्याला जगांत खरेंखुरें जीवन प्राप्त करून देते. अपकीर्ति जिवंत असलेल्या प्राण्याच्याहि जीविताचा नाश करिते.

२५५ कुतः कृतघ्नस्य यशः कुतः स्थानं कुतः सुखम्।
अश्रद्धेयः कृतघ्नो हि कृतने नास्ति निष्कृतिः॥१२।१७३।२०

कृतघ्न मनुष्याला यश कोठून येणार ? अधिकार कोठचा ? आणि सुख तरी कोठचें ? (अर्थात् त्याला यांपैकीं कांहींच मिलत नाहीं) कारण, कृतघ्न हा अविश्वसनीय बनलेला असतो. कृतघ्नाला प्रायश्चित्त नाहीं.

२५६ कुर्यात्कृष्णगतिः शेषं ज्वलितोऽनिलसारथिः।
न तु राजाभिपन्नस्य शेषं क्वचन विद्यते॥१२।६८।५०

वारा ज्याचा सहकारी आहे अशा प्रज्वलित अग्नीच्या तडाक्यांतून (कदाचित्) एखादी वस्तू दग्ध होण्याची राहून जाईल, परंतु राजानें ज्याच्यावर हल्ला केला त्याचें कांहींएक शिल्लक राहणार नाहीं.

२५७ कुर्यात्तृणमयं चापं शयीत मृगशायिकाम्।
अन्धःस्यादन्धवेलायां बाधिर्यमपि संश्रयेत॥१२।१४०।२७

(राजानें प्रसंगविशेषीं) आपलें धनुष्य तृणमय करावें. (गवताप्रमाणें निरुपयोगी आहे असें भासवावें) श्वापदांचा विश्वास बसण्यासाठीं झोपेचें सोंग घेणाऱ्या पारध्याप्रमाणें झोपेचा बहाणा करावा. अंध होण्याचा प्रसंग आल्यास अंधाप्रमाणें वागावें, व (बधिर होण्याचा प्रसंग आल्यास) बहिरेपणाचाहि आश्रय करावा.

२५८ कुलानि समुपेतानि गोभिः पुरुषतोऽर्थतः।
कुलसंख्यां न गच्छन्ति यानि हीनानि वृत्ततः॥५।३६।२८

गोधन, कर्तबगार पुरुष आणि द्रव्य यांच्या योगानें कुलांना मोठेपणा प्राप्त होत असतो. पण तीं आचारभ्रष्ट असली तर त्यांची गणना चांगल्या कुलांत होत नाहीं.

२५९ कुलीनस्य च या निन्दा वधो वाऽमित्रकर्शन।
महागुणो वधो राजन्न तु निन्दा कुजीविका॥५।७३।२४

(श्रीकृष्ण म्हणतात) हे शत्रुनाशका धर्मराजा, कुलीन पुरुषाची निंदा अथवा वध होण्याचा प्रसंग आला असतां त्याचा वध होणें फार बरें, जीवितच दुःखदायक करून टाकणारी निंदा बरी नव्हे.

२६० कृतज्ञेन सदा भाव्यं मित्रकामेन चैव ह॥१२।१७३।२२

मित्र जोडण्याची इच्छा करणारानें सदैव कृतज्ञ असावें.

२६१ कृतं ममाप्रियं तेन येनायं निहतो मृधे।
इति वाचा वदन्हन्तॄन् पूजयेत रहोगतः॥१२।१०२।३७

‘संग्रामांत ज्यानें या योद्ध्याचा वध केला असेल त्यानें माझें अप्रिय केलें’ असे उद्गार तोंडानें काढावे, आणि अंतस्थ रीतीनेंत्या शत्रूला ठार मारणाऱ्यांचा गौरव करावा.

२६२ कृतवैरे न विश्वासः कार्यस्त्विह सुहृद्यपि।
छन्नं संतिष्ठते वैरं गूढोऽग्निरिव दारुषु॥१२।१३९।४४

वैर करणारा मनुष्य जरी मूलचा मित्र असला तरी त्याजवर विश्वास ठेवूं नये. कारण, लाकडांत दडून राहिलेल्या अग्नीप्रमाणें वैर गुप्तपणें वसत असतें.

२६३ कृतार्था भुञ्जते दूताः
पूजां गृहन्ति चैव ह॥५।९१।१८

चांगले दूत कामगिरी पार पाडल्यावरच आराम करतात व सत्कार स्वीकारतात.

२६४ कृती सर्वत्र लभते प्रतिष्ठां भाग्यसंयुताम्।
अकृती लभते भ्रष्टः क्षते क्षारावसेचनम्॥१३।६।११

उद्योगी पुरुषाला वैभव प्राप्त होतें व त्याचा गौरव होतो. आलशी मनुष्य (वैभवापासून) भ्रष्ट होऊन, जखमेवर खारें पाणी शिंपडलें असतां होणाऱ्या दुःखाचा अनुभव घेतो.

२६५ कृपणं विलपन्नार्तो जरयाभिपरिग्लुतः।
म्रियते रुदतां मध्ये ज्ञातीनां न स पूरुषः॥९।५।३४

शरीर जरेनें व्यापलेलें आहे, व्याधिग्रस्त होऊन करुणपर्णे विलाप करितो आहे आणि आप्तस्वकीय भोवताली बसून रडत आहेत अशा स्थितींत जो मरण पावतो तो पुरुष नव्हे.

२६६ कृपणाः फलहेतवः॥६।२६।४९

कर्मफलाची इच्छा करणारे दीन होत.

२६७ के न हिंसन्ति जीवान्वै लोकेऽस्मिन्द्विजसत्तम।
बहु संचिन्त्य इति वै नास्ति कश्चिदहिंसकः॥३।२०८।३३

(धर्मव्याध म्हणतो) हे द्विजश्रेष्ठा, या मर्त्यलोकांत जीवांची हिंसा कोण करीत नाहींत? याविषयीं पुष्कल विचार केला असतां (असें दिसून येतें कीं) खरोखर मुलींच हिंसा न करणारा कोणीच नाहीं.

२६८ को हि जानाति कस्याद्य मृत्युकालो भविष्यति।
युवैव धर्मशीलः स्यादनित्यं खलु जीवितम्॥१२।१७५।१६

आज कोणाचा मरणदिवस आहे हें कोण जाणूं शकेल? (अर्थात् कोणीच नाहीं. या साठीं) मनुष्यानें तरुणपणींच धर्मपरायण व्हावें. कारण, जीवित हैं खरोखर क्षणभंगुर आहे.

२६९ को हि नाम पुमाँल्लोके मर्षयिष्यति सत्त्ववान्।
सपत्नानृध्यतो दृष्ट्वा हीनमात्मानमेव च॥२।४७।३२

आपल्या वैऱ्यांचा उत्कर्ष होत आहे, आणि आपण मात्र हीन स्थितींत आहों, असें पाहून खरोखर कोणता बाणेदार पुरुष तें सहन करील?

२७० कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति॥६।३३\।३१

(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, माझा भक्त कधींहि नाश पावत नाहीं हें तूं पक्कें समज.

२७१ क्रव्यादा अपि राजेन्द्र कृतघ्नं नोपभुञ्जते॥१२।१७२।२४

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे राजश्रेष्ठा, मांसभक्षक प्राणी सुद्धां कृतघ्नाला भक्षण करीत नाहींत.

२७२ क्लीवा हि वचनोत्तराः॥५।१६२।४४

नामर्द लोक नुसते बोलण्यांत शूर असतात.

२७३ क्लेशान्मुमुक्षुः परजात्स वै पुरुष उच्यते॥२।४९।१३

शत्रूकडून होणारी पीडा दूर करण्यास झटतो त्यालाच पुरुष म्हणावें.

२७४ क्षताद्भीतं विजानीयादुत्तमं मित्रलक्षणम्।
ये तस्य क्षतमिच्छन्ति ते तस्य रिपवः स्मृताः॥१२।८०।१९

(राजावर) येणाऱ्या संकटाची भीति वाटणें हें (राजाच्या) उत्तम मित्राचें लक्षण होय आणि जे त्याचा नाश इच्छितात ते त्या राजाचे शत्रुच होत.

२७५ क्षत्रधर्मं विदित्वाहं यदि ब्राह्मण्यमाश्रितः।
प्रकुर्यां सुमहत्कर्म न मे तत्साधुसंमतम्॥१०।३।२२

(अश्वत्थामा कृपाचार्यांस म्हणतो) क्षत्रियाचा धर्म जाणत असून जर मी ब्राह्मणधर्माला अनुसरून (शमदमादिक) मोठमोठीं साधनें करीत बसेन, तर तें माझें करणें सज्जनांना पसंत पडणार नाहीं.

२७६ क्षत्रियस्य मलं भैक्ष्यं ब्राह्मणस्यात्रतं मलम्॥८।४५।२३

भिक्षा मागणें हें क्षत्रियाला लांछन आहे, व्रतादिकांचा त्याग करणें हें ब्राह्मणाला लांछन आहे.

२७७ क्षत्रियस्य महाराज जये वृत्तिः समाहिता।
सवै धर्मस्वधर्मो वा स्ववृत्तौ का परीक्षणा॥२।५५।७

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे महाराजा, युद्धांत जय मिलविणें हा क्षत्रियाचा व्यवसाय ठरलेला आहे; मग त्यांत धर्म असो किंवा अधर्म असो. स्वतःच्या व्यवसायाची चिकित्सा करूनः काय फायदा ?

२७८ क्षत्रियस्य विशेषेण हृदयं वज्रसंनिभम्॥१२।२२।९

क्षत्रियाचें अंतःकरण विशेषेंकरून वज्रासारखें कठीण असलें पाहिजे.

२७९ क्षत्रियस्य सदा धर्मो नान्यः शत्रुनिबर्हणात्॥४॥२१॥४३

सदोदित शत्रूचें पारिपत्य करणें याशिवाय क्षत्रियाचा दुसरा धर्म नाहीं.

२८० क्षत्रियस्य हि धर्मोऽयं हन्याद्धन्येत वा पुनः॥७।१९७।३८.

एक तर मारावें, नाहीं तर मरून जावें हाच क्षत्रियाचा धर्म.

२८१ क्षत्रियस्यातिवृत्तस्य ब्राह्मणेषु विशेषतः।
ब्रह्मैव संनियन्तृ स्यात्क्षत्रं हि ब्रह्मसंभवम्॥१२।७८।२१

क्षत्रिय जर आपला धर्म सोडून विशेषतः ब्राह्मणावर अत्याचार करूं लागेल, तर ब्राह्मणच त्याचें नियमन करील. कारण, क्षत्रिय हा ब्राह्मणापासून उत्पन्न झालेला आहे.

२८२ क्षत्रियाणां बलं तेजो ब्राह्मणानां क्षमा बलम्॥१।१७५।२९

क्षत्रियांचें बल पराक्रम. ब्राह्मणांचें बल क्षमा.

२८३ क्षत्रियो बाहुवीर्यस्तु न तथा वाक्यवीर्यवान्॥२।२१।५१

क्षत्रियाचें सामर्थ्य बाहूंमध्येच असतें तें भाषण करण्यांत नसतें.

२८४ क्षममाणं नृपं नित्यं नीचः परिभवेज्जनः।
हस्तियन्ता गजस्येव शिर एवारुरुक्षति॥१२।५६।३९

राजा सदैव अपराधाची क्षमा करूं लागला, म्हणजे निकृष्ट प्रतीचे लोकसुद्धां त्याची अवज्ञा करूं लागतात. (इतकेंच नव्हे तर) हत्तीच्या मस्तकावर आरोहण करणाऱ्या महाताप्रमाणें ते त्याच्या डोक्यावर बसण्याची इच्छा करूं लागतात.

२८५ क्षमा गुणो ह्यशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा॥५।३३।५४

क्षमा हा दुर्बलांचा गुण, व समर्थांचें भूषण होय.

२८६ क्षमा प्रशस्यते लोके
न तु पापोऽर्हति क्षमाम्॥७।१९८।२६

क्षमा करणें ही गोष्ट लोकांत चांगली समजली जाते. तरी पण पापी मनुष्य क्षमेला पात्र नाहीं.

२८७ क्षमावन्तं हि पापात्मा
जितोऽयमिति मन्यते॥७।१९८।२७

क्षमा करणाऱ्याविषयीं दुष्ट मनुष्याला वाटतें कीं आपण याला जिंकलें.

२८८ क्षमावान्निरमर्षश्च नैव स्त्री न पुनः पुमान्॥५।१३३।३३

जो अपमान सहन करतो, ज्याला राग येत नाहीं तो स्त्रीहि नव्हे, आणि पुरुष तर तो नव्हेच नव्हे !

२८९ क्षात्रो धर्मो ह्यादिदेवात्प्रवृत्तः
पश्चादन्ये शेषभूताच धर्माः॥१२।६४।२१

ब्रह्मदेवापासून क्षात्रधर्म हाच प्रथम उत्पन्न झाला, व नंतर दुसरे धर्म निर्माण झाले असून ते सर्व त्याचे अंगभूत आहेत.

२९० क्षिप्रं विजानाति चिरं शृणोति
विज्ञाय चार्थं भजते न कामात्।
नासंपृष्टो व्युपयुङ्केपरार्थे
तत्प्रज्ञानं प्रथमं पण्डितस्य॥५।३३।२७

सांगितलेलें चटकन् समजणें, दुसऱ्याचें म्हणणेंपुरेसा वेल ऐकून घेणें, इच्छेची पर्वा न करतां विचार करून कोणतीहि गोष्ट हातीं घेणें आणि कोणी विचारिल्यावांचून दुसऱ्याच्या कामांत न पडणें, हें पंडिताचें मुख्य लक्षण होय.

२९१ क्षुधा निर्णुदति प्रज्ञां धर्मबुद्धि व्यपोहति।
क्षुधापरिगतज्ञानो धृतिं त्यजति चैव ह॥१४।९०।१९१

क्षुधा ही बुद्धिभ्रंश करते, आणि क्षुधेच्या योगानें मनुष्याचें ज्ञान पार नाहींसें होऊन त्याचें धैर्य गलून जातें.

२९२ क्षेत्रं पुरुषकारस्तु दैवं बीजमुदाहृतम्।
क्षेत्रबीजसमायोगात्ततः सस्यं समृध्यते॥१३।६।८

उद्योग हैं शेत व देव है वीं आहे (उद्योगरूप) शेत व (देवरूप) बीं यांचा संयोग झाला म्हणजे उत्तम प्रकारचें (यशोरूपी) पीक येतें.

२९३ खरीवात्सल्यमाहुस्तन्निःसामर्थ्यमहेतुकम्॥५।१३५।८

जें निष्कारण आणि निरुपयोगी वात्सल्य त्याला गाढवीचें प्रेम म्हणतात.

२९४ गतोदके सेतुबन्धो यादृक्तादृङ्मतिस्तव।
संदीप्ते भवने यद्वत्कूपस्य खननं तथा॥६।४९।२३

(पांडवांशीं युद्धाचा प्रसंग आणूं नको, म्हणून मीं दुर्योधनाला परोपरीनें सांगितलें असें धृतराष्ट्रानें म्हटलें त्यावर संजयाने दिलेलें हें उत्तर आहे) पाणी वाहून गेल्यावर बंधारा बांधावा, किंवा घराला आग लावल्यावर विहीर खणूं लागावें त्यासारखा हा तुझा बिचार आहे.

२९५ गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रसंग्रहैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता॥६।४३।१

एकट्या गीतेचें चांगलें अध्ययन करावें. इतर भाराभर शास्त्रांची गीतेपुढें काय मातब्बरी? गीता ही प्रत्यक्ष पद्मनाभ जो परमात्मा श्रीकृष्ण त्याच्या मुखकमलांतून बाहेर पडलेली आहे.

२९६ गुणयुक्तेऽपि नैकस्मिन्विश्वसेत विचक्षणः॥१२।२४।१८

गुणसंपन्न अशाहि एकट्या मनुष्यावर शहाण्यानें विश्वास ठेवू नये.

२९७ गुणानामेव वक्तारः सन्तः सत्सु नराधिप॥१२।१३२।१३

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) सज्जन हे सज्जनांचे ठिकाणी असलेले गुण तेवढेच सांगत असतात.

२९८ गुणान्गुणवतां शल्य गुणवान्वेत्ति नागुणः॥८।४०।२

(कर्ण म्हणतो) हेशल्या, गुणवान् लोकांच्या गुणांची पारख स्वतः गुणी असलेल्यालाच होत असते; गुणहीन असलेल्याला होत नाहीं.

२९९ गुणाश्च षण्मितभुक्तं भजन्ते
आरोग्यमायुश्च बलं सुखं च।
अनाविलं चास्य भवत्यपत्यं
न चैनमाद्यून इति क्षिपन्ति॥५।३७।३४

मिताहार करणाराला सहा गुण प्राप्त होतात. आरोग्य, (दीर्घ) आयुष्य बल व सुख हीं त्याला मिलतात. त्याची संतति निरोगी असते आणि ‘खादाड आहे’ असा आक्षेप त्यावर कोणी घेत नाहींत.

३०० गुरुरात्मवतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम्।
अथ प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः॥५।३५।७१

सुष्टांचा शास्ता गुरु, आणि दुष्टांना शासन करणारा राजा होय. परंतु चोरून पापें करणाऱ्यांना शिक्षा करणारा विवस्वानाचा पुत्र यम हाच होय.

३०१ गुरुलाघवमादाय धर्माधर्मविनिश्चये।
तो भूयांस्ततो राजन्कुरुष्व धर्मनिश्चयम्॥३।१३१।१३

(ससाण्याच्या रूपानें आलेला इंद्र शिबिराजाला म्हणतो) हे राजा, धर्म कोणता व अधर्म कोणता, याचा निर्णय करितांना तारतम्य पाहून त्यांतल्या त्यांत जो अधिक श्रेयस्कर दिसेल तोच धर्म, असें निश्चित समज.

३०२ गुरुशुश्रूषया ज्ञानं शान्तिं योगेन विन्दति॥५।३६।५२

गुरुशुश्रूषेनं ज्ञान आणि योगानें शांति मिलते.

३०३ गुरूणामवमानो हि वध इत्यभिधीयते॥८।७०।५१

गुरुजनांचा अपमान करणें म्हणजे त्यांचा वधच करणें होय !

३०४ गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः।
उत्पथप्रतिपन्नस्य न्याय्यं भवति शासनम्॥१।१४०।५४

गर्वानें फुगून गेलेला, कार्य कोणतें अकाय कोणतें हैं न जाणणारा, व दुर्मार्गानें चालणारा गुरु जरी असला तरी त्याला शिक्षा करणें न्याय्य आहे.

३०५ गृध्रदृष्टिर्वकालीनः श्वचेष्टः सिंहविक्रमः।
अनुद्विग्नः काकशङ्की भुजङ्गचरितं चरेत्॥१२।१४०।६२

(कार्यसाधु पुरुषानें) खिन्न होऊन न बसतां, गिधाडासारखी दूरदृष्टि ठेवावी, बगल्याप्रमाणें निश्चल रहावें, कुत्र्यासारखें सावध असावें, सिंहासारखा पराक्रम गाजवावा, कावल्याप्रमाणें साशंक असावें, व सर्पासारखें वर्तन ठेवावें. (सर्प जसा आयत्या बिलांत शिरतो, त्याप्रमाणे शत्रूच्या साधनांचा उपयोग करून घ्यावा.)

३०६ गृहस्थस्त्वेष धर्माणां सर्वेषां मूलमुच्यते॥१२।२३४।६

गृहस्थाश्रमी पुरुष हा सर्व धर्मांचा मूल आधार आहे.

३०७ गौरवेण परित्यक्तं निःस्नेहं परिवर्जयेत्।
सोदर्यं भ्रातरमपि किमुतान्यं पृथग्जनम्॥१२।२९२।२

सख्खा भाऊ जरी असला तरी त्याचें पूर्वीचें महत्त्व जाऊन तो शुष्क पडला, त्याचें द्रव्य संपलें म्हणजे इतर बांधव त्याच्या वाऱ्यासही उभे रहात नाहींत. मग इतर सामान्य लोकांची गोष्ट कशाला?

३०८ ग्रस्यतेऽकर्मशीलस्तु सदानर्थैरकिंचनः१२।१३९।८

उद्योग न करणाऱ्या दरिद्री मनुष्यावर संकटें नेहमीं कोसलतः असतात.

३०९ चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्॥६।३०।३४

(अर्जुन म्हणतो) हे श्रीकृष्णा, मन हें चंचल, (इंद्रियांना.विषयांकडे) जबरदस्तीनें ओढून नेणारें बलिष्ठ आणि दृढ आहे. त्याचा निग्रह करणें हें वाऱ्याची मोट बांधण्याप्रमाणें मला अत्यंत कठीण वाटतें.

३१० चण्डालत्वेऽपि मानुष्यं
सर्वथा तात शोभनम्॥१२।२९७।३१

(पराशर मुनि जनक राजाला म्हणतात) बाबारे, चांडालयोनींत कां होईना, पण मनुष्याचा जन्म येणें हें सर्वात उत्तम.

३११ चतुर्वेदोऽपि दुर्वृत्तः स शूद्रादतिरिच्यते॥३।३१३।१११

चारी वेद पढलेला असला तरी दुर्वर्तनी असेल तर तो शूद्रापेक्षांहि कनिष्ठ समजावा.

३१२ चत्वारि यस्य द्वाराणि सुगुप्तान्यमरोत्तमाः।
उपस्थमुदरं हस्तौ वाक्चतुर्थी स धर्मवित्॥१२।२९९।२८

(हंसरूपानें आलेला ब्रह्मदेव म्हणतो) देव हो, उपस्थ, उदर, हात व चवथी वाणी हीं चार द्वारें जो दाबांत ठेवितो तो धर्म जाणणारा होय.

३१३ चराणामचरा ह्यन्नमदंष्ट्रा दंष्ट्रिणामपि।
आपः पिपासतामन्नमन्नं शूरस्य कातराः॥१२।९९।१५

स्थावर पदार्थ है जंगम प्राण्यांचें अन्न होय. तसेंच दाढा नसलेले प्राणी दाढा असलेल्यांचे अन्न. पाणी हें तहानेलेल्यांचें अन्न. तसेंच भित्रे लोक शूराचें भक्ष्य होत.

३१४ चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः॥६।२८।१३

(भगवान् श्रीकृष्ण म्हणतात) गुण आणि कर्म यांच्या अनुरोधानें चातुर्वर्ण्य मींच उत्पन्न केलें.

३१५ चारैः पश्यन्ति राजानः॥५।३४।३४

राजे लोक हेरांच्या द्वारें पहात असतात.

३१६ चिरं ह्यपि जडः शूरः पण्डितं पर्युपास्य ह।
न स धर्मान्विजानाति दर्वी सूपरसानिव॥१०।५।३

जो बुद्धीचा जड तो धिमेपणानें फार दिवस जरी एकाद्या पंडिताजवल राहिला तरी, पक्वान्नांतील पलीला पक्वान्नाची गोडी जशी कलत नाहीं, तसा त्याला धर्मतत्त्वांचा बोध म्हणून होत नाहीं !

३१७ जरामृत्यू हि भूतानां खादितारौ वृकाविव।
बलिनां दुर्बलानां च ह्रस्वानां महतामपि॥१२।२८।१४

सबल दुर्बल, लहान थोर सर्व प्राण्यांना जरा व मरणा हीं लांडग्याप्रमाणे खाऊन टाकितात.

३१८ जरा रूपं हरति हि धैर्यमाशा
मृत्युः प्राणान्धर्मचर्यामसूया।
क्रोधः श्रियं शीलमनार्यसेवा
हियं कामः सर्वमेवाभिमानः॥५।३५।५०

वार्धक्य रूपाचा नाश करतें; आशा धैर्याचा, मृत्यु प्राणांचा, मत्सर धर्माचरणाचा, कोध लक्ष्मीचा, दुर्जनसेवा शीलाचा, विषयेच्छा लज्जेचा, आणि अभिमान सर्वस्वाचा नाश करितो.

३१९ जलौकावत्पिबेद्राष्ट्रं मृदुनैव नराधिपः।
व्याघ्रीव च हरेत्पुत्रान् संदशेन्न च पीडयेत्॥१२।८८।५

एकाद्या जलूप्रमाणें राजानें सौम्यपणानेंच राष्ट्रांतील द्रव्य कराच्या रूपानें घ्यावें. वाघीण जशी पिलांना आपले दांत लागूं न देतां उचलून नेते, त्याप्रमाणें प्रजेला त्रास न होईल अशा बेतानें तिजपासून कर घ्याया.

३२० जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि॥६।२६।२७

(श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना,) जन्मास आलेल्याला मरण ठेवलेलेंच आहे; तसेंच मेलेल्याला पुनः जन्म ठेवलेलाच. यासाठीं, या अपरिहार्य असलेल्या गोष्टीबद्दल शोक करणें तुला शोभत नाहीं.

३२१ जिता सभा वस्त्रवता मिष्टाशा गोमता जिता।
अध्वा जितो यानवता सर्वं शीलवता जितम्॥५।३४।४७

चांगली वस्त्रें परिधान करणाऱ्याला सभेमध्यें मान मिलतो. गाई बालगणाच्या मनुष्याची मिष्टान्न खाण्याची हौस सिद्धीस जाते. ज्याच्यापाशीं वाहन असतें त्याला मार्ग सहज आक्रमण करतां येतो. आणि शीलवान पुरुषाचें सर्वच कांहीं सिद्धीस जातें.

३२२ जीर्णमन्नं प्रशंसन्ति भार्यां च गतयौवनाम्।
शूरं विजितसंग्रामं गतपारं तपस्विनम्॥५।३५।६९

खाल्लेल्या अन्नाची प्रशंसा तें पचल्यावर करावी. तसेंच स्त्रीची तारुण्य उलटून गेल्यावर, शूराची लढाई जिंकल्यावर, आणि तपस्व्याची तपःसमाप्तीनंतर प्रशंसा करावी.

३२३ जीर्यन्ति जीर्यतः केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यतः।
चक्षुःश्रोत्रे च जीर्येते तृष्णैका न तु जीर्यते॥१३।७।२४

वार्धक्यानें शरीर जर्जर झालें म्हणजे केस जीर्ण होतात, दांत जीर्ण होतात, डोले आणि कानहि जीर्ण होतात, परंतु एकटी तृष्णा (लोभ) मात्र जीर्ण होत नाहीं !

३२४ जीवन्भद्राणि पश्यति॥४।३८।४२

कोणी झाला तरी आधीं जगेल तेव्हां मग चांगले दिवस पाहणार !

३२५ ज्ञातयो वर्धनीयास्तैर्य इच्छन्त्यात्मनः शुभम्॥५।३९।१८

स्वतःचें कल्याण व्हावें असें जे इच्छितात त्यांनीं अगोदर आपल्या आप्तेष्टांचा उत्कर्ष करावा.

३२६ ज्ञानं तत्त्वार्थसंबोधः॥३।३१३।९०

ज्ञान म्हणजे आत्मतत्त्वाचा सम्यक् बोध होणें.

३२७ ज्यायांसमपिचेद्वृद्धं गुणैरपि समन्वितम्।
आततायिनमायान्तं हन्याद् घातकमात्मनः॥६।१०७।१०१

मारण्याच्या इच्छेनें आपल्या आंगावर धावून येणारा आतयायी मनुष्य वयानें मोठा असला, किंबहुना वृद्ध असला, आणि गुणसंपन्न जरी असला तरी त्यास ठार करावें.

३२८ तदा स वृद्धो भवति तदा भवति दुःखितः।
तदा शून्यं जगत्तस्य यदा मात्रा वियुज्यते॥१२।२६६।३०

ज्यावेलीं मनुष्याला मातेचा वियोग होतो त्यावेलींच तो खरा वृद्ध होतो, त्यावेलींच तो खरा दुःखी होतो आणि त्यावेलींच त्याला सर्व जग शून्य वाटतें !

३२९ तदेवासनमन्विच्छेद्यत्र नाभिपतेत्परः॥४।४।१३

ज्या ठिकाणीं दुसरा कोणी येणार नाहीं (व ऊठ म्हणून म्हणणार नाहीं) अशीच जागा शोधून काढावी.

३३० तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥६।२८।३४

(श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना,) प्रणाम केल्यानें, परोपरीनें प्रश्न विचारल्यानें आणि सेवा केल्यानें तत्त्वद्रष्टे ज्ञानी लोक तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील असें समज.

३३१ तपः श्रुतं च योनिश्चाप्येतद्ब्राह्मण्यकारणम्।
त्रिभिर्गुणैः समुदितस्ततो भवति वै द्विजः॥१३।१२१।७

तप, वेदाध्ययन व ब्राह्मणकुलांत जन्म यांच्या योगानें ब्राह्मण्य प्राप्त होतें. या तीन गुणांनीं युक्त असेल तरच तो द्विज या संज्ञेला पात्र होतो.

३३२ तपसा प्राप्यते स्वर्गस्तपसा प्राप्यते यशः।
आयुः प्रकर्षो भोगाश्चलभ्यन्ते तपसा विभो॥१३।५७।८

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, तपानें स्वर्ग मिलतो, तपानें यश प्राप्त होतें. आयुष्य, वैभव आणि सर्वप्रकारच्या उपभोग्य वस्तु तपानें प्राप्त होतात

.

३३३ तपसा विन्दते महत्॥३।३१३।४८

तपाच्या योगानें मनुष्य महत्पदाला पोंचतो.

३३४ तपः स्वधर्मवर्तित्वम्॥३।३१३।८८

तप म्हणजे स्वधर्माप्रमाणें वागणें.

३३५ तपोर्थीयं ब्राह्मणी धत्त गर्भं
गौर्वोढारं धावितारं तुरङ्गी।
शूद्रा दासं पशुपालं च वैश्या
वधार्थीयं क्षत्रिया राजपुत्री॥११।२६।५

ब्राह्मणस्त्री गर्भ धारण करते तो त्यानें (जन्माला येऊन) तप करावें म्हणून, गाईनें ओझी वाहणारा, घोडीनें धावणारा, शूद्रस्त्रीनें दास्यकर्म करणारा, वैश्य स्त्रीनें गुरें राखणारा आणि क्षत्रिय राजकन्येनेंयुद्धांतमारणारा किंवा मरणारा, गर्भ धारण केलेला असतो.

३३६ तरसा ये न शक्यन्ते शस्त्रैः सुनिशितैरपि।
साम्ना तेऽपि निगृह्यन्ते गजा इव करेणुभिः॥१२।१३९।३९

जबरदस्तीनें अथवा अत्यंत तीक्ष्ण शस्त्रांच्या योगानेंहि ज्यांना दाबांत ठेवितां येत नाहीं ते सुद्धां, हत्ती हत्तिणोंना वश होतात त्याप्रमाणें, सामोपचारानें वश करितां येतात.

३३७ तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना
नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां
महाजनो येन गतः स पन्थाः॥३।३१३।११७

(धर्मतत्त्वांचा विचार करूं लागलें असतां) युक्तिवाद लंगडा पडतो, श्रुतिवाक्यें पहावीं तर तीं निरनिराल्या प्रकारचीं आहेत, ज्याचें मत सर्वांना प्रमाण आहे असा एकहि ऋषि आढलून येत नाहीं. तात्पर्य, धर्माचेंतत्त्व गुहेंत दडलेलें आहे. (म्हणजे अत्यंत गूढ आहे) अशा स्थितींत, थोर लोक ज्या मार्गानें गेले तोच मार्ग उत्तम.

३३८ तस्माच्छास्त्रंप्रमाणं ते
कार्याकार्यव्यवस्थितौ॥६।४०।२४

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) कार्य कोणतें, अकार्य कोणतें याचा निर्णय करण्याच्या कामीं तुला शास्त्रच प्रमाण मानिलें पाहिजे.

३३९ तृणानि भूमिरुदकं वाक्चतुर्थी च सूनृता।
सतामेतानि गेहेषु नोच्छिद्यन्ते कदाचन॥५।३६\।३४

गवताचें आसन, स्वच्छ जागा, पाणी आणि चौथें सत्य व प्रिय भाषण या चार गोष्टींची तरी सज्जनांच्या घरीं केव्हांहि वाण पडत नाहीं. (या चार वस्तू अतिथिसत्कारासाठींनेहमीं सिद्ध असतात)

३४० तेजसोर्हि द्वयोर्देवाः सख्यं वै भविता कथम्॥५।१०।२२

(‘तूं इंद्राशी सख्य कर’ असें सांगण्याकरितां आलेल्या देवांना वृत्रासुर म्हणतो) देवहो, दोन तेजस्वी पुरुषांचें सख्य कसें व्हावयाचें ?

३४१ त्यजन्ति दारान्पुत्रांश्च
मनुष्याः परिपूजिताः॥१२।९१।५३

मनुष्यांचा बहुमान केला म्हणजे ते आपल्या स्त्रीपुत्रांचाहि त्याग करण्यास तयार होतात.

३४२ त्यजेत्कुलार्थे पुरुषं ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत्।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत्॥५।३७।१७

(प्रसंग पडल्यास) कुलाच्या रक्षणाकरितां कुलांतील एका मनुष्याचा त्याग करावा. सबंध ग्रामाकरितां एका कुलाची पर्वा करूं नये. देशाकरितां एका गांवावरहि उदक सोडावें. आणि आत्मकल्याणाकरितां सर्व पृथ्वीचाहि त्याग करावा.

३४३ त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयंत्यजेत्॥६।४०।२१

काम, क्रोध व लोभ असें तीन प्रकारचें नरकाचें द्वार असून तें आत्मनाश करणारें आहे. तस्मात् या तिहींचाही त्याग करावा.

३४४ त्रीण्येव तु पदान्याहुः पुरुषस्योत्तमं व्रतम्।
न द्रुह्येच्चैव दद्याच्च सत्यं चैव परं वदेत्॥१३।१२०।१०

तीनच गोष्टींना पुरुषाचें उत्तम व्रत असें म्हटलें आहे. त्या म्हणजे, मत्सर करूं नये, दान करावें, आणि श्रेष्ठ असें सत्यच बोलावें.

३४५ त्वमित्युक्तो हि निहतो गुरुर्भवति भारत॥८।६९।८३

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) गुरूला ‘तूं’ असें संबोधिलें म्हणजे त्याचा वध केल्यासारखेंच झालें.

३४६ दण्ड एव हि राजेन्द्र क्षत्रधर्मो न मुण्डनम्॥१२।२३।४७

(व्यासमुनि युधिष्ठिराला म्हणतात) दंडन हाच क्षत्रियाचा धर्म आहे; मुंडन नव्हे.

३४७ दण्डनीत्यां यदा राजा सम्यक्कात्स्र्त्स्न्येन वर्तते।
तदा कृतयुगं नाम कालसृष्टं प्रवर्तते॥१२।६९।८०

जेव्हां राजा योग्य रीतीनें आणि पूर्णपणें दंडनीतीच्या अनुरोधानें चालतो, तेव्हां कालनिर्मित अशा कृतयुगाची प्रवृत्ति होते.

३४८ दण्डश्चेन्न भवेल्लोकेविनश्येयुरिमाः प्रजाः।
जले मत्स्यानिवाभक्ष्यन् दुर्बलान्बलवत्तराः॥१२।१५।३०

जगांत जर दंड नसता तर प्रजा नाश पावल्या असत्या. पाण्यांतील माशांप्रमाणें बलवत्तर लोकांनीं दुर्बलांना खाऊन टाकलें असतें.

३४९ दण्डः शास्ति प्रजाः सर्वा दण्ड एवाभिरक्षति।
दण्डः सुतेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधाः॥१२।१५।२

दंड हाच सर्व प्रजेला वलण लावतो. दंडच सर्वांचें रक्षण करतो. सर्व लोक झोपीं गेले तरी दंड जागा राहतो. म्हणूनच दंड हाच धर्म आहे असें ज्ञानी लोक समजतात.

३५० दण्डस्यैव भयादेके न खादन्ति परस्परम्।
अन्धे तमसि मज्जेयुर्यदि दण्डो न पालयेत्॥१२।१५।७

दंडाच्याच भीतीमुलें कांहीं प्राणी परस्परांना खाऊन टाकीत नाहींत. जर दंडशक्तीनें लोकांचें रक्षण केलें नाहीं तर ते घोर अंधकारांत बुडून जातील.

३५१ दत्तभुक्तफलं धनम्॥५।३९।६७

दान करणें व भोग्य वस्तूचा उपभोग घेणें हें धनाचें फल होय.

३५२ दया सर्वसुखैषित्वम्॥३।३१३।९०

दया म्हणजे सर्वांना सुख व्हावें अशी इच्छा.

३५३ दर्पो नाम श्रियः पुत्रो
जज्ञेऽधर्मादिति श्रुतिः॥१२।९०।२६

दर्प हा लक्ष्मीचा पुत्र आहे; तो तिला अधर्मापासून झाला असें ऐकण्यांत येतें.

३५४ दाक्ष्यमेकपदं धर्म्यं दानमेकपदं यशः।
सत्यमेकपदं स्वर्ग्यंं शीलमेकपदं सुखम्॥३।३१३।७०

दक्षता हेंच धर्माचें मुख्य कारण होय. दान हेंच यशःप्राप्तीचें मुख्य साधन होय. सत्य हेंच स्वर्गप्राप्तीचें मुख्य साधन होय. आणि शील हेंच सुखाचें मुख्य निधान होय.

३५५ दानपथ्यौदनो जन्तुः स्वकर्मफलमश्रुते॥१२।२९८।३९

दान हेंच मनुष्याला परलोकींच्या मार्गांत शिदोरीप्रमाणें उपयोगी पडतें. प्राण्याला स्वतःच्याच कर्माचें फल मिलत असतें.

३५६ दानमेव हि सर्वत्र सान्त्वेनानभिजल्पितम्।
न प्रीणयति भूतानि निर्व्यञ्जनमिवाशनम्॥१२।८४।७

दान झालें तरी गोड शब्द बोलून केलें नाहीं, तर तें, तोंडीं लावण्यावांचून दिलेल्या भोजनाप्रमाणें लोकांच्या मनाला आनंद देत नाहीं.

