२८ दशरथ-सुमन्त्र-संवाद

दोहा

मूल (दोहा)

देखि सचिवँ जय जीव कहि कीन्हेउ दंड प्रनामु।
सुनत उठेउ ब्याकुल नृपति कहु सुमंत्र कहँ रामु॥ १४८॥

अनुवाद (हिन्दी)

मंत्र्याने ‘जय जीव’ असे म्हणून दंडवत प्रणाम केला. ऐकताच राजाने व्याकूळ होऊन विचारले, ‘सुमंत्रा, राम कुठे आहे, ते सांग.’॥ १४८॥

मूल (चौपाई)

भूप सुमंत्रु लीन्ह उर लाई।
बूड़त कछु अधार जनु पाई॥
सहित सनेह निकट बैठारी।
पूँछत राउ नयन भरि बारी॥

अनुवाद (हिन्दी)

राजांनी सुमंत्राला हृदयाशी कवटाळले. जणू बुडत्याला काडीचा आधार मिळावा. मंत्र्याला प्रेमाने जवळ बसवून व डोळ्यांत अश्रू आणून राजे विचारू लागले.॥ १॥

मूल (चौपाई)

राम कुसल कहु सखा सनेही।
कहँ रघुनाथु लखनु बैदेही॥
आने फेरि किबनहि सिधाए।
सुनत सचिव लोचन जल छाए॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे माझ्या प्रेमळ मित्रा, श्रीरामाची खुशाली सांग. राम, लक्ष्मण व सीता कुठे आहेत, ते सांग. त्यांना परत आणलेस की ते वनात निघून गेले?’ हे ऐकताच मंत्र्याचे नेत्र पाण्याने डबडबले.॥ २॥

मूल (चौपाई)

सोक बिकल पुनिपूँछ नरेसू।
कहु सिय राम लखन संदेसू॥
राम रूप गुनसील सुभाऊ।
सुमिरि सुमिरि उर सोचत राऊ॥

अनुवाद (हिन्दी)

शोकामुळे व्याकूळ होऊन राजे पुन्हा विचारू लागले, ‘सीता, राम व लक्ष्मण यांची वार्ता तर सांग.’ श्रीरामांचे रूप, गुण, शील आणि स्वभाव यांची आठवण कर करून राजे मनात शोक करू लागले.॥ ३॥

मूल (चौपाई)

राउ सुनाइ दीन्ह बनवासू।
सुनि मन भयउ न हरषु हराँसू॥
सो सुत बिछुरत गएन प्राना।
को पापी बड़ मोहि समाना॥

अनुवाद (हिन्दी)

ते म्हणाले, ‘मी श्रीरामाला राजा करण्याचे सांगून वनवास दिला. ते ऐकून रामाच्या मनात हर्ष वा विषाद आला नाही. असा पुत्र सोडून गेल्यावरही माझे प्राण गेले नाहीत; मग माझ्यासारखा मोठा पापी कोण असेल?॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सखा रामु सिय लखनु जहँ तहाँ मोहि पहुँचाउ।
नाहिं त चाहत चलन अब प्रान कहउँ सतिभाउ॥ १४९॥

अनुवाद (हिन्दी)

हे सख्या, श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण जेथे आहेत, तेथे मलाही घेऊन चल. नाहीतर मी खरे सांगतो की, माझे प्राण आता जाऊ इच्छितात.’॥ १४९॥

मूल (चौपाई)

पुनि पुनि पूँछत मंत्रिहि राऊ।
प्रियतम सुअन सँदेस सुनाऊ॥
करहि सखा सोइ बेगि उपाऊ।
रामु लखनु सिय नयन देखाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

राजे वारंवार मंत्र्याला विचारत होते, ‘मला प्रियतम पुत्रांची वार्ता सांग. हे मित्रा, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे मला माझ्या डोळ्यांनी पाहता येतील, असा उपाय ताबडतोब कर.’॥ १॥

