१३ श्रीरामांचे समुद्रतीरी आगमन

दोहा

मूल (दोहा)

कपिपति बेगि बोलाए आए जूथप जूथ।
नाना बरन अतुल बल बानर भालु बरूथ॥ ३४॥

अनुवाद (हिन्दी)

वानरराज सुग्रीवाने लगेच वानरांना बोलावले. सेनापतींचे समूह आले. वानर व अस्वलांच्या झुंडी अनेक रंगांच्या होत्या आणि त्यांच्यामध्ये अतुलनीय बळ होते.॥ ३४॥

मूल (चौपाई)

प्रभु पद पंकज नावहिं सीसा।
गर्जहिं भालु महाबल कीसा॥
देखी राम सकल कपि सेना।
चितइ कृपा करि राजिव नैना॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण प्रभूंच्या चरणकमली नतमस्तक झाले. महाबलवान अस्वले व वानर गर्जना करीत होते. श्रीरामांनी सर्व सेना पाहून आपल्या कमलनेत्रांतून तिच्यावर कृपावर्षाव केला.॥ १॥

मूल (चौपाई)

राम कृपा बल पाइ कपिंदा।
भए पच्छजुत मनहुँ गिरिंदा॥
हरषि राम तब कीन्ह पयाना।
सगुन भए सुंदर सुभ नाना॥

अनुवाद (हिन्दी)

रामकृपेचे बळ मिळाल्यामुळे श्रेष्ठ वानर जणू पंख असलेले मोठे पर्वत झाले. मग श्रीरामांनी आनंदाने प्रस्थान केले. त्यावेळी अनेक सुंदर व शुभ शकुन झाले.॥ २॥

मूल (चौपाई)

जासु सकल मंगलमय कीती।
तासु पयान सगुन यह नीती॥
प्रभु पयान जाना बैदेहीं।
फरकि बाम अँग जनु कहि देहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांची कीर्ती ही सर्व मांगल्यांनी परिपूर्ण आहे, त्यांच्या प्रस्थानाच्या वेळी शकुन होणे, ही लीला आहे. प्रभूंचे प्रस्थान जानकीलाही जाणवले. तिची डावी अंगे स्फुरून सांगत होती की,श्रीराम येत आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

जोइ जोइ सगुन जानकिहि होई।
असगुन भयउ रावनहि सोई॥
चला कटकु को बरनैं पारा।
गर्जहिं बानर भालु अपारा॥

अनुवाद (हिन्दी)

जानकीला जेव्हा शकुन होत होते, तेव्हा रावणाला अपशकुन झाले. श्रीरामांची सेना निघाली, तिचे वर्णन कोण करील? असंख्य वानर व अस्वले गर्जना करीत होती.॥ ४॥

मूल (चौपाई)

नख आयुध गिरि पादपधारी।
चले गगन महि इच्छाचारी॥
केहरिनाद भालु कपि करहीं।
डगमगाहिं दिग्गज चिक्करहीं॥

अनुवाद (हिन्दी)

नखे हीच त्यांची शस्त्रे होती, ती स्वेच्छेनुसार चालणारी अस्वले व वानर पर्वत व वृक्ष उचलून आकाशातून निघाले आणि काही जमिनीवरून चालत होते. ते सिंहाप्रमाणे गर्जना करीत होते. त्यांच्या चालण्याने व गर्जनेने दिग्गज घाबरून चीत्कार करीत होते.॥ ५॥

छंद

मूल (दोहा)

चिक्करहिं दिग्गज डोल महि गिरि लोल सागर खरभरे।
मन हरष सभ गंधर्ब सुर मुनि नाग किंनर दुख टरे॥
कटकटहिं मर्कट बिकट भट बहु कोटि कोटिन्ह धावहीं।
जय राम प्रबल प्रताप कोसलनाथ गुन गन गावहीं॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

दिशांचे हत्ती चीत्कार करू लागले, पृथ्वी डगमगू लागली, पर्वत कापू लागले आणि समुद्र खवळले. गंधर्व, देव, मुनी, नाग, किन्नर हे सर्वच्या सर्व मनातून आनंदित झाले की, आता आमची दुःखे टळली. अनेक कोटी भयानक वानर योद्धे दात चावत होते आणि कोटॺवधी धावत होते. ‘प्रबल प्रतापी कोसलनाथ श्रीरामचंद्रांचा विजय असो,’ अशा घोषणा देत ते श्रीरामांचे गुण-गान करीत होते.॥ १॥

मूल (दोहा)

सहि सक न भार उदार अहिपति बार बारहिं मोहई।
गह दसन पुनि पुनि कमठ पृष्ट कठोर सो किमि सोहई॥
रघुबीर रुचिर प्रयान प्रस्थिति जानि परम सुहावनी।
जनु कमठ खर्पर सर्पराज सो लिखत अबिचल पावनी॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

परमश्रेष्ठ व महान सर्पराज शेषसुद्धा सेनेचे ओझे सहन करू शकेना. तो वारंवार घाबरून जात होता आणि पुनः पुन्हा कासवाच्या कठोर पाठीला दातांनी धरीत होता. वारंवार दात घुसवून तो कासवाच्या पाठीवर रेघा ओढीत होता. तो असा शोभत होता की, जणू श्रीरामचंद्रांची सुंदर प्रस्थानयात्रा ही फार चांगली समजून तिची पवित्र व अढळ कथा सर्पराज शेष कासवाच्या पाठीवर लिहीत होता.॥ २॥

दोहा

मूल (दोहा)

एहि बिधि जाइ कृपानिधि उतरे सागर तीर।
जहँ तहँ लागे खान फल भालु बिपुल कपि बीर॥ ३५॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे कृपानिधान श्रीराम समुद्रतटावर जाऊन पोहोचले. अनेक अस्वले व वानर जिकडे-तिकडे फळे खाऊ लागले.॥ ३५॥