४९ जनकांचे आगमन

दोहा

मूल (दोहा)

प्रेम मगन तेहि समय सब सुनि आवत मिथिलेसु।
सहित सभा संभ्रम उठेउ रबिकुल कमल दिनेसु॥ २७४॥

अनुवाद (हिन्दी)

त्यावेळी सर्व लोक प्रेम-मग्न झाले होते. एवढॺात मिथिलापती जनक येत आहेत, असे ऐकताच सूर्यकुलरूपी कमलासाठी सूर्य असलेले श्रीरामचंद्र सभेसह आदराने त्वरित उठून उभे राहिले.॥ २७४॥

मूल (चौपाई)

भाइ सचिव गुरपुरजन साथा।
आगें गवनु कीन्ह रघुनाथा॥
गिरिबरु दीख जनकपति जबहीं।
करि प्रनामु रथ त्यागेउ तबहीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथ बंधू, मंत्री, गुरू व पुरवासी यांना घेऊन जनकांच्या स्वागतासाठी निघाले. जनकांनी पर्वतश्रेष्ठ कामदनाथाला पाहिले, तेव्हांच ते प्रणाम करून रथातून उतरले व पायी चालू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

राम दरस लालसा उछाहू।
पथ श्रम लेसु कलेसु न काहू॥
मन तहँ जहँ रघुबर बैदेही।
बिनु मन तन दुख सुख सुधि केही॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांना श्रीरामांच्या दर्शनाची लालसा व उत्साह असल्यामुळे प्रवासाचा शीण व कष्ट वाटत नव्हते. जेथे श्रीराम व जानकी आहेत, तेथे त्यांचे मन लागले होते. मनाविना शरीराच्या सुख-दुःखाची जाणीव कुणाला असते?॥ २॥

मूल (चौपाई)

आवत जनकु चले एहि भाँती।
सहित समाज प्रेम मति माती॥
आए निकट देखि अनुरागे।
सादर मिलन परसपर लागे॥

अनुवाद (हिन्दी)

अशा अवस्थेमध्ये जनक राजा येत होते. सर्व मंडळींच्या बरोबर त्यांची बुद्धीही प्रेमात गुंग होऊन गेली होती. ते जवळ आल्याचे पाहून सर्वांच्या प्रेमाला भरते आले आणि ते आदराने परस्परांना भेटू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

लगे जनक मुनिजनपद बंदन।
रिषिन्ह प्रनामु कीन्ह रघुनंदन॥
भाइन्ह सहितरामु मिलि राजहि।
चले लवाइ समेत समाजहि॥

अनुवाद (हिन्दी)

जनक वसिष्ठादी मुनींच्या चरणांना वंदन करू लागले आणि श्रीरामचंद्रांनी जनकपुरीच्या शतानंदादी ऋषींना प्रणाम केला. नंतर श्रीराम भावांसह जनकांना भेटले आणि सर्वांना आपल्या आश्रमाकडे घेऊन येऊ लागले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

आश्रम सागर सांत रस पूरन पावन पाथु।
सेन मनहुँ करुना सरित लिएँ जाहिं रघुनाथु॥ २७५॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचा आश्रम शांतरसरूपी पवित्र जलाने पूर्ण भरलेला समुद्र होता. जनकांचा समाज जणू करुणरसाची नदी होती. आणि आश्रमरूपी शांतरसाच्या समुद्राला भेटायला श्रीराम तिला घेऊन निघाले होते.॥ २७५॥

मूल (चौपाई)

बोरति ग्यान बिराग करारे।
बचन ससोक मिलत नद नारे॥
सोच उसास समीर तरंगा।
धीरज तट तरुबर कर भंगा॥

अनुवाद (हिन्दी)

या करुणा-नदीला इतका पूर आला होता की, तिने ज्ञान-वैराग्यरूपी तटांना बुडवून टाकले होते. शोकपूर्ण बोलणे म्हणजे नद्या व ओढे होते, ते या नदीस मिळत होते आणि चिंतापूर्ण दीर्घ श्वास हवेच्या झोतांनी उसळलेल्या लाटा होत्या. त्या धैर्यरूपी किनाऱ्यावरील उत्तम वृक्ष उपटून टाकीत होत्या.॥ १॥

मूल (चौपाई)

बिषम बिषाद तोरावति धारा।
भय भ्रम भवँर अबर्त अपारा॥
केवट बुध बिद्या बड़ि नावा।
सकहिं न खेइ ऐक नहिं आवा॥

अनुवाद (हिन्दी)