मूल (चौपाई)

सचिव धीर धरि कह मृदु बानी।
महाराज तुम्ह पंडित ग्यानी॥
बीर सुधीर धुरंधर देवा।
साधु समाजु सदा तुम्ह सेवा॥

अनुवाद (हिन्दी)

मन घट्ट करून मंत्री कोमल वाणीने म्हणाला, ‘महाराज, तुम्ही पंडित व ज्ञानी आहात. हे देवा, तुम्ही शूरवीर व उत्तम धैर्यवान पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहात. तुम्ही नेहमी सत्संगाचा लाभ घेतला आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

जनम मरन सब दुख सुख भोगा।
हानि लाभु प्रिय मिलन बियोगा॥
काल करम बसहोहिं गोसाईं।
बरबस राति दिवस की नाईं॥

अनुवाद (हिन्दी)

जन्म-मरण, सुख-दुःखाचे भोग, हानि-लाभ, प्रियजनांचा संयोग-वियोग, हे सर्व काही, हे स्वामी! काल व कर्म यांच्या अधीन असल्यामुळे रात्र व दिवस यांच्याप्रमाणे अनिवार्यपणे येत असते.॥ ३॥

मूल (चौपाई)

सुख हरषहिं जड़ दुख बिलखाहीं।
दोउ सम धीर धरहिं मन माहीं॥
धीरज धरहु बिबेकु बिचारी।
छाड़िअ सोच सकल हितकारी॥

अनुवाद (हिन्दी)

मूर्ख लोक सुखात हर्षित होतात व दुःखात रडतात. परंतु धीर पुरुष आपल्या मनामध्ये दोन्ही गोष्टी समान असल्याचे मानतात. हे सर्वांचे रक्षक असलेले महाराज! तुम्ही विवेकपूर्ण विचार करून धैर्य धरा आणि शोक सोडून द्या.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रथम बासु तमसा भयउ दूसर सुरसरि तीर।
न्हाइ रहे जलपानु करि सिय समेत दोउ बीर॥ १५०॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांचा पहिला मुक्काम तमसा नदीच्या तटावर झाला. दुसरा गंगातटावर. सीतेसह दोन्ही बंधू त्यादिवशी स्नान करून फक्त पाणी पिऊन राहिले.॥ १५०॥

मूल (चौपाई)

केवट कीन्हि बहुत सेवकाई।
सो जामिनि सिंगरौर गवाँई॥
होत प्रात बट छीरु मगावा।
जटा मुकुट निज सीस बनावा॥

अनुवाद (हिन्दी)

निषादराजाने पुष्कळ सेवा केली. ती रात्र शृंगवेरपुरामध्ये घालविली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच वडाचा चीक मागविला व श्रीराम आणि लक्ष्मणाने आपल्या शिरावर जटाजूट तयार केले.॥ १॥

मूल (चौपाई)

राम सखाँ तब नाव मगाई।
प्रिया चढ़ाइ चढ़े रघुराई॥
लखन बान धनु धरे बनाई।
आपु चढ़े प्रभु आयसु पाई॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर श्रीरामचंद्रांचे मित्र निषादराज याने नाव मागवली. प्रथम प्रिय सीतेला नावेत चढवून नंतर श्रीरघुनाथ चढले. लक्ष्मणाने धनुष्य-बाण सज्ज केले व प्रभू श्रीरामांची आज्ञा मिळताच तो नावेत चढला.॥ २॥

मूल (चौपाई)

बिकल बिलोकि मोहि रघुबीरा।
बोले मधुर बचन धरि धीरा॥
तात प्रनामु तात सन कहेहू।
बार बार पद पंकज गहेहू॥

अनुवाद (हिन्दी)

मी व्याकूळ झालो, हे पाहून श्रीरामांनी मोठॺा धीराने मधुर शब्दांत म्हटले, ‘हे तात, बाबांना माझा प्रणाम सांगावा आणि माझ्यातर्फे वारंवार त्यांचे चरण-कमल धरावे.॥ ३॥