३५७ दानं मित्रं मरिष्यतः॥३।३१३।६४

दान हा मरणोन्मुख झालेल्याचा मित्र होय.

३५८ दाने तपसि सत्ये च यस्य नोच्चरितं यशः।
विद्यायामर्थलाभे वा मातुरुच्चार एव सः॥५।१३३।२४

दान, तप, सत्यभाषण, विद्या किंवा संपत्ति यांपैकीं कोणत्याहि बाबतींत ज्याची कीर्ति कोणी गात नाहीं तो आपल्या मातेचा केवल मलोत्सर्ग होय. (म्हणजे त्याच्या जन्माच्या रूपानें त्याच्या आईनें केवल आपल्या पोटांतील घाण बाहेर टाकली)

३५९दान्तस्य किमरण्येन तथाऽदान्तस्य भारत।
यत्रैव निवसेद्दान्तस्तदरण्यं स चाश्रमः॥१२।१६०।३६

(भीष्म युधिष्ठिराला म्हणता) इंद्रियें स्वाधीन असल्यावर अरण्यांत जाण्याची गरज काय? व नसल्यावर जाऊन उपयोग काय? जितेंद्रिय पुरुष ज्या ठिकाणीं वास्तव्य करील तेंच त्याचें अरण्य व तोच त्याचा आश्रम.

३६० दारिद्र्यमिति यत्प्रोक्तं पर्यायमरणं हि तत्॥५।१३४।१३

दारिद्र्य म्हणून जो शब्द आहे त्यालाच पर्याय शब्द मरण असा आहे.

३६१ दुरन्वयं दुष्प्रधर्षं दुरापं दुरतिक्रमम्।
सर्वं वै तपसाभ्येति तपो हि बलवत्तरम्॥१३।१२२।८

दुस्तर, अजिंक्य, प्राप्त होण्यास कठीण, अनुल्लंघनीय असें सर्व कांहीं तपाच्या योगानें साध्य होतें. खरोखर तप हेंअत्यंत सामर्थ्यवान आहे

.

३६२ दुर्वसं चैव कौरव्य जानता राजवेश्मनि॥४।४।११

(धौम्यमुनि युधिष्ठिराला म्हणतात) हे कुरुकुलोत्पन्ना, राजगृहीं वास्तव्य करणें हैं ज्ञात्या मनुष्यालाहि कठीण जाते.

३६३ दूताः किमपराध्यन्ते
यथोक्तस्यानुभाषिणः॥५।१६२।३९

सांगितलेला निरोप कलविणाऱ्या दूतांचा तसें करण्यांत काय बरें अपराध आहे ?

३६४ देशकालौ समासाद्य विक्रमेत विचक्षणः।
देशकालव्यतीतो हि विक्रमो निष्फलो भवेत्॥१२।१४०।२८

देशकालांची अनुकूलता पाहून शहाण्यानें पराक्रम गाजवावा. कारण योग्य देश आणि योग्य काल निघून गेल्यावर केलेला पराक्रम निष्फल होतो.

३६५ दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता॥६।४०।५

दैवी संपत्ति मोक्षाला, व आसुरी संपत्ति बंधनाला, कारणीभूत होते.

३६६ दौष्कुलेयाश्च लुब्धाश्च नृशंसा निरपत्रपाः।
त्वां तात निषेवेयुर्यावदाकपाणयः॥१२।८३।७

(भीष्म सांगतात) बा युधिष्ठिरा, हलक्या कुलांत जन्मलेले, लोभी, दुष्ट निर्लज्ज असे जे लोक आहेत, ते त्यांचा हात ओला होत आहे (अर्थात् त्यांना द्रव्यादिक पोंचत आहे) तोंपर्यंतच तुझी सेवा करितील.

३६७ द्रव्यागमो नृणां सूक्ष्मः पात्रे दानं ततः परम्।
कालः परतरो दानाच्छ्रद्धा चैव ततः परा॥१४।९०।९४

द्रव्य संपादन करणेंही गोष्ट कमी महत्त्वाची आहे. सत्पात्रीं केलेल्या दानाची योग्यता त्याहून जास्त आहे. योग्य कालीं दान करणें हें त्यापेक्षांहि श्रेष्ठ. आणि श्रद्धा ही तर त्याहिपेक्षां श्रेष्ठ आहे.

३६८ द्वावम्भसि निवेष्टव्यौ गले बद्ध्वादृढां शिलाम्।
धनवन्तमदातारं दरिद्रं चातपस्विनम्॥५।३३।६५

धनवान् असून दान न करणारा आणि दरिद्री असून तपश्चर्या न करणारा या दोघांना गल्यांत मोठी धोंड बांधून पाण्यांत बुडवून टाकावें.

३६९ द्वाविमौ कण्टकौ तीक्ष्णौ शरीरपरिशोषिणौ।
यश्चाधनः कामयते यश्च कुप्यत्यनीश्वरः॥५।३३।६१

निर्धन असून चैनीची इच्छा करणें व अंगांत सामर्थ्य नसतां रागावणें हे दोन शरीरांतील रक्त अगदीं नाहींसें करून टाकणारे तीक्ष्ण कांटे होत.

३७० द्वे कर्मणी नरः कुर्वन्नस्मिँल्लोके विरोचते।
अब्रुवन्परुषं किंचिदसतोऽनर्चयंस्तथा॥५।३३।५९

दोन गोष्टी करणारा मनुष्य या लोकीं योग्यतेस चढतो. यत्किंचित्हि कठोर न बोलणें आणि दुजनचा गौरव न करणें.

३७१ द्वेष्यो न साधुर्भवति न मेधावी न पण्डितः।
प्रिये शुभानि कार्याणि द्वेष्ये पापानि चैव ह॥५।३९।४

जो ज्याच्या द्वेषास पात्र झालेला असतो तो त्याला सज्जन, बुद्धिमान् अथवा शहाणा वाटत नाहीं. कारण, प्रिय असलेल्या मनुष्याची कृत्ये सर्व कांहीं चांगलीं आणि द्वेषास पात्र झालेल्या मनुष्याची कृत्ये सर्व कांहीं वाईट (समजणें ही सामान्य लोकांची रीतच आहे.)

३७२ द्वेष्यो भवति भूतानामुग्रो राजा युधिष्ठिर।
मृदुमप्यवमन्यन्ते तस्मादुभयमाचरेत्॥१२।१०२।३३

(भीष्म म्हणतात) हे युधिष्ठिरा, राजा नेहमीं कठोर वागूं लागला तर सर्व लोक त्याचा द्वेष करितात, आणि सौम्य रीतीनें वागूं लागला तर त्याचा अवमान करितात. म्हणून प्रसंगाप्रमाणें राजानें कठोर व्हावें व सौम्यही व्हावें.

३७३ द्व्यक्षरस्तु भवेन्मृत्युस्त्र्यक्षरं ब्रह्म शाश्वतम्।
ममेति च भवेन्मृत्युर्न ममेति च शाश्वतम्॥१२॥१३॥४

दोन अक्षरें म्हणजे मृत्यु व तीन अक्षरें म्हणजे शाश्वत ब्रह्म होय. ‘मम’ म्हणजे माझें असें मानिल्यानें मृत्यु, आणि ‘न मम’ म्हणजे माझेंअसें मानिल्यानें शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होतें.

३७४ धननाशेऽधिकं दुःखं मन्ये सर्वमहत्तरम्।
ज्ञातयो ह्यवमन्यन्ते मित्राणि च धनाच्च्युतम्॥१२।१७७\।३४

(वैराग्यसंपन्न मंकि म्हणतो) मला वाटतें, द्रव्यनाशाचें दुःख सर्वांत अत्यंत अधिक, कारण नातलग व मित्रहि द्रव्य नष्ट झालेल्याचा अपमान करितात.

३७५ धनमाहुः परं धर्मं धने सर्वं प्रतिष्ठितम्।
जीवन्ति धनिनो लोके मृता ये त्वधना नराः॥५।७२।२३

धन मिलविणें हा श्रेष्ठ धर्म होय असें म्हणतात धनावरच सर्व कांहीं अवलंबून आहे. धनसंपन्न लोकच जगांत जिवंत असतात. धनहीन पुरुष मेल्यांतच जमा.

३७६ धनात्कुलं प्रभवति धनाद्धर्मः प्रवर्धते।
नाधनस्यास्त्ययं लोको न परः पुरुषोत्तम॥१२।८।२२

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) हे नरश्रेष्ठा, धनाच्या योगानें कुलाचा उत्कर्ष होतो. धन असेल तर धर्माची वाढ होते. निर्धनाला ना इहलोक ना परलोक.

३७७ धनेन किं यन्न ददाति नाश्नुते
बलेन किं येन रिपुं न बाधते।
श्रुतेन किं येन न धर्ममाचरेत्
किमात्मना यो न जितेन्द्रियो वशी॥१२।३२१।९३

ज्याचा दान करण्याकडे किंवा भोगण्याकडे उपयोग केला जात नाहीं तें धन काय कामाचें? ज्याच्या योगानें शत्रूला त्रास दिला जात नाहीं त्या बलाचा काय उपयोग? धर्मानुष्ठान नाहीं तर विद्येची काय किंमत? आणि जो जितेंद्रिय, मनोनिग्रही नाहीं तो मनुष्य काय करावयाचा?

३७८ धनेनाधर्मलब्धेन यच्छिद्रमपिधीयते।
असंवृतं तद्भवति ततोऽन्यदवदीर्यते॥५।३५।७०

अन्यायानें मिलविलेल्या द्रव्यानें एकादें व्यंग झांकलें तर तें खरोखर झांकले जात नाहींच, परंतु त्यापासून दुसरें व्यंग उत्पन्न होतें.

३७९ धन्यानामुत्तमं दाक्ष्यं धनानामुत्तमं श्रुतम्।
लाभानां श्रेय आरोग्यं सुखानां तुष्टिरुत्तमा॥

३।३१३।७४

धन मिलविण्याच्या साधनांत दक्षता सर्वांत श्रेष्ठ आहे. धनांमध्यें उत्तम धन विद्या. सर्व लाभांत उत्कृष्ट लाभ म्हणजे आरोग्य. आणि सर्व सुखांत संतोष श्रेष्ठ.

३८० धर्म एको मनुष्याणां
सहायः पारलौकिकः॥१३।१११।१७

एकटा धर्मच मनुष्यांचा परलोकांतील सोबती आहे.

३८१ धर्म एव हतो हन्ति
धर्मो रक्षति रक्षितः॥३।३१३।१२८

आपण धर्माचा घात केला तर धर्मच आपला घात करतो. आणि आपण धर्माचें रक्षण केलें तर धर्म आपले रक्षण करतो.

३८२ धर्मं यो बाधते धर्मो न स धर्मः कुवर्त्म तत्।
अविरोधात्तु यो धर्मः स धर्मः सत्यविक्रम॥३।१३१।११

(ससाण्याच्या रूपाने आलेला इंद्र शिबि राजाला म्हणतो) ज्याच्या योगानें खऱ्या धर्माला बाध येतो तो धर्मच नव्हे, तो कुमार्ग होय. ज्याचा खन्या धर्माशीं विरोध येत नाहीं तोच धर्म.

३८३ धर्म संहरते तस्य धनं हरति यस्य सः।
ह्रियमाणे धने राजन्वयं कस्य क्षमेमहि॥१२।८।१३

(भीम युधिष्ठिराला म्हणतो) जो ज्याचें द्रव्य हरण करतो त्यानें त्याच्या धर्मांचाच उच्छेद केल्यासारखं होतें. राजा, आमच्या द्रव्याचा अपहार होऊं लागला तर आम्ही कोणाला क्षमा करावी काय?

३८४ धर्मं हि यो वर्धयते स पण्डितो
य एव धर्माच्च्यवते स मुह्यति॥१२।३२१२।७८

धर्माची जो वाढ करतो तोच पंडित. जो धर्मापासून च्युत होतो तो मोहांत सांपडला अस समजावें.

३८५ धर्मनित्यास्तु ये केचिन्न ते सीदन्ति कर्हिचित्॥३।२६३।४४

सदोदित धर्मानें जे वागतात त्यांचा कधींहि नाश होत नाहीं.

३८६ धर्ममूलः सदैवार्थः कामोऽर्थफलमुच्यते॥१२।१२३।४

केव्हां झालें तरी अर्थप्राप्तीचें मूल धर्म होय. काम (म्हणजे इष्टप्राप्ति ) हैं अर्थाचें फल होय.

३८७ धर्मं पुत्र निषेवस्व सुतीक्ष्णौ च हिमातपौ।
क्षुत्पिपासे च वायुं च जय नित्यं जितेन्द्रियः॥१२।३२१।४

(व्यास मुनि शुकाला सांगतात.) हे पुत्रा, तूं धर्माचरणानें वाग. नेहमीं जितेंद्रिय राहून कडक थंडी व ऊन, तहान व भूक, आणि प्राणवायु यांना जिंक. (म्हणजे सहन करण्यास शीक)

३८८ धर्मं पूर्वे धनं मध्ये जघन्ये काममाचरेत्।
अहन्यनुचरेदेवमेष शास्त्रकृतो विधिः॥३।३३।४०

दिवसाच्या पूर्वभागांत धर्मानुष्ठान, मध्यभागांत द्रव्यसंपादन व शेवटल्या भागांत विषयसेवन करावें, याप्रमाणें प्रत्यहीं वागावें हा शास्त्रोक्त विधि आहे.

३८९ धर्मव्युच्छित्तिमिच्छन्तो येऽधर्मस्य प्रवर्तकाः।
हन्तव्यास्ते दुरात्मानो देवैर्दैत्या इवोल्बणाः॥१२।३३।३०

जे धर्माचा उच्छेद करूं पाहतात व अधर्माचा प्रसार करतात अशा दुरात्म्यांना देवांनी महाभयंकर अशा दैत्यांना ठार मारिलें त्याप्रमाणे, ठार मारावें.

३९० धर्मश्चसूक्ष्मो निपुणोपलक्ष्यः॥२\।६७ ३८

धर्म सूक्ष्म आहे. तो सूक्ष्मबुद्धीच्या लोकांनाच समजेल.

३९१ धर्मश्चार्थेन महता शक्यो राजन्निषेवितुम्॥३।३३।४८

(भीम युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, धर्माचें आचरण विपुल द्रव्याच्याच योगानें करतां येणें शक्य आहे.

३९२ धर्मस्य निष्ठा त्वाचारस्तमेवाश्रित्य भोत्स्यसे॥१२।२५९।६

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) धर्माचा आधार आचार होय. त्याचाच आश्रय केल्यावर तुला धर्माचें ज्ञान होईल.

३९३ धर्मः सत्यं तथा वृत्तं बलं चैव तथाप्यहम्।
शीलमूला महाप्राज्ञ सदा नास्त्यत्र संशयः॥१२।१२४।६२

(लक्ष्मी प्रहादास म्हणते) धर्म, सत्य तसेंच सद्वर्तन, सामर्थ्य आणि मी या सर्वांचेंमूल कारण शील हेंच होय यांत संशय नाहीं.

३९४ धर्मादपेतं यत्कर्म यद्यपि स्यान्महाफलम्।
न तत्सेवेत मेधावी न तद्धितमिहोच्यते॥१२।२९३।८

धर्माला सोडून असलेलें कृत्य केवढेंहि मोठें फल देणारें असलें तरी तें शहाण्यानें करूं नये. कारण त्यापासून इहलोकीं खरें कल्याण होत नाहीं.

३९५ धर्माय राजा भवति न कामकरणाय तु॥१२।९०।३

धर्मरक्षणासाठीं राजाची उत्पत्ति आहे, आपल्या इच्छा तृप्त करून घेण्यासाठीं नव्हे.

३९६ धर्मार्थकामकुशलो धर्मार्थावप्यपीडयन्।
धर्मप्रधानकार्याणि कुर्याश्चेति पुनःपुनः॥७।१५१।३७

(द्रोणाचार्य दुर्योधनाला सांगतात) तूं धर्म, अर्थ व काम यांविषयीं कुशल आहेस. परंतु, धर्म व अर्थ या दोहोंसहि धक्का न लागूं देतां धर्मप्रधान अशींच कृत्ये करीत जा हेंमी तुला पुनः पुनः सांगतों.

३९७ धर्मार्थकामाः सममेव सेव्या
यो ह्येकभक्तः स नरो जघन्यः।
तयोस्तु दाक्ष्यं प्रवदन्ति मध्यं
स उत्तमो योऽभिरतस्त्रिवर्गे॥१२।१६७।४०

धर्म, अर्थ आणि काम यांचेंसेवन सारख्याच प्रमाणानें केलें पाहिजे. यापैकीं कोणत्याहि एकावरच जो भर देतो तो मनुष्य निकृष्ट होय. यांतून दोहोंच्या ठिकाणीं दक्ष असणारा मध्यम प्रतीचा होय. सर्वांत श्रेष्ठ तोच कीं, जो या तीनहि पुरुषार्थांमध्यें रममाण होऊन राहतो.

३९८ धर्मार्थौधर्मकामौ च कामार्थौ चाप्यपीडयन् ।
धर्मार्थकामान्योऽभ्येति सोऽत्यन्तं सुखमश्नुते॥९।६०।२२

धर्म व अर्थ, धर्म व काम, काम व अर्थ यांचा एकमेकांशी विरोध येऊं न देतां धर्म, अर्थ व काम या तिहींचें जो सेवन करती त्याला आत्यंतिक सुख प्राप्त होतें.

३९९ धर्मे चार्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ।
यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित्॥१।६२।५३

(वैशंपायन जनमेजय राजाला सांगतात) धर्माविषयीं, अर्थाविषयीं, कामाविषयीं आणि मोक्षाविषयीं यांत (महाभारतांत) जं सांगितलें आहे तेंचइतर ग्रंथांत आहे. जेंयांत नाहीं तें कोठेंच नाहीं.

४०० धर्मेण राज्यं विन्देत धर्मेण परिपालयेत्।
धर्ममूलां श्रियं प्राप्य न जहाति न हीयते॥५।३४।३१

धर्मानें राज्य मिलवावें व धर्मानंच त्याचें संरक्षण करावें. धर्मानें मिलविलेल्या राजलक्ष्मीचा त्याग करण्याचा प्रसंग येत नाहीं; व तीहि राजाला सोडून जात नाहीं.

४०१ धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मो राजनि तिष्ठति।
तं राजा साधु यः शास्ति स राजा पृथिवीपतिः॥१२।९०।५

धर्माच्या आधारानें प्राणी राहतात, धर्म, राजाच्या आधारानें राहतो, त्या धर्माचें पालन जो राजा उत्तम प्रकारें करितो तो राजा सर्व पृथ्वीचा स्वामी होतो.

४०२ धर्मे ते धीयतां बुद्धिर्मनस्तु महदस्तु च॥१५।१७।२१

(कुंती युधिष्ठिराला म्हणते) तुझी बुद्धि धर्माच्या ठिकाणीं स्थिर होवो, आणि तुझें मन मोठें असो.

४०३ धर्मे मतिर्भवतु वः सततोत्थितानां
स ह्येकएव परलोकगतस्य बन्धुः।
अर्थाः स्त्रियश्च निपुणैरपि सेव्यमाना
नैवाप्तभावमुपयान्ति न च स्थिरत्वम्॥१।२।३९१

(सौति शौनकादिक ऋषींना सांगतो) सतत प्रयत्नपूर्वक धर्मानुष्ठान करण्याकडे तुमची प्रवृत्ति असूं दे. कारण तोच एकटा परलोकीं गेल्यावर आपल्या उपयोगी पडणारा आहे. कनक आणि कांता यांची निष्णात लोकांनीं सेवा केली तरी तीं कामास येत नाहींत, तीं चिरकाल टिकतहि नाहींत.

४०४ धर्मेऽसुखकला काचिद्धर्मे तु परमं सुखम्॥१२।२७१।५६

धर्माचरणांत थोडेसे कष्ट वाटले तरी अत्यंत श्रेष्ठ सुख धर्मांतच आहे.

४०५ धर्मो हि परमा गतिः॥१२।१४७।८

धर्म हाच उत्कृष्ट प्रकारच्या गतीचें साधन होय.

४०६ धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्
क्षत्रियस्य न विद्यते॥६।२६।३१

धर्मयुद्धासारखें श्रेयस्कर क्षत्रियाला दुसरें कांहींच नाहीं.

४०७ धारणाद्धर्ममित्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः।
यः स्याद्धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः॥१२।१०९।११

धारण करतो म्हणून धर्म म्हणतात. धर्मानेंच लोकांना धारण केलें आहे. धारण करण्याच्या गुणानें जो युक्त असेल तोच धर्म असा सिद्धांत आहे.

४०८ धिक्तस्य जीवितं राज्ञो राष्ट्रं यस्यावसीदति।
अवृत्त्यान्यमनुष्योऽपि यो वैदेशिक इत्यपि॥१२।१३०।३४

ज्याचें राष्ट्र क्षीण दशेप्रत पावतें आणि परदेशांत राहणारा अन्य मनुष्यहि ज्याच्या राष्ट्रांत उपजीविका न झाल्यामुले नाश पावतो त्या राजाच्या जीविताला धिक्कार असो !

४०९ धिगस्त्वधनतामिह॥१२।८।११

या लोकामध्यें दारिद्र्याला धिक्कार असो !

४१० धूमायन्ते व्यपेतानि ज्वलन्ति सहितानि च
धृतराष्ट्रोल्मुकानीव ज्ञातयो भरतर्षभ॥५।३६।६०

(विदुर म्हणतो) हे भरतश्रेष्ठा धृतराष्ट्रा, लाकडाचीं कोलितें एकएकटीं असलीं म्हणजे नुसतीं धुमसत राहतात; पण तींच एकत्र असली म्हणजे त्यांच्यापासून ज्वाला उत्पन्न होते. त्याचप्रमाणें नातलगांची गोष्ट आहे.

४११ धूमो वायोरिव वशे बलं धर्मोऽनुवर्तते।
अनीश्वरो बले धर्मो द्रुमे वल्लीव संश्रिता॥१२।१३४।७

धूर वाऱ्याच्या अंकित राहतो तसा धर्म बलाच्या पाठोपाठ येतो. (बलावांचून) असमर्थ असलेला धर्म वृक्षाच्या आश्रयानें राहणाऱ्या लतेप्रमाणें बलावर अवलंबून असतो.

४१२ धृतिर्दाक्ष्यं संयमो बुद्धिरात्मा
धैर्यं शौर्यं देशकालाप्रमादः।
अल्पस्य वा बहुनो वा विवृद्धौ।
धनस्यैतान्यष्ट समिन्धनानि॥१२।१२०।३७

संथपणा, दक्षता, मनोनिग्रह, बुद्धिमत्ता, विचारशीलता, धैर्य, शौर्य आणि स्थलकालाविषयीं सावधगिरी, हीं आठ साधनें, मूलचें थोडें किंवा पुष्कल असलेलें धन वाढविण्याचीं होत.

४१३ धेनुर्वत्सस्य गोपस्य स्वामिनस्तस्करस्य च
पयः पिबति यस्तस्या धेनुस्तस्येति निश्चयः॥१२।१७४।३२

गाईवर वांसराची, गवल्याची, मालकाची व (प्रसंगविशेषीं)चोराचीहि सत्ता असते. पण ज्याला तिचें दूध प्राशन करण्यास मिलतें त्याचाच तिजवर खरा हक्क होय हेंनिश्चित.

४१४ न कश्चिज्जात्वतिक्रामेज्जरामृत्यू हि मानवः।
अपि सागरपर्यन्तां विजित्येमां वसुंधराम्॥१२।२८।१५

समुद्रवलयांकित ही सर्व पृथ्वी जिंकूनसुद्धां कोणीहि मनुष्य जरा आणि मृत्यु यांचें अतिक्रमण करूं शकत नाहीं.

४१५ न कश्चित्कस्यचिन्मित्रं न कश्चित्कस्यचित्सुहृद्।
अर्थतस्तु निवध्यन्ते मित्राणि रिपवस्तथा॥१२।१३८।११०

मुलांतच कोणी कोणाचा मित्र नसतो, आणि कोणी कोणाचा सखा नसतो. कार्याच्याच अनुरोधानें मित्र आणि शत्रु हे होत असतात.

४१६ न कश्चिन्नापनयते पुमानन्यत्र भार्गवात्।
शेषसंप्रतिपत्तिस्तु बुद्धिमत्स्वेव तिष्ठति॥५।३९।३०

(नीतिशास्त्रप्रणेत्या) शुक्राचार्यांव्यतिरिक्त दुसरा कोणीहि मनुष्य कधीं चुकत नाहीं असें नाहीं. परंतु चूक झाल्यावर पुढें काय करावयाचें याचें ज्ञान बुद्धिमान पुरुषांच्या ठायींच असते.

४१७ न कालो दण्डमुद्यम्य शिरः कृन्तति कस्यचित्।
कालस्य बलमेतावद्विपरीतार्थदर्शनम्॥२।८१।११

विनाशकाल प्राप्त झाला म्हणजे तो कांहीं प्रत्यक्ष दंड उगारून कोणाचें डोकें उडवीत नाहीं. तर बुद्धींत भ्रंश पाडून विपरीत प्रकार भासविणं एवढ्यापुरताच तो आपल्या बलाचा उपयोग करितो.

४१८ न कुलं वृत्तहीनस्य प्रमाणमिति मे मतिः।
अन्तेष्वपि हि जातानां वृत्तमेव विशिष्यते॥५।३४।४१

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) दुर्वर्तनी माणसाच्या कुलीनपणाला कांही किंमत देतां येत नाहीं असें मला वाटतें. हीन कुलांत जन्मलेल्यांच्यासुद्धां शीलालाच महत्त्व आहे.

४१९ न कृतस्य तु कर्तुश्च सख्यं संधीयते पुनः।
हृदयं तत्र जानाति कर्तुश्चैव कृतस्य च॥१२।१३९। ३६

अपराध करणारा आणि त्याचें प्रायश्चित्त देणारा ह्या उभयतांमध्यें पुनरपि मैत्री जडत नसते. कारण, परस्परांचा संबंध काय आहे हें प्रायश्चित्त देणारा व अपराध करणारा ह्या उभयतांचें अंतःकरणच जाणत असतें.

४२० न कोशः शुद्धशौचेन न नृशंसेन जातुचित्।
मध्यमं पदमास्थाय कोशसंग्रहणं चरेत्॥१२।१३३।३

अगदीं सोंवलेपणानें राहून संपत्ति मिलत नसते, तशीच ती दुष्टपणानेंही कधींच मिलत नाहीं. यास्तव मध्यम मार्गाचा अवलंब करून संपत्तीचा संग्रह करावा.

४२१ न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते।
गृहं तु गृहिणीहीनमरण्यसदृशं मतम्॥१२।१४४।६

नुसत्या घराला घर म्हणत नाहींत. गृहिणी हैंच घर. गृहिणी नसलेलें घर अरण्यासमान होय.

४२२ न च कश्चित्कृते कार्ये कर्तारं समवेक्षते॥१२।१३८।११२

कार्य होऊन गेल्यावर कर्त्याकडे कोणाचें लक्ष जात नाहीं.

४२३ न च शत्रुरवज्ञेयो दुर्बलोऽपि बलीयसा।
अल्पोऽपि हि दहत्यग्निर्विषमल्पं हिनस्ति च॥१२।५८।१७

स्वतः बलाढ्य असलेल्यानेंसुद्धां दुर्बल अशाहि शत्रूला तुच्छ समजूं नये. कां कीं, अग्नि लहान असला तरी जालल्यावांचून रहात नाहीं, आणि विष थोडें असलें तरी प्राणनाश करतेंच.

४२४ न च शुद्धानृशंसेन शक्यं राज्यमुपासितुम्॥१२।७५।१८

निर्भेल दयालूपणानें राज्य चालविणें शक्य नाहीं.

४२५ न चैव पुरुषो द्रष्टा स्वर्गस्य नरकस्य च।
आगमस्तु सतां चक्षुर्नृपते तमिहाचर॥१२।२८।५४

(अश्म नामक ब्राह्मण जनक राजाला सांगतो) हे राजा, स्वर्ग आणि नरक मनुष्याला दिसत नाहींत. परंतु त्यांना अवलोकन करण्याचें सज्जनांचे नेत्र म्हणजे शास्त्र होय. म्हणून तूं शास्त्राप्रमाणें वाग.

४२६ न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति।
हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते॥१।७५।५०

इच्छित वस्तूंच्या उपभोगानें भोगेच्छेची तृप्ति कधींच होत नसते. आहुतींच्या योगानें अधिक पेट घेणाऱ्या अग्नीप्रमाणें ती उलट अधिकच वाढते.

४२७ न जातु त्वमिति ब्रूयादापन्नोऽपि महत्तरम्।
त्वंकारो वा वधो वेति विद्वत्सु न विशिष्यते॥१३।१६२।५३

सकटांत असतांनाहि मोठ्या मनुष्याला ‘तूं’ असें एकेरी संबोधूं नये. विद्वानाला तूं असें म्हणणें व त्याचा वध करणें सारखेंच.

४२८ न जातु विवृतः कार्यः शत्रुः सुनयमिच्छता॥१२।१०५।१४

उत्कृष्ट प्रकारच्या नीतीप्रमाणें वागूं इच्छिणाऱ्या पुरुषानें केव्हांहि आपला शत्रु उघड करूं नये.

४२९ न जानपदिकं दुःखमेकः शोचितुमर्हति।
अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येदुपक्रमम्॥१२।३३०।१५

सर्व देशाच्या दुःखाचा एकट्यानें शोक करणें युक्त नव्हे. शोक न करितां प्रतिकाराचा जर कांहीं उपाय सुचला तर तो मात्र अमलांत आणावा.

४३० न तत्तरेद्यस्य न पारमुत्तरेत्
न तद्धरेद्यत्पुनराहरेत्परः।
न तत्खनेद्यस्य न मूलमुद्धरेत्
न तं हन्याद्यस्य शिरो न पातयेत्॥१२।१४०।६९

ज्याच्या पैलतीराला पोंचतां येणार नाहीं तें तरून जाण्याच्या भरीस पडूं नये. जें फिरून कोणी आपल्यापासून हिरावून घेईल त्याचें हरण करूं नये. ज्याचें मूल उपटून टाकतां येत नाहीं तें खणूं नये. ज्याचें शीर खालीं पाडतां येत नाहीं त्याच्यावर प्रहार करूं नये.

४३१ न तत्परस्य संदध्यात्प्रतिकूलं यदात्मनः।
एष संक्षेपतो धर्मः कामादन्यः प्रवर्तते॥१३।११३।८

आपल्याला अनिष्ट अशी जी गोष्ट ती दुसऱ्याच्या संबंधानें करूं नये. धर्माचें संक्षिप्त स्वरूप हेंअसें आहे. याला सोडून असलेला तो निव्वल स्वेच्छाचार होय

.

४३२ न तथा बाध्यते कृष्ण प्रकृत्या निर्धनो जनः।
यथा भद्रां श्रियं प्राप्य तथा हीनः सुखैधितः॥५।७२।२९

(युधिष्ठिर श्रीकृष्णांना म्हणतो) उत्तम प्रकारचेंवैभव प्राप्त होऊन सुखांत वाढलेल्या मनुष्याला तें वैभव नष्ट झालें असतां जेवढें दुःख होतें, तेवढें मूलांतच दरिद्री असलेल्या मनुष्याला होत नाहीं.

४३३ न तथेच्छन्ति कल्याणान्परेषां वेदितुं गुणान्।
यथैषां ज्ञातुमिच्छन्ति नैर्गुण्यं पापचेतसः॥५।३७।४७

दुष्ट मनुष्यांना दुसऱ्यांचे दोष जाणण्याची जशी इच्छा असते, तशी त्यांचे चांगले गुण समजून घेण्याची इच्छा नसते.

४३४ न तल्लोके द्रव्यमस्ति यल्लोकं प्रतिपूरयेत्।
समुद्रकल्पः पुरुषो न कदाचन पूर्यते॥१३।९३।४६

जगांत असें कोणतेंच द्रव्य नाहीं कीं, जें लोकांना पुरून उरेल. मनुष्य हा समुद्रासारखा आहे. त्याला कधींच कांहीं पुरत नाहीं.

४३५ न तृप्तिः प्रियलाभेऽस्ति तृष्णा नाद्भिः प्रशाम्यति।
संप्रज्वलति सा भूयः समिद्भिरिव पावकः॥१२।१८०।२६

प्रिय वस्तूचा लाभ झाल्यानें तृप्ति होते असें नाहीं. तृष्णा (हांव,लोभ) ही पाण्यानें शांत होत नाहीं. समिधांनीं जसा अग्नि, तशी ती (इष्टप्राप्तीनें) अधिकच प्रज्वलित होते.

४३६ न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः।
बालोऽपि यः प्रजानाति तं देवाः स्थविरं विदुः॥३।१३३।११

एकाद्याचे डोक्यावरील केस पांढरे झाले म्हणजे तो वृद्ध झाला असें नाहीं. वयानें लहान असला तरी, जो ज्ञानी आहे त्यालाच देव वृद्ध समजतात.

४३७ न त्वेवात्मावमन्तव्यः पुरुषेण कदाचन।
न ह्यात्मपरिभूतस्य भूतिर्भवति शोभना॥३।३२।५८

पुरुषानें स्वतःस केव्हांहि हीन लेखूं नये कारण, स्वतःस हीन मानणारास उत्तम प्रकारचें ऐश्वर्य प्राप्त होत नाहीं.

४३८ न दरिद्रो वसुमतो नाविद्वान्विदुषः सखा।
न शूरस्य सखा क्लीवः सखिपूर्वं किमिष्यते॥१।१३१।९

(गुरुबंधु असलेल्या दुपदराजाशीं पूर्वींची मैत्री लक्षांत आणून द्रोणाचार्य त्याजकडे गाय मागण्यासाठीं गेले असतां द्रुपदराजानें दिलेलें उत्तर) दरिद्री हा श्रीमंताचा अथवा मूर्ख हा विद्वानाचा मित्र नसतो. शूराची नामर्दाशी मैत्री असणें शक्य नाहीं. तर पूर्वीची मैत्री आतां सांगून काय मागतोस ?

४३९ न दृष्टपूर्वं प्रत्यक्षं परलोकं विदुर्बुधाः।
आगमांस्त्वनतिक्रम्य श्रद्धातव्यं बुभूषता॥१२।२८।४२

परलोक हा पूर्वी कोणीं प्रत्यक्ष पाहिला आहे असें शहाणे लोक समजत नाहींत. परंतु शास्त्रमार्गाचेंउल्लंघन न करितां उत्कर्षेच्छु पुरुषानें त्याविषयीं श्रद्धा ठेवावी.

४४० न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत्।
यं तु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम्॥५।३५।४०

देव कांहीं एकाद्या गुराख्याप्रमाणें हातांत दंड घेऊन कोणाचें रक्षण करीत नाहींत. तर ज्याचें रक्षण करण्याची ते इच्छा करितात, त्याला ते उत्तम प्रकारची बुद्धि देतात.

४४१ न द्वितीयस्य शिरसश्छेदनं विद्यते क्वचित्।
न च पाणेस्तृतीयस्य यन्नास्ति न ततो भयम्॥१२।१८०।२९

आपलें दुसरें डोकें कोणी कापील किंवा तिसरा हात तोडील अशी केव्हांहि भीति नसते. कां कीं, जें मूलांतच नाहीं त्याची भीति मुलींच नसते.

४४२ न धर्मः प्रीयते तात दानैर्दत्तैर्महाफलैः॥
न्यायलब्धैर्यथा सूक्ष्मैः श्रद्धापूतैः स तुष्यति॥१४।९०१९९

(धर्म उंछवृत्तीच्या ब्राह्मणाला म्हणतो) बाबारे, न्यायानें मिलविलेल्या आणि श्रद्धेनें पवित्र झालेल्या थोड्याशा द्रव्याच्या दानानें धर्म जसा संतुष्ट होतो, तसा केवल मोठें फल देणाऱ्या दानांनी संतोष पावत नाहीं.

४४३ न धर्मपर एव स्यान्न चार्थपरमो नरः।
न कामपरमो वा स्यात्सर्वान्सेवेत सर्वदा॥३।३३।३९

मनुष्यानें केवल धर्माचेंच अवलंबन करूं नये, एकट्या अर्थाच्याच पाठीमागे लागूं नये आणि नुसत्या कामाकडेही सर्व लक्ष देऊं नये. परंतु (धर्म, अर्थ व काम) या सर्वांचें सर्वदा सेवन करावें.

४४४ न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखम्॥१२।२५।२३

कोणालाहि नेहमींच दुःख होत नाहीं, किंवा नेहमींच सुख होत नाहीं.

४४५ न निर्मन्युः क्षत्रियोऽस्ति
लोके निर्वचनं स्मृतम्॥३।२७।३७

ज्याला अपमानाची चीड येत नाहीं तो क्षत्रिय नव्हे, अशी लोकांत म्हणच आहे.

४४६ न पश्यामोऽनपकृतं धनं किंचित्क्वचिद्वयम्॥१२।८।३०

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) दुसऱ्याला यत्किंचित्हि उपद्रव न देतां कोणाला केव्हां कांहीं धन मिलाल्याचें आमच्या पाहण्यांत नाहीं.

४४७ न पूर्वे नापरे जातु
कामानामन्तमाप्नुवन्॥१२।१७७।२२

पूर्वकालचे किंवा दुसरे कोणतेहि लोक इच्छेच्या अंतापर्यंत पोंचले नाहींत.

४४८ न बाह्यं द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवति भारत।
शारीरं द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवति वा न वा॥१२।१३।१

(सहदेव युधिष्ठिराला म्हणतो) बाह्य द्रव्याचा त्याग केल्यानें सिद्धि प्राप्त होत नसते. शरीरांत राहणाऱ्या (कामक्रोधादिविकाररूप) द्रव्याचा त्याग करूनहि सिद्धि मिलेल का नाहीं हा प्रश्नच आहे.