भयानक शोक हा या नदीतील प्रचंड प्रवाह होता. भय व भ्रम हे त्यामधील असंख्य भोवरे व चक्रे होती. विद्वान हे नावाडी होते व विद्या ही मोठी नौका होती, परंतु ते ती चालवू शकत नव्हते. कुणाला तिचा अंदाजच येत नव्हता.॥ २॥

मूल (चौपाई)

बनचर कोल किरात बिचारे।
थके बिलोकि पथिक हियँ हारे॥
आश्रम उदधि मिली जब जाई।
मनहुँ उठेउ अंबुधि अकुलाई॥

अनुवाद (हिन्दी)

वनात फिरणारे बिचारे कोल-किरात हे प्रवासी होते. ते ती नदी पाहून मनातून खचले होते. ही करुणा-नदी जेव्हा आश्रम-समुद्रास येऊन मिळाली, तेव्हा जणू तो समुद्र उसळू लागला.॥ ३॥

मूल (चौपाई)

सोक बिकल दोउ राज समाजा।
रहा न ग्यानु न धीरजु लाजा॥
भूप रूप गुन सील सराही।
रोवहिं सोक सिंधु अवगाही॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्हीही राज-समाज शोकाकुल झाले होते. कुणाला ज्ञान राहिले नाही, धैर्य राहिले नाही की लज्जाही राहिली नाही. राजा दशरथ यांच्या रूप, गुण व शीलाची प्रशंसा करीत सर्वजण रुदन करीत होते आणि शोक-समुद्रात बुडॺा मारीत होते.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

अवगाहि सोक समुद्र सोचहिं नारि नर ब्याकुल महा।
दै दोष सकल सरोष बोलहिं बाम बिधि कीन्हो कहा॥
सुर सिद्ध तापस जोगिजन मुनि देखि दसा बिदेह की।
तुलसी न समरथु कोउ जो तरि सकै सरित सनेह की॥

अनुवाद (हिन्दी)

शोक समुद्रात बुडॺा मारणारे सर्व स्त्री-पुरुष चिंतेने व्याकूळ झाले होते. ते सर्वजण विधात्याला दोष देत क्रोधाने म्हणत होते की प्रतिकूल दैवाने हे काय केले? तुलसीदास म्हणतात की, देव, सिद्ध, तपस्वी, योगी व मुनिगण यांमध्ये कोणीही असा सामर्थ्यशाली नाही की, जो त्या प्रसंगी राजा विदेहाची दशा पाहून प्रेमाची नदी पार करू शकेल.॥

सोरठा

मूल (दोहा)

किए अमित उपदेस जहँ तहँ लोगन्ह मुनिबरन्ह।
धीरजु धरिअ नरेस कहेउ बसिष्ठ बिदेह सन॥ २७६॥

अनुवाद (हिन्दी)

जेथे तेथे श्रेष्ठ मुनींनी लोकांना असंख्य उपदेश दिले आणि वसिष्ठांनी विदेह जनकांना म्हटले की, ‘तुम्ही धीर धरा.’॥ २७६॥

मूल (चौपाई)

जासु ग्यानु रबि भवनिसि नासा।
बचन किरन मुनि कमल बिकासा॥
तेहि कि मोह ममता निअराई।
यह सिय राम सनेह बड़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

ज्या राजा जनकांचा ज्ञानरूपी सूर्य जन्म-मरणरूपी रात्रीचा नाश करतो आणि ज्यांची वचनरूपी किरणे ही मुुनिरूपी कमलांना प्रफुल्लित करतात, त्यांच्याजवळ मोह व ममता हे फिरकू शकतील काय? परंतु हा सीतारामांच्या प्रेमाचा महिमा आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

बिषई साधक सिद्ध सयाने।
त्रिबिध जीव जग बेद बखाने॥
राम सनेह सरस मन जासू।
साधु सभाँ बड़ आदर तासू॥

अनुवाद (हिन्दी)

जगामध्ये विषयी, साधक व सिद्ध असे तीन प्रकारचे जीव आहेत,असे वेदांमध्ये सांगितले आहे. या तिघांमध्ये ज्याचे चित्त श्रीरामांच्या स्नेहामध्ये बुडालेले असते, त्याचाच साधूंच्या सभेत मोठा आदर होतो.॥ २॥

मूल (चौपाई)

सोह न राम पेम बिनु ग्यानू।
करनधार बिनु जिमि जलजानू॥
मुनि बहु बिधि बिदेहु समुझाए।
रामघाट सब लोग नहाए॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे नावाडॺाविना जहाज चालत नाही, त्याप्रमाणे श्रीरामांच्या प्रेमाविना ज्ञानाला शोभा नाही. वसिष्ठांनी विदेहराज जनकांना पुष्कळ प्रकारे समजाविले. नंतर सर्व लोकांनी रामघाटावर स्नान केले.॥ ३॥