मूल (चौपाई)

करबि पायँ परिबिनय बहोरी।
तात करिअ जनि चिंता मोरी॥
बन मग मंगल कुसल हमारें।
कृपा अनुग्रह पुन्य तुम्हारें॥

अनुवाद (हिन्दी)

पुन्हा त्यांचे पाय धरून विनंती करावी की, ‘‘बाबा! तुम्ही माझी काळजी करू नका. तुमच्या कृपेने आणि पुण्याईने वनात व वाटेत आमचे कल्याणच होईल.॥ ४॥

छंद

मूल (दोहा)

तुम्हरें अनुग्रह तात कानन जात सब सुखु पाइहौं।
प्रतिपालि आयसु कुसल देखन पाय पुनि फिरि आइहौं॥
जननीं सकल परितोषि परि परि पायँ करि बिनती घनी।
तुलसी करेहु सोइ जतनु जेहिं कुसली रहहिं कोसलधनी॥

अनुवाद (हिन्दी)

तात! तुमच्या अनुग्रहामुळे मला वनात असताना सर्व प्रकारचे सुख मिळेल. तुमच्या आज्ञेचे व्यवस्थित पालन करून तुमच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी सुखरूपपणे आम्ही परत येऊ. सर्व मातांचे पाय धरून त्यांचे समाधान करावे आणि त्यांना विनंती करावी की (तुलसीदास म्हणतात,) कोसलपती खुशाल राहतील, असा प्रयत्न तुम्ही करीत रहावे.

दोहा

मूल (दोहा)

गुर सन कहब सँदेसु बार बार पद पदुम गहि।
करब सोइ उपदेसु जेहिं न सोच मोहि अवधपति॥ १५१॥

अनुवाद (हिन्दी)

वारंवार चरण-कमल धरून वसिष्ठ गुरूंना निरोप सांगावा की, अयोध्यापतींनी आमची काळजी करू नये, असाच त्यांनी त्यांना उपदेश करावा.॥ १५१॥

मूल (चौपाई)

पुरजन परिजन सकल निहोरी।
तात सुनाएहु बिनती मोरी॥
सोइ सब भाँति मोर हितकारी।
जातें रह नरनाहु सुखारी॥

अनुवाद (हिन्दी)

हे तात, सर्व पुरवासीयांना व कुटुंबीयांना विनंती करावी की, ज्याच्या प्रयत्नाने महाराज सुखी होतील, तोच मनुष्य सर्व प्रकारे माझा हितकारी असेल.॥ १॥

मूल (चौपाई)

कहब सँदेसु भरत के आएँ।
नीति न तजिअ राजपदु पाएँ॥
पालेहु प्रजहि करममन बानी।
सेएहु मातु सकल सम जानी॥

अनुवाद (हिन्दी)

भरत आल्यावर त्याला माझा निरोप सांगावा की, राजाचे पद मिळाल्यावर नीती सोडू नकोस. कर्म, वचन आणि मन यांनी प्रजेचे पालन कर आणि सर्व मातेंना समान मानून त्यांची सेवा कर.॥ २॥

मूल (चौपाई)

ओर निबाहेहु भायप भाई।
करि पितु मातु सुजन सेवकाई॥
तात भाँति तेहि राखब राऊ।
सोच मोर जेहिं करै न काऊ॥

अनुवाद (हिन्दी)

आणि हे बंधू, पिता, माता व स्वजनांची सेवा करून त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम करावे. तसेच राजांनी कधी माझी काळजी करू नये अशा प्रकारे त्यांना सांभाळावे.॥ ३॥

मूल (चौपाई)

लखन कहे कछु बचन कठोरा।
बरजि राम पुनि मोहि निहोरा॥
बार बार निज सपथ देवाई।
कहबि न तात लखन लरिकाई॥