४४९ न बुद्धिर्धनलाभाय न जाड्यमसमृद्धये।
लोकपर्यायवृत्तान्तं प्राज्ञो जानाति नेतरः॥५।३८।३३

बुद्धि असली म्हणजे धन मिलतें असें नाहीं, आणि बुद्धिमांद्य असलें म्हणजे दारिद्र्य येतें असेंहि नाहीं. लोकव्यवहार हा चतुर पुरुषालाच समजतो, इतरांना नाहीं.

४५० न बुद्धिशास्त्राध्ययनेन शक्यं
प्राप्तुं विशेषं मनुजैरकाले।
मूर्खोऽपि चाप्नोति कदाचिदर्थान्
कालो हि कार्यं प्रति निर्विशेषः॥१२।२५।६

काल प्रतिकूल असतां नुसत्या बुद्धिमत्तेनें किंवा शास्त्राभ्यासानें मनुष्याला विशेष लाभ होणें शक्य नाहीं. उलट, एकादे वेलेस मूर्खालासुद्धां कार्यात यश येतें. तस्मात् काल हाच कार्यसिद्धीच्या बाबतींत सर्वांत महत्त्वाचा आहे.

४५१ न ब्रह्मचार्यधीयीत कल्याणीं न दुहेत गाम्।
न कन्योद्वहनं गच्छेद्यदि दण्डो न पालयेत्॥१२।१५।३७

जर दंडानें लोकांचें संरक्षण केलें नसतें, तर ब्रह्मचाऱ्यानें अध्ययन केलें नसतें. सवत्सा धेनूनें दूध दिलें नसतें, आणि मुलीनें विवाह करून घेतला नसता.

४५२ न लोके दीप्यते मूर्खः केवलात्मप्रशंसया।
अपि चापिहितः श्वभ्रे कृतविद्यः प्रकाशते॥१२।२८७।३१

लोकांत नुसत्या आत्मप्रौढीनें मूर्खाचें तेज पडत नाहीं. परंतु जो खरा खरा विद्वान् आहे त्याला एखाद्या गुहेंतलपवून ठेविलें, तरी तो चमकल्याशिवाय राहणार नाहीं.

४५३ नवनीतं हृदयं ब्राह्मणस्य
वाचि क्षुरो निशितस्तीक्ष्णधारः।
तदुभयमेतद्विपरीतं क्षत्रियस्य
वाङ्नवनीतं हृदयं तीक्ष्णधारमिति॥१।३।१२३

ब्राह्मणाचें हृदय लोण्यासारखें मऊ असतें, परंतु बोलण्यांत तीक्ष्ण धारेच्या पाजवलेल्या वस्तऱ्यासारखा तो कठोर असतो. क्षत्रियाच्या या दोनहि गोष्टी उलट असतात. म्हणजे बोलणें मृदु पण हृदय कठीण.

४५४ न विश्वसेदविश्वस्ते विश्वस्ते नातिविश्वसेत्।
विश्वासाद्भयमुत्पन्नं मूलान्यपि निकृन्तति॥५।३८।९

अविश्वासू माणसावर विश्वास ठेवू नये. विश्वासू मनुष्यावर देखील अति विश्वास टाकूं नये. कारण, विश्वास ठेविल्यामुले जर कांहीं भय उत्पन्न झालें, तर तें आपलीं पालेंमुले देखील खणून काढते.

४५५ न वै मानं च मौनं च सहितौ वसतः सदा।
अयं हि लोको मानस्य असौ मौनस्य तद्विदुः॥५।४२।४४

मान व मौन ह्रीं सर्वदा एकत्र रहात नाहींत. हा लोक मानाचा असून परलोक मौनाचा आहे असें म्हणतात.
(अन्न, स्त्री इत्यादि भोगांचे ठिकाणीं जो अभिलाष त्याला ‘मान’ असें म्हणतात. आणि ब्रह्मानंदसुखाच्या प्राप्तीचें जें कारण त्याला मौन’ असें म्हणतात.)

४५६ न वै श्रुतमविज्ञाय वृद्धाननुपसेव्य वा।
धर्मार्थौवेदितुं शक्यौ बृहस्पतिसमैरपि॥५।३९।४१

शास्त्र समजून घेतल्यावांचून अथवा वृद्धांचा समागम केल्यावांचून धर्म व अर्थ या दोन पुरुषार्थांचेंज्ञान होणें बृहस्पतीसारख्या बुद्धिमान् पुरुषांनाहि शक्य नाहीं.

४५७ न वै सुखं प्राप्नुवन्तीह भिन्नाः॥५।३६।५६

आपसांत फुटून राहणारांना जगांत सुख खचित प्राप्त होत नाहीं.

४५८ न शत्रुर्वशमापन्नो मोक्तव्यो वध्यतां गतः॥५।३८।२९

ज्याचा अवश्य वध केला पाहिजे असा शत्रु हातांत सांपडलाअसतां सोडून देऊं नये.

४५९ न शत्रुर्विवृतः कार्यो वधमस्याभिकाङ्क्षता।
क्रोधं भयं च हर्षं च नियम्य स्वयमात्मनि॥१२।

१०३।८

शत्रूला ठार मारण्याची इच्छा करणाऱ्यानें आपला शत्रु प्रगट करूं नये. (म्हणजे त्याच्याशीं उघड द्वेष करूं नये) राग, भय व आनंद हीं आंतल्या आंत दाबून ठेवावीं.

४६० न श्रेयः सततं तेजो न नित्यं श्रेयसी क्षमा॥३।२८।६

सदोदित तीव्रपणा श्रेयस्कर नाहीं, तसेंच नेहमीं सौम्यपणाहि कामाचा नाहीं.

४६१ नष्टं समुद्रे पतितं नष्टं वाक्यमशृण्वति।
अनात्मनि श्रुतं नष्टं नष्टं हुतमनग्निकम्॥५।३९।४२

जें समुद्रांत पडलें तें नष्ट झालें. न ऐकणाऱ्याला सांगितलेलें वायां गेलें. स्वेच्छाचारी माणसाची विद्या फुकट गेली, राखेंत टाकलेली आहुति व्यर्थ गेली.

४६२ न संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति।
संशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति॥१२।१४०।३४

संकटांत सांपडल्यावांचून मनुष्याला चांगल्या गोष्टी प्राप्त होत नाहीत. पण संकटांत सांपडल्यानंतर जर तो जिवंत राहिला तर त्याला आपलें कल्याण झालेलें दिसून येईल

.

४६३ न स क्षयो महाराज यः क्षयो वृद्धिमावहेत्।
क्षयः स त्विह मन्तव्यो यं लब्ध्वा बहु नाशयेत्॥५।३९।७

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) जो क्षय उत्कर्षाला कारण होतो तो खरोखर क्षय नव्हे. जो प्राप्त झाला असतां बहुत नाश करतो त्यालाच क्षय म्हणावें.

४६४ न सख्यमजरं लोके हृदि तिष्ठति कस्यचित्।
कालो ह्येनं विहरति क्रोधो वैनं रहत्युत॥१।१३१।७

जगांत कोणाच्याहि अंतःकरणांत स्नेहभाव कमी न होतां एकसारखा टिकून रहात नाहीं. कालांतरानें स्नेह नाहींसा होतो किंवा क्रोधामुलेंहि नष्ट होतो.

४६५ न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा
न ते वृद्धा ये न वदन्ति धर्मम्।
नासौ धर्मोयत्र न सत्यमस्ति
न तत्सत्यं यच्छलेनाभ्युपेतम्॥५।३५।८

जेथें वृद्ध लोक नाहींत ती सभा नव्हे. जे धर्माला अनुसरून भाषण करीत नाहींत. ते वृद्ध नव्हेत. ज्यांत सत्य नाहीं तो धर्म नव्हे. आणि जें कपटानें युक्त असेल तें सत्यहि नव्हे.

४६६ न स्याद्वनमृते व्याघ्रान् व्याघ्रा न स्युर्ऋते वनम्।
वनं हि रक्ष्यते व्याघ्रैर्व्याघ्रान् रक्षति काननम्॥५।३७।४६

वाघांवांचून वन टिकूं शकणार नाहीं आणि वनावांचून वाघ राहूं शकणार नाहींत. कारण वाघांच्या योगानें वनाचें रक्षण होतें, आणि वन वाघांचें रक्षण करतें.

४६७ न हायनैर्न पलितैर्न वित्तैर्न च बन्धुभिः।
ऋषयश्चक्रिरे धर्मं योऽनूचानः स नो महान्॥१२।३२३।

वयोमान, पिकलेले केस, धनदौलत आणि सोयरेधायरे यांचे बलावर कोणाला मोठेपणा प्राप्त होत नाहीं. ऋषींनी असा नियम ठरविला कीं, जो सांग वेदाचें अध्ययन करणारा त्यालाच आम्ही श्रेष्ठ समजतों.

४६८ न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति॥६।३०।४०

(श्रीकृष्ण सांगतात) बा अर्जुना, शुभ कर्में करणारा कोणीहि दुःस्थितीप्रत जात नाहीं.

४६९ न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्॥६।२७।५

कांहींहि कर्म न करितां कोणीहि एक क्षणभर देखील राहूं शकत नाहीं.

४७० न हि खल्वनुपायेन कश्चिदर्थोऽभिसिध्यति।
सूत्रजालैर्यथा मत्स्यान्बध्नन्ति जलजीविनः॥१२।२०३।११

भलत्याच उपायानें कोणतेंहि कार्य खचित सिद्ध होत नाहीं. उदाहरणार्थ जलचरांवर उपजीविका करणारे लोक सुतांचें जालेंच टाकून (वस्त्र टाकून नव्हे) माशांना घेरीत असतात.

४७१ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते॥६।२८।३८

खरोखर ज्ञानासारखें पवित्र या जगांत दुसरें कांहींच नाहीं.

४७२ न हि दैवेन सिध्यन्ति कार्याण्येकेन सत्तम।
न चापि कर्मणैकेन द्वाभ्यां सिद्धिस्तु योगतः॥१०।२।३

(कृपाचार्य अश्वत्थाम्याला सांगतात) हे सज्जनश्रेष्ठा, एकट्या देवाने किंवा एकट्या उद्योगानें कार्यें सिद्धीस जात नसतात. परंतु या दोहोंच्या संयोगानें कोणतेंहि काम साधत असतें.

४७३ न हि पश्यामि जीवन्तं लोके कंचिदहिंसया।
सत्त्वैःसत्त्वाहि जीवन्ति दुर्बलैर्बलवत्तराः॥१२।१५।२०

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) अहिंसावृत्तीनें जगांत जिवंत राहणारा कोणी दिसून येत नाहीं. खरोखर बलवान् प्राणी आपल्याहून दुर्बल असलेल्या प्राण्यांवर उपजीविका करीत असतात.

४७४ न हि प्रमादात्परमस्ति कश्चित्
वधोनराणामिह जीवलोके।
प्रमत्तमर्था हि नरं समन्तात्
त्यजन्त्यनर्थाश्च समाविशन्ति॥१०।१०।१९

यां लोकीं मनुष्यांना बेसावधपणापेक्षां अधिक घातक असें कांहींच नाहीं. बेसावध राहणाऱ्या मनुष्याला सर्व प्रकारची संपत्ति सोडून जाते, आणि त्याच्यावर संकटें मात्र कोसलतात.

४७५ न हि प्राणात्प्रियतरं लोके किंचन विद्यते।
तस्माद्दयां नरः कुर्याद्यथात्मनि तथा परे॥१३।११६।१२

मृत्युलोकीं प्राणापेक्षां प्रियतर असें कांहींच नाहीं. यास्तव, मनुष्यानें स्वतःप्रमाणेंच दुसऱ्यावर दया करावी.

४७६ न हि बुद्ध्यान्वितः प्राज्ञो नीतिशास्त्रविशारदः।
निमज्जत्यापदं प्राप्य महतीं दारुणामपि॥१२।१३८।४०

नीतिशास्त्रनिपुण, बुद्धिमान, चतुर पुरुष केवढेंहि मोठें भयंकर संकट प्राप्त झालें तरी त्यांत बुडून जात नाहीं.

४७७ न हि वैरं महात्मानो विवृण्वन्त्यपकारिषु।
शनैः शनैर्महाराज दर्शयन्ति स्म ते बलम्॥१२।१५७।१०

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) थोर लोक आपला अपकार करणाऱ्याविषयींचें वैर एकदम प्रगट करीत नाहींत. तथापि हलू हलू आपले सामर्थ्य (त्यांना) दाखविल्यावांचून ते रहात नाहींत.

४७८ न हि वैराणि शाम्यन्ति दीर्घकालधृतान्यपि५।७२।६२

वैर दीर्घ कालपर्यंत धारण केलें तरी सुद्धां नाहींसें होत नाहीं.

४७९ न हि शौर्यात्परं किंचित्॥१२।९९।१८

शौर्यापेक्षां श्रेष्ठ कांहींच नाहीं.

४८० न हि संचयवान्कश्चिद्दृश्यते निरुपद्रवः॥३।२।४८

कोणीहि संचय करणारा पुरुष उपद्रवरहित असल्याचें दृष्टोत्पत्तीस येत नाहीं.

४८१ न हि सर्वत्र पाण्डित्यं सुलभं पुरुषेण वै॥३।२८।२७

मनुष्याची बुद्धि सर्वच विषयांत चालणें खचित सोपें नाहीं.

४८२ नहीदृशमनायुष्यं लोके किंचन विद्यते।
यादृशं पुरुषस्येह परदारोपसेवनम्॥१३।१०४।२१

खरोखर, परस्त्रीगमनाइतकें पुरुषाच्या आयुष्याची हानि करणारें जगांत दुसरें कांहीं नाहीं.

४८३ न हृष्यत्यात्मसंमाने नावमानेन तप्यते।
गाङ्गो हृद इवाक्षोभ्यो यः स पण्डित उच्यते॥५।३३।३१

आपला सन्मान झाला असतां जो आनंद मानीत नाहीं, अपमान झाला असतां कष्टी होत नाहीं, आणि गंगेच्या डोहाप्रमाणे ज्याची शांति केव्हांहि ढलत नाहीं त्याला पंडित म्हणतात.

४८४ न ह्यनुप्तं प्ररोहति॥१३।१६३।११

पेरल्याविना उगवत नाहीं.

४८५ न ह्यात्मनः प्रियतरं किंचिद्भूतेषु निश्चितम्॥११।७।२७

प्राणिमात्राला स्वतःपेक्षां प्रिय कांहींच नाहीं हेंनिश्चित होय.

४८६ न ह्यात्मस्तवसंयुक्तं वक्तव्यमनिमित्ततः॥१।३४।३

आत्मस्तुतीनें युक्त असें भाषण कारणावांचून करूं नये.

४८७ न ह्युत्थानमृते दैवं राज्ञामर्थं प्रसाधयेत्॥१२।५६।१४

उद्योगावांचून नुसतें देव राजांचे मनोरथ सिद्धीस नेणार नाहीं.

४८८ न ह्यृतेऽर्थेन वर्तेते धर्मकामाविति श्रुतिः॥१२।१६७।१२

अर्थाला (द्रव्याला) सोडून धर्म व काम हे पुरुषार्थ रहातनाहींत अशी श्रुति आहे.

४८९ नाकारो गूहितुं शक्यो बृहस्पतिसमैरपि॥७।१२।१४

मनांतील हेतु छपविणें बृहस्पतीसारख्यांनाहि शक्य नाहीं.

४९० नाकालतो म्रियते जायते वा
नाकालतो व्याहरते च बालः।
नाकालतो यौवनमभ्युपैति
नाकालतो रोहति बीजमुप्तम्॥१२।२५।११

वेल आल्याशिवाय कोणी मरत नाहीं किंवा जन्माला येत नाहीं. योग्य काल आल्यावांचून लहान मूल बोलूं लागत नाहीं. योग्य कालाशिवाय कोणास तारुण्यावस्था प्राप्त होत नाहीं. आणि पेरलेले बींअकालीं उगवत नाहीं.

४९१ नाकृतात्मा वेदयति धर्माधर्मविनिश्चयम्॥३।२१५।१८

मनोनिग्रह केल्याशिवाय धर्म कोणता, अधर्म कोणता याचें निश्चित ज्ञान होत नाहीं.

४९२ नाकृत्वा लभते कश्चित्
किंचिदत्र प्रियाप्रियम्॥१२।२९८।३०

कांहीं तरी केल्याशिवाय या लोकीं कोणालाहि कांहीं सुखदुःख प्राप्त होत नाहीं.

४९३ नागामिनमनर्थं हि प्रतिघातशतैरपि।
शक्नुवन्ति प्रतिव्योढुमृते बुद्धिबलान्नराः॥१२।२२७।३२

शेंकडों प्रकारचे उपाय केले तरी मनुष्यांना बुद्धिसामर्थ्य असल्यावांचून भावी अनर्थाचा प्रतिकार करितां येणें शक्य नाहीं.

४९४ नाघ्नतः कीर्तिरस्तीह न वित्तं न पुनः प्रजाः।
इन्द्रो वृत्रवधेनैव महेन्द्रः समपद्यत॥१२।१५।१५

शत्रूचा वध न करणाऱ्या राजाला या लोकीं कीर्ति लाभणार नाहीं, धन मिलणार नाहीं आणि त्याची प्रजाहि सुरक्षित राहणार नाहीं. इंद्र सुद्धां वृत्रासुराचा वध करूनच महेंद्रपदवीला पोंचला.

४९५ नाच्छित्त्वा परमर्माणि नाकृत्वा कर्म दारुणम्।
नाहत्वा मत्स्यघातीव प्राप्नोति महतीं श्रियम्॥१२।१४०।५०

शत्रूच्या मर्मस्थानांवर घाव घातल्याशिवाय, भयंकर पराक्रम गाजविल्याशिवाय, आणि मासे मारणाऱ्या कोल्याप्रमाणें हत्त्या केल्याशिवाय मोठ्या लक्ष्मीचा (राजलक्ष्मीचा) लाभ होणार नाहीं.

४९६ नातः पापीयसीं कांचिदवस्थां शम्बरोऽब्रवीत्।
यत्र नैवाद्य न प्रातर्भोजनं प्रति दृश्यते॥५।७२।२२

आजच्या अथवा उद्यांच्याहि अन्नाची तजवीज ज्या अवस्थेमध्यें दृष्टीस पडत नाहीं, त्या अवस्थेपेक्षां कोणतीहि अवस्था अधिक दुःखदायक नाहीं, असें शंबरानेंहि सांगितलें आहे.

४९७ नात्मच्छन्देन भूतानां जीवितं मरणं तथा।
नाप्यकाले सुखं प्राप्यं दुःखं वापि यदूत्तम॥५।७२।५०

(युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणतो) हे यदुश्रेष्ठा, प्राण्यांना आपल्या इच्छेप्रमाणें जन्म किंवा मरण येत नाहीं. तसेंच सुख काय किंवा दुःख काय, अकालीं प्राप्त होत नसतें.

४९८ नात्मच्छिद्रं रिपुर्विद्याद्विद्याच्छिद्रं परस्य तु।
गूहेत्कूर्म इवाङ्गानि रक्षेद्विवरमात्मनः॥१२।१४०।२४

आपलें मर्मस्थान शत्रूला समजूं देऊं नये. आपण मात्र शत्रूचें मर्मस्थान शोधून काढावें. कासव ज्याप्रमाणें आपले सर्व अवयव आपल्या शरीरांतच दडवून ठेवतें त्याप्रमाणें राज्याचीं सर्व अंगें गुप्त राखावीं. आणि आपल्या छिद्रांविषयीं जपून असावें.

४९९ नात्यन्तं गुणवत्किंचिन्न चाप्यत्यन्तनिर्गुणम्।
उभयं सर्वकार्येषु दृश्यते साध्वसाधु वा॥१२।१५।५०

सर्वस्वी गुणसंपन्न असें कांहीं नाहीं. आणि सर्वथा गुणहीनहि कांहीं नाहीं. सर्व गोष्टींत बरें व वाईट हीं दोनहि असलेली दिसून येतात.

५०० नादेशकाले किंचित्स्यादेशकालौ प्रतीक्षताम् ३।२८।३२

देशकाल अनुकूल नसतां कांहीं होणार नाहीं. यास्तव, देशकालाकडे नजर द्यावी.

५०१ नाधनो धर्मकृत्यानि यथावदनुतिष्ठति।
धनाद्धि धर्मः स्रवति शैलादभि नदी यथा॥१२।८।२३

द्रव्य नसतां धर्मकृत्यें यथासांग करितां येत नाहींत. पर्वतापासून जशी नदी, तसा द्रव्यापासून धर्म उत्पन्न होतो.

५०२ नाधर्मश्चरितोराजन्सद्यः फलति गौरिव।
शनैरावर्त्यमानो हि कर्तुर्मूलानि कृन्तति॥१।८०।२

(शुक्राचार्य वृषपर्व्याला म्हणतात) हे राजा, केलेलें पाप गाईप्रमाणें (गाईला खाणें घालतांच ती दूध देते त्याप्रमाणें) ताबडतोब फल देत नाहीं. परंतु तें पुनः पुनः केलें जाऊन हलूहलू कर्त्याचीं पालें मुलें खणून काढतें.

५०३ नाधर्मो विद्यते कश्चिच्छत्रून्हत्वाततायिनः।
अधर्म्यमयशस्यं च शात्रवाणां प्रयाचनम्॥५।३।२१

आततायी अशा शत्रूंना ठार मारल्यानें कसलाहि अधर्म होत नाहीं. परंतु शत्रूजवल याचना करणें हें मात्र धर्माच्या विरुद्ध असून कीर्तीला कालिमा लावणारें आहे.

५०४ नान्यत्र विद्यातपसोर्नान्यत्रेन्द्रियनिग्रहात्।
नान्यत्र लोभसंत्यागाच्छान्तिं पश्यामि तेऽनघ॥५। ३६।५१

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे निष्पाप राजा, विद्या व तप यांच्यावांचून, इंद्रियनिग्रहावांचून, आणि लोभाचा सर्वथा त्याग केल्यावांचून तुला शांति प्राप्त होण्याचा अन्य मार्ग दिसत नाहीं.

५०५ नान्यद्दुःखतरं किंचिल्लोकेषु प्रतिभाति मे।
अर्थैर्विहीनः पुरुषः परैः संपरिभूयते॥३।१९३।२०

(बकमुनि इंद्राला म्हणतात) लोक द्रव्यहीन पुरुषाचा सर्व प्रकारें अपमान करितात, यापेक्षां अधिक दुःखदायक गोष्ट जगांत दुसरी कोणतीहि असेल, असें मला वाटत नाहीं.

५०६ नापराधोऽस्ति नारीणां नर एवापराध्यति।
सर्वकार्यापराध्यत्वान्नापराध्यन्ति चाङ्गनाः॥१२।२६६।४०

(स्त्रियांचेंपाऊल कुमार्गाकडे वव्टण्याच्या कामीं) स्त्रियांचा कांहींएक अपराध नाहीं. या कामीं पुरुष हाच सर्वस्वीं दोषी असतो. अशा प्रकारच्या सर्व बाबतींत पहिली आगलीक पुरुषाकडून होत असल्यामुलें स्त्रीवर्गाकडे दोष येत नाहीं.

५०७ नापृष्टः कस्यचिद्ब्रूयान्नाप्यन्यायेन पृच्छतः।
ज्ञानवानपि मेधावी जडवत्समुपाविशेत्॥१२।२८७।३५

कोणी प्रश्न न करितां किंवा अन्यायानें प्रश्न केला असतांहि शहाण्या मनुष्यानें उत्तर देऊं नये. तर त्यास त्या गोष्टीचें ज्ञान असूनहि त्यानें अजाणत्याप्रमाणें गप्प बसावें.

५०८ नाप्राप्यं तपसः किंचित्॥१२।२९५।२३

तपाला अप्राप्य असें कांहींच नाहीं.

५०९ नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम्।
आपत्सु च न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः॥५।३३।२८

विचारी लोक अप्राप्य वस्तूचा अभिलाष धरीत नाहींत, गेलेल्याचा शोक करीत नाहींत, आणि अडचणीच्या प्रसंगीं भांबावून जात नाहींत.

५१० नाभीतो यजते राजन्नाभीतो दातुमिच्छति।
नाभीतः पुरुषः कश्चित्समये स्थातुमिच्छति॥१२।१५।१३

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) राजा, (दंडाची) भीति असल्याशिवाय कोणी यज्ञ करीत नाहीं, भीति वाटल्याशिवाय कोणाला दान करण्याची इच्छा होत नाहीं, आणि भीति वाटल्याशिवाय कोणी मनुष्य केलेला करार पालूं इच्छित नाहीं.

५११ नामर्षं कुरुते यस्तु पुरुषः सोऽधमः स्मृतः॥२।५०।१७

ज्या पुरुषाला (दुसऱ्यानें अपमान केला असतां ) क्रोध येत नाहीं, तो अधम समजावा.

५१२ नाऽमृतस्य हि पापीयान्भार्यामालभ्य जीवति४।१७।१५

(कीचकानें अपमान केला असतां द्रौपदी संतप्त होऊन पांडवांस म्हणते) जिवंत पुरुषाच्या भार्येचा अपमान करणारा पापी कदापि जिवंत राहू शकणार नाहीं !

५१३ नायमत्यन्तसंवासो लभ्यते जातु केनचित्।
अपि स्वेन शरीरेण किमुतान्येन केनचित्॥१२।२८।५२

कोणासहि खुद्द आपल्या शरीराचासुद्धां सहवास चिरकाल लाभत नाहीं. मग इतर वस्तूंची कथा काय?

५१४ नायं परस्य सुकृतं दुष्कृतं चापि सेवते।
करोति यादृशं कर्म तादृशं प्रतिपद्यते॥१२।२९०।२२

हा जीवात्मा दुसऱ्याचें सुकृत किंवा दुष्कृत भोगीत नाहीं. तर स्वतः ज्या प्रकारचें कर्म करतो त्याप्रकारचें फल भोगतो.

५१५ नारभेतान्यसामर्थ्यात्पुरुषः कार्यमात्मनः।
मतिसाम्यं द्वयोर्नास्ति कार्येषु कुरुनन्दन॥२।५६।८

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे कुरुनंदना, मनुष्यानें दुसऱ्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून आपलें कार्य हातीं घेऊं नये, कारण, एकाच कार्याविषयीं दोघांचें सारखें मत नसतें.

५१६ नालं सुखाय सुहृदो नालं दुःखाय शत्रवः।
न च प्रज्ञालमर्थानां न सुखानामलं धनम्१२।१७४।२९

मित्र असले म्हणून ते सुख देऊं शकतात असें नाहीं, व शत्रु असले म्हणून ते दुःख देऊं शकतात असेंहि नाहीं, बुद्धीच्या योगानें द्रव्यप्राप्ति होतेच असें नाहीं, व द्रव्याच्या योगानें सुख होतेंच असेंहि नाहीं.

५१७ नालसाः प्राप्नुवन्त्यर्थान्न क्लीबानाभिमानिनः।
न च लोकरवाद्भीता न वै शश्वत्प्रतीक्षिणः१२।१४०।२३

आलशी, दुर्बल, गर्विष्ठ, लोकापवादाला भिणारे, आणि नेहमींवाट पहात राहणारे दीर्घसूत्री अशांना इष्टप्राप्ति होत नाहीं.

५१८ नावं न शक्यमारुह्य स्थले विपरिवर्तितुम्।
तथैव रथमारुह्य नाप्सु चर्या विधीयते॥१४।५०।३०

(कर्माधिकाऱ्याकडून योगाचें व योगाधिकाऱ्याकडून कर्माचें अनुष्ठान होणें शक्य नाहीं याविषयीं दृष्टान्त)नावेंत बसून जमिनीवर इकडे तिकडे हिंडतां येणें शक्य नाहीं. आणि रथांत बसून पाण्यावर चालतां येणार नाहीं.

५१९ नाश्रोत्रियः श्रोत्रियस्य नारथी रथिनः सखा।
नाराजा पार्थिवस्यापि सखिपूर्वंकिमिष्यते॥१।१३१।११

(द्रुपद राजाशीं असलेली पूर्वीची गुरुगृहींची मैत्री लक्षांत आणून द्रोणाचार्य त्याजकडे गाय मागण्यासाठीं गेले असतां पूर्वीची मैत्री आतां कशी टिकेल असें द्रुपदराजानें उत्तर दिलें) वेदवेत्त्याब्राह्मणाचा मित्र वेद न जाणणारा नसतो. रथांतून लढणाऱ्या योद्ध्याचा मित्र त्याच्या सारखा असतो. राजाचा मित्र राजाच असतो. पूर्वीची मैत्री पुढें करून काय इच्छितोस?

५२० नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः॥६।२६।१६

जें मूलांतच नाहीं तें अस्तित्वांत येणें शक्य नाहीं, आणि जें आहे तें नाहींसें होणें शक्य नाहीं. या दोहोंच्या खऱ्या स्वरूपाचा निर्णय तत्ववेत्या पुरुषांनी जाणिलेला असतो.

५२१ नासम्यक्कृतकारी स्यादप्रमत्तः सदा भवेत्।
कण्टको ह्यपि दुश्छिन्नो विकारं कुरुते चिरम्१२।१४०।६०

निष्कालजीपणानें कांहीं करूं नये. नेहमीं सावध असावें.कारण, एकादा कांटासुद्धां जर अयोग्य रीतीनें तुटला तर तो पुष्कल कालपर्यंत विकार उत्पन्न करतो.

५२२ नास्ति जात्या रिपुर्नाम मित्रं वापि न विद्यते।
सामर्थ्ययोगाज्जायन्ते मित्राणि रिपवस्तथा॥१२।१४०।५१

खरोखर जन्मतःच कोणी शत्रु नसतो किंवा मित्रहि नसतो. सामर्थ्याच्या योगानें मित्र आणि शत्रु हे होत असतात.

५२३ नास्ति भार्यासमो बन्धुर्नास्ति भार्यासमा गतिः।
नास्ति भार्यासमो लोके सहायो धर्मसंग्रहे॥१२।१४४।१६

भार्येसारखा मित्र नाहीं, भार्येसारखा आसरा नाहीं. या लोकीं भार्येसारखा धर्मसंग्रहाच्या कामीं साहाय्य करणारा कोणी नाहीं.

५२४ नास्ति मातृसमाच्छाया नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया॥१२।२६६।३१

मातेसारखी सांवली नाहीं, मातेसारखी गति नाहीं, मातेसारखें छत्र नाहीं. मातेसारखी प्रिय कोणी नाहीं.

५२५ नास्ति विद्यासमं चक्षुर्नास्ति सत्यसमं तपः।
नास्ति रागसमं दुःखं नास्ति त्यागसमं सुखम्॥१२।३२९।६

विद्येसारखा अन्य नेत्र नाहीं. सत्यासारखें तप नाहीं. विषयवासनेसारखें दुःख नाहीं, आणि त्यागासारखें सुख नाहीं.

५२६ नास्ति वै जातितः शत्रुः पुरुषस्य विशांपते।
येन साधारणी वृत्तिः स शत्रुर्नेतरो जनः॥२।५५।१५

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) राजा, जन्मतःच कोणी मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा शत्रु नसतो. आपल्या सारखीच ज्याची उपजीविका असेल तोच आपला शत्रु; दुसरा कोणी नाहीं.

५२७ नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम्।
न हि तीव्रतरं किंचिदनृतादिह विद्यते॥१।७४।१०५

सत्यापरता धर्म नाहीं, सत्यापेक्षां श्रेष्ठ कांहीं नाहीं. असत्यापेक्षां अधिक भयंकर असें जगांत कांहींच नाहीं.

५२८ नास्थाने प्रक्रिया क्षमा॥१२।११९।३

अस्थानीं बहुमान करणं योग्य नव्हे.

५२९ नाहं राज्यं भवद्दत्तं भोक्तुमिच्छामि पार्थिव।
बाहुवीर्यार्जितं राज्यमश्नीयामिति कामये॥१२।७४।१८

(मुचुकुंद कुबेराला म्हणतो) हे राजा, तुझ्याकडून दान मिलालेलें राज्य भोगण्याची माझी इच्छा नाहीं. राज्य स्वतःच्या बाहुबलानें मिलवून त्याचा उपभोग घ्यावा असें मी इच्छितों.

५३० नाह्ना पूरयितुं शक्या न मासैर्भरतर्षभ।
अपूर्यांपूरयन्निच्छामायुषापि न शक्नुयात्॥१२।१७।४

(युधिष्ठिर भीमाला म्हणतो) हे भरतश्रेष्ठा, वासनेची तृप्ति एका दिवसाने किंवा कांहीं महिन्यांनींहि होणें शक्य नाहीं. वासना ही ‘अपूर्य’ असून तिची पूर्ति करणें सबंध आयुष्य खर्चून सुद्धां शक्य नाहीं.

५३१ निकृत्या निकृतिप्रज्ञा हन्तव्या इति निश्चयः।
न हि नैकृतिकं हत्वा निकृत्या पापमुच्यते॥३।५२।२२

कपटबुद्धि शत्रूंचा कपटानेंच वध केला पाहिजे असा सिद्धांत आहे. कपटी शत्रूचा कपटानें वध केला असतां त्याला पाप म्हणत नाहींत.

५३२ नित्यं यस्तु सतो रक्षेदसतश्च निवर्तयेत्।
स एव राजा कर्तव्यस्तेन सर्वमिदं धृतम्॥१२।७८।४४

जो नेहमीं सज्जनांचेंपालन करील आणि दुर्जनांना घालवून देईल त्यालाच राजा करावें. त्याच्याच आश्रयानें सर्व विश्व असतें.

५३३ नित्यं रक्षितमन्त्रःस्याद्यथा मूकः शरच्छिखी।१२।१२०।७

ज्याप्रमाणें मोर हा शरदृतूंत मौन धारण करतो, त्याप्रमाणें राजानें आपली मसलत नेहमीं गुप्त राखावी.

५३४ नित्यं विश्वासयेदन्यान्।
परेषां तु न विश्वसेत्॥१२।१३८।१९५

आपल्याविषयीं दुसऱ्यांच्या मनांत नेहमीं विश्वास उत्पन्न करावा. आपण मात्र दुसऱ्यावर विश्वास ठेवूं नये.

५३५ नित्यमुद्यतदण्डस्य भृशमुद्विजते नरः।
तस्मात्सर्वाणि भूतानि दण्डेनैव प्रसाधयेत्॥१२।१४०।८

दंडशक्ति नेहमीं सज्ज असली म्हणजे लोक फार वचकून असतात. यास्तव राजानें सव प्राण्यांना दंडशक्तीच्या योगानेंच आपल्या ताब्यांत ठेवावें.

५३६ नित्यं बुद्धिमतोऽप्यर्थः स्वल्पकोऽपि विवर्धते।
दाक्ष्येण कुर्वतः कर्म संयमात्प्रतितिष्ठति॥१२।१३९।८८

बुद्धिमान् पुरुषाजवल आरंभीं अगदीं थोडें द्रव्य असलें तरी तें नेहमीं वाढत जातें. दक्षतेनें उद्योग करणाराचें कार्य निग्रहामुलें पक्केंहोतें.

५३७ नित्योद्विग्नाः प्रजा यस्य करभारप्रपीडिताः।
अनर्थैर्विप्रलुप्यन्ते स गच्छति पराभवम्१२।१३९।१०९

ज्या राजाच्या प्रजा नेहमीं भयभीत आहेत, करांच्या ओझ्यामुलें चिरडून गेल्या आहेत, अनेक संकटांनीं लुटल्या जात आहेत (संकटें येऊन त्यांचें द्रव्य लुबाडलें जात आहे) त्या राजाचा पराभव होतो.

५३८ निमेषमात्रमपि हि वयो गच्छन्न तिष्ठति।
स्वशरीरेष्वनित्येषु नित्यं किमनुचिन्तयेत्१२।३३०।२२

आयुष्य एकसारखें चाललें असून एक पलभरसुद्धां थांबत नाहीं. स्वतःचें शरीरच जेथें अशाश्वत, तेथें कोणती वस्तु शाश्वत म्हणून समजावयाची?

५३९ नियन्ता चेन्न विद्येत न कश्चिद्धर्ममाचरेत्॥४।६८।४५

नियमन करणारा कोणी नसेल तर कोणीहि धर्माप्रमाणें वागणार नाहीं.

५४० निरीहो नाश्नुते महत्॥५।१३३।३४

महत्त्वाकांक्षा नसणाऱ्या पुरुषाला मोठेपणा प्राप्त होत नाहीं.

५४१ निर्मन्युश्चाप्यसंख्येयः पुरुषः क्लीबसाधनः।५।१३३।६

ज्याला कधीं राग येत नाहीं असा नामर्द पुरुष कोणाच्या खिसगणतींत नसतो.

५४२ निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम्।
तस्माद्व्याघ्रो वनं रक्षेद्वनं व्याघ्रं च पालयेत्॥५।२९।५५

वन नसेल तर वाघांचा वध होत असतो, आणि ज्यांत वाघ नाहीं तें वनहि लोकांकडून तोडलें जातें. यास्तव वाघानें बनाचें रक्षण करावें, आणि वनानेंहि वाघाचें पालन करावें.

५४३ निश्चयः स्वार्थशास्त्रेषु विश्वासश्चासुखोदयः१२।१३९।७०

नीतिशास्त्राचा असा सिद्धांत आहे कीं, (अस्थानीं) विश्वास हा सर्व दुःखांचें उत्पत्तिस्थान आहे.

५४४ निश्चित्य यः प्रक्रमते नान्तर्वसति कर्मणः।
अवन्ध्यकालो वश्यात्मा स वै पण्डित उच्यते॥५।३३।२९

प्रथम निश्चय केल्यावरच जो कार्य हातीं घेतो, कार्य मध्येंच सोडून जो स्वस्थ बसत नाहीं, जो आपला वेल फुकट घालवीत नाहीं आणि ज्याचें मन स्वाधीन आहे त्याला पंडित असें म्हणतात.

