०२ जयंताचा दुष्टपणा आणि त्याचा परिणाम

मूल (चौपाई)

एक बार चुनि कुसुम सुहाए।
निज कर भूषन राम बनाए॥
सीतहि पहिराए प्रभु सादर।
बैठे फटिक सिला पर सुंदर॥

अनुवाद (हिन्दी)

एकदा सुंदर फुले वेचून श्रीरामांनी आपल्या हातांनी तऱ्हेतऱ्हेचे अलंकार बनविले आणि सुंदर स्फटिक शिळेवर बसलेल्या प्रभूंनी मोठॺा प्रेमाने ते सीतेला घातले.॥ २॥

मूल (चौपाई)

सुरपति सुत धरि बायस बेषा।
सठ चाहत रघुपति बल देखा॥
जिमि पिपीलिका सागर थाहा।
महा मंदमति पावन चाहा॥

अनुवाद (हिन्दी)

देवराज इंद्राचा नीच मूर्ख पुत्र जयंत हा कावळ्याचे रूप घेऊन श्रीरघुनाथांचे सामर्थ्य पाहू इच्छित होता, ज्याप्रमाणे निर्बुद्ध मुंगी समुद्राचा थांग पाहू इच्छिते.॥ ३॥

मूल (चौपाई)

सीता चरन चोंच हति भागा।
मूढ़ मंदमति कारन कागा॥
चला रुधिर रघुनायक जाना।
सींक धनुष सायक संधाना॥

अनुवाद (हिन्दी)

तो मूर्ख व मंदबुद्धीमुळे भगवंतांच्या बळाची परीक्षा घेण्यासाठी बनलेला कावळा सीतेच्या चरणांवर चोच मारून पळाला. जेव्हा रक्त वाहू लागले, तेव्हा श्रीरामांनी ते पाहिले व धनुष्यावर बोरूचा बाण लावून सोडला.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

अति कृपाल रघुनायक सदा दीन पर नेह।
ता सन आइ कीन्ह छलु मूरख अवगुन गेह॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ हे अत्यंत कृपाळू आहेत आणि त्यांचे दीनांवर नेहमी प्रेम असते, त्यांच्याशीही अवगुणांचे घर असलेल्या त्या मूर्ख जयंताने कपट केले.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रेरित मंत्र ब्रह्मसर धावा।
चला भाजि बायस भय पावा॥
धरि निज रूप गयउ पितु पाहीं।
राम बिमुख राखा तेहि नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

मंत्राने प्रेरित असलेला तो ब्रह्मबाण सुसाट निघाला. कावळा घाबरून पळू लागला. तो आपले खरे रूप घेऊन इंद्राकडे गेला, परंतु श्रीरामांचा तो विरोधी असल्याचे पाहून इंद्राने त्याला जवळ केले नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

भा निरास उपजी मन त्रासा।
जथा चक्र भय रिषि दुर्बासा॥
ब्रह्मधाम सिवपुर सब लोका।
फिरा श्रमित ब्याकुल भय सोका॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा तो निराश झाला. ज्याप्रमाणे दुर्वास ऋषीला चक्र पाठीमागे लागल्यामुळे भीती वाटली, त्याप्रमाणे जयंताच्या मनाला भय वाटू लागले. तो ब्रह्मलोक, शिवलोक इत्यादी सर्व लोकांमध्ये थकून व भय-शोकाने व्याकूळ होऊन पळत निघाला.॥ २॥

मूल (चौपाई)

काहूँ बैठन कहा न ओही।
राखि को सकइ राम कर द्रोही॥
मातु मृत्यु पितु समन समाना।
सुधा होइ बिष सुनु हरिजाना॥

अनुवाद (हिन्दी)

परंतु कुणी त्याला बसायलाही सांगितले नाही. श्रीरामांच्या शत्रूला कोण जवळ करणार? काकभुशुंडी म्हणाले, ‘हे गरुडा, अशा व्यक्तीला माता ही मृत्यूसारखी, पिता हा यमासारखा आणि अमृत हे विषासारखे बनते.॥ ३॥