अनुवाद (हिन्दी)

लक्ष्मण काहीसे कठोर बोलला, परंतु श्रीरामांनी त्याला आवरून मला विनंती केली आणि वारंवार स्वतःची शपथ घालून सांगितले की, ‘हे तात, लक्ष्मणाचा बालिशपणा तेथे सांगू नका.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

कहि प्रनामु कछु कहन लिय सिय भइ सिथिल सनेह।
थकित बचन लोचन सजल पुलक पल्लवित देह॥ १५२॥

अनुवाद (हिन्दी)

सीता प्रणाम करून काही सांगू लागली. परंतु प्रेमाधिक्यामुळे ती अवघडून गेली. तिची वाणी रुद्ध झाली, डोळ्यांमध्ये पाणी आले आणि शरीर रोमांचित झाले.॥ १५२॥

मूल (चौपाई)

तेहि अवसर रघुबर रुख पाई।
केवट पारहि नाव चलाई॥
रघुकुलतिलक चलेएहि भाँती।
देखउँ ठाढ़ कुलिस धरि छाती॥

अनुवाद (हिन्दी)

त्याचवेळी श्रीरामांचा संकेत मिळताच नावाडॺाने पलीकडे जाण्यासाठी नाव सोडली. अशा प्रकारे रघुवंशतिलक श्रीराम निघाले आणि मी छातीवर दगड ठेवून उभ्या उभ्या पहात राहिलो.॥ १॥

मूल (चौपाई)

मैं आपन किमिकहौं कलेसू।
जिअत फिरेउँ लेइ राम सँदेसू॥
असकहि सचिवबचनरहि गयऊ।
हानि गलानि सोच बस भयऊ॥

अनुवाद (हिन्दी)

मी श्रीरामांचा हा निरोप घेऊन जिवंतपणे परत आलो. माझे दुःख मी कसे सांगू?’ असे म्हणत तो झालेल्या हानीच्या क्लेशामुळे व काळजीमुळे तसाच गप्प राहिला.॥ २॥

मूल (चौपाई)

सूत बचन सुनतहिं नरनाहू।
परेउ धरनि उर दारुन दाहू॥
तलफत बिषममोह मन मापा।
माजा मनहुँ मीन कहुँ ब्यापा॥

अनुवाद (हिन्दी)

सुमंत्राचे बोलणे ऐकताच राजे जमिनीवर कोसळले. त्यांच्या हृदयात आग भडकली. ते तडफडू लागले, त्यांचे मन भीषण मोहामुळे व्याकूळ झाले. जणू माशाला पहिल्या पावसाचे पाणी बाधले होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

करि बिलापसब रोवहिं रानी।
महा बिपति किमि जाइ बखानी॥
सुनि बिलाप दुखहू दुखु लागा।
धीरजहू कर धीरजु भागा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व राण्या आक्रोश करीत रडू लागल्या. त्या महान संकटाचे वर्णन कसे करता येईल? त्या वेळचा विलाप ऐकून दुःखालाही दुःख झाले आणि धैर्याचे धैर्यही गळून गेले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

भयउ कोलाहलु अवध अति सुनि नृप राउर सोरु।
बिपुल बिहग बन परेउ निसि मानहु कुलिस कठोरु॥ १५३॥

अनुवाद (हिन्दी)

राजाच्या अंतःपुरातील रडण्याचा आवाज ऐकून अयोध्येमध्ये मोठा कोलाहल माजला. जणू पक्ष्यांच्या विशाल वनात रात्रीच्या वेळी कठोर वीज कोसळली होती.॥ १५३॥

मूल (चौपाई)

प्रान कंठगत भयउ भुआलू।
मनि बिहीन जनु ब्याकुल ब्यालू॥
इंद्रीं सकल बिकल भइँ भारी।
जनु सर सरसिज बनु बिनु बारी॥

अनुवाद (हिन्दी)