५४५ निषेवते प्रशस्तानि निन्दितानि न सेवते।
अनास्तिकः श्रद्दधान एतत्पण्डितलक्षणम्॥५।३३।२१

जो प्रशस्त कर्मांचें आचरण करतो, निंद्य कर्मापासून दूर राहतो (पुनर्जन्म, परलोक इत्यादिकांविषयों) आस्तिक्यबुद्धि धारण करतो, आणि (गुरु, वेदवाक्य इत्यादींवर) विश्वास ठेवतो तो पंडित होय.

५४६ नैकमिच्छेद्गणं हित्वा स्याच्चेदन्यतरग्रहः।
यस्त्वेको बहुभिः श्रेयान्कामं तेन गणं त्यजेत्॥
श्रेयसो लक्षणं चैतद्विक्रमो यस्य दृश्यते१२।८३।१२-१३

समुदायाला सोडून (राजानें) एकाच मनुष्याची इच्छा करूं नये; व एकाचाच अंगीकार करणें अवश्य असल्यास, जो एकटा इतर पुष्कलांपेक्षां श्रेष्ठ असेल, त्याचा स्वीकार करून समुदायाचा खुशाल त्याग करावा. कारण, ज्या पक्षांत जास्त पराक्रम असेल तो स्वीकारणें हें कल्याणाचें लक्षण आहे.

५४७ नैवास्य कश्चिद्भविता नायं भवति कस्यचित्।
पथि सङ्गतमेवेदं दारबन्धुसुहृज्जनैः॥१२।२८।३९

ह्या जीवात्म्याचा कोणी नाहीं आणि हा कोणाचा नाहीं. स्त्री, इतर नातलग व इष्ट मित्र यांचा सहवास हा केवल रस्त्यांतील भेटीसारखा आहे.

५४८ नैवाहितानां सततं विपश्चितः
क्षणं प्रतीक्षन्त्यपि दुर्बलीयसाम्।
विशेषतोऽरीन्व्यसनेषु पण्डितो
निहत्य धर्मं च यशश्च विन्दते॥८।९०।७१

शत्रु दुर्बल झाले म्हणजे शहाणे लोक केव्हांहि त्यांचा नाश करण्याला क्षणभरदेखील विलंब लावीत नाहींत. शहाण्या मनुष्यानें विशेषतः शत्रु संकटांत असतांनाच त्याचा वध केला असतां त्याजकडून धर्माचरण घडून शिवाय त्यास कीर्तिही प्राप्त होते.

५४९ नोदकक्लिन्नगात्रस्तु स्त्रात इत्यभिधीयते।
स स्नातो यो दमस्नातः स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥१३।१०८।९

पाण्यानें आंग भिजलें म्हणजे स्नान झालें असें म्हणत नाहींत. ज्यानें इंद्रियदमनरूप उदकांत स्नान केलें तोच खरोखर ‘स्नात’ झाला. तो अंतर्बाह्य शुचिर्भूत झाला.

५५० पक्कानां हि वधे सूत वज्रायन्ते तृणान्युत॥७।११।४८

(धृतराष्ट्र संजयाला म्हणतो) हे सूता, पक्व झालेल्यांचा वध करण्याच्या कामीं तृणाचासुद्धां वज्रासारखा उपयोग होतो.

५५१ पञ्चमेऽहनि षष्ठे वा शाकं पचति स्वे गृहे।
अनृणी चाप्रवासी च स वारिचर मोदते॥३।३१३।११५

(युधिष्ठिर म्हणतो) हे यक्षा, पांचव्या अथवा सहाव्या दिवशीं कां होईना, जो स्वतःचे घरींच असेल तो भाजीपाला उकडून खातो, ज्याला कोणाचें देणें नाहीं, आणि ज्याला प्रवास करावा लागत नाहीं तो, आनंदानें राहतो.

५५२ पञ्चेन्द्रियस्य मर्त्यस्य छिद्रं चेदेकमिन्द्रियम्।
ततोऽस्य स्रवति प्रज्ञा दृतेः पात्रादिवोदकम्॥५।३३।८२

मनुष्याच्या पांच इंद्रियांपैकीं एकादें जरी ताब्यांत नसेल तरी त्याच्या द्वारें, चर्मपात्रांतील पाणी भोंकांतून गलून जावें त्याप्रमाणें त्याची बुद्धि नष्ट होते.

५५३ पठकाः पाठकाश्चैव ये चान्ये शास्त्रचिन्तकाः।
सर्वे व्यसनिनो मूर्खा यः क्रियावान्स पण्डितः॥३।३१३।११०

शिकणारे व शिकविणारे तसेंच इतर जे कोणी शास्त्राविषयीं विचार करितात ते सर्व नादिष्ट, मूर्ख आहेत. जो कांहीं तरी करून दाखवितो तोच खरा शहाणाः

५५४ पण्डितेन विरुद्धः सन् दूरस्थोऽस्मीति नाश्वसेत्।
दीर्घौ बुद्धिमतो बाहू याभ्यां हिंसति हिंसितः॥१२।१४०।६८

पंडिताशीं विरोध आला असतां, आपण त्याच्यापासून दूर आहों असें समजून निर्भयपणें राहूं नये. कारण बुद्धिमान् पुरुषाचे बाहु (दिसण्यांत जेवढे दिसतात तेवढे नसून ते) फार लांब असतात, व त्याला पीडा दिल्यास त्यांच्या योगानें तो पीडा देणाऱ्यांचा वध करतो.

५५५ पतितः शोच्यते राजन्निर्धनश्चापि शोच्यते।
विशेषं नाधिगच्छामि पतितस्याधनस्य च॥१२।८।१५

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) राजा, लोक पातकी मनुष्याच्या संबंधानें हलहलतात आणि निर्धनाच्या संबंधानेंहि हलहलतात. मला तर पातकी आणि दरिद्री यांच्यामध्यें कांहों भेद दिसत नाहीं.

५५६ पतिर्हि देवो नारीणां पतिर्बन्धुः पतिर्गतिः।
पत्या समा गतिर्नास्ति दैवतं वा यथा पतिः॥१३।१४६।५५

पति हाच स्त्रियांचा देव, पति हाच बांधव, आणि पति हेंच आश्रयस्थान, स्त्रियांना पतीसारखी गति नाहीं, पति हा खरोखर देवासमान होय.

५५७ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः॥६।३३।२६

(भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात) पान, फूल, फल, किंवा (नुसतें) पाणी सुद्धां जो मला भक्तिपूर्वक अर्पण करितो, त्या शुद्ध अंतःकरणाच्या मनुष्याचें भक्तीनें अर्पण केलेलें तें मी स्वीकारीत असतों.

५५८ परं विषहते यस्मात्तस्मात्पुरुष उच्यते॥५।३३।३५

शत्रूचा प्रतिकार करतो म्हणून पुरुष म्हणतात.

५५९ परं क्षिपति दोषेण वर्तमानः स्वयं तथा।
यश्चक्रुध्यत्यनीशानः स च मूढतमो नरः॥५।३३।४२

जो दोष स्वतःचे ठिकाणीं आहे त्याच दोषाबद्दल जो दुसऱ्याला नांवें ठेवितो, तसेंच आंगीं सामर्थ्य नसतां जो रागावतो तो मनुष्य पराकाष्ठेचा मूर्ख होय.

५६० परनेयोऽग्रणीर्यस्य स मार्गान्प्रतिमुह्यति।
पन्थानमनुगच्छेयुः कथं तस्य पदानुगाः॥२।५५।४

ज्याचा पुढारी दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा असतो, त्याचा स्वतःचाच मार्ग चुकतो. तेव्हां त्याच्या पावलावर पाऊल टाकून जाणारांना योग्य मार्ग कसा सांपडावा?

५६१ परवाच्येषु निपुणः सर्वो भवति सर्वदा।
आत्मवाच्यं न जानीते जानन्नपि च मुह्यति॥८।४५।४४

दुसऱ्याचे दोष काढण्यांत सर्वजण प्रवीण असतात. कोणालाहि स्वतःचा दोष मात्र समजत नाहीं; आणि समजला तर उमजत नाहीं.

५६२ परश्रिया न तप्यन्ति ये सन्तः पुरुषर्षभाः।
ग्राम्यादर्थान्निवृत्ताश्च दुर्गाण्यतितरन्ति ते॥१२।११०।१७

जे श्रेष्ठ सत्पुरुष दुसऱ्याच्या संपत्तीनें संतप्त होत नाहींत आणि ग्राम्य विषयांपासून निवृत्त आहेत ते संकटांतून तरून जातात.

५६३ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥६।२८।८

(श्रीकृष्ण म्हणतात) सज्जनांचें संरक्षण करण्यासाठीं, दुष्टांचें निर्दलन करण्यासाठीं, आणि धर्माची संस्थापना करण्यासाठीं युगायुगांच्या ठिकाणींमी अवतार घेत असतों.

५६४ पर्जन्यः पर्वते वर्षन् किं नु साधयते फलम्।
कृष्टे क्षेत्रे तथा वर्षन् किं न साधयते फलम्॥१०।२।५

पाऊस डोंगरावर पुष्कल पडला तरी त्यापासून कोणतें बरें फल मिलणार? तोच नांगरलेल्या शेतांत पडला तर कोणतें फल मिलणार नाहीं?

५६५ पर्जन्यनाथाः पशवो राजानो मन्त्रिबान्धवाः।
पतयो बान्धवाः स्त्रीणां ब्राह्मणा वेदबान्धवाः॥५।३४।३८

पर्जन्य हा पशूंचा बांधव (हितकर्ता) होय. राजांचा बांधव प्रधान. स्त्रियांचा बांधव पति, आणि ब्राह्मणांचा बांधव वेद होय.

५६६ पर्यङ्कशय्या भूमिश्च समाने यस्य देहिनः।
शालयश्च कदन्नं च यस्य स्यान्मुक्त एव सः१२।२८८।३४

पलंगावर पहुडणें व जमिनीवर पडणें हीं दोनहि ज्याला सारखींच वाटतात, तसेंच पक्वान्न आणि कदन्न ज्याला सारखेंच तो मुक्तच होय.

५६७ पात्रे दानं स्वल्पमपि काले दत्तं युधिष्ठिर।
मनसा हि विशुद्धेन प्रेत्यानन्तफलं स्मृतम्॥३।२५९।३४

(व्यासमुनि म्हणतात) हे युधिष्ठिरा, योग्य ठिकाणीं योग्य वेलीं शुद्ध मनानें केलेलें दान अत्यल्प जरी असलें, तरी त्यापासून मरणोत्तर मोठें फल मिलतें.

५६८ पानमक्षास्तथा नार्यो मृगया गीतवादितम्।
एतानि युक्त्या सेवेत प्रसङ्गो ह्यत्र दोषवान्॥१२।१४०।२६

मद्य, जुगार त्याचप्रमाणें स्त्रिया, मृगया आणि गाणें बजावणें यांचे जपून सेवन करावें. कारण, यांची चटक लागणें फार वाईट.

५६९ पापानां विद्ध्यधिष्ठानं लोभमेव द्विजोत्तम॥३।२०७।५८

(धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणतो) हे द्विजश्रेष्ठा, सर्व पापांचे आश्रयस्थान लोभ हेंच आहे असें जाण.

५७० पापेभ्यो हि धनं दत्तं दातारमपि पीडयेत्।
तस्माद्धर्मार्थमनृतमुक्त्वा नानृतभाग्भवेत्॥८।६९।६५

दुष्टांना धन मिलूंदिलें असतां त्यापासून देणारालासुद्धां पीडा होते. (म्हणून चोराला धन कोठें आहे हें सांगण्यापेक्षां खुशाल खोटें सांगावें.) म्हणून धर्मासाठीं खोटें बोललें असतां खोटें बोलण्याचें पाप लागत नाहीं.

५७१ पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
पुत्राश्च स्थाविरे भावे न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति१३।४६।१४

स्त्रीचें कुंवारपणीं बाप रक्षण करितो, तरुणपणीं पति रक्षण करितो, आणि वृद्धपणीं मुलगे रक्षण करितात, एवंच, स्त्री ही स्वातंत्र्याला पात्र नाहीं.

५७२ पित्रा पुत्रो वयःस्थोऽपि सततं वाच्य एव तु।
यथा स्याद्गुणसंयुक्तः प्राप्नुयाच्च महद्यशः॥१।४२।४

मुलगा मोठा झाला असला, तरी सुद्धां तो सद्गुणी व्हावा आणि त्याला उत्तम प्रकारचेंयश लाभावें, म्हणून बापानें त्याला तशा प्रकारचा उपदेश करावा.

५७३ पिवन्त्येवोदकं गावो मण्डूकेषु रुवत्स्वपि॥१२।१४१।८२

(तल्यांतील) बेडकांनी कितीहि डरांव डरांव केलें तरी गाई. पाणी पितातच !

५७४ पुत्र आत्मा मनुष्यस्य भार्या दैवकृतः सखा॥३।३१३।७२

पुत्र हाच मनुष्याचा आत्मा होय, आणि भार्या हा देवानें प्राप्त झालेला सखा होय.

५७५ पुत्रं हि मातापितरौ त्यजतः पतितं प्रियम्।
लोको रक्षति चात्मानं पश्य स्वार्थस्य सारताम्॥१२।१३८।१४६

आपला पुत्र प्रिय असूनहि पतित झाला तर आईबापसुद्धां त्याचा त्याग करतात. लोकहि (इतरांकडे न पाहतां) स्वतःचें संरक्षण करीत असतात. स्वार्थाचा प्रभाव केवढा आहे पहा !

५७६ पुत्र नात्मावमन्तव्यः पूर्वाभिरसमृद्धिभिः॥५।१३।५२५

(विदुला माता संजयाला म्हणते) हे पुत्रा, प्रथमतः आपणापाशीं जरी संपत्ति नसली तरी त्याकरितां पुरुषानें स्वतःला दीन समजूं नये.

५७७ पुत्रपौत्रोपपन्नोऽपि जननीं यः समाश्रितः।
अपि वर्षशतस्यान्ते स द्विहायनवच्चरेत्॥१२।२६६।२८

मनुष्य पुत्रपौत्रांनीं युक्त असला तरी ज्याला मातेचा आश्रय आहे, तो आपल्या वयाच्या शंभराव्या वर्षाच्या शेवटींहि दोन वर्षांच्या लहान मुलाप्रमाणें वागेल !

५७८ पुत्रस्पर्शात्सुखतरः स्पर्शो लोके न विद्यते॥१।७४।५८

पुत्रस्पर्शापेक्षां सुखकर स्पर्श जगांत कोणताच नाहीं.

५७९ पुत्रः सखा वा भ्राता वा पिता वा यदि वा गुरुः।
रिपुस्थानेषु वर्तन्तो हन्तव्या भूतिमिच्छता॥१।१४०।५२

पुत्र, मित्र, भाऊ, बाप किंवा गुरु कोणीहि असो, तो जर शत्रुत्वानें वागत असेल तर त्याचा उत्कर्षेच्छु पुरुषानें वध करावा.

५८० पुत्रा इव पितुर्गेहे विषये यस्य मानवाः।
निर्भया विचरिष्यन्ति स राजा राजसत्तमः१२।५७।३३

बापाच्या घरांत जसे मुलगे, तसे ज्याच्या राज्यांत लोक निर्भयपणें संचार करूं शकतात, तो राजा सर्व राजांत श्रेष्ठ होय.

५८१ पुनरावर्तमानानां भग्नानां जीवितैषिणाम्।
भेतव्यमरिशेषाणामेकायनगता हि ते॥९।५८।१५

जिवाची इच्छा करणारे पण एकदा पराभव पावले असून, पुनः उलटून येणारे असे जे शत्रुकडील उरलेले लोक त्यांचे भय धरावें कारण, (मारीन किंवा मरेन एवढा) एकच विषय त्यांच्या दृष्टीपुढें असतो.

५८२ पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुवा॥१।७४।३९

पुत्र नामक नरकापासून मुलगा हा बापाचें रक्षण करतो, म्हणून त्याला स्वतः ब्रह्मदेवानेंच पुत्र असें म्हटलें आहे.

५८३ पुरुषे पुरुषे बुद्धिर्या या भवति शोभना।
तुष्यन्ति च पृथक्सर्वे प्रज्ञया ते स्वया स्वया॥१०।३।३

प्रत्येक मनुष्यामध्यें जो म्हणून शहाणपणाचा भाग असतो तेवढ्यावरच जो तो आपआपल्या ठिकाणीं खूष असतो.

५८४ पुष्पं पुष्पं विचिन्वीत मूलच्छेदं न कारयेत्।
मालाकार इवारामे न यथाङ्गारकारकः॥५।३४।१८

बागेंतील माल्याप्रमाणें वृक्षाचें मूल न तोडितां फूल येईल तेवढें घेत असावें. लोणाऱ्याप्रमाणें मुलासकट वृक्ष तोडून टाकूं नये.

५८५ पूर्वं संमानना यत्र पश्चाच्चैव विमानना।
जह्यात्तत्सत्त्ववान्स्थानं शत्रोः संमानितोऽपि सन्॥१२।१३९।३३

जेथें पहिल्यानें बहुमान मिलतो व मागाहून अपमान होतो तें ठिकाण शत्रूकडून पुनरपि मानसन्मान मिलाला तरी स्वाभिमानी पुरुषानें सोडूनच दिलें पाहिजे.

५८६ पृथिवी रत्नसंपूर्णा हिरण्यं पशवः स्त्रियः।
नालमेकस्य तत्सर्वमिति मत्वा शमं व्रजेत्॥१।७५।५१

रत्नांनीं परिपूर्ण असलेली सर्व पृथ्वी, सोनें, पशु, स्त्रिया हेंसर्व एकट्याला मिलालें तरी, पुरेसें वाटणार नाहीं असा विचार करून मनुष्यानें मनोनिग्रह करण्यास शिकावें

५८७ प्रक्षालनाद्धि पङ्कस्य श्रेयो न स्पर्शनं नृणाम्॥३।२।४९

चिखल (आंगावर उडाल्यावर) धुऊन टाकण्यापेक्षां त्याला स्पर्शच न करणें मनुष्यांना सुखावह होतें.

५८८ प्रच्छन्नो वा प्रकाशो वा योगो योऽरिं प्रबाधते।
तद्वै शस्त्रं शस्त्रविदां न शस्त्रं छेदनं स्मृतम्॥२।५५।९

उघड असो अथवा गुप्त असो, ज्या उपायानें शत्रूचा नाश होत असेल त्या उपायालाच वीरांचें शस्त्र म्हणतात. (हातपाय) तोडणाऱ्या शस्त्राला शस्त्र म्हणत नाहींत.

५८९ प्रजा यस्य विवर्धन्ते सरसीव महोत्पलम्।
स सर्वफलभाग्राजा स्वर्गलोके महीयते॥१२।१३९।११०

ज्या राजाच्या प्रजा सरोवरांतील मोठ्या कमलांप्रमाणें वृद्धिंगत होत असतात, त्याला सर्व प्रकारचीं फलें प्राप्त होतात व तो स्वर्गामध्यें पूज्य होतो.

५९० प्रज्ञया मानसं दुःखं हन्याच्छारीरमौषधैः।
एतद्विज्ञानसामर्थ्यं न बालैः समतामियात्॥१२।२०५।३

मानसिक दुःख विवेकानें आणि शारीरिक दुःख औषधानें नाहींसें करावें अशा प्रकारें दुःखाचा नाश करणें हेंच ज्ञानाच्या सामर्थ्याचें लक्षण आहे. (दुःखाचा परिहार न करितां) लहान बालकांसारखें वागूं नये.

५९९ प्रज्ञा प्रतिष्ठा भूतानां प्रज्ञा लाभः परो मतः।
प्रज्ञा निःश्रेयसी लोके प्रज्ञा स्वर्गो मतः सताम्॥१२।१८०।२

ज्ञान हाच प्राण्यांचा आधार आहे. ज्ञान हाच उत्कृष्ट असा लाभ आहे. लोकांत ज्ञान हेंच मोक्षालाहि कारण आहे. ज्ञान हाच प्रत्यक्ष स्वर्ग आहे. असें सत्पुरुषांचें मत आहे.

५९२ प्रतिकूलः पितुर्यश्च न स पुत्रः सतां मतः॥१।८५।२४

बापाशीं जो वैर करतो तो पुत्र सज्जनांना मान्य होत नाहीं.

५९३ प्रत्युपकुर्वन्बह्वपि न भाति पूर्वोपकारिणा तुल्यः।
एकः करोति हि कृते निष्कारणमेव कुरुतेऽन्यः॥१२।१३८।८२

उपकारांची भरपूर फेड करणारा मूल उपकार करणाऱ्याच्या बरोबरीचा ठरेल असें वाटत नाहीं. कां कीं, एकजण आधीं उपकृत झाल्यावर मग (फेड म्हणून) उपकार करीत असतो, तर दुसरा निरपेक्ष बुद्धीनेंच उपकार करितो.

५९४ प्रत्युपस्थितकालस्य सुखस्य परिवर्जनम्।
अनागतसुखाशा च नैव बुद्धिमतां नयः॥१२।१४०।३६

वेलेवर चालून आलेलें सुख सोडून द्यावयाचें आणि प्राप्त न झालेल्या सुखाची आशा करीत बसावयाचें ही शहाण्यांची रीतच नव्हे.

५९५ प्रभवन् योऽनहंवादी स वै पुरुष उच्यते॥१३।१४६।१५

समर्थ असून ज्याला गर्व नाहीं तोच पुरुष म्हणावयाचा.

५९६ प्रभवार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम्।
यः स्यात्प्रभवसंयुक्तः स धर्म इति निश्चयः॥१२।१०९।१०

जीवांचा उत्कर्ष व्हावा एवढ्यासाठींच धर्म कथन केला आहे. जो उत्कर्षानें युक्त असेल तोच धर्म असा सिद्धांत आहे.

५९७ प्रयोजनेषु ये सक्ता न विशेषेषु भारत।
तानहं पण्डितान्मन्ये विशेषा हि प्रसङ्गिनः॥५।३८।४४

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे भारता, जे केवल कार्यें पार पाडण्याविषयीं तत्पर असतात, फाजील भानगडींत पडत नाहींत, त्यांना मी शहाणे समजतों. कारण, स्वतःचें आधिक्य दाखविणारे (कलहाचा) प्रसंग आणितात.

५९८ प्रवारणं तु बालानां पूर्वं कार्यमिति श्रुतिः॥५।७।१७

बालकांची इच्छा प्रथम पुरवावी अशी श्रुति आहे.

५९९ प्रवृत्तवाक् चित्रकथ ऊहवान्प्रतिभानवान्।
आशु ग्रन्थस्य वक्ता च यः स पण्डित उच्यते॥५।३३।३३

बोलका, मनोरंजक गोष्टी माहीत असलेला, तर्कवान् आणि समयसूचक असून जो ग्रंथाचा अर्थ चटकन सांगतो तो पंडित होय.

६०० प्रसादो निष्फलो यस्य क्रोधश्वापि निरर्थकः।
न तं भर्तारमिच्छन्ति षण्ढं पतिमिव स्त्रियः॥५।३४।२१

ज्याच्या कृपेचा कांहीं उपयोग नाहीं आणि रागापासूनहि कांहीं हानि नाहीं, असा अधिपति, ज्याप्रमाणें स्त्रियांना नामर्द पति नको असतो त्याप्रमाणें, प्रजेला नको असतो.

६०१ प्रसृतैरिन्द्रियैर्दुःखी तैरेव नियतैः सुखी।
तस्मादिन्द्रियरूपेभ्यो यच्छेदात्मानमात्मना॥१२।२०४।९

इंद्रियें मोकलीं सोडल्यानें मनुष्य दुःखी होतो व तींच आंवरून धरल्यानें सुखी होतो, यासाठीं, इंद्रियांच्या निरनिराल्या विषयांपासून आपलें मन आवरून धरावें.

६०२ प्रस्थं वाहसहस्रेषु यात्रार्थं चैव कोटिषु।
प्रासादे मञ्चकं स्थानं यः पश्यति स मुच्यते॥१२।२८८।३०

हजारों नव्हे कोट्यवधि गाडे धान्य पुढें पडलें असतांहि, जो केवल निर्वाहाला लागणाऱ्या मापटेंभर धान्याचीच अपेक्षा करतो, व ज्याला मोठा राजवाडा रहावयास दिला असतां, एक खाट ठेवण्याइतकीच जागा जो पुरेशी समजतो तो मुक्त होतो.

६०३ प्रहरिष्यन्प्रियं ब्रूयात्प्रहरन्नपि भारत।
प्रहृत्य च कृपायीत शोचेत च रुदेत च॥१।१४०।५६

(कणिक मंत्री धृतराष्ट्राला सांगतो) (शत्रूवर) प्रहार करण्याचें मनांत असतां वरकरणी त्याच्याशीं गोड बोलावें, तसेंच प्रहार करीत असतांहि गोडच बोलावें आणि प्रहार केल्यावर त्याच्याविषयीं सहानुभूति दाखवावी, खेद प्रदर्शित करावा व रडावेंहि.

६०४ प्राकृतो हि प्रशंसन्वा निन्दन्वा किं करिष्यति।
वने काक इवाबुद्धिर्वाशमानो निरर्थकम्॥१२।११४।८

हलका मनुष्य, प्रशंसा करून अथवा निंदा करून, करणार काय आहे ? अरण्यांत निरर्थक ओरडणाऱ्या कावल्याप्रमाणें मंदबुद्धि मनुष्याची स्थिति आहे.

६०५ प्राज्ञस्तु जल्पतां पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः।
गुणवद्वाक्यमादत्ते हंसः क्षीरमिवाम्भसः॥१।७४।९१

बडबड करणाऱ्या लोकांचें बरें वाईट बोलणें ऐकून, पाणी टाकून देऊन दूध ग्रहण करणाऱ्या हंसाप्रमाणें, त्यांतून चांगलें बोलणें तेवढें शहाणा मनुष्य घेत असतो.

६०६ प्राज्ञो वा यदि वा मूर्खः सघनो निर्धनोऽपि वा।
सर्वः कालवशं याति शुभाशुभसमन्वितः॥१२।१५३।४३

शहाणा असो, मूर्ख असो, श्रीमंत असो दरिद्री असो सर्वांना आपआपलें पापपुण्य बरोबर घेऊन कालाच्या स्वाधीन व्हावें लागतें.

६०७ प्राप्ते च प्रहरेत्काले न च संवर्तते पुनः।
हन्तुकामस्य देवेन्द्र पुरुषस्य रिपून्प्रति॥१२।१०३।२०

** यो हि कालो व्यतिक्रामेत्पुरुषं कालकाङ्क्षिणम्।
दुर्लभः स पुनस्तेन कालः कर्म चिकीर्षुणा॥१२॥१०३।२१**

(बृहस्पति इंद्राला म्हणतात) देवेंद्रा, शत्रूला मारण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषानें योग्य संधि आली असतां प्रहार केला पाहिजे. गेलेली वेल फिरून येत नसते; कार्य साधण्याच्या इच्छेनें योग्य कालाची वाट पहाणाऱ्या पुरुषानें आलेली संधि गमावली तर ती त्याला फिरून मिलणें कठीण.

६०८ प्रायेण नीचा व्यसनेषु मग्ना
निन्दन्ति देवं कुकृतं न तु स्वम्॥८।९१।१

नीच लोक संकटांत सांपडले म्हणजे बहुतकरून देवाला दोष लावतात; ते आपल्या दुष्कर्माला बोल लावीत नाहींत !

६०९ प्रायेण श्रीमतां लोके भोक्तुं शक्तिर्न विद्यते।
जीर्यन्त्यपि हि काष्ठानि दरिद्राणां च सर्वशः॥१२।२८।२९

बहुतकरून श्रीमंत लोकांना जेवण्याची शक्तिच नसते. आणि दरिद्री मनुष्यांना लाकडेंसुद्धां सर्व पचून जातात.

६१० प्रीयते हि हरन्पापः परवित्तमराजके।
यदास्य उद्धरन्त्यन्ये तदा राजानमिच्छति॥१२।६७।१३

दुसऱ्याचें द्रव्य हरण करणाऱ्या पापी मनुष्याला देशांत राजा नसलेला बरा वाटतो; पण जेव्हां त्याचें द्रव्य दुसरे लोक नेऊ लागतात, तेव्हां त्याला राजा असावा, असें वाटू लागतें.

६११ फलशाकमपि श्रेयो भोक्तुं ह्यकृपणं गृहे।
परस्य तु गृहे भोक्तुः परिभूतस्य नित्यशः॥३।१९३।३०

नित्य अपमान सहन करून दुसऱ्याच्या घरीं जेवण्यापेक्षां, मिंधेपणा न पतकरतां स्वतःच्या घरीं फल व शाकभाजी खाल्लेली बरी!

६१२ बकवच्चिन्तयेदर्थान् सिंहवच्च पराक्रमेत्।
वृकवच्चावलुम्पेत शशवच्च विनिष्पतेत्॥१२।१४०।२५

बगल्याप्रमाणें आपल्या उद्दिष्टाकडे लक्ष्य ठेवावें आणि सिंहाप्रमाणें पराक्रम गाजवावा. लांडग्याप्रमाणें शत्रुवर अचानक हल्ला करावा, व सशाप्रमाणें निसटून जावें.

६१३ बलं हि क्षत्रिये नित्यं बले दण्डः समाहितः॥१२।२३।१३

क्षत्रियाचे ठिकाणीं बल हें नियमानें वास्तव्य करणारें असून बलावरच दंड अवलंबून आहे.

६१४ बलज्येष्ठं स्मृतं क्षत्रं मन्त्रज्येष्ठा द्विजातयः।
धनज्येष्ठाः स्मृता वैश्याः शूद्रास्तु वयसाधिकाः॥५।१६८१७

क्षत्रिय बलानें श्रेष्ठ, ब्राह्मण मंत्रसामर्थ्यानें श्रेष्ठ आणि वैश्य धनानें श्रेष्ठ होत. शूद्र हे मात्र केवल वयानें मोठे.

६१५ बलं तु वाचि द्विजसत्तमानां
क्षात्रं बुधा बाहुबलं वदन्ति॥ ८।७०।१२

उत्तम ब्राह्मणांचें बल वाणींत, व क्षत्रियांचें बल बाहूंत असतें असें शहाणे लोक सांगतात.

६१६ बलवत्संनिकर्षो हि
न कदाचित्प्रशस्यते॥१२।१३८।१७५

बलवानाशीं सान्निध्य असणें केव्हांहि प्रशस्त नव्हे.

६१७ बलवन्तो ह्यनियमा नियमा दुर्बलीयसाम्॥१४।२२।२३

बलिष्ठांना नियम लागू नाहींत दुर्बलांकरितां नियम आहेत.

६१८ बलवांश्च यथा धर्मं लोके पश्यति पूरुषः।
स धर्मो धर्मवेलायां भवत्यभिहतः परः॥२।६९।१५

धर्मनिर्णय करण्याची वेल आली म्हणजे, जगांत बलसंपन्न पुरुष ठरवील तो धर्म ठरतो; दुसऱ्यानें (दुर्बलानें) सांगितलेल्या धर्माची पायमल्ली होते.

६१९ बलवान्वा कृती वेति कृती राजन्विशिष्यते॥ ९।३३।९

(श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, बलवान् आणि कृती यांच्यांत श्रेष्ठ कोण असा विचार करतां, कृती (म्हणजे डावपेंच जाणणारा, युक्तिमान) हाच श्रेष्ठ ठरतो.

६२० बलिना संनिकृष्टस्य शत्रोरपि परिग्रहः।
कार्य इत्याहुराचार्या विषमे जीवितार्थिना॥१२।१३८।४५

संकटांत सांपडल्यास जीविताची इच्छा करणाऱ्या बलाढ्यहि प्राण्यानें आपल्या समीप असणाऱ्या शत्रूचाहि आश्रय करावा, असें नीतिशास्त्राच्या आचार्यांनी सांगितलेलें आहे.

६२१ बहवः पण्डिता मूर्खा लुब्धा मायोपजीविनः।
कुर्युर्दोषमदोषस्य बृहस्पतिमतेरपि॥१२।१११।६३

पुष्कल पंडित मूर्ख, लोभी, कपटानें उपजीविका चालविणारे लोक बुद्धीनें बृहस्पतीसारख्या असलेल्या निर्दोष मनुष्यालाहि दोष लावितात.

६२२ बालो युवा च वृद्धश्च यत्करोति शुभाशुभम्।
तस्यां तस्यामवस्थायां तत्फलं प्रतिपद्यते॥१२।१८१।१५

बाल, तरुण आणि वृद्ध पुरुष जें जें कांहीं शुभ अथवा अशुभ कर्म करतो, त्याचें फल त्या त्या अवस्थेंत त्याला अवश्य मिलतें.

६२३ बुद्धिमान्वृद्धसेवया॥३।३१३।४८

वृद्धांचा समागम केल्यानें मनुष्य चतुर होतो.

६२४ बुद्धिश्व हीयते पुंसां नीचैः सह समागमात्।
मध्यमैर्मध्यतां याति श्रेष्ठतां याति चोत्तमैः॥३।१।३०

नीच लोकांच्या संगतीनें मनुष्यांची बुद्धि भ्रष्ट होते, मध्यम लोकांच्या संगतीनें ती मध्यम होते, आणि उत्तम लोकांशीं सहवास ठेविल्यानें उत्तम होते.

६२५ बुद्धौ कलुषभूतायां विनाशे प्रत्युपस्थिते।
अनयो नयसङ्काशो हृदयान्नापसर्पति॥५।३४।८२

बुद्धि मलिन झाली व विनाशकाल जवल येऊन ठेपला म्हणजे नीतीसारखी दिसणारी अनीति मनुष्याच्या हृदयांत ठाणें देऊन बसते.

६२६ बुभुक्षां जयते यस्तु
स स्वर्गं जयते ध्रुवम्॥१४।९०।९१

ज्यानें क्षुधा जिंकली त्यानें खचित स्वर्ग जिंकला.

६२७ ब्रह्मक्षत्रं हि सर्वेषां वर्णानां मूलमुच्यते॥१२।७३।५

ब्राह्मण आणि क्षत्रिय हेच सर्व वर्णांचें मूल होत.

६२८ ब्रह्म क्षत्त्रेण सहितं क्षत्त्रंच ब्रह्मणा सह।
संयुक्तौ दहतः शत्रून्वनानीवाग्निमारुतौ॥३।१८५।२५

ब्राह्मणानें क्षत्रियाशीं व क्षत्रियानें ब्राह्मणाशीं सहकार्य केलें म्हणजे ते दोघे मिलून वनेंच्या वनें जालून फस्त करणाऱ्या अग्निवायूंप्रमाणें, शत्रूंना जालून टाकतील.

६२९ ब्रह्मचर्यं परो धर्मः॥१।१७०।७१

ब्रह्मचर्य पालणें हा श्रेष्ठ धर्म होय.

६३० ब्रह्मचर्येण जीवितम्॥१३।७।१४

ब्रह्मचर्यानें (दीर्घ) आयुष्य प्राप्त होतें.

६३१ ब्रह्म वर्धयति क्षत्त्रं क्षत्त्रतो ब्रह्म वर्धते॥१२।७३।३२

ब्राह्मण क्षत्रियाचें सामर्थ्य वाढवितो आणि क्षत्रियामुलें ब्राह्मणाचा उत्कर्ष होतो.

६३२ ब्रह्महत्याफलं तस्य यः कृतं नावबुध्यते॥७।१८३।२८

आपणांवर दुसऱ्यानें केलेला उपकार जो स्मरत नाहीं, त्याला ब्रह्महत्येचें पातक लागतें.

६३३ ब्राह्मणस्य तु देहोऽयं न कामार्थाय जायते।
इह क्लेशायतपसे प्रेत्य त्वनुपमं सुखम्॥१२।३२१।२३

ब्राह्मणाचा देह हा सुखोपभोगासाठीं निर्माण झालेला नाहीं, इहलोकीं क्लेश भोगून तपाचरण करण्यासाठीं ब्राह्मण जन्मला आहे. असें केलें तरच परलोकीं त्याला निरुपम सुख मिलेल.

६३४ ब्राह्मण्यं बहुभिरवाप्यते तपोभि-
स्तल्लब्ध्वा न रतिपरेण हेलितव्यम्।
स्वाध्याये तपसि दमे च नित्ययुक्तः
क्षेमार्थी कुशलपरः सदा यतस्व॥१२।३२१।२४

(व्यासमुनि शुकाला सांगतात) पुष्कल प्रकारें तप करावें तेव्हांच ब्राह्मणत्व प्राप्त होत असतें. तें लाभल्यावर विषयांच्या नादीं लागून व्यर्थ दवडूं नये. आत्मकल्याण साधून घेण्याची इच्छा असेल तर वेदाभ्यास, तप व इंद्रियदमन यांमध्यें नेहमीं दक्ष राहून सत्कर्म करून झटून प्रयत्न कर.

६३५ भक्ष्योत्तमप्रतिच्छन्नं मत्स्यो बडिशमायसम्।
लोभाभिपाती ग्रसते नानुबन्धमवेक्षते॥५।३४।१३

उत्तम प्रकारच्या खाद्य पदार्थानें आच्छादलेला लोखंडाचा गल मासा लोभानें झडप घालून गिलून टाकतो, (असें करितांना) पाठीमागून परिणाम काय होईल इकडे त्याचें लक्ष नसतें.

६३६ भज्येतापि न संनमेत्॥९।५।१४

(भीमसेनाचें मत) तुटून जावें पण वाकूं नये.

६३७ भयेन भेदयेद्भीरुं शूरमञ्जलिकर्मणा।
लुब्धमर्थप्रदानेन समं न्यूनं तथौजसा॥१।१४०।५०

भित्रा असेल त्याला भीति दाखवून फितूर करावा, शूराला हात जोडून, लोभी असेल त्याला द्रव्य देऊन, आणि बरोबरीचा किंवा दुर्बल असेल त्याला पराक्रमानें वश करावा.

६३८ भर्तव्या रक्षणीया च पत्नी हि पतिना सदा॥३।६९।४१

पतीनें निरंतर पत्नीचें पोषण व रक्षण केलें पाहिजे.