मूल (चौपाई)

मित्र करइ सत रिपु कै करनी।
ता कहँ बिबुधनदी बैतरनी॥
सब जगु ताहि अनलहु ते ताता।
जो रघुबीर बिमुख सुनु भ्राता॥

अनुवाद (हिन्दी)

मित्र त्याच्याशी शेकडो शत्रूंप्रमाणे वागू लागतो. देवनदी गंगा ही त्याच्यासाठी यमपुरीची वैतरणी नदी बनते. हे बंधू, ऐक. जो श्रीरघुनाथांशी विन्मुख होतो, त्याला संपूर्ण जग हे अग्नीपेक्षाही अधिक होरपळवणारे होते.’॥ ४॥

मूल (चौपाई)

नारद देखा बिकल जयंता।
लागि दया कोमल चित संता॥
पठवा तुरत राम पहिं ताही।
कहेसि पुकारि प्रनत हित पाही॥

अनुवाद (हिन्दी)

नारदांनी जेव्हा व्याकूळ जयंताला पाहिले, तेव्हा त्यांना दया आली. कारण संतांचे मन मोठे कोमल असते. त्यांनी त्याची समजूत घालून त्याला तत्काळ श्रीरामांच्याकडे पाठविले. त्यांनी त्याला सांगितले की, तू श्रीरामांना जाऊन असे म्हण की, ‘हे शरणागतांचे हितकारी, मला वाचवा.’॥ ५॥

मूल (चौपाई)

आतुर सभय गहेसि पद जाई।
त्राहि त्राहि दयाल रघुराई॥
अतुलित बल अतुलित प्रभुताई।
मैं मतिमंद जानि नहिं पाई॥

अनुवाद (हिन्दी)

व्याकूळ व भयभीत झालेल्या जयंताने जाऊन श्रीरामांचे पाय धरले व म्हटले, ‘हे दयाळू रघुनाथा, रक्षण करा. रक्षण करा. तुमचे अतुल्य बळ व अतुल्य सत्ता माझ्या मंदबुद्धीला ओळखता आली नाही.॥

मूल (चौपाई)

निज कृत कर्म जनित फल पायउँ।
अब प्रभु पाहि सरन तकि आयउँ॥
सुनि कृपाल अति आरत बानी।
एकनयन करि तजा भवानी॥

अनुवाद (हिन्दी)

आपल्या कर्माचे फळ मला मिळाले. आता हे प्रभू, माझे रक्षण करा. मी केवळ तुमचाच आश्रय पाहून आलो आहे.’ श्रीशिव म्हणतात, हे पार्वती, कृपाळू श्रीरघुनाथांनी त्याचे अत्यंत दुःखाचे बोलणे ऐकून त्याला एकाक्ष करून सोडून दिले.॥ ७॥

सोरठा

मूल (दोहा)

कीन्ह मोह बस द्रोह जद्यपि तेहि कर बध उचित।
प्रभु छाड़ेउ करि छोह को कृपाल रघुबीर सम॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

त्याने मूर्खपणाने खोडी काढली होती, म्हणून त्याचा वध करणेच योग्य होते; परंतु प्रभूंनी कृपा करून त्याला सोडून दिले. श्रीरामांच्यासारखा कृपाळू दुसरा कोण असणार?॥ २॥

मूल (चौपाई)

रघुपति चित्रकूट बसि नाना।
चरित किए श्रुति सुधा समाना॥
बहुरि राम अस मन अनुमाना।
होइहि भीर सबहिं मोहि जाना॥

अनुवाद (हिन्दी)

चित्रकूटामध्ये राहून श्रीरघुनाथांनी अनेक लीला केल्या, त्या कानांनी ऐकण्यास अमृतासारख्या गोड आहेत. काही काळानंतर श्रीरामांना वाटले की, सर्व लोकांना मी कळून आलो आहे. त्यामुळे येथे मोठी गर्दी होईल.॥ १॥