मूल (चौपाई)

सकल सोक संकुल नर नारी।
सो बासरु बीतेउ बिनु बारी॥
पसु खग मृगन्ह न कीन्ह अहारू।
प्रिय परिजन कर कौन बिचारू॥

अनुवाद (हिन्दी)

स्त्री-पुरुष सर्वजण शोकाकुल होते. त्या दिवशी भोजन ते काय, कुणी पाणीही घेतले नाही. पशु-पक्षी व हरिणांनीसुद्धा आहार घेतला नाही. मग प्रियजन व कुटुंबी यांच्याविषयी काय सांगावे?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

दोउ समाज निमिराजु रघुराजु नहाने प्रात।
बैठे सब बट बिटप तर मन मलीन कृस गात॥ २७७॥

अनुवाद (हिन्दी)

निमिराज जनक आणि रघुराज रामचंद्र आणि दोन्हीकडची मंडळी यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केले आणि सर्वजण वटवृक्षाखाली जाऊन बसले. सर्वांची मने उदास व शरीरे अशक्त झाली होती.॥ २७७॥

मूल (चौपाई)

जे महिसुर दसरथ पुर बासी।
जे मिथिलापति नगर निवासी॥
हंस बंस गुर जनक पुरोधा।
जिन्ह जग मगु परमारथु सोधा॥

अनुवाद (हिन्दी)

जे अयोध्येचे राहणारे व जे मिथिलेचे राहणारे ब्राह्मण होते आणि सूर्यवंशाचे गुरू वसिष्ठ व जनकांचे पुरोहित शतानंद की ज्यांनी सांसारिक अभ्युदयाचा मार्ग व परमार्थाचा मार्ग शोधून काढला होता,॥ १॥

मूल (चौपाई)

लगे कहन उपदेस अनेका।
सहित धरम नय बिरति बिबेका॥
कौसिककहि कहि कथा पुरानीं।
समुझाई सब सभा सुबानीं॥

अनुवाद (हिन्दी)

ते सर्वजण धर्म, नीती, वैराग्य व विवेकयुक्त अनेक विचार सांगू लागले. विश्वामित्रांनी प्राचीन कथा सर्व सभेला सुंदर वाणीमध्ये समजावून दिल्या.॥ २॥

मूल (चौपाई)

तब रघुनाथ कौसिकहि कहेऊ।
नाथ कालि जल बिनु सबु रहेऊ॥
मुनि कह उचित कहत रघुराई।
गयउ बीति दिन पहर अढ़ाई॥

अनुवाद (हिन्दी)

तेव्हा श्रीरघुनाथांनी विश्वामित्रांना म्हटले की, ‘हे मुनिवर्य! काल सर्व लोक पाणीसुद्धा न पिता राहिले आहेत, म्हणून आता काही आहार घेतला पाहिजे.’ विश्वामित्र म्हणाले, ‘श्रीरघुनाथ योग्यच सांगत आहेत. आजही अडीच प्रहर उलटून गेले.’॥ ३॥

मूल (चौपाई)

रिषि रुख लखि कह ते रहु तिराजू।
इहाँ उचित नहिं असन अनाजू॥
कहा भूपभल सबहि सोहाना।
पाइ रजायसु चले नहाना॥

अनुवाद (हिन्दी)

विश्वामित्रांचा रोख पाहून जनक म्हणाले की, ‘येथे अन्न खाणे योग्य नाही.’ राजांचे सुंदर बोलणे ऐकून सर्वांच्या मनाला बरे वाटले. आज्ञा घेऊन सर्व स्नानास गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

तेहि अवसर फल फूल दल मूल अनेक प्रकार।
लइ आए बनचर बिपुल भरि भरि काँवरि भार॥ २७८॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचवेळी अनेक प्रकारची पुष्कळ फळे, फुले, पाने, मुळे इत्यादी पदार्थांच्या कावडॺा व ओझी घेऊन कोल, किरात हे वनवासी लोक आले.॥ २७८॥

मूल (चौपाई)

कामद भे गिरि राम प्रसादा।
अवलोकत अपहरत बिषादा॥
सर सरिता बन भूमि बिभागा।
जनु उमगत आनँद अनुरागा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचंद्रांच्या कृपेमुळे सर्व पर्वत मनोवांछित वस्तू देणारे बनले. केवळ दर्शनानेच ते सर्व दुःखांचे हरण करीत. तेथील तलाव, नद्या, वने आणि पृथ्वीचे सर्व भाग यांमध्ये जणू आनंद व प्रेमाचा सागर उसळत होता.॥ १॥