६३९ भवितव्यं सदा राज्ञा
गर्भिणीसहधर्मिणा॥१२।५६।४४

ज्याप्रमाणें गर्भिणी स्त्री गर्भाचें संगोपन करते, त्याप्रमाणें राजानें निरंतर प्रजाजनांचे रक्षण करावें.

६४० भारं स वहते तस्य ग्रन्थस्यार्थं न वेत्ति यः।
यस्तु ग्रन्थार्थतत्वज्ञो नास्य ग्रन्थागमो वृथा॥१२।३०५।१४

ज्याला ग्रंथाचा अर्थ कलत नाहीं (पण जो नुसती घोकंपट्टी करतो) तो त्या ग्रंथाचा केवल भार वाहतो. परंतु ज्यानें ग्रंथाच्या अर्थाचें रहस्य जाणलें त्याचाच अभ्यास सार्थकी लागला.

६४१ भार्यायां रक्ष्यमाणायां प्रजा भवति रक्षिता।
प्रजायां रक्ष्यमाणायामात्मा भवति रक्षितः॥३।१२।६९

भार्येचें संरक्षण होऊं लागलें असतां संततीचें संरक्षण होतें, आणि संततीचें संरक्षण होऊं लागलें असतां आपलें संरक्षण होतें.

६४२ भार्या हि परमो ह्यर्थः पुरुषस्येह पठ्यते।
असहायस्य लोकेऽस्मिँल्लोकयात्रासहायिनी॥१२।१४४।१४

भार्या ही पुरुषाची इहलोकांतील परमश्रेष्ठ संपत्ति होय असें म्हटलेलें आहे या जगांत असहाय असलेल्या पुरुषाला संसाराच्या कामी साहाय्य करणारी तीच आहे.

६४३ भार्याहीनं गृहस्थस्य शून्यमेव गृहं भवेत्॥१२।१४४।५

भावांचून गृहस्थाचें घर रिकामेंच वाटतें.

६४४ भिन्नानामतुलो नाशः क्षिप्रमेव प्रवर्तते॥१।२९।२०

ज्यांच्यांत भिन्नभाव उत्पन्न झाला त्यांचा तत्काल सर्वथा नाश होतो.

६४५ भिन्ना श्लिष्टा तु या प्रीतिर्न सा स्नेहेन वर्तते॥१२।१११।८५

एकदा मोडून पुनः जोडलेला स्नेह स्नेहाच्या रूपानें टिकत नाहीं.

६४६ भीतवत्संविधातव्यं यावद्भयमनागतम्।
आगतं तु भयं दृष्ट्वाप्रहर्तव्यमभीतवत्॥१।१४०।८२

संकट जोंवर प्राप्त झालेलें नाहीं, तोंवर भित्र्या माणसाप्रमाणेंं त्याचें निवारण करण्याच्या तजविजींत असावें. परंतु संकट येऊन ठेपलें असें दिसतांच, शूराप्रमाणें त्यास तोंड द्यावें.

६४७ भीमसेनस्तु धर्मेण युध्यमानो न जेष्यति ।
अन्यायेन तु युध्यन्वै हन्यादेव सुयोधनम्॥९।५८।४

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) भीमसेन जर धर्मानें लढेल तर त्यास जय मिलणार नाहीं; परंतु जर अन्यायानें युद्ध करील तर खात्रीनें सुयोधनास ठार करील.

६४८ भुञ्जते ते त्वघं पापा
ये पचन्त्यात्मकारणात्॥६।२७।१३

जे केवल आपल्यासाठीं अन्न शिजवितात, ते पातकी लोक (त्या अन्नाच्या रूपानें) पापच भक्षण करितात.

६४९ भूतं हित्वा च भाव्यर्थे
योऽवलम्बेत्स मन्दधीः॥१।२३३।१५

प्राप्त झालेल्या फलाचा त्याग करून पुढें मिलणाऱ्या फलाची जो आशा करीत बसतो तो मूर्ख होय.

६५० भूतिः श्रीर्ह्रीर्धृतिः कीर्तिर्दक्षे वसति नालसे॥१२।२७।३२

वैभव, संपत्ति, विनयशीलपणा, धैर्य व कीर्ति हीं सर्व तत्परतेनें उद्योग करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणीं वास करितात; आलशाच्या ठिकाणीं रहात नाहींत.

६५१ भूमिरेतौ निगिरति सर्पो बिलशयानिव।
राजानं चाप्ययोद्धारं ब्राह्मणं चाप्रवासिनम्॥१२।२३।१५

युद्ध न करणारा राजा आणि प्रवास न करणारा ब्राह्मण या दोघांना बिलांत राहाणाऱ्या प्राण्यांना सर्प खाऊन टाकतो त्याप्रमाणें भूमि गिलून टाकते.

६५२ भूयांसं लभते क्लेशं या गौर्भवति दुर्दुहा।
अथ या सुदुहा राजन्नैव तां वितुदन्त्यपि॥१२।६७।९

जी गाय धार काढूं देण्यास फार त्रास देते, तिला अतिशय क्लेश भोगावे लागतात; पण जी सुखानें दूध देते तिला मुलींच कोणी त्रास देत नाहीं.

६५३ भेदे गणा विनश्युर्हिभिन्नास्तु सुजयाः परैः।
तस्मात्संघातयोगेन प्रयतेरन्गणाः सदा॥१२।१०७।१४

समुदायांत भेद उत्पन्न झाला कीं त्यांचा सर्वथा नाश ठरलेलाच. कारण त्यांच्यांत फूट पडली म्हणजे शत्रु त्यांचांसहज पराभव करूं शकतात. यास्तव, समुदायांनीं नेहमीं संघशक्तीनें कार्य करावें.

६५४ भैषज्यमेतद्दुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत्।
चिन्त्यमानं हि न व्येति भूयश्चापि प्रवर्धते॥१२।३३०।१२

दुःखावर औषध हेंच कीं, त्याचं एकसारखें चिंतन करीत बसूं नये. कारण, चिंतन केल्यानें दुःख नाहींसें तर होत नाहींच, पण उलट अधिक वाढतें मात्र.

६५५ मग्नस्य व्यसने कृच्छ्रे धृतिः श्रेयस्करी नृप॥१२।२२७।३

** धैर्येण युक्तं सततं शरीरं न विशीर्यते।**
** विशोकता सुखं धत्ते धत्ते चारोग्यमुत्तमम्॥१२।२२७।४**

** आरोग्याच्च शरीरस्य स पुनर्विन्दते श्रियम्॥१२।२२७।५**

(भीष्म युधिष्ठिराला सांगतात) महत्संकटांत सांपडलेल्या मनुष्यानें धीर धरणें श्रेयस्कर आहे. नेहमीं धैर्य असलें म्हणजे शरीराची हानि होत नाहीं. शोकाचा त्याग केल्यानें सुख होतें व त्यापासून उत्तम आरोग्य प्राप्त होतें. आणि शरीर निरोगी राहिलें म्हणजे मनुष्य गेलेलें वैभव पुनः प्राप्त करून घेतो.

६५६ मद्यमांसपरस्वानि तथा दारा धनानि च।
आहरेद्रागवशगस्तथा शास्त्रं प्रदर्शयेत्॥१२।८८।२२

विषयाधीन झालेला मनुष्य मद्य, मांस, परस्त्री आणि परद्रव्य यांचा अपहार करील, आणि (आपल्या दुष्कृत्याचें समर्थन करण्याकरितां) तसा शास्त्रार्थहि काढून दाखवील.

६५७ मधुदोहं दुहेद्राष्ट्रं भ्रमरा इव पादपम्।
वत्सापेक्षी दुहेच्चैव स्तनांश्च न विकुट्टयेत्॥१२।८८।४

भ्रमर जसा झाडावरील फुलाला धक्का न लावतां त्यांतील मध तेवढा हलूच काढून घेतो त्याप्रमाणें राजानें प्रजेचें मन न दुखवितां तिजपासून कराच्या रूपानें द्रव्य ग्रहण करावें. अथवा, ज्याप्रमाणें गाईची धार काढणारा वांसराला दूध राहील अशा बेतानें धार काढतो, आंचल अगदीं पिलून काढीत नाहीं. त्याप्रमाणेंच राजानें प्रजेचें पोषण होईल अशा बेतानेंच कर घ्यावा.

६५८ मधु यः केवलं दृष्ट्वा प्रपातं नानुपश्यति।
स भ्रष्टो मधुलोभेन शोचत्येवं यथा भवान्॥११।१।३७

(भारतीय युद्धानंतर संजय धृतराष्ट्राला म्हणतो) ज्याला (तुटलेल्या कड्यास लटकणारें) मधाचें पोलें मात्र दिसतें, पण तो तुटलेला कडा दिसत नाहीं, तो मधाच्या लोभानें पुढें जाऊन खालीं घसरतो आणि हल्लीं तूं शोक करीत आहेस असाच पश्चात्ताप करीत बसतो.

६५९ मन एव मनुष्यस्य पूर्वरूपाणि शंसति॥१२।२२८।२

मनुष्याची उन्नति किंवा अवनति पुढें व्हावयाची असली म्हणजे तिचीं पूर्वचिन्हें त्याचें मनच सांगत असतें.

६६० मनसश्चेन्द्रियाणां चाप्यैकाग्र्यं परमं तपः।
तज्ज्यायः सर्वधर्मेभ्यः स धर्मः पर उच्यते॥१२।२५०।४

मन आणि इंद्रियें यांची एकाग्रता साध्य करणें हें फार मोठेंतप आहे. ही एकाग्रता सर्व प्रकारच्या कर्माचरणापेक्षां श्रेष्ठ आहे. ती साध्य करणें हा श्रेष्ठ धर्म होय.

६६१ मनसो दुःखमूलं तु स्नेह इत्युपलभ्यते॥३।२।२७

मनाला दुःख होण्याचें मूल कारण, आसक्ति हेंच असल्याचेंं आढलून येतें.

६६२ मनुष्या ह्याढ्यतां प्राप्य राज्यमिच्छन्त्यनन्तरम्।
राज्याद्देवत्वमिच्छन्ति देवत्वादिन्द्रतामपि॥१२।१८०।२४

खरोखर मनुष्यांना ऐश्वर्य प्राप्त झालें, म्हणजे त्यानंतर राज्य मिलविण्याची इच्छा होते, राज्य मिलालें कीं देवपद आणि देवत्वप्राप्तीनंतर इंद्रपदसुद्धां पाहिजे असें वाटूंलागतें.

६६३ मन्यते कर्षयित्वा तु क्षमा साध्वीति शम्बरः।
असंतप्तं तु यद्दारु प्रत्येति प्रकृतिं पुनः॥१२।१०२।३१

शत्रूला जर्जर करून सोडल्यावर मग क्षमा केलेली चांगली असें शंबराचें मत आहे, कारण तापविल्यावांचून वाकविलेलें लाकूड पुनरपि पूर्वस्थितीस येतें.

६६४ महानप्येकजो वृक्षो बलवान्सुप्रतिष्ठितः।
प्रसह्य एव वातेन सस्कन्धो मर्दितुं क्षणात्॥५।३६।६२

अथ ये सहिता वृक्षाः संघशः सुप्रतिष्ठिताः।
ते हि शीघ्रतमान्वातान्सहन्तेऽन्योन्यसंश्रयात्॥५।३६।६३

एकटाएक वृक्ष मोठा, बलकट असला, व भुईंत खोल गेलेला असला तरी (सोसाट्याच्या) वाऱ्यानें एका क्षणांत खोडासहवर्तमान त्याचा चुराडा होणेंशक्य आहे. परंतु, जे एकत्र वाढलेले वृक्ष एका जमावानें बलकट पायावर उभे असतात, ते एकमेकांच्या आधारामुलें अति प्रचंड वायूंनाहि दाद देत नाहींत.

६६५ महान्भवत्यनिर्विण्णः सुखं चानन्त्यमश्नुते॥५।३९।५९

सतत उद्योग करणाराच पुरुष योग्यतेला चढतो आणि त्यालाअक्षय सुख प्राप्त होतें.

६६६ माता पिता बान्धवानां वरिष्ठौ
भार्या जरा बीजमात्रं तु पुत्रः।
भ्राता शत्रुः क्लिन्नपाणिर्वयस्य
आत्मा ह्येकः सुखदुःखस्य भोक्ता॥१२।१३९।३०

आईबाप हे सर्व आप्तवर्गांत वरिष्ठ होत. भार्या ही पुरुषाला वार्धक्य आणण्यास कारणीभूत होत असते. पुत्र हा केवल आपलें बीज होय. भाऊ हा (वांटणी घेत असल्यामुलें) शत्रुच होय. जोंवर हात भिजत आहे तोंवरच मित्र. सारांश, सुख किंवा दुःख भोगणारा आत्मा हा आपला एकटा एक आहे.

६६७ मातापितृसहस्राणि पुत्रदारशतानि च।
संसारेष्वनुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे॥१८।५।६०

निरनिराल्या हजारों जन्मांत अनुभवलेलीं हजारों आईबापें व शेंकडोंस्त्रिया आणि पुत्र हीं सर्व मरून जातात व यापुढें होणारीं इतरहि मरणारच.

६६८ मातृलाभे सनाथत्वमनाथत्वं विपर्यये॥१२।२६६।२६

आई असली तरच मनुष्य सनाथ असतो, ती नसली कीं अनाथ होतो.

६६९ मानं हित्वा प्रियो भवति॥३।३१३।७८

अभिमान सोडल्यानें मनुष्य (लोकांना) प्रिय होतो.

६७० मायया निर्जिता देवैरसुरा इति नः श्रुतम्॥९।५८।५

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) कपटाच्या योगानेंच देवांनी असुरांना जिंकलें, असें आम्हीं ऐकलें आहे.

६७१ मायावी मायया वध्यः सत्यमेतद्युधिष्ठिर॥९।३१।७

(श्रीकृष्ण म्हणतात) हे युधिष्ठिरा, कपटी मनुष्याचा कपटानेंच वध केला पाहिजे हैं सत्य होय.

६७२ मास्तंगमस्त्वं कृपणो विश्रूयस्व स्वकर्मणा।
मा मध्ये मा जघन्ये त्वं माधोभूस्तिष्ठ गर्जितः॥५।१३३।१३

(विदुला संजयास म्हणते) तूं दीन होऊन स्वतःचा नाश करून घेऊं नको. स्वपराक्रमानें प्रसिद्धीस ये, तूं मध्यम स्थितींत अथवा हीन स्थितींत राहूं नको. हीन न होतां (कर्तृत्वानें) गाजत रहा.

६७३ मित्रं च शत्रुतामेति कस्मिंश्चित्कालपर्यये।
शत्रुश्च मित्रतामेति स्वार्थो हि बलवत्तरः॥१२।१३८।१४२

एकादे वेलेस मित्र वैर करूं लागतो आणि शत्रु मित्र बनतो. कारण, स्वार्थ हा फार प्रबल आहे.

६७४ मुहूर्तं ज्वलितं श्रेयो
न च धूमायितं चिरम्॥५।१३३।१५

थोडा वेल कां होईना पण चमकून जाणें चांगलें; परंतु चिरकाल धुमसत राहणें बरें नव्हे.

६७५ मुहूर्तमपि राजेन्द्र तिन्दुकालातवज्ज्वलेत्।
न तुषाग्निरिवानर्चिर्धूमायेत चिरं नरः१२।१४०।१९

(भारद्वाजमुनि शत्रुंजय राजाला म्हणतात) हे राजश्रेष्ठा, मनुष्यानें टेंभुरणीच्या कोलिताप्रमाणें क्षणभर तरी चमकून जावें. ज्वाला नसलेल्या कोंड्याच्या अग्नीप्रमाणें निरंतर धुमसत राहूं नये.

६७६ मूर्खो हि जल्पतां पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः।
अशुभं वाक्यमादत्ते पुरीषमिव सूकरः॥१।७४।९०

बडबड करणाऱ्या लोकांचें बरें वाईट बोलणें ऐकून, त्यांतून वाईट बोलणें तेवढें, विष्ठा ग्रहण करणाऱ्या डुकराप्रमाणें, मूर्ख मनुष्य घेत असतो.

६७७ मूलमेवादितश्छिन्द्यात्परपक्षस्य नित्यशः।
ततः सहायांस्तत्पक्षान्सर्वांश्च तदनन्तरम्॥१।१४०।१६

नेहमीं आपल्या शत्रुपक्षाचें मूलच पहिल्यानें तोडून टाकावें. नंतर त्याचे साथीदार व त्यानंतर त्याच्या पक्षांतील इतर सर्व लोक यांचा उच्छेद करावा.

६७८ मृतं वा यदि वा नष्टं योऽतीतमनुशोचति।
दुःखेन लभते दुःखं द्वावनर्थौप्रपद्यते॥११।२६।४

मेल्यामुलें किंवा हरवल्यामुलें जें नाहींसें झालें त्याविषयीं जो शोक करीत बसतो, त्याला त्या दुःख करण्यापासून पुनः दुःख प्राप्त होतें व अशा रीतीनें तो दोन अनर्थांत सांपडतो.

६७९ मृतं शरीरमुत्सृज्य काष्ठलोष्टसमं जनाः।
मुहूर्तमिव रोदित्वा ततो यान्ति पराङ्मुखाः॥१३।१११।१४

मेलेलें शरीर लाकडाप्रमाणें अथवा मातीच्या ढेकलाप्रमाणें टाकून देऊन व क्षणभर रडून नंतर लोक पाठमोरे होऊन निघून जातात.

६८० मृतकल्पा हि रोगिणः॥५।३६।६७

रोगी मनुष्यें मेल्यांतच जमा.

६८१ मृतो दरिद्रः पुरुषः॥३।३१३।८४

दरिद्री पुरुष जिवंतपणींच मेलेला असतो.

६८२ मृदं वै मन्यते पापो भाषमाणमशक्तिकम्।
जितमर्थं विजानीयादबुधो मार्दवे सति॥५।४।६

कोणी सौम्यपणें बोलूं लागला तर दुष्ट लोक त्याला दुर्बल समजतात. सौम्यपणा असला म्हणजे मूर्खाला वाटावयाचें कीं, आपला पक्ष सिद्ध झाला.

६८३ मृदुना दारुणं हन्ति मृदुना हन्त्यदारुणम्।
नासाध्यं मृदुना किंचित्तस्मात्तीव्रतरं मृदु॥३।२८।३१

मृदुपणानें भयंकर शत्रूचा नाश करितां येतो आणि मृदुपणानें भयंकर नसलेल्या शत्रूचाहि नाश करितां येतो. मृदुपणानें असाध्य असें कांहींच नाहीं यास्तव मृदुपणा हा वस्तुतः तीक्ष्णापेक्षांहि तीक्ष्ण आहे.

६८४ मृदुरित्यवजानन्ति तीक्ष्ण इत्युद्विजन्ति च।
तीक्ष्णकाले भवेत्तीक्ष्णो मृदुकाले मृदुर्भवेत्॥१२।१४०।६५

(राजा) मऊपणानें वागणारा असला तर लोक त्याची अवज्ञा करितात. आणि कठोरपणानें वागणारा असला तर लोक त्याला भितात. यासाठीं कठोरपणें वागण्याची वेल येईल तेव्हां कठोर व्हावें, आणि मऊपणानेंवागण्याची वेल असेल तेव्हां मृदु व्हावें.

६८५ मौनान्न स मुनिर्भवति नारण्यवसनान्मुनिः।
स्वलक्षणं तु यो वेद स मुनिः श्रेष्ठ उच्यते॥५।४३।६०

मौनव्रत पाललें म्हणजे कोणी मुनि होत नाहीं. किंवा अरण्यांत राहिल्यानेंहि मुनि होत नाहीं. ज्यानें आत्मस्वरूप जाणलें तोच मुनि श्रेष्ठ होय.

६८६ य एव देवा हन्तारस्ताँल्लोकोऽर्चयते भृशम्॥१२।१५।१६

ठार मारणारे जे देव आहेत, त्यांनाच लोक अतिशय भजतात.

६८७ यः कश्चिदप्यसंबद्धो मित्रभावेन वर्तते।
स एव बन्धुस्तन्मित्रं सा गतिस्तत्परायणम्॥५।३६।३८

कसल्याहिप्रकारचा संबंध नसतांहि जो कोणी आपल्याशीं मित्रभावानें वागतो तोच आपला बंधु, तोच मित्र, तोच आसरा, आणि तोच मोठा आधार.

६८८ यः कृशार्थः कृशगवः कृशभृत्यः कृशातिथिः।
स वै राजन्कृशोनाम न शरीरकृशः कृशः॥१२।८।२४

(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, ज्याच्यापाशीं द्रव्य नाहीं, गुरेंढोरें नाहींत, नोकर चाकर नाहींत, आणि ज्याच्याकडे अतिथि फारसे येत नाहींत, तोच खरोखर कृश म्हटला पाहिजे. जो केवल शरीरानें कुश तो खरोखर कृश नव्हे.

६८९ यच्च कामसुखं लोके यच्च दिव्यं महत्सुखम्।
तृष्णाक्षयसुखस्यैते नार्हतः षोडशीं कलाम्॥१२।१७४।४६

इहलोकीं विषयोपभोगापासून प्राप्त होणारें सुख आणि स्वर्गांतील उच्च सुख हीं दोनहि सुखें वासनाक्षयामुलें प्राप्त होणाऱ्या सुखाच्या सोलाव्या हिश्शाइतकीं देखील भरणार नाहींत.

६९० यच्छक्यं ग्रसितुं ग्रस्यं ग्रस्तं परिणमेच्च यत्।
हितं च परिणामे यत्तदाद्यं भूतिमिच्छता॥५।३४।१४

ज्याचा घास घेतां येईल, खाल्ल्यावर जें पचेल, व परिणामीं जें हितकर होईल तेंच अन्न कल्याणेच्छु पुरुषानें खाल्लें पाहिजे.

६९१ यतो धर्मस्ततो जयः॥१३।१६७।४१

जिकडे धर्म तिकडे जय.

६९२ यत्करोति शुभं कर्म तथा कर्म सुदारुणम्।
तत्कर्तैव समश्नाति बान्धवानां किमत्र ह॥१२।१५३।४१

कोणीहि जें चांगलें कर्म करतो अथवा वाईट कर्म करतो, त्याचें फल त्याचें त्यालाच भोगावें लागतें. यांत त्याच्या नातलगांचा काय संबंध?

६९३ यत्तु कार्यं भवेत्कार्यं कर्मणा तत्समाचर।
हीनचेष्टस्य यः शोकः स हि शत्रुर्धनंजय॥७।८०।८

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) उद्दिष्ट साधण्यासाठीं जें करावयाचें तें करण्याच्या उद्योगाला लाग. अर्जुना, जो प्रतिकाराचा कांहीं उद्योग करीत नाहीं, त्याचा शोक हा शत्रुच होय.

६९४ यत्नवान् नावसीदति॥१२।३३१।२

यत्न करणारा नाश पावत नाहीं.

६९५ यत्नो हि सततं कार्यस्ततो दैवेन सिध्यति॥१२।१५३।५०

सतत प्रयत्न करीत असावें; म्हणजे दैववशात् यश मिलेल.

६९६ यत्र दानपतिं शूरं क्षुधिताः पृथिवीचराः।
प्राप्य तुष्टाः प्रतिष्ठन्ते धर्मः कोऽभ्यधिकस्ततः॥५।१३२।२८

पृथ्वीवर हिंडणारे क्षुधित लोक ज्या शूर दानपतीपाशीं आले असतां संतुष्ट होऊन पुढें जातात, त्याच्या धर्मापेक्षां कोणता धर्म अधिक आहे?

६९७ यत्र धर्मो ह्यधर्मेण सत्यं यत्रानृतेन च।
हन्यते प्रेक्षमाणानां हतास्तत्र सभासदः॥५।९५।४९

ज्या सभेंत सभासदांच्या डोल्यांदेखत धर्माचा अधर्मानें व सत्याचा असत्यानें खून केला जातो, त्या सभेंतील सभासदांना धिक्कार असो !

६९८ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥६।४२।७८

(संजय धृतराष्ट्राला म्हणतो) जिकडे योगेश्वर कृष्ण, जिकडे धनुर्धारी अर्जुन, तिकडेच लक्ष्मी, विजय, अखंड वैभव आणि नीति हींराहणार असें माझें मत आहे.

६९९ यत्र सूक्तं दुरुक्तं च समं स्यान्मधुसूदन।
न तत्र प्रलपेत्प्राज्ञो बधिरेष्विव गायनः॥५।९२।१३

(विदुर श्रीकृष्णांना म्हणतो) हे मधुसूदना, जेथें चांगलें बोलण्याचा किंवा वाईट बोलण्याचा उपयोग सारखाच होतो तेथें, बहिऱ्या लोकांमध्ये बसून गायन करणें गवयास योग्य नाहीं त्याप्रमाणें, शहाण्या पुरुषानें कांहींएक न बोलणें चांगलें.

७०० यत्र स्त्री यत्र कितवो बालो यत्रानुशासिता।
मज्जन्ति तेऽवशा राजन्नद्यामश्मलवा इव॥५।३८।४३

(विदुर धृतराष्ट्र राजाला म्हणतो) ज्यांच्यावर स्त्री किंवा लुच्चा मनुष्य किंवा अल्पवयी मुलगा अधिकार चालवीत असेल, ते लोक पराधीन होत्साते, नदींत बुडणाऱ्या पाषाणमय होड्यांप्रमाणें नाश पावतात.

७०१ यत्सुखं सेवमानोऽपि धर्मार्थाभ्यां न हीयते ।
कामं तदुपसेवेत न मूढव्रतमाचरेत्॥५।३९।६१

ज्या सुखाचें सेवन केलें तरी धर्म व अर्थ या दोन पुरुषार्थांना कांहीं बाध येत नाहीं, तेंच यथेष्ट सेवन करावें. मूर्खासारखें (अविचारानें) वर्तन करूं नये.

७०२ यथा कर्म तथा लाभ
इति शास्त्रनिदर्शनम्॥१२।२७९।२०

जसें कर्म तसें फल असा शास्त्राचा सिद्धांत आहे.

७०३ यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ।
समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागमः॥१२।२८।३६

ज्याप्रमाणें महासागरांत लाकडाचे दोन ओंडके वहात वहात एका ठिकाणीं येतात, व (थोड्या वेलानें) फिरून एकमेकांपासून दूर जातात, त्यासारखा सर्व प्राण्यांचा एकमेकांशी असणारा सहवास आहे.

७०४ यथा जीर्णमजीर्णं वा वस्त्रं त्यक्त्वा तु पूरुषः ।
अन्यद्रोचयते वस्त्रमेवं देहाः शरीरिणाम्॥११।३।९

जुनें झालेलें किंवा कधींकधीं नवेंहि एक वस्त्र टाकून मनुष्य दुसरें घेतो, त्याप्रमाणेंच प्राण्यांच्या देहांचीहि गोष्ट आहे.

७०५ यथा दानं तथा भोग इति धर्मेषु निश्चयः॥१३।६२।८

जसें दिलें असेल तसेंच भोगावयास मिलतें, असा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे.

७०६ यथादित्यः समुद्यन्वै तमः पूर्वं व्यपोहति।
एवं कल्याणमातिष्ठन् सर्वपापैः प्रमुच्यते॥३।२०७।५७

ज्याप्रमाणें सूर्य उदयास येऊं लागला म्हणजे पूर्वींचा अंधकार नाहींसा होतो, त्याप्रमाणें कल्याणकारक कृत्यें करणारा सर्व पातकांपासून मुक्त होतो.

७०७ यथा धेनुसहस्रेषु वत्सो विन्दति मातरम्।
तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति॥१२।३२२।१६

हजारों गाईंतून वासरूं जसें नेमकें आपल्या आईला हुडकून काढतें, तसें पूर्वजन्मीं केलेलें कर्म कर्त्याच्या पाठोपाठ येतें.

७०८ यथा नदीनदाः सर्वे सागरे यान्ति संस्थितिम्।
एवमाश्रमिणः सर्वे गृहस्थे यान्ति संस्थितिम्॥१२।२९५।३९

ज्याप्रमाणें सर्व नद्या आणि नद अखेर समुद्राला जाऊन मिलतात, त्याप्रमाणें इतर सर्व आश्रमांतील लोक गृहस्थाश्रमी पुरुषावर अवलंबून राहतात.

७०९ यथा बर्हाणि चित्राणि विभर्ति भुजगाशनः।
तथा बहुविधं राजा रूपं कुर्वीत धर्मवित्॥१२।१२०।४

मोर जशीं चित्रविचित्र पिसें धारण करतो, त्याप्रमाणें आपलें कर्तव्य ओलखणाऱ्या राजानें (प्रसंगानुसार) निरनिरालीं रूपें धारण करावीं.

७१० यथा बीजं विना क्षेत्रमुप्तं भवति निष्फलम्।
तथा पुरुषकारेण विना दैवं न सिध्यति॥१३।६।७

शेत तयार न करितां त्यांत बींटाकिल्यानें जसें तें वायां जातें, त्याप्रमाणें उद्योग केल्यावांचून नुसत्या दैवानें सिद्धि मिलत नाहीं.

७११ यथामति यथापाठं
तथा विद्या फलिष्यति॥१२।३२७।४८

जशी बुद्धि असेल आणि जसा अभ्यास असेल त्या मानानें विद्येचें फल मिलणार.

७१२ यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पदः।
तद्वदर्थान्मनुष्येभ्य आदद्यादविहिंसया॥५।३४।१७

भ्रमर जसा फुलांना अपाय न करतां त्यांतील मध तेवढा काढून घेतो. त्याप्रमाणें (राजानें) लोकांचें मन न दुखवितां त्यांजपासून द्रव्य घ्यावें.

७१३ यथा मातरमाश्रित्य सर्वे जीवन्ति जन्तवः।
एवं गार्हस्थ्यमाश्रित्य वर्तन्त इतश्रमाः॥१२।२६९।६

जसे सर्व प्राणी मातेचा आश्रय करून जिवंत राहतात, तसे गृहस्थाश्रमाच्या आधारानें इतर आश्रम राहतात.

७१४ यथा यथा हि पुरुषो नित्यं शास्त्रमवेक्षते।
तथा तथा विजानाति विज्ञानमथ रोचते॥१२।१३०।१०

मनुष्य जसजसा नेहमीं शास्त्राचें अवलोकन करीत जाईल, तसतसें त्याला समजूं लागेल, आणि नंतर त्याला ज्ञानाची आवड उत्पन्न होईल.

७१५ यथा यथैव जीवेद्धि तत्कर्तव्यमहेलया।
जीवितं मरणाच्छ्रेयो जीवन्धर्ममवाप्नुयात्॥१२।१४१।६५

ज्या ज्या प्रकारें जीविताचें संरक्षण होईल तें बेलाशक करावें. मरण्यापेक्षां जगणें हेंच श्रेयस्कर आहे. कारण आधीं जगेल तर पुढें धर्म आचरण करील.

७१६ यथा राजन्हस्तिपदे पदानि
संलीयन्ते सर्वसत्त्वोद्भवानि।
एवं धर्मान् राजधर्मेषु सर्वान्
सर्वावस्थं संप्रलीनान्निबोध॥१२।६३।२५

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, ज्याप्रमाणें एकट्या हत्तीच्या पावलांत इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो. त्याप्रमाणें एका राजधर्मांत इतर सर्वधर्मांचा सर्व प्रकारें अंतर्भाव होतो हें तूं पक्कें समज.

७१७ यथाऽवध्ये वध्यमाने भवेद्दोषो जनार्दन।
स वध्यस्यावधे दृष्ट इति धर्मविदो विदुः॥५।८२।१८

(द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणते) वधास पात्र नसलेल्याचा वध होऊं लागला असतां जो दोष लागतो, तोच दोष वधास पात्र असलेल्याचा वध होत नसल्यास लागतो, असें धर्मवेत्त्यांचेंमत आहे.

७१८ यथा वायुस्तृणाग्राणि संवर्तयति सर्वशः।
तथा कालवशं यान्ति भूतानि भरतर्षभ॥११।२।९

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) जसा वारा गवताचे सर्व शेंडे हलवून सोडतो त्याप्रमाणें सर्व प्राणी कालाच्या तडाक्यांत सांपडतात.

७१९ यथाशक्ति चिकीर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते
न किंचिदवमन्यन्ते नराः पण्डितबुद्धयः॥५।३३।२१

शाहाणे लोक शक्तीप्रमाणें कार्य करण्याची इच्छा करितात, शक्तीप्रमाणेंच कार्य करितात. आणि कोणाचाहि मुलींच अवमान करीत नाहींत.

७२० यथाशक्ति मनुष्याणां शममालक्षयामहे।
अन्येषामपि सत्त्वानामपि कीटपिपीलिकैः॥४।५०।१४

(अश्वत्थामा कर्णाला म्हणतो) आम्हांला वाटतें कीं, मनुष्यांच्या सहनशीलतेला तरी कांहीं मर्यादा असतेच. फार काय, पण किडामुंगी वगैरे इतर प्राणीहि कांहीं विशिष्ट मर्यादेपर्यंतच दुःखं सहन करितात.

७२१ यथा शरीरं न ग्लायेन्नेयान्मृत्युवशं यथा।
तथा कर्मसु वर्तेत समर्थो धर्ममाचरेत्॥१२।२६५।१४

ज्याप्रकारें शरीराला थकवा येणार नाहीं आणि तें मृत्युवश होणार नाहीं, अशा प्रकारें कर्मांचें आचरण करावें. समर्थ राहून धर्माचरण करावें.

७२२ यथा समुद्रो भगवान् यथा हि हिमवान् गिरिः।
ख्यातावुभौ रत्ननिधी तथा भारतमुच्यते॥१८।५।६५

जसा भगवान् समुद्र आणि जसा पर्वतराज हिमालय हे रत्ननिधि म्हणून प्रसिद्ध आहेत तसेंच महाभारत हेंहि आहे.

७२३ यथा हि पुरुषः शालां पुनः संप्रविशेन्नवाम्।
एवं जीवः शरीराणि तानि तानि प्रपद्यते॥१२।१५।५७

मनुष्यानें (एक घर सोडून) पुनः दुसऱ्या नव्या घरांत प्रवेश करावा, तसा जीव हा निरनिराल्या देहांत प्रविष्ट होत असतो.

७२४ यथा ह्यामिषमाकाशे पक्षिभिः श्वापदैर्भुवि।
भक्ष्यते सलिले मत्स्यैस्तथा सर्वत्र वित्तवान्॥३।२।४०

ज्याप्रमाणें आकाशामध्यें पक्षी, भूतलावर श्वापदें, आणि पाण्यामध्यें मासे आमिषावर झडप घालीत असतात, त्याप्रमाणें सर्वत्र द्रव्यवान् पुरुषाची स्थिति असते. (म्हणजे त्याला लुबाडण्याकरितां सर्व ठिकाणीं लोक टपून बसलेले असतात.)

७२५ यदतप्तं प्रणमते नैतत्संतापमर्हति।
यत्स्वयं नमते दारु न तत्संनामयन्त्यपि॥१२।६७।१०

तापविल्याशिवायच जें लवतें तें तापविण्याची गरज नाहीं. जें लाकूड आपोआपच वांकतें तें (तापवून) वांकविण्याच्या भरीस कोणी पडत नाहीं.

७२६ यदन्येषां हितं न स्यादात्मनः कर्म पौरुषम्।
अपत्रपेत वा येन न तत्कुर्यात्कथंचन॥१२।१२४।६७

आपला जो प्रयत्न किंवा जी कृति दुसऱ्याच्या हिताची होणार नाहीं, अथवा जे केल्यानें आपली आपल्यालाच लाज वाटेल तें केव्हांहि करूं नये.

७२७ यदन्यैर्विहितं नेच्छेदात्मनः कर्म पूरुषः।
न तत्परेषु कुर्वीत जानन्नप्रियमात्मनः॥१२।२५९।२०

जें दुसऱ्यांनीं आपल्यासंबंधानें करूं नये असें मनुष्याला वाटतें, तें आपल्याला अप्रिय आहे, हें लक्षांत वागवून, आपणहि दुसऱ्यासंबंधानें करूं नये.

७२८ यदर्थो हि नरो राजंस्तदर्थोऽस्यातिथिः स्मृतः॥१५।२६।३७

(धृतराष्ट्र युधिष्ठिराला म्हणतो) राजा, मनुष्याजवल जी सामग्री असेल तिनेंच अतिथीचा सत्कार करावा, असें म्हटलें आहे.

७२९ यदा तु कश्चिज्ज्ञातीनां बाह्यः प्रार्थयते कुलम्।
न मर्षयन्ति तत्सन्तो बाह्येनाभिप्रधर्षणम्॥३।२४३।३

जेव्हां कोणी परका मनुष्य भाऊबंदांच्या कुलावर उठतो, तेव्हां परक्याकडून आपल्या कुलाचा होत असलेला तो अपमान सज्जन सहन करीत नाहींत.

७३० यदा मानं लभते माननार्ह–
स्तदा स वै जीवति जीवलोके।
यदावमानं लभते महान्तं
तदा जीवन्मृत इत्युच्यते सः॥८।६९।८१

सन्मान्य पुरुष जोंपर्यंत मान मिलवितो, तोंपर्यंतच या जगांत तो खरोखर जिवंत असतो. एकदा त्याचा अतिशय अपमान झाला कीं, तो जिवंत असूनहि मेल्याप्रमाणेंच झाला !

७३१ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥६ ।२८।७

(भगवान् श्रीकृष्ण सांगतात) अर्जुना, ज्या ज्या वेलीं धर्माला ग्लानि येते व अधर्माचा उत्कर्ष होतो त्या त्या वेलीं मी अवतार घेत असतों.

७३२ यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥६।२६।५८

कासव जसें आपले सर्व अवयव आंत ओढून घेतें त्याप्रमाणें जेव्हां मनुष्य आपलीं सर्व इंद्रियें त्यांच्या विषयांपासून आंवरून धरतो, तेव्हां त्याची बुद्धि स्थिर झाली असें म्हणतात.