राजाचे प्राण कंठाशी आले. जणू मण्याविना साप मरणासन्न झाला होता. सर्व इंद्रिये फार व्याकूळ झाली, पाण्याविना तलावातील कमळे कोमेजून जावीत तशी.॥ १॥

मूल (चौपाई)

कौसल्याँ नृपु दीख मलाना।
रबिकुल रबि अँथयउ जियँ जाना॥
उर धरि धीर राम महतारी।
बोली बचन समय अनुसारी॥

अनुवाद (हिन्दी)

राजाला फार दुःखी झाल्याचे पाहून कौसल्येने जाणले की, ‘आता सूर्यकुलातील सूर्य अस्ताला चालला आहे.’ तेव्हा श्रीरामांची माता कौसल्या ही मन घट्ट करून प्रसंगानुरूप म्हणाली,॥ २॥

मूल (चौपाई)

नाथ समुझि मन करिअ बिचारू।
राम बियोग पयोधि अपारू॥
करनधार तुम्ह अवध जहाजू।
चढ़ेउ सकल प्रिय पथिक समाजू॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे नाथ, तुम्ही मनात विचार करा की, श्रीरामांचा वियोग हा अपार समुद्र आहे. अयोध्या ही जहाज आहे आणि तुम्ही त्याचे कर्णधार आहात. सर्व प्रजा, कुटुंबीय व प्रियजन हे जहाजातील प्रवासी आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

धीरजु धरिअ त पाइअ पारू।
नाहिं त बूड़िहि सबु परिवारू॥
जौं जियँ धरि अबिनयपिय मोरी।
रामु लखनु सिय मिलहिं बहोरी॥

अनुवाद (हिन्दी)

तुम्ही धीर धराल, तर सर्वजण तरून जातील. नाहीतर सर्व परिवार बुडून जाईल. हे प्रिय स्वामी, माझी विनंती मान्य कराल, तर श्रीराम, लक्ष्मण, सीता हे परत येऊन भेटतील.’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

प्रिया बचन मृदु सुनत नृपु चितयउ आँखि उघारि।
तलफत मीन मलीन जनु सींचत सीतल बारि॥ १५४॥

अनुवाद (हिन्दी)

प्रिय पत्नी कौसल्येचे हे मृदू बोलणे ऐकून राजांनी डोळे उघडून पाहिले. जणू तडफडणाऱ्या बिचाऱ्या मासोळीवर कुणी तरी शीतल जल शिंपडले.॥ १५४॥

मूल (चौपाई)

धरि धीरजु उठि बैठ भुआलू।
कहु सुमंत्र कहँ राम कृपालू॥
कहाँ लखनु कहँरामु सनेही।
कहँ प्रिय पुत्रबधू बैदेही॥

अनुवाद (हिन्दी)

धीर धरून राजे उठून बसले आणि म्हणाले, ‘सुमंत्रा, कृपाळू श्रीराम कुठे आहे, ते सांग. लक्ष्मण कोठे आहे? स्नेही राम कोठे आहे आणि माझी लाडकी सून जानकी कोठे आहे?’॥ १॥

मूल (चौपाई)

बिलपत राउ बिकल बहु भाँती।
भइ जुग सरिस सिराति न राती॥
तापस अंध सापसुधि आई।
कौसल्यहि सब कथा सुनाई॥

अनुवाद (हिन्दी)

महाराज व्याकूळ होऊन अनेक प्रकारे विलाप करीत होते. ती रात्र युगाप्रमाणे मोठी वाटत होती. सरता सरत नव्हती. राजांना श्रवणकुमाराचा पिता आंधळा तपस्वी याच्या शापाची आठवण आली. त्यांनी ती सर्व कथा कौसल्येला सांगितली.॥ २॥

मूल (चौपाई)

भयउ बिकल बरनत इतिहासा।
राम रहित धिग जीवन आसा॥
सो तनु राखि करब मैं काहा।
जेहिं न प्रेम पनु मोर निबाहा॥