मूल (चौपाई)

बेलि बिटप सब सफल सफूला।
बोलत खग मृग अलि अनुकूला॥
तेहि अवसर बन अधिक उछाहू।
त्रिबिध समीर सुखद सब काहू॥

अनुवाद (हिन्दी)

वेली आणि वृक्ष हे सर्वच फुलांनी भरून गेले. पक्षी, पशू आणि भ्रमर हे मनोहर बोल बोलू लागले. त्याप्रसंगी वनामध्ये फार उत्साह भरला होता. सर्वांना सुख देणारे शीतल, मंद व सुगंधित वारे वाहात होते.॥ २॥

मूल (चौपाई)

जाइ न बरनि मनोहरताई।
जनु महि करति जनक पहुनाई॥
तब सब लोग नहाइ नहाई।
राम जनक मुनि आयसु पाई॥
देखि देखि तरुबर अनुरागे।
जहँ तहँ पुरजन उतरन लागे॥
दलफल मूल कंदबिधि नाना।
पावन सुंदर सुधा समाना॥

अनुवाद (हिन्दी)

वनाच्या मनोहरतेचे वर्णन करणेच कठीण होते. जणू पृथ्वी ही जनकांचा पाहुणचार करीत होती. त्यावेळी जनकपुरवासी सर्व लोक आंघोळ करून श्रीराम, जनक व मुनी यांची आज्ञा घेऊन सुंदर वृक्ष पहात-पहात प्रेमाने जिकडे तिकडे उतरत होते. पवित्र, सुंदर व अमृतासारखी अनेक प्रकारची पाने, फळे, मुळे व कंद॥ ३-४॥

दोहा

मूल (दोहा)

सादर सब कहँ रामगुर पठए भरि भरि भार।
पूजि पितर सुर अतिथि गुर लगे करन फरहार॥ २७९॥

अनुवाद (हिन्दी)

यांची ओझी श्रीरामांचे गुरू वसिष्ठांनी सर्वांच्याकडे भरभरून आदराने पाठविली. तेव्हा ते लोक पितर, देवता, अतिथी आणि गुरू यांची पूजा करून फलाहार करू लागले.॥ २७९॥

मूल (चौपाई)

एहि बिधि बासर बीते चारी।
रामु निरखि नर नारि सुखारी॥
दुहु समाज असि रुचिमन माहीं।
बिनु सिय राम फिरब भल नाहीं॥

अनुवाद (हिन्दी)

अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. श्रीरामचंद्रांच्या दर्शनामुळे सर्व स्त्री-पुरुष सुखी होते. श्रीसीतारामांना घेतल्याविना परत जाणे चांगले नाही, अशी दोन्ही समाजांच्या मनात इच्छा होती.॥ १॥

मूल (चौपाई)

सीता राम संग बनबासू।
कोटि अमरपुर सरिस सुपासू॥
परिहरि लखन रामु बैदेही।
जेहि घरु भाव बाम बिधि तेही॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीसीतारामांच्या सोबत वनात राहणे म्हणजे कोटॺवधी देवलोकांमध्ये निवास करण्याजोगे सुखदायक होते. लक्ष्मण, श्रीराम व जानकी यांना सोडून ज्यांना आपले घर बरे वाटते, दैव त्यांच्या विरुद्ध आहे, असे समजावे.॥ २॥

मूल (चौपाई)

दाहिन दइउ होइ जब सबही।
राम समीप बसिअ बन तबही॥
मंदाकिनि मज्जनु तिहु काला।
राम दरसु मुद मंगल माला॥

अनुवाद (हिन्दी)

जेव्हा दैव हे सर्वांना अनुकूल असेल, तेव्हाच श्रीरामांच्याजवळ वनात निवास घडू शकतो. मंदाकिनीचे त्रिकाळ स्नान, आनंद व मांगल्याची रास असलेले श्रीरामांचे दर्शन,॥ ३॥

मूल (चौपाई)

अटनु राम गिरि बनतापस थल।
असनु अमिअ सम कंद मूल फल॥
सुख समेत संबत दुइ साता।
पल सम होहिं न जनिअहिं जाता॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचा कामदनाथ पर्वत, वने व तपस्व्यांच्या स्थानांतून फिरणे आणि अमृतासमान मधुर कंद, मुळे, व फळांचे भोजन. अशा सुखसोहळ्यात चौदा वर्षे पळासारखी निघून जातील. केव्हा गेली कळणारही नाही.॥ ४॥