७३३ यदिदं ब्रह्मणो रूपं ब्रह्मचर्यमिति स्मृतम्।
परं तत्सर्वधर्मेभ्यस्तेन यान्ति परां गतिम्॥१२।२१४।७

(परब्रह्माच्या प्राप्तीचें साधन असल्यामुलें) ब्रह्मचर्य हेंपरब्रह्माचें केवल स्वरूपच आहे असें सांगितलें आहे. तें सर्व प्रकारच्या धर्मनियमांपेक्षां श्रेष्ठ आहे. त्याच्या योगानेंच अत्यंत श्रेष्ठ गति प्राप्त होते. (मोक्ष मिलतो.)

७३४ यदि नात्मनि पुत्रेषु न चेत्पौत्रेषु नप्तृषु।
हि पापं कृतं कर्म सद्यः फलति गौरिव॥१२।९१।२१

आपल्या पापकर्माचेंप्रायश्चित्त आपल्याला भोगावें लागलें नाहीं, तर आपल्या मुलांना, त्यांना नाहीं तर नातवांना (तरी भोगावें लागेल) कारण गाईला खाणें घातलें असतां ती लगेच जास्त दूध देते, त्याप्रमाणें पापकर्माचें फल ताबडतोब मिलतें असें नाहीं. (‘गो’ म्हणजे भूमि असा अर्थ घेऊन या श्लोकाच्या दुसऱ्या ओलीचा पुढील प्रमाणें दुसराहि अर्थ टीकाकारांनी केलेला आहेः-भूमींत धान्य पेरिलें कीं तें लागलेंच जसें पिकत नाहीं, तसेंच केलेल्या पापकर्माचें फल तत्काल मिलूं शकत नाहीं.)

७३५ यदि नैवंविधं जातु कुर्यां जिह्ममहं रणे।
कुतो वा विजयो भूयः कुतो राज्यं कुतो धनम्॥९।६१।६४

(श्रीकृष्ण पांडवांस म्हणतात) युद्धांत (भीष्मद्रोणादिकांनामारण्याच्या कामीं) अशा प्रकारचें कपट जर मी केलें नाहीं तर तुम्हांला जय कसा मिलेल ? फिरून राज्य कसें मिलणार? धन कोठून मिलणार?

७३६ यदिष्टं तत्सुखं प्राहुर्द्वेष्यं दुःखमिहेष्यते॥१२।२९५।२७

इहलोकीं जें इष्ट वाटतें तें सुख, आणि जें द्वेष्य वाटतें तें दुःख असें मानिलें जातें.

७३७ यदि संन्यासतः सिद्धिं राजा कश्चिदवाप्नुयात्।
पर्वताश्च द्रुमाश्चैव क्षिप्रं सिद्धिमवाप्नुयुः॥१२।१०।२४

संन्यासानें जर एकाद्या राजाला सिद्धि प्राप्त होती तर (निष्क्रिय अशा) पर्वतांना व वृक्षांनासुद्धां सिद्धि तत्काल मिलाली असती !

७३८ यदि स्यात्पुरुषः कर्ता शक्रात्मश्रेयसे ध्रुवम्।
आरम्भास्तस्य सिध्येयुर्न तु जातु पराभवेत्॥१२।२२२।१८

(स्थानभ्रष्ट व पाशबद्ध झालेला प्रऱ्हाद इंद्राला म्हणतो) ईद्रा, आत्मकल्याण साधून घेणें ही गोष्ट जर निश्चयेंकरून पुरुषाच्याच हातची असती, तर त्याचे सर्व उद्योग सिद्धीस गेले असते; त्याला केव्हांहि अपयश आलें नसतें.

७३९ यदैव शत्रुर्जानीयात्सपत्नं त्यक्तजीवितम्।
तदैवास्मादुद्विजते सर्पाद्वेश्मगतादिव॥५।१३५।३६

आपला प्रतिपक्षी जिवावर उदार झाला असें जेव्हां शत्रूला समजून येतें, तेव्हांच त्याला घरांत शिरलेल्या सर्पासारखी त्याची भीति वाटूं लागते.

७४० यद्दुरापं दुराम्नायं दुराधर्षं दुरन्वयम्।
तत्सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम्॥१४।५१।१७

जें जें म्हणून असाध्य, अज्ञेय, अत्यंत भयंकर किंवा अत्यंत दुस्तर असें असेल तें सर्व तपानें साध्य होतें, खरोखरच, तपाचें अतिक्रमण करणें कठीण आहे.

७४१ यद्भूतहितमत्यन्तं तत्सत्यमितिधारणा॥३।२०९।४

ज्याच्या योगानें जीवाचें अतिशय कल्याण होतें तेंच सत्य असा सिद्धांत आहे.

७४२ यद्यत्प्रियं यस्य सुखं तदाहु—
स्तदेव दुःखं प्रवदन्त्यनिष्टम्॥१२।२०१।१०

ज्याला जें प्रिय वाटतें त्याला तो सुख म्हणतो, तेंच अप्रिय झालें कीं त्यालाच दुःख म्हणतो.

७४३ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥६।२७।२१

श्रेष्ठ पुरुष ज्या ज्या प्रकारें वागतो त्या त्या प्रकारेंच इतर लोक वागतात. त्याला जें मान्य होतें, त्याचेंच अनुकरण लोक करीत असतात.

७४४ यद्यदाचरते राजा तत्प्रजानां स्म रोचते॥१२।७५।४

राजा जें जें करतो तें प्रजेला आवडूं लागतें.

७४५ यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम्॥६।३४।४१

(भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात) जी जी वस्तु मोठेपणा ऐश्वर्य किंवा वैभव यांनीं युक्त असेल, ती ती प्रत्येक माझ्या (परमेश्वराच्या) तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेली आहे असें तूं पक्कें समज.

७४६ यद्यपि भ्रातरः क्रुद्धा भार्या वा कारणान्तरे।
स्वभावतस्ते प्रीयन्ते नेतरः प्रीयते जनः॥१२।१३८।१५४

कारणपरत्वें भाऊ जरी रागावले किंवा बायको रागावली तरी तीं स्वभावतःच प्रिय असतात. तसे इतर लोक प्रिय नसतात.

७४७ यन्निमित्तं भवेच्छोकस्तापो वा दुःखमेव च।
आयासो वा यतो मूलमेकाङ्गमपि तत्त्यजेत्॥१२।१७४।४३

ज्याच्यामुलें शोक, ताप, दुःख किंवा कष्ट होतात, तें कारण जरी आपल्या शरीराचा एक अवयव असलें तरीहि त्याचा त्यागकेला पाहिजे.

७४८ यमाजीवन्ति पुरुषं सर्वभूतानि संजय।
पक्वंद्रुममिवासाद्य तस्य जीवितमर्थवत्॥५।१३३।४३

(विदुला म्हणते) हे संजया, पक्व वृक्षाप्रमाणें ज्याच्याजवल गेल्यानें सर्व जीवांचें प्राणरक्षण होतें त्याचेंच जीवित सफल झालें.

७४९ ययोरेव समं वित्तं ययोरेव समं श्रुतम्।
तयोर्विवाहः सख्यं च न तु पुष्टविपुष्टयोः॥१।१३१।१०

ज्यांची श्रीमंती सारखी, ज्यांचें ज्ञान सारखें, त्यांचाच विवाहसंबंध किंवा स्नेहसंबंध होत असतो. एक समर्थ आणि दुसरा असमर्थ अशांचा अशा प्रकारचा संबंध कधींहि होत नसतो.

७५० यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्॥६।४०।२३

शास्त्रांत सांगितलेला विधि सोडून जो मनास वाटेल तें करूं लागला. त्याला सिद्धि प्राप्त होत नाहीं. सुख नाहीं आणि श्रेष्ठ गतिहि नाहीं.

७५१ यस्तु निःश्रेयसं श्रुत्वा प्राक्तदेवाभिपद्यते।
आत्मनो मतमुत्सृज्य स लोके सुखमेधते॥५।१२४।२४

आपलें खरें कल्याण कशांत आहे हें ऐकल्यावर, स्वतःचें मत बाजूला सारून जो प्रथमतः त्याचेंच आचरण करतो त्याला जगांत सुख होतें.

७५२ यस्तु वृद्ध्या न तृप्येत क्षये दीनतरो भवेत्।
एतदुत्तममित्रस्य निमित्तमिति चक्षते॥१२।८०।१६

आपला अभ्युदय कितीहि झाला तरी तृप्ति न होणें, आणि हान झाल्यास अत्यंत दीन होणें हें उत्तम प्रतीच्या मित्राचें लक्षण होय असे सांगितलेलें आहे.

७५३ यस्माददान्तान्दमयत्यशिष्टान् दण्डयत्यपि।
दमनाद्दण्डनाच्चैव तस्माद्दण्डं विदुर्बुधाः॥१२।१५।८

ज्याअर्थीं (राजदंड हा) स्वैराचरण करणाऱ्यांना वठणीस आणतो आणि असभ्यपणें वागणारांना शिक्षा करतो, त्याअर्थीं दमन करणें आणि दंड करणें या दोन गुणांमुलें ज्ञाते लोक त्याला दंड असें म्हणतात.

७५४ यस्मिन्क्षमा च क्रोधश्चदानादाने भयाभये।
निग्रहानुग्रहौ चोभौ स वै धर्मविदुच्यते॥१२।१४।१७

ज्याच्या ठायीं (प्रसंगानुरूप) क्षमा व क्रोध, दान देणें व दान घेणें, भय व अभय, तसेंच निग्रह व अनुग्रह हीं दोनहि आढलतात तोच खरोखर धर्म जाणणारा होय.

७५५ यस्मिन्नर्थे हितं यत्स्यात्तद्वर्णं रूपमादिशेत्।
बहुरूपस्य राज्ञो हि सूक्ष्मोऽप्यर्थो न सीदति॥१२।१२०।६

ज्या बाबतींत जें योग्य दिसेल त्याप्रकारचें रूप (राजानें) धारण करावें. कारण (प्रसंगाप्रमाणें) निरनिरालीं रूपें धारण करणाऱ्या राजाची बारीक सारीक गोष्टीत सुद्धां फसगत होत नाहीं.

७५६ यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्य–
स्तस्मिंस्तथा वर्तितव्यं स धर्मः।
मायाचारोमायया वर्तितव्यः
साध्वाचारः साधुना प्रत्युपेयः॥५।३७।७

ज्याच्याशीं जो मनुष्य ज्या प्रकारें वागतो, त्याच्याशीं त्यानें त्याचप्रकारें वागावें, असें करण्यांतच धर्म आहे. कपट करणाराशीं कपटानें वागावें, आणि सरलपणानें चालणाराशीं सरलपणा ठेवावा.

७५७यस्मै देवाः प्रयच्छन्ति पुरुषाय पराभवम्।
बुद्धिं तस्यापकर्षन्ति सोऽवाचीनानि पश्यति॥५।३४।८१

देवांच्या मनांतून ज्याचा नाश करावयाचा असतो, त्याची बुद्धि ते हिरावून घेतात, आणि मग त्याला (आपल्या हातून) नीच कर्में झालेली दिसतात.

७५८ यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं परे।
कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते॥५।३३।२३

ज्याचें पुढें करावयाचें कृत्य अथवा योजलेला बेत दुसऱ्यांना कलत नाहीं, काय तें प्रत्यक्ष कृतींत आल्यावरच समजतें त्याला पंडित म्हणतात.

७५९ यस्य दानजितं मित्रं शत्रवो युधि निर्जिताः।
अन्नपानजिता दाराः सफलं तस्य जीवितम्॥५।३९।८३

ज्यानें उदारपणानें मित्र आपलासा केला, युद्ध करून शत्रूंना जिंकलें आणि अन्नपानादिकांच्या योगानें स्त्रीला स्वाधीन ठेविलें त्याचें जीवित सफल झालें.

७६० यस्य धर्मो हि धर्मार्थः क्लेशभाङ् न स पण्डितः।
न सधर्मस्य वेदार्थं सूर्यस्यान्धः प्रभामिव॥३।३३।२३

(तत्त्व न जाणतां) केवल धर्मासाठीं जो धर्माचरण करतो तो शहाणा नसून दुःखाचा मात्र वांटेकरी होतो. आंधल्याला ज्याप्रमाणें सूर्याची प्रभा समजत नाहीं, त्याप्रमाणें त्याला धर्माचा अर्थ समजत नाहीं.

७६१ यस्य नास्ति निजा प्रज्ञा केवलं तु बहुश्रुतः।
न स जानाति शास्त्रार्थं दर्वीसूपरसानिव॥२।५५।१

ज्याला स्वतःची बुद्धि नाहीं पण ज्यानें केवल पुष्कलसें ऐकलेलें आहे त्याला, आमटींतल्या पलीला आमटीची चव कलत नाहीं त्याप्रमाणें शास्त्राचें रहस्य कलत नाहीं.

७६२ यस्य भार्या गृहे नास्ति साध्वी च प्रियवादिनी।
अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम्॥१२।१४४।१७

ज्याच्या घरांत सत्त्वशील व प्रिय भाषण करणारी स्त्री नाहीं, त्यानें अरण्यांत निघून जावें. कां कीं, जसें अरण्य तसेंच त्याचें घर.

७६३ यस्य वृत्तं न जल्पन्ति मानवा महदद्भुतम्।
राशिवर्धनमात्रं स नैव स्त्री न पुनः पुमान्॥५।१३३।२३

ज्याच्या हातून एकादी मोठी अद्भुत गोष्ट घडल्याचें लोक बोलत नाहींत तो मनुष्य केवल (मनुष्यजातीची) संख्या वाढविणारा होय. वस्तुतः त्याला स्त्रीहि म्हणतां येत नाहीं, मग पुरुष तर तो नव्हेच नव्हे.

७६४ यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यार्थास्तस्य बान्धवाः।
यस्यार्थाः स पुमाँल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः॥१२।८।१९

ज्याच्याजवल द्रव्य असेल त्याच्यासाठीं मित्र असतात. ज्याच्याजवल द्रव्य आहे त्याच्याकरितां आप्तेष्ट आहेत. जगांत ज्याच्याजवल द्रव्य असेल तोच खरा पुरुष आणि तोच पंडित.

७६५ यस्यैव बलमोजश्च स धर्मस्य प्रभुर्नरः॥१२।१५२।१८

ज्याच्या आंगीं सामर्थ्य आणि तेज हीं असतात तोच मनुष्य धर्माचरणास समर्थ होतो.

७६६ यः सदारः स विश्वास्यः॥१।७४।४४

(शकुंतला दुष्यंताला भार्येचें महत्त्व सांगते) जो सपत्नीक असेल तो विश्वास ठेवण्यास योग्य होय.

७६७ यः सपत्नश्रियं दीप्तां हीनश्रीः पर्युपासते।
मरणं शोभनं तस्य इति विद्वज्जना विदुः॥१।७९।१३

जो स्वतःचें ऐश्वर्य नष्ट झालें असतां प्रतिपक्ष्याच्या डोले दिपविणाऱ्या वैभवाची आराधना करितो, त्याला मृत्यु आलेला. फार उत्तम असें ज्ञाते लोक म्हणतात.

७६८ यः समुत्पतितं क्रोधं क्षमयेह निरस्यति।
यथोरगस्त्वचं जीर्णां स वै पुरुष उच्यते॥१।७९।४

सर्प जसा जीर्ण झालेली त्वचा टाकून देतो त्याप्रमाणें अंतःकरणांत उत्पन्न झालेल्या क्रोधाचें क्षमेच्या योगानें जो निवारण करितो तोच पुरुष म्हणावयाचा.

७६९ यः सौहृदे पुरुषं स्थापयित्वा
पश्चादेनं दूषयते स बालः॥२।६४।१३

जो पहिल्यानें आपणच एकाद्याला आपला स्नेही समजतो व मागून त्याला दूषण देतो तो पोरकट होय.

७७० या दुस्त्यजा दुर्मतिभिर्या न जीर्यति जीर्यतः।
योऽसौ प्राणान्तिको रोगस्तां तृष्णां त्यजतः सुखम्॥१३।७।२१

दुष्ट मनुष्यांना जिचा त्याग करितां येत नाहीं, शरीर जीर्ण होत असतां जी कमी होत नाहीं, जी केवल प्राणांतींच संपणाऱ्या रोगासारखी आहे त्या तृष्णेचा (लोभाचा) त्याग करणारास सुख प्राप्त होतें.

७७१ यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः।
सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम्॥१३।६।६

शेतकरी शेतांत ज्या प्रकारचें बीज टाकतो त्या प्रकारचें त्यास फल मिलतें. जर त्यानें चांगलें बीं पेरिलें तर त्यास चांगलें फल येतें; आणि वाईट पेरिलें तर वाईट फल येतें.

७७२ यादृशः पुरुषस्यात्मा तादृशं संप्रभाषते॥५।३।१

पुरुषाचें अंतःकरण जशा प्रकारचें असतें तशा प्रकारचें तो भाषण करीत असतो.

७७३ यादृशैः संनिविशते यादृशांश्चोपसेवते।
यादृगिच्छेच्च भवितुं तादृग्भवति पूरुषः॥५।३६।१३

कोणी मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांशी सहवास ठेवितो, ज्या प्रकारच्या मनुष्यांची सेवा करतो, आणि ज्या प्रकारचा होण्याची इच्छा धरतो त्या प्रकारचा तो होतो.

७७४ यादृशो जायते राजा
तादृशोऽस्य जनो भवेत्॥११।८।३२

जसा राजा असेल तशी त्याची प्रजा होते.

७७५ यावच्च मार्दवेनैतान् राजन्नुपचरिष्यसि।
तावदेते हरिष्यन्ति तव राज्यमरिंदम्॥५।७३।८

(श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणतात) हे शत्रूंचें दमन करणाऱ्या धर्मराजा, जोपर्यंत तूं सामोपचारानें यांच्याशीं (कौरवांशीं) वागत राहाशील तोंपर्यंत हे तुझें राज्य बलकावून बसतील.

७७६ यावत्कीर्तिर्मनुष्यस्य न प्रणश्यति कौरव।
तावज्जीवति गान्धारे नष्टकीर्तिस्तु नश्यति॥१।२०३।११

(भीष्म म्हणतात) गांधारीपुत्रा दुर्योधना; जोंपर्यंत मनुष्याची कीर्ति नष्ट झालेली नाहीं तोंपर्यंत तो जिवंत असतो. कीर्ति नाहींशी झाली म्हणजे त्याचा नाश होतो.

७७७ यावद्धि तीक्ष्णया सूच्या विध्येदग्रेण केशव।
तावदप्यपरित्याज्यं भूमेर्नः पाण्डवान्प्रति॥५।१२७।२५

(दुर्योधन म्हणतो) हे कृष्णा, भूमीमध्यें तीक्ष्ण सुई टोचली असतां तिच्या टोकावर जेवढ़ी भूमि येईल तेवढी भूमि देखील आम्ही पांडवांना देणार नाहीं.

७७८ युक्ता यदा जानपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव।
अभीक्ष्णं भिक्षुरूपेण राजानं घ्नन्ति तादृशाः॥१२।९१।२३

राष्ट्रांतील प्रजा उद्योगशील असूनहि जर (उद्योगाच्या अभावामुलें) भिक्षुरूपी बनून ब्राह्मणांप्रमाणें वारंवार भिक्षा मागूं लागली तर तिच्या योगानें राजाचा वध होतो.

७७९ ये च मूढतमा लोके ये च बुद्धेः परं गताः।
त एव सुखमेधन्ते मध्यमः क्लिश्यते जनः॥१२।२५।२८

जगांत जे अत्यंत मूढ असतात, अथवा जे ज्ञानाच्या पैलतीराला पोंचलेले असतात तेच सुखानें नांदत असतात. मध्यम स्थितींतल्या लोकांना क्लेशच होतात.

७८० ये तु बुद्ध्या हि बलिनस्ते भवन्ति बलीयसः।
प्राणमात्रबला ये वै नैव ते बलिनो मताः॥१२।१५६।१३

जे बुद्धीनें बलिष्ठ असतील, तेच खरे प्रबल होत. जे केवल शारीरिक बलानें संपन्न ते खरोखर बलवान् नव्हत.

७८१ ये दम्भान्नाचरन्ति स्म येषां वृत्तिश्चसंयता।
विषयांश्च निगृह्णन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते॥१२।११०।३

जे दांभिक आचरण करीत नाहींत, ज्यांची वृत्ति संयमशील आहे व जे विषयांना जिंकतात ते सर्व संकटातून पार पडतात.

७८२ ये धनादपकर्षन्ति नरं स्वबलमास्थिताः।
ते धर्ममर्थं कामं च प्रमथ्नन्ति नरं च तम्॥५।७२।२४

स्वतःच्या बलाचा आश्रय करून जे एकाद्या मनुष्याचें द्रव्य हिरावून घेतात, ते त्याचा धर्म, अर्थ व काम आणि तो मनुष्य या सर्वांचा विध्वंस करतात.

७८३ येन खट्वांसमारूढः परितप्येत कर्मणा।
आदावेव न तत्कुर्यादध्रुवे जीविते सति॥५।३९।२९

खाटेवर (मृत्युशय्येवर) पडल्यावर ज्या कृत्यामुलें पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येईल असें कृत्य प्रथमतःच करूं नये. कारण जीवित क्षणभंगुर आहे.

७८४ ये न मानित्वमिच्छन्ति मानयन्ति च ये परान्।
मान्यमानान्नमस्यन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते॥१२।११०।१९

जे सन्मानाची इच्छा करीत नाहींत, जे दुसऱ्यांना मान देतात आणि सन्मानास पात्र असलेल्यांना प्रणाम करितात ते संकटांच्या पार जातात.

७८५ ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्॥६।२८।११

(श्रीकृष्ण म्हणतात) जे मला जसे भजतात तसें मी त्यांना फल देतों.

७८६ येऽर्थाः स्त्रीषु समायुक्ताः प्रमत्तपतितेषु च।
ये चानार्ये समासक्ताः सर्वे ते संशयं गताः॥५।३८।४२

जींकामें स्त्रिया किंवा झिंगलेला अथवा पतित मनुष्य यांच्यावर सोंपविलीं गेलीं, तसेंच जीं कामें अनार्य मनुष्याकडे दिलीं गेलीं ती सगलीं संशयांत पडलीं.

७८७ येषां त्रीण्यवदातानि विद्या योनिश्चकर्म च।
तान्सेवेत्तैःसमास्या हि शास्त्रेभ्योऽपि गरीयसी॥३।१।२७

विद्या, कुल आणि आचरण हीं तीन ज्यांचींशुद्ध आहेत त्यांची संगत धरावी. खरोखर, त्यांचा समागम शास्त्राभ्यासापेक्षांहि श्रेष्ठ होय.

७८८ येषां शास्त्रानुगा बुद्धिर्न ते मुह्यन्ति भारत॥१।१।२४४

(संजय धृतराष्ट्राला म्हणतो) ज्यांची बुद्धि शास्त्रानुसार चालते ते भांबावून जात नाहींत.

७८९ ये हि धर्मस्य लोप्तारो
वध्यास्ते मम पाण्डव॥७।१८१।२८

(श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना, जे धर्म बुडविणारे असतील ते माझ्याकडून मारिले जाण्यास योग्य होत.

७९० ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः॥६।२९।२२

(श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना, इंद्रियांचा विषयांशीं संबंध घडल्यानें जे भोग उत्पन्न होतात ते खरोखर दुःखाचें माहेरघरच होत, त्यांना आदि असून अंतहि असतो. त्यांच्या ठिकाणीं शहाणा पुरुष रममाण होत नाहीं.

७९१ योगः कर्मसु कौशलम्॥६।२६।५०

योग म्हणजे कर्में करण्याचें कौशल्य. (कर्मफलाचा लेप न लागेल अशा रीतीनें निष्कामबुद्धीनें कर्में करणें.)

७९२ यो न दर्शयते तेजः क्षत्रियः काल आगते।
सर्वभूतानि तं पार्थ सदा परिभवन्त्युत॥३।२७।३८

(द्रौपदी धर्मराजास म्हणते) हे कुंतीपुत्रा, समय प्राप्त झाला असतां जो क्षत्रिय आपलें तेज प्रकट करीत नाहीं त्याचा अपमान सर्व प्राणी नेहमीं करीत असतात.

७९३ योऽन्यथा सन्तमात्मानमन्यथा प्रतिपद्यते।
किं तेन न कृतं पापं चौरेणात्मापहारिणा॥५।४२।३७

जो आपलें खरें स्वरूप एकाप्रकारचें असतां, तें दुसऱ्या प्रकारचें भासवितो; त्या स्वतःचें खरें स्वरूप लपविणाऱ्याचोरानें कोणतें पाप केलें नाहीं ?

७९४ यो मां प्रयतते हन्तुं ज्ञात्वा प्रहरणे बलम्।
तस्य तस्मिन्प्रहरणे पुनः प्रादुर्भवाम्यहम्॥१४।१३।१३

(काम म्हणजे अहंकार म्हणतो) एकाद्या आयुधांत (तपश्चर्यादि साधनांत) सामर्थ्य आहे असें समजून जो मला त्यार्नेमारण्याचा प्रयत्न करितो, त्याच्या त्या आयुधांतच मी फिरून उत्पन्न होतों. (तपश्चर्यादिकांचा अहंकार उत्पन्न होतो.)

७९५ यो यथा वर्तते यस्मिंस्तस्मिन्नेव प्रवर्तयन।
नाधर्मं समवाप्नोति नचाश्रेयश्च विन्दति॥५।१७८।५३

जो ज्याच्याशीं ज्याप्रकारें वागतो त्याच्याशीं त्या प्रकारें वागण्यांत कोणताहि अधर्म घडत नाहीं, आणि त्यापासून अकल्याणहि होत नाहीं.

७९६ यो यस्मिञ्जीवति स्वार्थे पश्येत्पीडां न जीवति।
स तस्य मित्रं तावत्स्याद्यावन्नस्याद्विपर्ययः॥१२।१३८।१४०

जो जिवंत राहिला असतां स्वार्थाला बाध येणार नाहीं व आपले प्राण वांचतील असें ज्याला वाटत असेल त्याचा तो मित्र, उलट स्थिति आली नाहीं तोंवरच असतो.

७९७ योऽरिणा सह संधाय सुखं स्वपिति विश्वसन्।
स वृक्षाग्रे प्रसुप्तो वा पतितः प्रतिबुध्यते॥१२।१४०।३७

जो शत्रूशीं तह केल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवून खुशाल झोपा काढतो तो, झाडाच्या शेंड्यावर झोपी गेलेल्या मनुष्याप्रमाणें, पडल्यावरच जागा होतो.

७९८ यो विद्यया तपसा संप्रवृद्धः
स एव पूज्यो भवति द्विजानाम्॥१।८९।३

जो विद्येनें व तपानें वृद्ध झाला तोच द्विजांना पूज्य वाटतो.

७९९ यो हि तेजो यथाशक्ति न दर्शयति विक्रमात्।
क्षत्त्रियो जीविताकाङ्क्षी स्तेन इत्येव तं विदुः॥५।१३४।२

जीवाच्या आशेनें जो क्षत्रिय यथाशक्ति पराक्रम करून आपलें तेज प्रकट करीत नाहीं तो चोरच म्हटला पाहिजे !

८०० रक्षणं सर्वभूतानामिति क्षात्त्रं परं मतम्॥१२।१२०।३

सर्व भूतांचें रक्षण करतो म्हणून क्षत्रियाला श्रेष्ठ समजतात.

८०१ रथः शरीरं भूतानां सत्त्वमाहुस्तु सारथिम्।
इन्द्रियाणि हयानाहुः कर्मबुद्धिस्तु रश्मयः॥११।७।१३

जीवाचें शरीर हा रथ व बुद्धि हा सारथि होय. इंद्रियें हे (या रथाला जोडलेले) घोडे होत. आणि मन हा लगाम होय.

८०२ राजन्सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यसि।
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यसि॥१।७४।८२

(शकुंतला दुष्यंताला म्हणते) हे राजा, दुसऱ्यांचे मोहरीएवढे बारीक दोष तुला दिसतात, पण स्वतःचे बेलफलाएवढे मोठे दोषहि तूं पहात असूनहि तिकडे डोलेझांक करतोस.

८०३ राजमूला महाबाहो योगक्षेमसुवृष्टयः।
प्रजासु व्याधयश्चैव मरणं च भयानि च॥१२।१४१।९

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) प्रजेचा योगक्षेम नीट चालणें, पर्जन्य चांगला पडणें, तसेंच प्रजेला रोग, मरण अथवा भय प्राप्त होणें या सर्वांचें मुख्य कारण राजाच आहे.

८०४ राजमूलो महाप्राज्ञ धर्मो लोकस्य लक्ष्यते ।
प्रजा राजभयादेव न खादन्ति परस्परम्॥१२।६८।८

(बृहस्पति वसुमना राजाला सांगतात) लोक धर्मानेंवागतात, याचें कारण राजाच होय असें दिसून येतें. राजाच्या भीतीमुलेंच लोक एकमेकांना खाऊन टाकीत नाहींत.

८०५ राजा कृतयुगस्रष्टा त्रेताया द्वापरस्य च।
युगस्य च चतुर्थस्य राजा भवति कारणम्॥१२।६९।९८

जगांत कृतयुग उत्पन्न करणारा राजाच होय. तीच गोष्ट त्रेतायुगाची व द्वापर युगाची आणि चौथ्या म्हणजे कलियुगालाहि राजाच कारण होतो.

८०६ राजा चेन्न भवेल्लोके पृथिव्यां दण्डधारकः।
जले मत्स्यानिवाभक्ष्यन्दुर्बलं बलवत्तराः॥१२।६७।१६

पृथ्वीवर दंड धारण करणारा राजा जर नसता, तर पाण्यांतील माशांप्रमाणें बलवत्तर लोकांनीं दुर्बलांना खाऊन टाकिलें असतें.

८०७ राजानं प्रथमं विन्देत्ततो भार्यां ततो धनम्।
राजन्यसति लोकस्य कुतो भार्या कुतो धनम् ॥१२।५७।४१

प्रथमतः (संरक्षण करणारा) राजा प्राप्त करून घ्यावा त्यानंतर भार्या मिलवावी व द्रव्य मिलवावें. कारण राजाच जर अयोग्य असेल तर स्त्री तशी कशी राहणार व धन तरी कसें मिलणार?

८०८ राजा लोकस्य रक्षिता॥१२।९०।३

राजा हाच लोकांचा पालनकर्ता होय.

८०९ राजैव कर्ता भूतानां राजैव च विनाशकः।
धर्मात्मा यः स कर्ता स्यादधर्मात्मा विनाशकः॥१२।९१।९

प्राण्यांचें कल्याण करणारा राजाच आणि त्यांचा नाश करणाराहि पण राजाच. कारण तो धर्मानें वागेल तर कल्याणकर्ता आणि अधर्मानें वागेल तर नाश करणारा ठरतो.

८१० राजैव युगमुच्यते॥१२।९१।६

राजालाच युग म्हणतात. (म्हणजे जसा राजा असेल तसें बरें वाईट युग उत्पन्न होतें)

८११ राज्ञः प्रमाददोषेण दस्युभिः परिमुष्यताम्।
अशरण्यः प्रजानां यः स राजा कलिरुच्यते॥१२।१२।२९

राजाच्या हलगर्जीपणामुलें चोरांकडून लुबाडल्या जाणाऱ्या प्रजेला जो राजा अभय देऊं शकत नाहीं तो (मूर्तिमंत) कलिच होय.

८१२ राज्ञां हि चित्तानि परिप्लुतानि।
सान्त्वं दत्त्वा मुसलैर्घातयन्ति॥२।६४।१२

राजांचें चित्त नेहमीं कलुषित असल्यामुलें ते प्रथमतः गोड बोलतात आणि मागाहून डोक्यांत मुसल घालून प्राण घेतात.

८१३ राज्ञा हि पूजितो धर्मस्ततः सर्वत्र पूज्यते॥१२।७५।४

राजानें अगोदर धर्माचा मान ठेविला म्हणजे सर्व लोक धर्माचा मान ठेवितात.

८१४ राज्यं हि सुमहत्तन्त्रं धार्यते नाकृतात्मभिः।
न शक्यं मृदुना वोढुमायासस्थानमुत्तमम्॥१२।५८।२१

राज्य चालविणें हें अत्यंत अवघड काम आहे. ज्यानें मनोनिग्रह केला नाहीं त्याला तें झेपणार नाहीं. राज्यधुरा वाहणें हें अत्यंत कष्टप्रद असून तें लेच्यापेच्या मनुष्याला शक्य नाहीं.

८१५ राज्यं प्रणिधिमूलं हि मन्त्रसारं प्रचक्षते॥१२।८३।५१

हेर हा राज्याचा आधार, आणि सल्लामसलत ही शक्ति होय असें म्हणतात.

८१६ राष्ट्रस्यैतत्कृत्यतमं राज्ञ एवाभिषेचनम्।
अनिन्द्रमबलं राष्ट्रं दस्यवोऽभिभवन्त्युत॥१२।६७।२

कोणत्यातरी राजाला राज्याभिषेक करणें हेंएक राष्ट्राचें प्रमुख कर्तव्य आहे. कारण राष्ट्राला कोणी नियंता नसला म्हणजे तें दुर्बल झाल्यामुलें शत्रु त्याच्यावर हल्ला करितात.

८१७ रोहते सायकैर्विद्धं वनं परशुना हतम्।
वाचा दुरुक्तं बीभत्सं न संरोहति वाक्क्षतम्॥५।३४।७८

बाणांनी वेधलेलें अथवा कुऱ्हाडीनें तोडलेलें वन फिरून वाढीस लागतें. परंतु दुष्ट व बीभत्स बोलण्यानें पडलेली जखम भरून येत नाहीं.

८१८ लब्धानामपि वित्तानां बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ।
अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम्॥१२।२६।३१

मिलविलेल्या द्रव्याचे दोन दुरुपयोग जाणावे. एक, अपात्रीं दान करणें, दुसरा सत्पात्रीं न करणें.

८१९ लोकयात्रार्थमेवेह धर्मस्य नियमः कृतः॥१२।२५९।५

या जगांत लोकव्यवहार सुरलीतपणें चालावा एवढ्यासाठींच धर्माचरणाचा नियम घालून दिला आहे.

८२० लोकरञ्जनमेवात्र राज्ञां धर्मः सनातनः॥१२।५७।११

या लोकीं प्रजेला सुखी ठेवणें हाच राजांचा सनातन धर्म आहे.

८२१ लोभं हित्वा सुखी भवेत्॥३।३१३।७८

लोभ टाकिल्यानें मनुष्य सुखी होतो.

८२२ लोभात्पापं प्रवर्तते १२।१५८।२

लोभापासून पातकाची प्रवृत्ति होते.

८२३ लोहितोदां केशतृणां गजशैलां ध्वजद्रुमाम्।
महीं करोति युद्धेषु क्षत्रियो यः स धर्मवित्॥१२।५५।१८

जो संग्रामामध्यें पृथ्वीला रक्तरूपी जलानें युक्त, केशरूपी तृणानें आच्छादित झालेली, गजरूपी पर्वत असलेली व ध्वजरूपी वृक्षांनीं युक्त अशी करितो, तोच क्षत्रिय खरा धर्मवेत्ता होय.

८२४ वधमेव प्रशंसन्ति शत्रूणामपकारिणाम्॥१।१४०।१०

अपकार करणाऱ्या शत्रूंचा वधच करणें प्रशस्त मानतात.

८२५ वध्यन्ते न ह्यविश्वस्ताः शत्रुभिर्दुर्बला अपि।
विश्वस्तास्तेषु वध्यन्ते बलवन्तोऽपि दुर्बलैः॥१२।१३८।१९८

जे सावध असतात ते दुर्बल असले तरी शत्रूंकडून मारिले जात नाहींंत. पण बलाढ्य असले तरी शत्रूविषयीं बेसावध राहणारे, दुर्बल शत्रूंकडूनहि मारिले जातात.

८२६ वर्तमानः सुखे सर्वो मुह्यतीति मतिर्मम॥३।१८१।३०

(अजगर झालेला नहुष राजा युधिष्ठिराला म्हणतो) सुखांत असतांना सर्वांना मोह उत्पन्न होतो असें माझें मत आहे.

८२७ वर्धमानमृणं तिष्ठेत्परिभूताश्च शत्रवः।
जनयन्ति भयं तीव्रं व्याधयश्चाप्युपेक्षिताः॥१२।१४०।५९

ऋण अवशिष्ट राहिलेंतर तें वृद्धिंगतच होत जातें, शत्रु शिल्लक ठेविले तर त्यांचा अपमान झाल्यामुलें ते पुढें अत्यंत भीति उत्पन्न करितात. आणि रोगांची उपेक्षा केली तर त्यापासूनहि अतिशय भीति उत्पन्न होते.

८२८ वशे बलवतां धर्मः सुखं भोगवतामिव।
नास्त्यसाध्यं बलवतां सर्वं बलवतां शुचि॥१२।१३४।८

सुख जसें भोगसाधनें अनुकूल असलेल्याच्या स्वाधीन, तसा धर्म बलसंपन्न असलेल्यांच्या अधीन. ज्यांच्यापाशीं बल आहे त्यांना असाध्य असें कांहींच नाहीं. बलवान् असतील त्यांचें सर्वच पवित्र.

८२९ वसन्विषयमध्येऽपि न वसत्येव बुद्धिमान्।
संवसत्येव दुर्बुद्धिरसत्सु विषयेष्वपि॥१२।२९८।६

शहाणा मनुष्य विषयांच्यागराड्यांत राहूनहि न राहिल्यासारखा असतो. मूर्ख मनुष्य विषय जवल नसतांहि त्यांत गुरफटल्याप्रमाणें असतो.

८३० वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालस्य पर्ययः।
प्राप्तकालं तु विज्ञाय भिन्द्याद्घटमिवाश्मनि॥१२।१४०।१८

आपला काल उलट आहे तोंवर शत्रूला खांद्यावर देखील बसवावें परंतु योग्य काल आला आहेसें दिसून येतांच मडकें दगडावर आपटावेंतसा त्याचा चुराडा करून टाकावा.

८३१ वाक्शल्यं मनसो जरा॥५।३९।७९

वाग्बाणामुलें मनाला वार्धक्य येतें.

