४० भगवंताचे वरदान

दोहा

मूल (दोहा)

जानि सभय सुर भूमि सुनि बचन समेत सनेह।
गगनगिरा गंभीर भइ हरनि सोक संदेह॥ १८६॥

अनुवाद (हिन्दी)

देव आणि पृथ्वी भयभीत झाल्याचे पाहून आणि त्यांचे स्नेहयुक्त बोलणे ऐकून शोक व संदेह दूर करणारी गंभीर आकाशवाणी झाली.॥ १८६॥

मूल (चौपाई)

जनि डरपहु मुनि सिद्ध सुरेसा।
तुम्हहि लागि धरिहउँ नर बेसा॥
अंसन्ह सहित मनुज अवतारा।
लेहउँ दिनकर बंस उदारा॥

अनुवाद (हिन्दी)

‘हे मुनींनो, सिद्धांनो व देवाधिदेवांनो! घाबरू नका. तुमच्यासाठी मी मनुष्यरूप धारण करीन आणि पवित्र सूर्यवंशामध्ये आपल्या अंशांसह अवतार घेईन.॥ १॥

मूल (चौपाई)

कस्यप अदिति महातप कीन्हा।
तिन्ह कहुँ मैं पूरब बर दीन्हा॥
ते दसरथ कौसल्या रूपा।
कोसलपुरीं प्रगट नरभूपा॥

अनुवाद (हिन्दी)

कश्यप आणि अदिती यांनी मोठे तप केले होते. मी पूर्वीच त्यांना वर दिलेला आहे. तेच दशरथ आणि कौसल्या यांच्या रूपाने मनुष्यांचे राजा बनून अयोध्यापुरीत प्रकट झालेले आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

तिन्ह कें गृह अवतरिहउँ जाई।
रघुकुल तिलक सो चारिउ भाई॥
नारद बचन सत्य सब करिहउँ।
परम सक्ति समेत अवतरिहउँ॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांच्या घरी मी रघुकुलात श्रेष्ठ चार भावांच्या रूपाने अवतार घेईन. नारदांचे(शाप) वचन मी पूर्णपणे सत्य करीन आणि आपल्या पराशक्तीसह अवतार घेईन.॥ ३॥

मूल (चौपाई)

हरिहउँ सकल भूमि गरुआई।
निर्भय होहु देव समुदाई॥
गगन ब्रह्मबानी सुनि काना।
तुरत फिरे सुर हृदय जुड़ाना॥

अनुवाद (हिन्दी)

मी पृथ्वीचा सर्व भार हरण करीन. हे देववृंदांनो! तुम्ही निर्भय व्हा.’ आकाशात झालेली ही भगवंतांची वाणीे ऐकून देव लगेच परत गेले. त्यांचे मन संतुष्ट झाले.॥ ४॥

मूल (चौपाई)

तब ब्रह्माँ धरनिहि समुझावा।
अभय भई भरोस जियँ आवा॥

अनुवाद (हिन्दी)

मग ब्रह्मदेवांनी पृथ्वीला समजावून सांगितले. तीसुद्धा निर्भय झाली आणि तिला धीर आला.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

निज लोकहि बिरंचि गे देवन्ह इहइ सिखाइ।
बानर तनु धरि धरि महि हरि पद सेवहु जाइ॥ १८७॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व देवांना सांगितले की, ‘वानरांचे रूप घेऊन तुम्ही पृथ्वीवर जाऊन भगवंतांच्या चरणाची सेवा करा.’ असे म्हणून ब्रह्मदेव आपल्या लोकी परत गेले.॥ १८७॥

मूल (चौपाई)

गए देव सब निज निज धामा।
भूमि सहित मन कहुँ बिश्रामा॥
जो कछु आयसु ब्रह्माँ दीन्हा।
हरषे देव बिलंब न कीन्हा॥

अनुवाद (हिन्दी)

सर्व देव आपापल्या लोकी गेले. पृथ्वीसह सर्वांच्या मनाला शांती लाभली. ब्रह्मदेवांनी जी आज्ञा दिली, त्यामुळे देव फार प्रसन्न झाले आणि त्यांनी (तसे करण्यास) वेळ घालविला नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

बनचर देह धरी छिति माहीं।
अतुलित बल प्रताप तिन्ह पाहीं॥
गिरि तरु नख आयुध सब बीरा।
हरि मारग चितवहिं मतिधीरा॥

अनुवाद (हिन्दी)

देवांनी पृथ्वीवर वानरदेह धारण केले. त्यांच्यामध्ये अपार बळ आणि पराक्रम होता. सर्वजण शूर होते. पर्वत, वृक्ष व नखे हीच त्यांची शस्त्रे होती. ते सर्व धीरबुद्धीचे (वानररूप देव) भगवंतांच्या येण्याची वाट पाहू लागले.॥ २॥