अनुवाद (हिन्दी)

त्या घटनेचे वर्णन करता करता राजे व्याकूळ झाले आणि म्हणू लागले की, ‘श्रीरामाविना जगण्याच्या आशेचा धिक्कार असो. ज्याने आपल्या प्रेमाचा पण निभावून नेला नाही, ते शरीर ठेवून मी काय करू?॥ ३॥

मूल (चौपाई)

हा रघुनंदन प्रान पिरीते।
तुम्ह बिनु जिअत बहुत दिन बीते॥
हा जानकी लखन हा रघुबर।
हा पितु हित चित चातक जलधर॥

अनुवाद (हिन्दी)

हे रघुकुलाला आनंद देणाऱ्या माझ्या प्राणप्रिय रामा, तुझ्याविना जगून बरेच दिवस झाले. हे जानकी, लक्ष्मणा, हे रघुवीरा, हे पित्याच्या चित्तरूपी चातकाचे समाधान करणाऱ्या मेघांनो,’॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम राम कहि राम कहि राम राम कहि राम।
तनु परिहरि रघुबर बिरहँ राउ गयउ सुरधाम॥ १५५॥

अनुवाद (हिन्दी)

राम-राम म्हणत, पुन्हा राम म्हणत, पुन्हा राम-राम म्हणत आणि पुन्हा राम म्हणत श्रीरामांच्या विरहामुळे शरीराचा त्याग करून महाराज देवलोकी निघून गेले.॥ १५५॥

मूल (चौपाई)

जिअन मरन फलु दसरथ पावा।
अंड अनेक अमल जसु छावा॥
जिअतराम बिधु बदनु निहारा।
राम बिरह करि मरनु सँवारा॥

अनुवाद (हिन्दी)

जगण्याचे व मरण्याचे फल दशरथांना मिळाले. त्यांची निर्मल कीर्ती अनेक ब्रह्मांडांमध्ये पसरली. जिवात जीव असताना त्यांनी श्रीरामांचे चंद्रासमान मुख पाहिले आणि श्रीरामांच्या विरहाच्या निमित्ताने आपले मरण सार्थ केले.॥ १॥

मूल (चौपाई)

सोक बिकल सबरोवहिं रानी।
रूपु सीलु बलु तेजु बखानी॥
करहिं बिलाप अनेक प्रकारा।
परहिं भूमितल बारहिं बारा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व राण्या शोकामुळे व्याकूळ होऊन रडू लागल्या. राजाचे रूप, शील, बल आणि तेज यांचे वर्णन करीत करीत त्या अनेक प्रकारे विलाप करीत होत्या व जमिनीवर वारंवार लोळण घेत होत्या.॥ २॥

मूल (चौपाई)

बिलपहिं बिकल दास अरु दासी।
घर घर रुदनु करहिं पुरबासी॥
अँथयउ आजु भानुकुल भानू।
धरम अवधि गुन रूप निधानू॥

अनुवाद (हिन्दी)

दास-दासी व्याकूळ होऊन विलाप करीत होत्या. आणि नगरातील लोक घरोघरी रडत होते. ते म्हणत होते की, ‘आज धर्माची परिसीमा, गुण व रूपाचे भांडार असलेला सूर्यकुलाचा सूर्य मावळला.’॥ ३॥

मूल (चौपाई)

गारीं सकल कैकइहि देहीं।
नयन बिहीन कीन्ह जग जेहीं॥
एहिबिधि बिलपतरैनि बिहानी।
आए सकल महामुनि ग्यानी॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वजण कैकेयीला शिव्या देत होते. ‘तिने संपूर्ण जगाला डोळ्यांविना आंधळे करून टाकले.’ अशा प्रकारे विलाप करीत रात्र निघून गेली. प्रातःकाळी सर्व मोठमोठे ज्ञानी मुनी आले.॥ ४॥