८३२ वाक्संयमो हि नृपते सुदुष्करतमो मतः।
अर्थवच्च विचित्रं च न शक्यं बहु भाषितुम्॥५।३४।७६

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, वाणीचा संयम करणें अत्यंत दुर्घट म्हणून म्हटलें आह. परंतु यथार्थ असून चटकदार असें भाषण पुष्कल करणें शक्यहि नाहीं.

८३३ वाक्सायका वदनान्निष्पतन्ति
यैराहतः शोचति रात्र्यहानि।
परस्य नामर्मसु ये पतन्ति
तान्पण्डितो नावसृजेत्परेषु॥१३।१०४।३२

वाग्बाण हे तोंडांतून सुटत असतात. ते ज्याला लागले तो रात्रंदिवस तलमलत राहतो. यास्तव जे मर्मस्थानांवाचून इतर ठिकाणीं पडतच नाहींत (मर्मींच लागतात) असे वाग्बाण सुज्ञ मनुष्यानें दुसऱ्यावर केव्हांहि टाकू नयेत.

८३४ वाग्वज्रा ब्राह्मणाः प्रोक्ताः
क्षत्रिया बाहुजीविनः॥१२।१९९।४६

वाणी हेंब्राह्मणांचें शस्त्र असून क्षत्रिय हे बाहुबलावर जगणारे होत असें म्हटलें आहे.

८३५ वाचा भृशं विनीतः स्याद्धृदयेन तथा क्षुरः।
स्मितपूर्वाभिभाषी स्यात्सृष्टो रौद्रेण कर्मणा१।१४०।६६

बोलण्यांत अगदीं विनयशील पण हृदयानें वस्तऱ्याच्या धारेप्रमाणें तीक्ष्ण असावें. स्मितपूर्वक बोलावें परंतु आपलें खरें स्वरूप भयंकर कृति करून प्रगट करावें.

८३६ वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही॥६।२६।२२

ज्याप्रमाणें मनुष्य जुनीं वस्त्रें टाकून देऊन दुसरीं नवीं घेतो, त्याप्रमाणें आत्मा हा जीर्ण झालेलीं शरीरें टाकून देऊन दुसऱ्या नव्या शरीरांत प्रवेश करितो.

८३७ विक्रमाधिगता ह्यर्थाः क्षत्रधर्मेण जीवतः।
मनो मनुष्यस्य सदा प्रीणन्ति पुरुषोत्तम॥५।९०।७९

(कुंती श्रीकृष्णाला म्हणते) हे पुरुषोत्तमा, पराक्रम करून मिलविलेलें द्रव्य क्षात्रधर्मानें चालणाऱ्या मनुष्याच्या मनाला सदा संतोष देतें.

८३८ विगुणा ह्यपि संरक्ष्या ज्ञातयो भरतर्षभ॥५।३९।२०

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे भरतश्रेष्ठा, आपल्या कुलांतील गुणहीन पुरुषांचेंहि संरक्षण करणें अवश्य आहे.

८३९ विजयो मन्त्रमूलो हि राज्ञो भवति भारत॥२।५।२७

(नारद युधिष्ठिराला म्हणतात) हे भारता, राजाला विजय प्राप्त होण्याला मूल कारण गुप्त सल्लामसलत हेंच होय.

८४० विदिते चापि वक्तव्यं सुहृद्भिरनुरागतः॥४।४।१९

एकाद्यास माहीत असलेली गोष्टहि आप्तेष्टांनीं पुनः प्रेमानें सांगावी हें त्यांचें कर्तव्यच आहे.

८४१ विद्या तपो वा विपुलं धनं वा
सर्वं ह्येतद्व्यवसायेन शक्यम्॥१२।१२०।४५

विद्या, तप, अथवा विपुल द्रव्य हेंसर्व उद्योगानेंच मिलविणें शक्य आहे.

८४२ विद्यामदो धनमदस्तृतीयोऽभिजनो मदः।
मदा एतेऽवलिप्तानामेत एव सतां दमाः॥५।३४।४४

विद्येचा मद, धनाचा मद व तिसरा कुलाचा मद हे तीन गर्विष्ठ लोकांच्या बाबतींत मद म्हणजे अहंकार वाढविणारे ठरतात, तेच सज्जनांच्या बाबतींत दमाला म्हणजे इंद्रियनिग्रहाला कारण होतात.

८४३ विद्या हि सा ब्रह्मचर्येण लभ्या॥५।४४।२

विद्या म्हणून जी आहे ती ब्रह्मचर्यानेंच साध्य होत असते.

८४४ विना वधं न कुर्वन्ति तापसाः प्राणयापनम्॥१२।१५।२४

जीवहत्या घडल्याविना तपस्व्याचेंसुद्धां प्राणधारण होत नाहीं

८४५ विरूपो यावदादर्शे नात्मनः पश्यते मुखम्।
मन्यते तावदात्मानमन्येभ्यो रूपवत्तरम्॥१।७४॥८७

कुरूप मनुष्य जोंवर आरशांत आपलें तोंड पहात नाहीं, तोंवर त्याला वाटत असतें कीं, आपण इतरांपेक्षां अधिक रूपवान् आहों.

८४६ विवर्जनं ह्यकार्याणामेतत्सुपुरुषव्रतम्॥४।१४।३६

दुष्कृत्य सर्वथा वर्ज्य करणें हें सत्पुरुषांचें व्रत होय.

८४७ विवाहकाले रतिसंप्रयोगे
प्राणात्यये सर्वधनापहारे।
विप्रस्य चार्थे ह्यनृतं वदेत
पञ्चानृतान्याहुरपातकानि॥८।६९।३३

विवाहकालीं, संभोगसमयीं, प्राणसंकट ओढवलें असतां, सर्वस्वाचा नाश होण्याचा समय आला असतां, तसेंच एकाद्या ब्राह्मणाचें हित साधत असेल तर मनुष्यानें असत्य भाषण केलें तरी चालेल. या पांच प्रसंगीं असत्य भाषणाच्या योगानें पातक लागत नाहीं.

८४८ विश्वासयित्वा तु परं तत्त्वभूतेन हेतुना।
अथास्य प्रहरेत्काले किंचिद्विचलिते पदे॥१२।१४०।४४

खरेंखुरें कारण दाखवून शत्रूचा विश्वास संपादन करावा. आणि कालांतरानें त्याचें आसन जरासें डलमलीत झालें कीं, त्याच्यावर प्रहार करावा.

८४९ विश्वासयेत्परांश्चैव विश्वसेच्च न कस्यचित्।
पुत्रेष्वपि हि राजेन्द्र विश्वासो न प्रशस्यते॥१२।८५।३३

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) दुसऱ्यांचा विश्वास संपादन करावा. पण आपण मात्र कोणावरहि विश्वास ठेवूं नये. हे राजश्रेष्ठा, फार काय, पण पोटच्या मुलाचासुद्धां पूर्ण विश्वास धरणें प्रशस्त नव्हे.

८५० विश्वासाद्भयमभ्येति
नापरीक्ष्य च विश्वसेत्॥१२।१४०।४३

(भलत्याच मनुष्यावर) विश्वास टाकिल्यानेंभीति उत्पन्न होत असते. यास्तव, परीक्षा पाहिल्यावांचून कोणावरहि विश्वास ठेवूं नये.

८५१ विषमं न हि मन्यन्ते प्रपातं मधुदर्शिनः॥५।५१।२६

मध पाहणारे (मधाच्या ठिकाणाचा) तुटलेला कडा किती भयंकर आहे इकडे लक्ष देत नाहींत.

८५२ विषमां च दशां प्राप्तो देवान् गर्हति वै भृशम्।
आत्मनः कर्मदोषाणि न विजानात्यपण्डितः॥३।२०९।१६

मूर्ख मनुष्य दुर्दशेच्या फेऱ्यांत सांपडला म्हणजे देवांच्या नांवानें खडे फोडतो, पण आपलें चुकतें कोठें, हैं त्याला समजत नाहीं.

८५३ विषमावस्थिते दैवे पौरुषेऽफलतां गते।
विषादयन्ति नात्मानं सत्त्वोपाश्रयिणो नराः॥३।७९।१४

दैव प्रतिकूल होऊन प्रयत्न फुकट गेला असतां, सत्वशील पुरुष अंतःकरण खिन्न होऊं देत नाहींत.

८५४ विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते॥६।२६।५९

निराहारी पुरुषाला विषय सोडून जातात, पण त्यांची आवड शिल्लक राहतेच, ही आवडसुद्धां परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर नष्ट होते.

८५५ विष्वग्लोपः प्रवर्तेत भिद्येरन्सर्वसेतवः।
ममत्वं न प्रजानीयुर्यदि दण्डो न पालयेत्॥१२।१५।३८

दंडाने जर संरक्षण केलें नसतें तर सर्वत्र लोप होऊन गेला असता. सर्व प्रकारच्या मर्यादांचा भंग होऊन गेला असता; आणि कोणाची कशावर मालकी राहिली नसती.

८५६ विहीनं कर्मणान्यायं यः प्रगृह्णाति भूमिपः।
उपायस्याविशेषज्ञं तद्वै क्षत्रं नपुंसकम्॥१२।१४२।३१

(सामादिक) उपाय व त्यांचे भेद यांचें ज्ञान नसणारा जो राजा, अन्यायानें प्रजेकडून कर वसूल करतो; पण आपलें (प्रजापालनरूप) कर्तव्य मात्र करीत नाहीं तो क्षत्रिय केवल नपुंसक होय.

८५७ वृक्षमूलेऽपि दयिता
यस्य तिष्ठति तद्गृहम्।
प्रासादोऽपि तया हीनः
कान्तार इति निश्चितम्॥१२।१४४।१२

कोणी झाडाखालीं राहिला, तरी त्याची स्त्री बरोबर असेल, तर तें त्याचें घरच होय, आणि तिजवांचून जरी एकादें राजमंदिर असलेंतरी तें निःसंशय अरण्यच होय.

८५८ वृत्तं यत्नेन संरक्षेद्वित्तमेति च याति च।
अक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः॥५।३६।३७

शीलाचें यत्नपूर्वक रक्षण करावें. द्रव्य काय, मिलतें आणि जातें, जो केवल द्रव्यानें क्षीण झाला तो खरोखर क्षीण नव्हे, पणज्याचें शील भ्रष्ट झालें त्याचा सर्वस्वीं नाश झाला.

८५९ वृत्तेः कार्पण्यलब्धाया अप्रतिष्ठैव ज्यायसी॥५।९०।७४

मिंधेपणानें उपजीविका करण्यापेक्षां अगदीं निराधार असणेंच चांगलें.

८६० वृत्तेन हि भवत्यार्यो न धनेन न विद्यया॥५।९०।५३

शीलानेंच मनुष्य आर्य गणला जातो; धनानें नव्हे, अथवा विद्येनेंहि नव्हे.

८६१ वेदाढ्या वृत्तसंपन्ना ज्ञानवन्तस्तपस्विनः।
यत्र तिष्ठन्ति वै विप्रास्तन्नाम नगरं नृप॥३।२००।९१

(मार्कंडेय युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, वेदपारंगत, शीलसंपन्न, ज्ञानी व तपस्वी असे ब्राह्मण ज्यांत राहात असतील त्यालाच खरोखर नगर म्हणाव.

८६२ वेदाऽहं तव या बुद्धिरानृशंस्याऽगुणैव सा॥१२।७५।१८

(धर्माचरण करण्याच्या इच्छेनें राज्य सोडून अरण्यांत जाऊं इच्छिणाऱ्या युधिष्ठिरास भीष्म म्हणतात) तुझ्या बुद्धीला क्रूरत्वाचा संपर्क नाहीं हें मी जाणून आहें पण तशा प्रकारची बुद्धि निष्फल होय.

८६३ वैद्याश्चाप्यातुराः सन्ति बलवन्तश्च दुर्बलाः।
श्रीमन्तश्चापरे षण्ढा विचित्रः कालपर्ययः॥१२।२८।२२

वैद्यांनासुद्धां रोग होतात आणि बलवान् देखील दुबले ठरतात. तसेंच कित्येक श्रीमंत लोक नामर्द असतात. कालाची गति विचित्र आहे !

८६४ व्यक्तं हि जीर्यमाणोऽपि बुद्धिं जरयते नरः॥७।१४३।१६

मनुष्य वृद्ध होऊं लागला म्हणजे त्याची बुद्धिहि त्याच्या शरीराबरोबरच जीर्ण होऊं लागते हैं अगदीं खरें आहे.

८६५ व्यवसायं समाश्रित्यं सहायान् योऽधिगच्छति।
न तस्य कश्चिदारम्भः कदाचिदवसीदति॥१२।२९८।४२

जो आपली मुख्य भिस्त स्वतःचे प्रयत्नावर ठेवून मग दुसऱ्यांचें साहाय्य घेतो, त्याचा कसलाहि प्रयत्न केव्हांहि फसत नाहीं.

८६६ व्रजे वाप्यथवारण्ये यत्र सन्ति बहुश्रुताः।
तत्तन्नगरमित्याहुः पार्थ तीर्थं च तद्भवेत्॥३।२००।९२

(मार्कंडेय म्हणतात) हे युधिष्ठिरा, बहुश्रुत ब्राह्मण जेथें असतील तो गौलवाडा असला, अथवा अरण्य जरी असलें तरी त्यालाच नगर म्हणतात, आणि तेंच तीर्थ होय.

८६७ शकुनानामिवाकाशे मत्स्यानामिव चोदके।
पदं यथा न दृश्येत तथा पुण्यकृतां गतिः॥१२।३२२।१९

पक्ष्यांनीं आकाशांत आणि माशांनी पाण्यांत आक्रमिलेल्या मार्गाची जशी कांहीं खूण दिसत नाहीं, त्याप्रमाणें पुण्यवान् लोकांना प्राप्त होणारी गति उघड दिसत नाहीं.

८६८ शक्नोति जीवितुं दक्षो नालसः सुखमेधते॥१०।२।१५

तत्परतेनें उद्योग करणारा मनुष्य चांगल्या प्रकारें जगूं शकतो. आलशी मनुष्याला सुख म्हणून मिलत नाहीं.

८६९ शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः॥६।२९।२३

शरीर टाकून देण्यापूर्वीं या जगांत असतांनाच, जो कामक्रोधांचा तडाका सहन करूं शकतो तो योगी होय. तोच मनुष्य सुखी होय.

८७० शक्यं ह्येवाहवे योद्धुं न दातुमनसूयितम्॥१३।८।१०

समरांगणांत लढणें सहज शक्य आहे; पण असूया (म्हणजे हेवा, लोभ वगैरे) न धरितां दान करणें हें मात्र शक्य नाहीं.

८७१ शत्रुः प्रवृद्धो नोपेक्ष्यो दुर्बलोऽपि बलीयसा॥५।९।२२

शत्रु दुर्बल जरी असला तरी तो वृद्धिंगत झाला असतां, बलाढ्य पुरुषानेंहि त्याची उपेक्षा करितां उपयोगी नाहीं.

८७२ शत्रुं च मित्ररूपेण सान्त्वेनैवाभिसान्त्वयेत्।
नित्यशश्चोद्विजेत्तस्माद्गृहात्सर्पयुतादिव॥१२।१४०।१५

वरकरणी मित्रत्वाचा आव आणून शत्रूला सामोपचारानेंच वश करावें, परंतु आंत सर्प शिरलेल्या घराप्रमाणें त्याचें निरंतर भय बालगावें.

८७३ शत्रुपक्षं समृध्यन्तं यो मोहात्समुपेक्षते।
व्याधिराप्यायित इव तस्य मूलं छिनत्ति सः॥२।५५।१६

भरभराटींत असलेल्या शत्रुपक्षाची जो मूर्खपणें उपेक्षा करितो, त्याचा तो शत्रुपक्ष, विकोपास गेलेल्या व्याधीप्रमाणें समूल उच्छेद करितो.

८७४ शत्रुर्निमज्जता ग्राह्यो जङ्घायां प्रपतिष्यता।
विपरिच्छिन्नमूलोऽपि न विषीदेत्कथंचन॥५।१३३३।२०

बुडतां बुडतां अथवा पडतां पडतांसुद्धां शत्रुची तंगडी पकडावी (आणि त्यासह बुडावे किंवा पडावें.) मुलासकट सर्वनाश झाला तरी केव्हांहि खिन्न होऊन बसूं नये.

८७५ शत्रुश्चैव हि मित्रं च न लेख्यं न च मातृका।
यो वै संतापयति यं स शत्रुः प्रोच्यते नृप॥२।५५।१०

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, अमका हा शत्रु आणि अमका हा मित्र, असा कांहीं कोणावर छाप मारलेला नाहीं, किंवा अक्षरेंहि खोदलेलीं नाहींत ! तर, ज्याच्यापासून ज्याला ताप होतो, त्यालाच त्याचा शत्रु असें म्हणत असतात.

८७६ शत्रोरपि गुणा ग्राह्या दोषा वाच्या गुरोरपि॥४।५१।१५

शत्रूचेसुद्धां गुण घ्यावे. आणि दोष गुरूचे असले तरीसुद्धां निंद्य मानावे.

८७७ शयानं चानुशेते हि तिष्ठन्तं चानुतिष्ठति।
अनुधावति धावन्तं कर्म पूर्वकृतं नरम्॥११।२।३२

पूर्वजन्मीं केलेलें कर्म मनुष्य झोपीं गेला कीं, त्याच्याबरोबरच झोपीं जातें, उभा राहिला कीं लगेच उभें राहतें, आणि तो धावूं लागला म्हणजे त्याच्या मागोमाग धावत जातें.

८७८ शरीरनियमं प्राहुर्ब्राह्मणा मानुषं व्रतम्।
मनो विशुद्धां बुद्धिं च दैवमाहुर्व्रतं द्विजाः॥३।९३।२१

(व्यासादिकमुनि पांडवांना म्हणतात) शारीरिक नियम पालणें हेंज्ञानी लोक मानवी व्रत समजतात आणि मनावर जय मिलवून बुद्धि शुद्ध करणें हें दैवी व्रत मानतात.

८७९ शरीरस्य विनाशेन धर्म एव विशिष्यते॥१।२१३।२०

आपला प्राण खर्चीं घालूनहि धर्म पालणें हेंच अधिक श्रेयस्कर आहे.

८८० शाश्वतोऽयं धर्मपथः सद्भिराचरितः सदा।
यद्भार्यां परिरक्षन्ति भर्तारोऽल्पबला अपि॥३।१२।६८

(द्रौपदी पांडवांस म्हणते) भर्ते अशक्त असले तरीहि भार्येचें संरक्षण करितात. हा सनातन धर्ममार्ग असून सज्जनांनीं नेहमीं आचरलेला आहे.

८८१ शीलं प्रधानं पुरुषे तद्यस्येह प्रणश्यति।
न तस्य जीवितेनार्थो न धनेन न बन्धुभिः॥५।३४।४८

मनुष्याच्या ठिकाणीं शील हेंच मुख्य आहे. तेंच ज्याचें नष्ट झालें त्याला या जगांत जीविताचा, धनाचा अथवा बांधवांचा कांहींएक उपयोग नाहीं.

८८२ शीलवृत्तफलं श्रुतम्॥५।३९।६७

विद्येचें फल म्हणजे उत्तम शील आणि सदाचार.

८८३ शीलेन हि त्रयो लोकाः शक्या जेतुं न संशयः।
न हि किंचिदसाध्यं वै लोके शीलवतां भवेत्॥१२।१२४।१५

शीलाच्या जोरावर त्रैलोक्य जिंकणें शक्य आहे. यांत शंका नाहीं. खरोखर, शीलसंपन्न मनुष्यांना असाध्य असें कांहींच नाहीं.

८८४ शुचेरपि हि युक्तस्य दोष एव निपात्यते।
मुनेरपि वनस्थस्य स्वानि कर्माणि कुर्वतः॥१२।१११।६०

शुचिर्भूत व आपलें कर्तव्य करण्यांत तत्पर अशाहि पुरुषावर दोषारोप केला जातो. आणि अरण्यामध्यें राहून केवल आपलीं कर्में करीत असणाऱ्या ऋषीवरहि दोषारोप केला जातो.

८८५ शुभं वा यदि वा पापं द्वेष्यं वा यदि वा प्रियम्।
अपृष्टस्तस्य तद्ब्रूयाद्यस्य नेच्छेत्पराभवम्॥५।३४।४

ज्याची हानि होऊं नये अशी आपल्याला इच्छा असते, त्याला त्यानें जरी विचारिलें नसलें तरी, त्याच्यासंबंधानें जेंआपणाला दिसत असेल तें सांगावें; मग तें शुभ असो अथवा अशुभ असो. आणि त्याचप्रमाणें त्याला प्रिय होवो अथवा अप्रिय होवो.

८८६ शुभानामशुभानां च द्वौ राशी पुरुषर्षभ।
यः पूर्वं सुकृतं भुङ्क्तेपश्चान्निरयमेव सः॥१८।३।१३

(इंद्र युधिष्ठिराला म्हणतो) हे पुरुषश्रेष्ठा, पुण्य आणि पाप यांच्या दोन निरनिराल्या राशी आहेत. यांपैकीं पुण्य जो प्रथम भोगतो, त्याच्या वाट्याला मागाहून नरकच येतो.

८८७ शुभेन कर्मणा सौख्यं दुःखं पापेन कर्मणा।
कृतं भवति सर्वत्र नाकृतं विद्यते क्वचित्॥११।२।३६

सत्कर्मानें सुख आणि दुष्कर्मानें दुःख प्राप्त होतें. जें पूर्वीं केलें असेल तेंच केव्हां झालें तरी फलाला येणार. जें केलें नाहीं त्याचें फलहि नाहीं.

८८८ शुश्रूषुरपि दुर्मेधाः पुरुषोऽनियतेन्द्रियः।
नालं वेदयितुं कृत्स्नौ धर्मार्थाविति मे मतिः॥१०।५।१

** तथैव तावन्मेधावी विनयं यो न शिक्षते।
न च किंचन जानाति सोऽपि धर्मार्थनिश्चयम्॥१०।५।२**

(कृपाचार्य अश्वत्थाम्याला म्हणतात) मंद बुद्धीचा मनुष्य जिज्ञासु असला तरी इंद्रियांवर ताबा मिलविल्यावांचून तो धर्मार्थ पूर्णपणें जाणण्यास समर्थ होणार नाहीं, असें माझेंमत आहे. तीच गोष्ट, ज्याच्या मनाला चांगले वलण लागलेलें नाहीं अशा बुद्धिमान् मनुष्याची, त्याला सुद्धां धर्मार्थाचेंनिश्चित ज्ञान कधींच होत नाहीं.

८८९ शूरः सर्वंपालयति सर्वं शूरे प्रतिष्ठितम्॥१२।९९।१८

शूर पुरुष सर्वांचें रक्षण करितो. शूराच्या आधारानें सर्व राहतात.

८९० शूरा वीराश्च शतशः सन्ति लोके युधिष्ठिर।
येषां संख्यायमानानां दानशूरो विशिष्यते॥१३।८।११

(भीष्म म्हणतात) हे युधिष्ठिरा, शूर वीर जगांत शेंकड्यांनीं आहेत. पण त्यांची (प्रतवारीनें) गणना करूं लागल्यास दानशूर हाच विशेष श्रेष्ठ ठरेल.

८९१ शृगालोऽपि वने कर्ण शशैः परिवृतो वसन्।
मन्यते सिंहमात्मानं यावत्सिंहं न पश्यति॥८।३९।२८

(शल्य म्हणतो) हे कर्णा, वनांत सशांच्या जमावांत कोल्हा बसला असतां त्याला सुद्धां आपण सिंह आहों असें वाटतें. (पण कोठवर ?) सिंह दृष्टीस पडला नाहीं तोंवर.

८९२ शृणु यक्ष कुलं तात न स्वाध्यायो न च श्रुतम्।
कारणं हि द्विजत्वे च वृत्तमेव न संशयः॥३।३१३।१०८

(युधिष्ठिर म्हणतो) बायक्षा, ऐक. द्विजत्वाला कारण कुल नव्हे, वेदपठण नव्हे, किंवा शास्त्राभ्यासहि नव्हे, तर शील हेंच द्विजत्वाला कारण होय यांत संशय नाहीं.

८९३ शोकः कार्यविनाशनः॥७।८०।७

शोकानें कार्यनाश होतो.

८९४ शोककाले शुचो मा त्वं हर्षकाले च मा हृषः।
अतीतानागतं हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय॥१२।२२७।६६

(बली इंद्राला म्हणतो) दुःखाच्या वेलीं तूं दुःख करूं नको आणि आनंदाच्या वेलीं हर्ष मानूं नको. पूर्वीं होऊन गेलेलें आणि पुढें होणारें यांचा विचार करीत न बसतां वर्तमानकालाकडे नजर देऊन वाग.

८९५ शोकस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च।
दिवसे दिवसे मूढमाविशन्ति न पण्डितम्॥११।२।२२

रोजच्यारोज हजारों शोक करण्याजोग्या गोष्टी आणि शेंकडों भय वाटण्याजोग्या गोष्टी मूढाला प्राप्त होत असतात, शहाण्याला. प्राप्त होत नाहींत.

८९६ श्रद्दधानः शुभां विद्यां हीनादपि समाप्नुयात्।
सुवर्णमपि चामेध्यादाददीताविचारयन्॥१२।१६५।३१

चांगली विद्या हीन मनुष्यापासून देखील श्रद्धेनें ग्रहण करावी. सोनें अपवित्र पदार्थांशीं मिसललें असल्यास त्यांतूनही खुशाल काढून घ्यावें.

८९७ श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः॥६।४१।३

मनुष्य हा श्रद्धामय आहे ज्याची जशी श्रद्धा असेल तसा तो होतो.

८९८ श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति॥६।२८।३९

इंद्रिये ताब्यांत ठेवून दक्षतेनें प्रयत्न करणाऱ्या श्रद्धावान् मनुष्याला ज्ञान प्राप्त होतें. ज्ञान प्राप्त झाल्यावर लवकरच त्याला परमशांतीचा लाभ होतो.

८९९ श्रिय एताः स्त्रियो नाम सत्कार्या भूतिमिच्छता।
पालिता निगृहीतां च श्रीः स्त्री भवति भारत॥१३।४६।१५

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे भारता, स्त्रिया म्हणजे खरोखर मूर्तिमंत लक्ष्मीच होत; कल्याणेच्छु पुरुषानें त्यांचा गौरव करावा. उत्तम प्रकारें पालनपोषण करून योग्य दाबांत ठेविल्यानें स्त्री ही लक्ष्मी (गृहलक्ष्मी) होते.

९०० श्रियं ह्यविनयो हन्ति जरा रूपमिवोत्तमम्॥५।३४।१२

वार्धक्यानें जसा सुंदर रूपाचा, तसा अहंकारानें ऐश्वर्याचा नाश होतो.

९०१ श्रियो बलममात्यांश्च बलवानिह विन्दति।
यो ह्यनाढ्यः स पतितस्तदुच्छिष्टं यदल्पकम्॥१२।१३४।४

ऐश्वर्य, सामर्थ्य, आणि अमात्य हें सर्व बलसंपन्न असलेल्याला प्राप्त होतें. जो बलसंपन्न नसेल तो खरोखर पतित होय. अल्पशी सत्ता असणें हें केवल उच्छिष्टच होय.

९०२ श्रीमान्स यावद्भवति तावद्भवति पूरुषः॥५।७२।३६

कोणीहि संपत्तीनें युक्त असेल तोंपर्यंतच खरोखर पुरुष गणला जातो.

९०३ श्रीर्हता पुरुषं हन्ति पुरुषस्याधनं वधः॥५।७२।१९

लक्ष्मीचा घात झाला असतां पुरुषाचा वध होतो. कारण, निर्धनता हा पुरुषाचा वधच होय.

९०४ श्रुतमाप्नोति हि नरः सततं वृद्धसेवया॥१३।१६२।४९

सतत वृद्धजनांचा समागम केल्यानें मनुष्याला ज्ञान प्राप्त होतें.

९०५ श्रुतं प्रज्ञानुगं यस्य प्रज्ञा चैव श्रुतानुगा।
असंभिन्नार्यमर्यादः पण्डिताख्यां लभेत सः॥५।३३।३४

बुद्धीला अनुरूप ज्याचें अध्ययन आहे, अध्ययनाला अनुरूप ज्याचे विचार आहेत, आणि आर्य पुरुषाच्या मर्यादेचें ज्याच्या हातून उल्लंघन होत नाहीं त्याला पंडित ही संज्ञा प्राप्त होते.

९०६ श्रुतेन तपसा वापि
श्रिया वा विक्रमेण वा।
जनान्योऽभिभवत्यन्यान्
कर्मणा हि स वै पुमान्॥५।१३३।२५

विद्येनें किंवा तपानें, संपत्तीनें किंवा पराक्रमानें जो इतरांवर मात करतो, तो आपल्या कर्तृत्वामुलें खरा पुरुष ठरतो.

९०७ श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः॥६।२७।३५

(श्रीकृष्ण सांगतात) आचरण्यास सोपा अशा परधर्मापेक्षां सदोष असला तरीहि स्वधर्मच श्रेष्ठ होय. स्वधर्मांत राहून मरण आलें तरी तें चांगलें, (कारण) परधर्माचा स्वीकार करण्यांत मोठें भय आहे.

९०८ श्रेष्ठो हि पण्डितः शत्रुर्न च मित्रमपण्डितः॥१२।१३८।४६

शहाणा शत्रु पतकरला, पण मूर्ख मित्र नको.

९०९ श्रोतव्यं खलु वृद्धानामिति शास्त्रनिदर्शनम्।
न त्वेव ह्यतिवृद्धानां पुनर्षाला हि ते मताः॥५।१६८।२६

वृद्धांचें अवश्य ऐकावें असें शास्त्र सांगतें; पण अतिवृद्ध झालेल्यांचें ऐकूं नये. कारण त्यांची गणना पुनरपि बाल. झालेल्यांतच केली पाहिजे.

९१० श्वःकार्यमद्य कुर्वीत पूर्वाह्ने चापराह्णिकम्।
न हि प्रतीक्षते मृत्युः कृतं वास्य न वा कृतम्॥१२।३२१।७३

उद्यांचे कार्य आज करावें, तिसऱ्या प्रहरीं करावयाचें तें सकालीं करावें. कारण मृत्यु कोणाचें काम झालें अगर न झालें हेंपहात बसत नाहीं.

९११ षड्दोषाः पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता।
निद्रा तन्द्री भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता॥५।३३।८३

आपलें बरें व्हावें असें इच्छिणाऱ्या पुरुषानें सहा दोष टालावे. फार झोप, सुस्ती, भय, क्रोध, आलस व दीर्घसूत्रीपणा.

९१२ स एव धर्मः सोऽधर्मो देशकाले प्रतिष्ठितः।
आदानमनृतं हिंसा धर्मो ह्यावस्थिकः स्मृतः॥१२।३६।११

योग्य वेलीं आणि योग्य स्थलीं जो धर्म ठरतो, तोच अयोग्य वेलीं आणि अयोग्य स्थलीं अधर्म होतो. चौर्यकर्म, असत्यभाषण, हिंसा या सर्वांची गोष्ट अशीच आहे. धर्म हा परिस्थितीप्रमाणें ठरवावा लागतो.

९१३ संयोगा विप्रयोगान्ता जातानां प्राणिनां ध्रुवम्।
बुद्बुदा इव तोयेषु भवन्ति न भवन्ति च॥१२।२७।३०

जन्माला आलेल्या प्राण्यांच्या संयोगांची अखेर वियोगांतच होत असते. पाण्यावरील बुडबुड्यांप्रमाणे, ते एकसारखे उत्पन्न होतात आणि नाहींतसे होतात.

९१४ संवासाज्जायते स्नेहो जीवितान्तकरेष्वपि।
अन्योऽन्यस्य च विश्वासः श्वपचेन शुनो यथा॥१२।१३९।४०

आपला प्राण घेणाऱ्यांशीं सुद्धां सहवासानें स्नेह जडतो, आणिं एकमेकांना विश्वास वाटतो. उदाहरणार्थ, कुत्र्याचें मांस खाणारा चांडाल आणि कुत्रा.

९१५ संसारयति कृत्यानि सर्वत्र विचिकित्सते।
चिरं करोति क्षिप्रार्थे स मूढो भरतर्षभ॥५।३३।३९

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे भरतश्रेष्ठा, जो स्वतः करावयाचीं कामें दुसऱ्यांवर सोंपवितो, प्रत्येक बाबतींत फाजील चिकित्सा करीत बसतो, आणि जें कार्य लवकर झालें पाहिजे त्याला दिरंगाई करितो तो मूढ होय.

९१६ संहता हि महाबलाः॥८।३४।७

संघ करून एकत्र राहिलेले लोक अत्यंत बलाढ्य होतात.

९१७ सख्यं सोदर्ययोर्भ्रात्रोर्दम्पत्योर्वा परस्परम्।
कस्यचिन्नाभिजानामि प्रीतिं निष्कारणामिह॥१२।१३८।१५३

सख्खे बंधु अथवा पतिपत्नी यांच्यामध्यें जो परस्पर स्नेह असतो तोहि कारणामुलेंच होय. कांहीं तरी कारण असल्यावांचून जगांत कोणाचें कोणावर प्रेम असल्याचें पाहण्यांत नाहीं !

९१८ संक्षेपो नीतिशास्त्राणामविश्वासः परो मतः॥१२।१३८।१९७

सर्व नीतिशास्त्रांचें थोडक्यांत सार हेंच कीं, कोणाचा विश्वास म्हणून धरूं नये.

९१९ स चेन्निकृत्या युध्येत निकृत्या प्रतियोधयेत्।
अथ चेद्धर्मतो युध्येद्धर्मेणैव निवारयेत्॥१२।९५।९

प्रतिपक्षी जर कपटानें लढेल तर आपणहि उलट कपटानेंच लढावें. आणि तो जर धर्मयुद्ध करील तर आपणहि धर्मानेंच लढून त्याचें निवारण करावें.

९२० सत्यं स्वर्गस्य सोपानं पारावारस्य नौरिव॥५।३३।५२

समुद्र तरून जाण्यास जशी नाव तसा सत्य, हा स्वर्गास जाण्याचा जिना आहे.

९२१ सत्यं दमस्तपो दानमहिंसा धर्मनित्यता।
साधकानि सदा पुंसां न जातिर्न कुलं नृप॥३।१८१।४३

(अजगर झालेला नहुषराजा युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, सत्यभाषण, इंद्रियनिग्रह, तप, दान, अहिंसा आणि नित्य धर्माचरण हींच नेहमीं मनुष्यांच्या उपयोगी पडणारीं आहेत. जातीचा कांहीं उपयोग नाहीं, आणि कुलाचाहि नाहीं.

९२२ सत्यस्य वचनं श्रेयः सत्यज्ञानं तु दुष्करम्।
यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं ब्रवीम्यहम्॥१२।२८७।२०

(नारद गालवाला म्हणतात) सत्य बोलणें चांगलें खरें, पण सत्याचें निभ्रांत ज्ञान होणें मोठें कठीण. ज्याच्या योगानें जीवांचें अत्यंत कल्याण होतें त्यालाच मी सत्य म्हणतों.

९२३ सत्यस्य वदिता साधुर्न सत्याद्विद्यते परम्।
तत्त्वेनैव सुदुर्ज्ञेयं पश्य सत्यमनुष्ठितम्॥८।६९।३१

(श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात) सत्य सांगेल तो साधु. सत्यापरतें श्रेष्ठ कांहीं नाहीं. परंतु सत्याचें आचरण करितांना वास्तविक सत्य कोणतें हें समजणेंच अत्यंत कठीण आहे.

९२४ सत्येन रक्ष्यते धर्मो विद्या योगेन रक्ष्यते।
मृजया रक्ष्यते रूपं कुलं वृत्तेन रक्ष्यते॥५।३४।३९

सत्यानें धर्माचें रक्षण होतें, व्यासंगाच्या योगानें विद्या जिवंत राहते. स्वच्छता ठेविल्यानें रूप टिकून राहतें, आणि सदाचरणानें कुलाचें रक्षण होतें.

९२५ सत्येन विधृतं सर्वं
सर्वं सत्ये प्रतिष्ठितम्॥१२।२५९।१०

सर्व कांहीं सत्याच्या पायावर उभें आहे. सर्व कांहीं सत्याच्या आधारानें राहतें.

९२६ सन्तः परार्थं कुर्वाणा
नावेक्षन्ति परस्परम्॥३।२९७।४९

परोपकार करणारे सज्जन प्रत्युपकाराची अपेक्षा करीत नाहींत

९२७ सन्ति पुत्राः सुबहवो दरिद्राणामनिच्छताम्।
नास्ति पुत्रः समृद्धानां विचित्रं विधिचेष्टितम्॥१२।२८।२४

दरिद्री लोकांना इच्छा नसतां पुष्कल मुलगे होतात आणि कित्येक श्रीमंतांना मुलगा नसतो. दैवाची लीला विचित्र आहे !

९२८ संतोषो वै श्रियं हन्ति ह्यभिमानं च भारत।
अनुक्रोशभये चोभे यैर्वृतो नाश्नुते महत्॥२।४९।१४

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) अल्पसंतुष्ट राहिल्यानें ऐश्वर्याचा व स्वाभिमानाचा नाश होतो. दया आणि भय यांचीहि गोष्ट अशीच. यांचा मनुष्यावर पगडा बसला म्हणजे मोठेपणाचें नांवच घ्यावयास नको.

९२९ संनिमज्जेज्जगदिदं गम्भीरे कालसागरे।
जरामृत्युमहाग्राहे न कश्चिदवबुध्यते॥१२।२८।४४

जरामृत्युरूपी मोठमोठ्या नक्रांनीं व्याप्त असलेल्या खोल अशा कालसागरांत हें सर्व जग (एक दिवस) बुडून जाईल हे कोणाच्याच लक्ष्यांत येत नाहीं !

९३० सपत्नसहिते कार्ये कृत्वा संधिं न विश्वसेत्।
अपक्रामेत्ततः शीघ्रं कृतकार्यो विचक्षणः॥१२।१४०।१४

जें कार्य केलें असतां शत्रूचें आणि आपलें सारखेंच हित होईल, त्या कार्यापुरता शत्रूशीं समेट करावा. तथापि त्याजवर विश्वास ठेवूं नये; आणि कार्य झालें म्हणजे सुज्ञ मनुष्यानें लागलेच. शत्रूपासून दूर व्हावें.

९३१ समत्वं योग उच्यते॥६।२६।४८

(सुखदुःख, यशापयश इत्यादि द्वंद्वांविषयीं सारखी बुद्धि ठेवणें अशा प्रकारच्या) समत्वबुद्धीला योग असें म्हणतात.

९३२ समुच्छ्रये यो यतते स राजन् परमो नयः॥२।५५।११

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, भाग्योदय करण्याकडे जिची प्रवृत्ति असते तीच नीति श्रेष्ठ होय.

९३३ संपन्नतरमेवानं दरिद्रा भुञ्जते सदा।
क्षुत्स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा॥५।३४।५०

दरिद्री लोक नेहमींच अतिशय मिष्ट अन्न भक्षण करीत असतात. कारण भुकेनें तोंडाला चव येत असते. आणि तीतर श्रीमंतांना फारच दुर्लभ.

९३४ संप्रीतिभोज्यान्यन्नानि
आपद्भोज्यानि वा पुनः॥५।९१।२५

प्रेम असल्यास अथवा कांहीं आपत्ति असल्यास एकानें दुसऱ्याकडचें अन्न भक्षण करावें.

९३५ संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते॥६।२६।३४

संभावित पुरुषाची अपकीर्ति होणें मरणापेक्षां वाईट.

९३६ संभोजनं संकथनं संप्रश्नोऽथ समागमः।
एतानि ज्ञातिकार्याणि न विरोधः कदाचन॥५।६४।११

एकत्र भोजन करणें, एकत्र गप्पागोष्टी करणें, एकमेकांस प्रश्न विचारणें आणि भेट देणें या गोष्टी ज्ञातिबांधवांनीं (अवश्य) करीत जाव्या. केव्हांहि परस्परांशीं विरोध करूं नये.

९३७ सर्वकालं मनुष्येण व्यवसायवता सदा।
पीडाकरममित्राणां यत्स्यात्कर्तव्यमेव तत्॥७।१४३।६८

ज्या ज्या गोष्टीमुलें शत्रूंना पीडा होईल ती प्रत्येक गोष्ट मनुष्यानें सर्वकालीं मुद्दाम यत्नपूर्वक केली पाहिजे.

९३८ सर्वं जिह्मंमृत्युपदमार्जवं ब्रह्मणः पदम्।
एतावाञ्ज्ञानविषयः किं प्रलापः करिष्यति॥१२।७९।२१

कपटानें युक्त असलेलें सर्व कांहीं मरणाला कारण होतें. सरलपणांत ब्रह्मप्राप्ति आहें. जें काय जाणावयाचें तें एवढंच. जास्त बोलण्यांत काय अर्थ ?

९३९ सर्वतीर्थेषु वा स्नानं सर्वभूतेषु चार्जवम्।
उभे त्वेते समे स्यातामार्जवं वा विशिष्यते॥५।३५।२

सर्व तीर्थांत स्नान करणें आणि सर्वांशीं निष्कपटानें वागणेंया दोहोंची योग्यता सारखीच. कदाचित् निष्कपटपणाच श्रेष्ठ ठरेल.

९४० सर्वथा धर्ममूलोऽर्थो धर्मश्वार्थपरिग्रहः।
इतरेतरयोर्नीतौ विद्धि मेघोदधी यथा॥३।३३।२९

(भीम युधिष्ठिराला म्हणतो) अर्थ हा सर्वस्वी धर्ममूलक असून धर्म हा अर्थावर अवलंबून आहे. सारांश, मेघ व समुद्र यांप्रमाणें धर्म व अर्थ हे परस्परांवर अवलंबून आहेत.

९४१ सर्वथानार्यकर्मैतत्प्रशंसा स्वयमात्मनः॥५।७६।६

आपली आपण प्रशंसा करणें हें सर्वस्वीं अनार्य माणसाचें काम होय.

९४२ सर्वथा संहतैरेव दुर्बलैर्बलवानपि।
अमित्रः शक्यते हन्तुं मधुहा भ्रमरैरिव॥३।३३।७०

पोल्यांतील मध काढणाऱ्याचा मधमाशा एकजुटीनें (तुटून पडून) प्राण घेतात. त्याप्रमाणें सर्वांची पूर्ण एकी असेल तर दुर्बल लोक देखील बलिष्ठ अशाहि शत्रूला ठार करूं शकतात.

९४३ सर्वभूतहितः साधुरसाधुर्निर्दयः स्मृतः॥३।३१३।९२

सर्व भूतांच्या हितासाठीं झटतो तो साधु. आणि निर्दयतेनें वागतो तो असाधु (दुष्ट) होय.

९४४ सर्वभूतेषु सस्नेहो यथात्मनि तथाऽपरे।
ईदृशः पुरुषोत्कर्षो देवि देवत्वमश्नुते॥१३।१४४।५८

(महेश्वर पार्वतीला म्हणतात) हे देवि, जो सर्व प्राण्यांविषयीं वत्सलता धारण करतो आणि आपल्यासारखेंच सर्व भूतांना मानतो, तो श्रेष्ठ पुरुष देवत्वाला पोंचतो.

९४५ सर्वं प्रियाभ्युपगतं धर्ममाहुर्मनीषिणः॥१२।२५९।२५

जिच्या योगानें दुसऱ्याचें प्रिय होईल, ती प्रत्येक गोष्ट धर्मच होय, असें ज्ञाते लोक सांगतात.

९४६ सर्वं बलवतां पथ्यं सर्वं बलवतां शुचि।
सर्वं बलवतां धर्मः सर्वं बलवतां स्वकम्॥१५।३०।२४

बलसंपन्न असलेल्यांना सर्व कांहीं हितकर आणि सर्व कांहीं पवित्र आहे. पाहिजे तो त्यांचा धर्म आणि सर्व कांहीं त्यांच्या सत्तेचें !

९४७ सर्वं बलवतो वशे॥१२।१३४।३

सर्व कांहीं बलवानाच्या हातीं असतें.

९४८ सर्वस्य जीवलोकस्य राजधर्मः परायणम्॥१२।५६।३

सर्व जीवसृष्टीला राजधर्म हाच मोठा आधार आहे.

९४९ सर्वस्य हि स्वका प्रज्ञा साधुवादे प्रतिष्ठिता।
परबुद्धिं च निन्दन्ति स्वां प्रशंसन्ति चासकृत्॥१०।३।५

ज्याला त्याला स्वतःची बुद्धि सांगते, तें योग्य, असें ठाम वाटतें. सर्वजण दुसऱ्याच्या बुद्धीची निंदा करितात, आणि स्वतःच्या बुद्धीची वारंवार प्रशंसा करितात.

९५० सर्वस्वमपि संत्यज्य कार्यमात्महितं नरैः॥१२।१३९।८४

सर्वस्वाचा त्याग करून सुद्धां मनुष्यांनीं आत्मकल्याण साधावें.

९५१ सर्वः सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन।
नैकत्र परिनिष्ठास्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित्॥३।७२।८

सर्वांनाच सर्व गोष्टींच ज्ञान नसतें. सर्वज्ञ असा कोणीच नाहीं. कोणाहि एकाच मनुष्याच्या ठिकाणीं सर्व ज्ञान एकवटलेलें नाहीं.

९५२ सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ताः
सर्वे लोका राजधर्मे प्रविष्टाः॥१२।६३।२९

सर्व विद्यांचा राजधर्माशीं संबंध आहे. आणि सर्व प्रकारचे लोकव्यवहार राजधर्माशीं निगडित झालेले आहेत.

९५३ सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः।
संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं हि जीवितम्॥१२।२७।३१

सर्व प्रकारच्या संचयांचा शेवट क्षयांत होत असतो, चढण्याची अखेर पडण्यांत होते, संयोगांचे पर्यवसान वियोगांत आणि जीविताचा अंत मरणांत होत असतो.

९५४ सर्वेण खलु मर्तव्यं मर्त्यलोके प्रसूयता।
कृतान्तविहिते मार्गे मृतं को जीवयिष्यति॥१२।१५३।१३

मृत्युलोकांत जन्मास येणाऱ्या प्रत्येकाला खचित मरावयाचें आहे. हा मार्ग कृतांतानें (यमानें) ठरविला असल्यामुलें मेलेल्याला जिवंत कोण करणार ?

९५५ सर्वे धर्मा राजधर्मप्रधानाः॥१२।६३।२७

सर्व धर्मांमध्यें राजधर्म हा अग्रगण्य आहे.

९५६ सर्वेषां कृतवैराणामविश्वासः सुखोदयः॥१२।१३९।२८

आपणांशीं वैर करणाऱ्या कोणाचाहि विश्वास न धरल्यानें सुख होतें.

९५७ सर्वो दण्डाजितो लोको दुर्लभो हि शुचिर्जनः।
दण्डस्य हि भयाद्भीतो भोगायैव प्रवर्तते॥१२।१५।३४

सर्व लोक दंडाच्या योगानें वठणीवर येतात. स्वभावतःच शुचिर्भूत असलेला मनुष्य विरला. खरोखर, दंडाच्या भयानेंच कोणी झाला तरी, आपलें ठरलेलें काम करीत असतो.

९५८ सर्वोपायैरुपायज्ञो दीनमात्मानमुद्धरेत्॥१२।१४१।१००

चतुर पुरुषानें हरप्रयत्न करून हीन स्थितींतून आपला उद्धार करावा.

९५९ सर्वो विमृशते जन्तुः कृच्छ्रस्थो धर्मदर्शनम्।
पदस्थः पिहितं द्वारं परलोकस्य पश्यति॥९।३२।५९

कोणीहि मनुष्य संकटांत सांपडला, म्हणजे मग धर्मशास्त्राचा विचार करूं लागतो. उच्चस्थितींत असतांना त्याला स्वर्गाचें द्वार बंद असलेलेंच दिसतें. (स्वर्गादिक सर्व थोतांड आहे असें तो मानितो.)

९६० सर्वो हि मन्यते लोक आत्मानं बुद्धिमत्तरम् \।\।१०\।३\।४

प्रत्येक मनुष्य स्वतःला अधिक शहाणा समजतो.

९६१ सर्वो हि लोको नृपधर्ममूलः॥१२।१२०।५६

सर्व लोकांना राजधर्म हा आधारभूत आहे.

९६२ सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।
सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः॥६।४२।४८

(श्रीकृष्ण सांगतात) हे अर्जुना, स्वभावतः प्राप्त झालेलें कर्म सदोष असलें तरी, त्याचा त्याग करूं नये, कारण, अग्नि जसा धुरानें वेष्टिलेला असतो, तसा प्रत्येक कर्मांत कांहींना कांहीं दोष हा असतोच.

९६३ सहस्रशक्तिश्च शतं शतशक्तिर्दशापि च।
दद्यादपश्च यः शक्त्या सर्वे तुल्यफलाः स्मृताः॥१४।९०।९७

ज्याच्याजवल एक हजार (रुपये) आहेत त्यानें शंभर दिले, किंवा ज्याच्यापाशीं शंभर आहेत त्यानें दहा दिले आणि (ज्याच्यापाशीं कपर्दिकहि नाहीं) त्यानें यथाशक्ति नुसतें पाणी दिलें, तर या तिघांस सारखेंच फल मिलतें.

९६४ सहायबन्धना ह्यर्थाः सहायाश्चार्थबन्धनाः।
अन्योऽन्यबन्धनावेतौ विनान्योऽन्यं न सिध्यतः॥५।३७।३८

द्रव्य साहाय्यकर्त्यांवर अवलंबून असून साहाय्यकर्ते द्रव्यावर अवलंबून असतात. सारांश, परस्परांवर अवलंबून असलेल्या या दोन गोष्टी परस्परांवांचून सिद्ध होत नाहींत.

९६५ साङ्गोपाङ्गानपि यदि यश्च वेदानधीयते।
वेदवेद्यं न जानीते वेदभारवहो हि सः॥१२।३१८।५०

सर्व अंगें आणि उपांगें यांसहित चारहि वेदांचेंज्यानें अध्ययन केलें, परंतु वेदांनीं जाणावयाचें जें परमात्मतत्त्व तें ज्यानें जाणलें नाहीं, तो केवल वेदग्रंथाचा भार वाहणारा होय.

९६६ सा भार्या या प्रियं ब्रूते स पुत्रो यत्र निर्वृतिः।
तन्मित्रं यत्र विश्वासः स देशो यत्र जीव्यते॥१२।१३९।९६

जी प्रिय भाषण करते तीच भार्या, जो सुखाला कारण होतो तोच पुत्र, ज्याच्यावर विश्वास ठेवितां येतो तोच मित्र, आणि ज्या ठिकाणों उपजीविका होते तोच देश.

९६७ साम्याद्धिसख्यं भवति
वैषम्यान्नोपपद्यते॥१।१३१।६७

कांहीतरी सारखेपणा असेल तेव्हां सख्य होतें; विषमता असेल तर तें होत नाहीं.

९६८ सायंप्रातर्मनुष्याणामशनं वेदनिर्मितम्।
नान्तरा भोजनं दृष्टमुपवासी तथा भवेत्॥१२।१९३।१०

मनुष्यांनीं सकालसंध्याकाल भोजन करावें, असा नियम वेदानें घालून दिलेला आहे. मध्यंतरीं कांहीं खाऊं नये, अशा रीतीनें जो राहतो तो उपवासीच असतो.

९६९ साहसोत्पतितानां च निराशानां च जीविते।
न शक्यमग्रतः स्थातुं शक्रेणापि धनंजय॥९।५८।१६

(श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना, जिवावर उदार होऊन साहसानें हल्ला करणाऱ्यांच्या पुढें उभें राहण्याची इंद्राची सुद्धां प्राज्ञा नाहीं.

९७० सिंहस्य सततं पार्श्वे सिंह एवानुगो भवेत्।
असिंहः सिंहसहितः सिंहवल्लभते फलम्॥१२।११९।११

** यस्तु सिंहः श्वभिः कीर्णः सिंहकर्मफले रतः।
न स सिंहफलं भोक्तुं शक्तः श्वभिरुपासितः॥१२।११९।१२**

सदोदित सिंहाच्या संनिध असणारा त्याचा अनुचर सिंहच बनतो. सिंह ज्याच्या बरोबर आहे तो स्वतः सिंह नसला तरी त्याला सिंहाप्रमाणेंच फल मिलतें, परंतु जो स्वतः सिंह असूनही कुत्र्यांच्या जमावांत राहतो आणि सिंहाप्रमाणें कर्मफल मिलण्याची इच्छा करतो, त्याला कुत्र्यांच्या सहवासांत असेपर्यंत तसें फल मिलणें शक्य नाहीं.

९७१ सुखं वा यदि वा दुःखं प्रियं वा यदि वाऽप्रियम्।
प्राप्तं प्राप्तमुपासीत हृदयेनापराजितः॥१२।२५।२६

सुख असो किंवा दुःख असो, प्रिय असो अथवा अप्रिय असो जें जें म्हणून प्राप्त होईल त्याचा, अंतःकरण खचूं न देतां स्वीकार करावा.

९७२ सुखं सांग्रामिको मृत्युः
क्षत्रधर्मेण युध्यताम्॥८।९३।५५

क्षत्रियधर्मानें युद्ध करणारांना संग्रामांत आलेला मृत्यु सुखदायक होय.

९७३ सुखं सुखेनेह न जातु लभ्यं
दुःखेन साध्वी लभते सुखानि॥३।२३४।४

(द्रौपदी सत्यभामेस सांगते) इहलोकीं सुखासुखीं सुख लाभणें कधींच शक्य नाहीं. दुःख सोसल्यानेंच साध्वीला सुखप्राप्ति होत असते.

९७४ सुखं च दुःखं च भवाभवौ च
लाभालाभौ मरणं जीवितं च।
पर्यायशः सर्वमेते स्पृशन्ति
तस्माद्धीरो न च हृष्येन्न शोचेत्॥५।३६।४७

सुख आणि दुःख, उत्कर्ष आणि अपकर्ष लाभ आणि हानि जगणें आणि मरणें हींक्रमाक्रमानें सर्वांनाच प्राप्त होत असतात. म्हणून शहाण्यानें त्यांविषयीं हर्षहि मानूं नये आणि शोक पण करूं नये.

९७५ सुखं दुःखान्तमालस्यं
दाक्ष्यं दुःखं सुखोदयम्॥१२।२७।३२

आलसांत (प्रारंभीं) सुख वाटतें पण त्याचा शेवट दुःखांत होतो, तत्परतेनें उद्योग करण्यांत (प्रथम) दुःख वाटलें तरी त्यापासून परिणामीं सुख होते.

९७६ सुखं निराशःस्वपिति नैराश्यं परमं सुखम्॥१२।१७४।६२

ज्यानें आशा सोडली त्याला सुखानें झोप येते. निराशेसारखें सुख नाहीं.

९७७ सुखमेव हि दुःखान्तं कदाचिद्दुःखतः सुखम्।
तस्मादेतद्द्वयं जह्याद्य इच्छेच्छाश्वतं सुखम्॥१२।२५।२४

सुखाचा अंत दुःखांतच होतो. उलट केव्हां केव्हां दुःखांतून सुखाचा उदय होतो. म्हणून ज्याला शाश्वत सुख हवें असेल त्यानें या दोहोंचाहि त्याग करावा.

९७८ सुखं मोक्षसुखं लोके न च मूढोऽवगच्छति।
प्रसक्तः पुत्रपशुषु धनधान्यसमाकुलः॥१२।२८८।५

खरें सुख म्हणजे मोक्षसुख. परंतु मूढ मनुष्याला हे समजत नाहीं. तो जगांत पुत्र, पशु यांतच गुंतून राहतो आणि धन, धान्य इत्यादिकांतच गढून गेलेला असतो.

९७९ सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तरं सुखम्।
पर्यायेणोपसर्पन्ते नरं नेमिमरा इव॥३।२६१।४९

(चाक फिरतांना) चाकाच्या धावेमध्यें एकामागून एक अरे येत असतात, त्याप्रमाणें सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख आलीपालीनें मनुष्यांना प्राप्त होत असतें.

९८० सुखाद्बहुतरं दुःखं जीविते नास्ति संशयः।
स्निग्धस्य चन्द्रियार्थेषु मोहान्मरणमप्रियम्॥१२/२०५/६

आयुष्यांत सुखापेक्षां दुःखच पुष्कल अधिक आहे यांत संशय नाहीं. परंतु मोहानें इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणीं आसक्त होऊन राहिल्यामुलें मनुष्याला मरण अप्रिय वाटतें.

९८१ सुखार्थिनः कुतो विद्या
नास्ति विद्यार्थिनः सुखम्॥५।४०।७

सुखेच्छु पुरुषाला विद्या कोटूनप्राप्त होणार? आणि विद्येची इच्छा करणाऱ्याला सुख कोठून मिलणार?

९८२ सुखे तु वर्तमानो वै दुःखे वापि नरोत्तम।
सुवृत्ताद्यो न चलते शास्त्रचक्षुः स मानवः॥१२।२९५।३१

(पराशरमुनि जनकाला म्हणतात) हे पुरुषश्रेष्ठा, सुखांत किंवा दुःखांत असतांना देखील जो मनुष्य सद्वर्तनापासून चलित होत नाहीं, त्यालाच खरी शास्त्रदृष्टि प्राप्त झाली.

९८३ सुतेषु राजन्सर्वेषु हीनेष्वभ्यधिका कृपा॥३।९।१९

(व्यासमुनि धृतराष्ट्राला म्हणतात) हे राजा, सर्व मुलांत जे गुणहीन असतील त्यांची (आईबापांना) कालजी अधिक.

९८४ सुपूरा वै कुनदिका सुपूरो मुषिकाञ्जलिः।
सुसंतोषःकापुरुषः स्वल्पकेनैव तुष्यति॥५।१३३।९

लहानसा ओढा पाण्यानें तेव्हांच भरून जातो. उंदराची ओंजल सहज भरते. त्याचप्रमाणें क्षुद्र मनुष्यहि सहज संतुष्ट होत असून त्याचें थोडक्यानेंच समाधान होतें.

९८५ सुप्रज्ञमपि चेच्छूरमृद्धिर्मोहयते नरम्॥३।१८१।३०

तीव्र बुद्धीच्या शूर पुरुषाला देखील ऐश्वर्याचा मोह पडत असतो.

९८६ सुप्रणीतो बलौधो हि कुरुते कार्यमुत्तमम्।
अन्धं बलं जडं प्राहुः प्रणेतव्यं विचक्षणैः॥२।२०।१६

शक्तीचा ओघ कुशलतेनें वलविला म्हणजे त्याच्याकडून उत्तम प्रकारचें कार्य होतें. बल हें आंधलें असून अचेतन आहे त्याचा शहाण्यानें (इष्टकार्याकडे) उपयोग करून घेतला पाहिजे.

९८७ सुप्राकृतोऽपि पुरुषः सर्वः स्त्रीजनसंसदि।
स्तौति गर्वायते चापि स्वमात्मानं न संशयः॥१२।२८४।२७

कोणीहि अगदीं सामान्य प्रतीचा सुद्धां पुरुष स्त्रीजनांच्या समुदायांत आपली आपणच स्तुति करून प्रौढी मिरवतो यांत संशय नाहीं.

९८८ सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबन्धः श्लथायते॥ १।२२१।१७

(अर्जुनसुभद्राविवाहानंतर आपल्या नव्या सवतीला उद्देशून द्रौपदी अर्जुनाला म्हणते) ओझें एकदां घट्ट बांधलें असलें, तथापि त्यास जर पुनः दुसरी दोरी बांधिली, तर पहिली दोरी सैल पडावयाचीच !

९८९ सुमन्त्रिते सुविक्रान्ते सुकृते सुविचारिते।
सिध्यन्त्यर्था महाबाहो दैवं चात्र प्रदक्षिणम्॥३।३६।७

(युधिष्ठिर भीमसेनाला म्हणतो) हे महाबाहो, चांगल्या तऱ्हेची सल्लामसलत, चांगल्या तऱ्हेचा पराक्रम, चांगल्या तऱ्हेचा विचार आणि चांगल्या तऱ्हेचें कर्तृत्व यांच्या योगानें मनोरथ सिद्धीस जातात, परंतु या ठिकाणीं देवाचीहि अनुकूलता असावी लागते.

९९० सुलभाः पुरुषा राजन्सततं प्रियवादिनः।
अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः॥५।३७।१५

(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, सतत प्रिय भाषण करणारे पुष्कल आढलतात; परंतु अप्रिय असलें तरी हितकर असेल तेंच सांगणारा विरला, आणि ऐकणाराहि विरला.

९९१ सूक्ष्मा गतिर्हि धर्मस्य दुर्ज्ञेया ह्यकृतात्मभिः॥१३।१०।३८

धर्माचेंस्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे. मनोजय ज्यांनीं केलेला नाहीं, त्यास तें समजणें कठीण.

९९२ सेनापतौ यशो गन्ता
न तु योधान्कथंचन॥५।१६८।२८

यशाचें श्रेय नेहमीं सेनापतीला मिलणार, सैनिकांना कधींच नाहीं.

९९३ सोपानभूतं स्वर्गस्य मानुष्यं प्राप्य दुर्लभम्।
तथात्मानं समादध्याद्भ्रश्यते न पुनर्यथा॥१२।३२१।८०

स्वर्गास जाण्याचा (जणूं) जिनाच अशा दुर्लभ मनुष्यजन्माला येऊन परमात्म्याकडे असें ध्यान लावावें कीं, जेणेंकरून स्थानभ्रष्ट होण्याचा प्रसंग पुनश्च येणार नाहीं.

९९४ सौहृदान्यपि जीर्यन्ते कालेन परिजीर्यतः॥१।१३१।६

कालांतरानें मनुष्य जीर्ण होतो तसा स्नेह सुद्धां कमी होत असतो.

९९५ स्थापयेदेव मर्यादां जनचित्तप्रसादिनीम्।
अल्पेऽप्यर्थे च मर्यादा लोके भवति पूजिता॥१२।१३३।१३

लोकांचीं अंतःकरणें प्रसन्न राहतील अशाच प्रकारचे नियम केले पाहिजेत. लहानसहान गोष्टींतसुद्धां नियम असलेला लोकांना मान्य होतो.

९९६ स्त्रियो यत्र च पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः॥१३।४६।५

जेथें स्त्रियांचा गौरव होतो तेथें देवता रममाण होतात.

९९७ स्वबाहुबलमाश्रित्य योऽभ्युज्जीवति मानवः।
स लोके लभते कीर्तिं परत्र च शुभां गतिम्॥५।१३३।४५

आपल्या बाहुबलाचा आश्रय करून जो मनुष्य आत्मोद्धार करून घेतो, त्याची इहलोकीं कीर्ति होऊन त्याला परलोकीं उत्तम गति मिलते.

९९८ स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥६।४२।१७

स्वभावतः ठरलेलें कर्म करण्यांत पाप लागत नाहीं.

९९९ स्वमर्थं यः परित्यज्य परार्थमनुतिष्ठति।
मिथ्याचरति मित्रार्थे यश्व मूढः स उच्यते॥५।३३।३६

जो स्वतः चें कर्तव्य सोडून देऊन दुसऱ्याच्या उलाढाली करीत राहतो आणि मित्रकार्यामध्यें खोटें आचरण करतो त्याला मूढ असें म्हणतात.

१००० स्वमांसं परमांसेन यो वर्धयितुमिच्छति।
नास्ति क्षुद्रतरस्तस्मात्स नृशंसतरो नरः॥१३।११६।११

दुसऱ्याचें मांस भक्षण करून आपलें मांस वाढविण्याची जो इच्छा करतो, त्याच्यासारखा नीच कोणी नाहीं. तो मनुष्य अत्यंत दुष्ट होय.

१००१ स्वयमुत्पद्यते जन्तुः स्वयमेव विवर्धते।
सुखदुःखे तथा मृत्युं स्वयमेवाधिगच्छति॥१२।२८८।१६

प्राणी स्वतःच जन्म घेतो स्वतःच वाढतो. तसेंच सुखदुःखे आणि मृत्यु त्याला स्वतःलाच प्राप्त होत असतात.

१००२ स्वयं प्राप्ते परिभवो भवतीति विनिश्चयः॥१३।८२।१४

(दुसऱ्यानें न बोलावितां) आपण होऊन जर कोणी दुसऱ्याकडे गेलें तर त्याचा अपमान होतो, हें अगदीं निश्चित होय.

१००३ स्ववीर्यं यः समाश्रित्य समाह्वयति वै परान्।
अभीतो युध्यते शत्रून् स वै पुरुष उच्यते॥५।१६३।३

स्वतःच्या सामर्थ्याचा आश्रय करून जो शत्रूंना युद्धाला आव्हान करतो आणि न भितां लढतो तोच खरा पुरुष म्हणावयाचा.

१००४ स्वार्थे सर्वे विमुह्यन्ति येऽपि धर्मविदो जनाः॥४।५१।४

स्वार्थाचा मोह सर्वांना, जे धर्म जाणणारेत्यांनासुद्धां, पडत असतो.

१००५ स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः६।४२।४५

आपआपलें कर्तव्य आनंदानें करीत राहिल्यानें मनुष्यास परमसिद्धि प्राप्त होते.

१००६ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः॥६।२६।३७

(श्रीकृष्ण सांगतात) हे अजुना, तुला जर युद्धांत मरण आलें तर स्वर्ग मिलेल, आणि तुझा जय झाला तर साऱ्यापृथ्वीचें राज्य तूं भोगशील. यासाठीं, हे कुंतीपुत्रा, युद्धाचा निश्चय करून ऊठ.

१००७ हर्षो योधगणस्यैको जयलक्षणमुच्यते॥६।३।७५

सर्व सैनिकांना लढण्याचा हुरूप वाटणें ही एक गोष्ट जय मिलण्याचें लक्षण होय.

१००८ हितं यत्सर्वभूतानामात्मनश्च सुखावहम्।
तत्कुर्यादीश्वरे ह्येतन्मूलं सर्वार्थसिद्धये॥५।३७।४०

सर्व भूतांना जें हितकर आणि स्वतःलाहि सुखावह तेंच ईश्वरार्पणबुद्धीनें करीत असावें. कारण, हेंच सव गोष्टी सिद्धीस जाण्याचें मूल आहे.

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724820752Screenshot2024-08-28102214.png"/>

सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724052893Screenshot2024-08-19130426.png"/>

विषयसूची
<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724053041Screenshot2024-08-19130616.png"/>

विषयः क्रमाङ्कः
अग्रणीः ५६०
अज्ञानम्
अतिथिः ७२८
अद्रोहः १५-१७
अधनः १८
अधमः ३१
अधर्मः २०-२२
अध्ययनम् ५१
अनर्थः ६५
अनार्यः ३०
अनित्यम् ३२
अनिर्वेदः ३४
अनिष्टम् ३६
अनुग्रहः १६
अनृतम् ४१
अन्नम् ३१३
अन्यायः ५०७
अपकारः ६८
अपण्डितः ८५२
अपत्यम् १६१
अपराधः ५०६
अप्रियम् ६७
अभिमानः ६२
अभिवादनम् ६३
अभ्यासः ११०
अमर्षः ६६
अमित्रः ४०
अमृतम् ७०
अराजकम् ७४
अरिः ७५
अर्थः
अलसः ५१७
अवमानः ३७
अवलिप्तः ३०४
अविश्वासः ९३
अश्रद्धा
असाधुः १२७
असूया ३१८
अहिंसा १४
आचारः ५२
आततायी १८०
आत्मा
आपद् ४८
आयुः २८
आरोग्यम् ३२
आर्जवम् १२६
आर्यः १५१
आलस्यम् १५२
आशा
आश्चर्यम् १२२
आसनम् ३२९
इच्छा १५८
इन्द्रियम् ८२
ईश्वरः १६९
ईहा २०७
उत्कर्षः १४१
उत्थानम् १७१-१७४
उत्साहः १७६
उद्धारः २२१
उद्यमः १७९
उद्योगः ९७ (उत्थानम् पुरुषकारः यत्नः व्यवसायः)
उद्वेगः ७०
उपकारः २०९
उपायः ४७०
ऐश्वर्यम् ७६
ओजः ६३७
औषधम् १०२
कन्या १३६
कर्ता १९३
कर्म
कल्याणम् ६५
कामः ८१
कारणम् २३१
कार्यम्
कालः
काष्ठम् २२५
कीर्तिः ६३
कुलम् १०८
कृतघ्नः २५५
कृतज्ञः १०८
कृत्यम्
कृपणः २६६
कृपा ६८
कृशः ६८८
कृषिः २१५
कोशः १८
क्रिया ८५
क्रोधः १४
क्लीबः १७७
क्लेशः ६३३
क्षत्रियः २०
क्षमा १२६
क्षयः ४६३
क्षुधा २९१
क्षेमम् २५
गणः ५४६
गतिः ६९
गर्भः ३३५
गीता २९५
गुणः २२
गुरुः २३९
गृहस्थाश्रमः ५८
गृहिणी ४२१ (दयिता दाराः नारी पत्नी भार्या स्त्री)
चञ्चलम् १२८
चारः ३१५
चित्तम् ३३
चौरः ७९३ (स्तेनः)
छिद्रम् ४९८
जननी ५७७ (माता)
जन्म २२६
जयः १३३
जरा ३१७
जातिः ५२२
जिह्मम् ७३५
जीवितम् ३२
ज्ञातिः १९
ज्ञानम्
ज्वलनम् ८९
तत्त्वम् ७०
तपः १४
तरणम् २२५
तीक्ष्णः २३८
तीर्थम् ८६६
तृणम् ३३९
तृप्तिः ७०
तृष्णा ३२३
तेजः २८२
त्यागः
दक्षः ६५०
दण्डः ८७
दमः १०८
दया ३५२
दयिता ८५७ (गृहिणी दाराः नारी पत्नी भार्या स्त्री)
दरिद्रः ६४
दाक्ष्यम् ३५४
दानम् १४
दाराः १४६
दारुणम् २२१
दासः ७९
दीर्घमूत्रः २७
दुःखम् ४२
दुर्गम् २२६
दुर्जनः ११
दुर्बलः १८
दुष्कृतम् १४०
दूतः २६३
देवः ३५
देशः ३६४ ४१२
देहः ६३३
दैवम् १०९
दोषः १३१
द्रव्यम् ३२

[TABLE]

धृतिः २२६
धैर्यम् ३१८
नगरम् ८६१
नपुंसकम् ८५६ (क्लीबः षण्ढः)
नयः ४१६
नरकः १६५
नराधिपः १८०
नरेन्द्रः ९३ (नराधिपः नृपः भूमिपः राजा)
नाथः ५६५
नारी ९२
निकृतिः ५३१
निग्रहः ४०
नित्यम् ४४४
निन्दा ६१
नियमः २१०
नियमनम् १४०
निरयः
निर्मन्युः ४४५
निश्चयः ३५
नीचः ६०८
नीतिः ५७
नृपः २८४
नृशंसः ३६६
पण्डितः ३२
पतिः ५५६
पतितः ५५५
पत्नी ३८
पन्थाः ९२
परधर्मः ९०७
परलोकः
पराक्रमः १०२
पराभवः ११८
परितापः ४६
परिपन्थी १४३
परिभवः ५०५
परिवादः ४६

[TABLE]

प्रज्ञा १०८
प्रभवः १८७
प्रभुः ५९५
प्रमादः १२६
प्रवासः ५५१
प्रशंसा ६०४
प्रश्नः २१०-२१६
प्रहारः १६०
प्राकृतः ६०४
प्राज्ञः ४४९
प्राणः ८१
प्रार्थना १७५ (याचना)
प्रियम् ३२
प्रीतिः १५०
फलम् ३५
बन्धः १२९
बन्धुः १७८
बलम्
बलवान् ९८
बान्धवः ७७
बालः ८३
बुद्धिः ५९
ब्रह्म १११
ब्रह्मचर्यम् ६२९
ब्रह्मचारी २२७
ब्राह्मणः १९१
ब्राह्मण्यम् २७५
भक्तः २७०
भद्रम् ३२४
भयम् ९५
भर्ता ५७१
भारः ६४०
भार्या ८०
भाषणम् ३१
भूतिः
भूमिपः १२१
भृत्यः २२
भेदः ४५७
भोगः १६८
भोजनम् २९९
भ्राता ५७९
मतिः ४४
मदः १५२
मनः ११०
मन्त्रः १८९
ममत्वम् १०
मरणम् २०
महत् ३३३
महाभारतम्
माता ७७
मानः ७० ४५५ ४८३
मानुष्यम् १२८
माया १६९
मित्रम् ४०

[TABLE]

[TABLE]

राज्यम् ६०
राष्ट्रम् १८३
रिपुः १५
रूपम् ३२
रोगः ६८०
लाभः ३४
लोकः
लोभः १०
वक्ता ५९९
वचनम् २७२ ६०३
वधः १९६
वनम् ५४२
वयः ५३८
वयस्यः ६६६ (मित्रम् सखा सुहृद्)
वर्णः ३१४
वर्तनम् १४४
वाक् ६५
वात्सल्यम् २९३
विक्रमः ३९
विघ्नः १५३
विचक्षणः ७०
विचारः ९८९
वित्तम् २४
विद्या ७६
विद्यार्थी १५२
विद्वान् २१
विधिः १६७
विनयः २१६
विनाशः
विप्रः ८४७
विभूतिः ७४५
वियोगः ९९३
विरोधः २४०
विश्वासः ३१
विषम् ७०
विषयः ५८
वीरः १७१
वीर्यम् ५५
वृत्तम् १४५
वृत्तिः ९५
वृद्धः ६३
वृद्धिः ४१२
वेदः १६०

[TABLE]

शास्ता ३००
शास्त्रम् २०४
शीलम् १२
शुचिः ५४९
शुभम् ३४
शुश्रूषा १०१
शूरः १९६
शेषः ८४
शोकः १०२
शौचम् १०
शौर्यम् ४१२
श्रद्धा १०४
श्रीः २३
श्रुतम् १०५
श्रेयः
श्रेष्ठः १७३
श्रोता ९९०
षण्ढः ६००
संयमः ४१२
संयोगः ९१३
संवासः ३२
संशयः
संसारः ६६७
सखा ८८
सख्यम् ३४०
संगः ११९
संगतम् १५५
संघः ६५३
संचयः ३२
सत्कारः २११

[TABLE]

[TABLE]

स्त्री २२४
स्थविरः १८५
स्नानम् ५४९
स्नेहः २३३
स्वकर्म ९७
स्वधर्मः ५८
स्वर्गः ७३
स्वामी २२
स्वार्थः ५४३
हननम् ७२
हर्षः ४५९
हास्यम् ११
हिंसा ४३
हितम् ३९४
हृदयम् ४५३
ह्रीः ३१८

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724123677Screenshot2024-08-20084411.png"/>

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724090620Screenshot2024-08-19233248.png"/>

मुद्रकः—एस्. व्ही. परुलेकर, मुंबईवैभव प्रेस, सर्व्हंटस् ऑफ् इंडिया
सोसायटीज् बिल्डिंग, गिरगांव–मुंबई.

—————

प्रकाशक—केशव भिकाजी ढवले, रामचंद्र बिल्डिंग, गिरगांव–मुंबई.
(सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन)

<MISSING_FIG href="../books_images/U-IMG-1724090703Screenshot2024-08-19233248.png"/>

]


  1. श्लोक%20२१०%20ते%20२१६%20नारदमुनींनीं%20युधिष्ठिराला%20विचारलेल्या%20’कश्चित्प्रश्नांतील’%20आहेत “श्लोक २१० ते २१६ नारदमुनींनीं युधिष्ठिराला विचारलेल्या ‘कश्चित्प्रश्नांतील’ आहेत” ↩︎